23 जून 2017
भारतीय क्रिकेट टीम कोच आणि राष्ट्रपती निवडणूक
स्टीव्हन स्पिलबर्गच्या वा हॉलिवूडमधील चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स असते तेव्हा बहुतांशवेळी डायरेक्टर हा मध्यभागी असतो. त्याच्या आजूबाजुला मुव्हीतील मेन 'एक्टर्स' असतात मग ते कितीही मोठे स्टार्स असो. कारण मुव्ही ही पूर्णपणे 'डायरेक्टर' ची असते. पण आपल्याकडे असं नसतं .चित्रपटाच्या शेवटी लिहून येतं " इट्स ....(डिरेक्टर्स) फिल्म' पण सर्व सूत्र हे स्टारच्या हाती असतात.
कारण आपल्याकडे व्यक्ती महात्म्य खूप आहे. आपल्याला स्टार्स हवे असतात सतत, पूजायला,डोक्यावर बसवायला.
त्यांना आपणच नकळतपणे सर्व हक्क देत असतो.
कोहलीने जे कुंबळेसोबत केलं ते याच भारतीय वृत्तीमुळे.
कारण त्याला माहिती आहे तो स्टार आहे.
तो स्वतःची मनमानी करणार. त्याचा (टीम चा कॅप्टन असेलेला)आभाळाएव्हढा अहंकार भारतीय मानसिकतेमुळे वाढलेला आहे.
एकंदरीतच भारतीय कोच हा #राष्ट्रपती सारखा असतो. अधिकार कागदावर भरपूर असतात. पण त्याने ते वापरावे हे त्याच्याकडून 'अभिप्रेत' कोणालाही नसतं.
त्याला पंतप्रधानाच्या कलेने राहायचं असतं. आणि आपलं पद भूषवायचं असतं.
आणि टीमचा पंतप्रधानाच्या, टीमच्या कॅप्टनच्या मर्जीतीलच कोच असावा अशी त्याची अपेक्षा असते.
भारतीय क्रिकेट टीम चा कॅप्टन आणि भारतीय राष्ट्रपती निवडणूक यात बरंच साम्य असतं. कार्य पद्धतीनुसार..
मुळात भारतीय क्रिकेट मध्ये एकंदरीतच आशियाई क्रिकेट मध्ये कोच कल्चरच नाही आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये फक्त होयबा होयबा करणारेच कोच यशस्वी होतात. म्हणजे त्याना यशस्वी किताब 'दिला' जातो. गॅरी कर्स्टर्नने हेच केलं होतं. त्याला ग्रेग चॅपल ची झालेली अवस्था, प्रकरण माहिती होतं, त्याने पूर्ण होमवर्क केला होता. म्हणून यशस्वी झाला. ठरवला गेला.
त्यापूर्वी अंशुमन गायकवाड ही असाच यशस्वी ठरवला गेला.
आपल्याकडे कोच हा नावानेच असतो. कॅप्टन ला तो नावानेच असायला हवा असतो. त्याने कॅप्टनच्या मनाप्रमाणे किमान कॅप्टनच्याच हातात सर्व सूत्र असावेत , कोच ने फक्त आपलं लॅपटॉप वरती काम करावे, नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करावं आणि कॅप्टनला काही गोष्टी 'सुचवाव्यात' .
बदल्यात बीसीसीआय कडून प्रचंड मोठी रक्कम घेत राहावी. भारतीय कोच असण्याचे मनाचे पद मिरवावे, टीम ला कॅप्टन पूर्ण मोकळीक द्यावी. ही भारतीय क्रिकेटची आदर्श कार्यप्रणाली असते.
जेव्हा जेव्हा कोच हा स्वतंत्र्य बाण्याचा असतो तेव्हा तेव्हा अडचणी होतातच. हा आजवरचा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या अत्यन्त व्यावसायिक खेळाचे बाळकडू प्यायलेला ग्रेग चॅपल असो की मग आता 100% देणारा अनिल कुंबळे असो हे कोच भारतीय मानसिकतेला मानवतच नाही. ही एकंदरीतच आशियाई मानसिकता आहे. पाकिस्तान टीम लाही आफ्रिकेचा बॉब वूलमर मानवला नव्हता.
कारण टीम चा कॅप्टन हाच प्रमुख असतो. त्याचा अहंकार आभाळाहुन मोठा असतो.
परंतु याचीच एक दुसरी बाजू . आपल्याकडे अपयशासाठी सर्वप्रथम आणि संपूर्ण दोष कॅप्टनलाच दिला जातो. टीम अपयशी ठरू लागली की प्रथम कॅप्टनलाच जाब विचारला जातो आणि राजीनाम्याची मागणी केली जाते.
तेव्हा कॅप्टनला सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हव्या असतील तर काय बिघडले?
प्रत्येक भारतीय कॅप्टन हा आपली मनमानी करतो हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या मर्जीतील 'स्टाफ' त्याला हवा असतो. अशी मनमानी गांगुलीने केली, धोनीने प्रचंड केली, फक्त तो मुरलेला राजकारणी असल्याने कोल्ड किलर असल्याने, तो गाजावाजा करीत नाही. आणि आता विराट कोहली करतोय.
यात नवीन काहीच नाही.
अनिल कुंबळे हा अत्यन्त समंजस, आणि 100 % देणारा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे हे ट्रॅफिक हवालदार असते तरी त्यांनी तेही काम शंभर टक्के पूर्ण मनापासून केलं असतं.
अनिल कुंब्लेशी कोहलीने जमवून ,जुळवून घ्यायला हवं होतं., असं सर्व म्हणतात. त्याने का जुळवून घ्यावं? ते काय एकमेकांसोबत संसार करताय? की रेल्वेतील सीट शेअर करताय!
विराट कोहली हा ऍक्टिव्ह खेळाडू आणि कॅप्टन आहे. तो पूर्णपणे भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे.आणि आपल्या पारंपरिक मानसिकतेप्रमाणे स्टार आहे सर्व यशापयाशचं खापर त्याच्यावर फोडलं जाणार आहे. मग त्याने त्याला हवं तसा स्टाफ मागितला , वा निषेध नोंदवला तर काय चुकले!
आणि हा अवास्तव हक्क आपणच त्याला दिला आहे. जो आपण सर्व स्टार्स ना देतो.मग ते क्रिकेटर्स असो वा सिनेस्टार्स! कारण आपल्याकडे टीम वर्क पेक्षा स्टार वर्क करतो.
कुंबळे हा कोच म्हणून चांगला किंवा वाईट असेल तो भाग वेगळा.पण मुळात कोच ला प्रत्यक्षरित्या जबाबदार धरल्या जात नाही. त्यामुळे कुंबळे ने राजीनामा दिला हा त्याचा स्वाभिमान झालाच पण तेच योग्यही होतं.
पण आपल्याच व्यक्ती महात्म्य मानसिकतेमुळे अनिल कुंबळे चा बळी गेला आहे. यासाठी सर्वच जबाबदार आहेत.
पण आता ही मानसिकता आहे ते आहे. ती आपल्या जीवनारणीचा भाग आहे. ती रात्रीतून बदलू शकत नाही.
भारताचं नशीब आहे की भारताकडे विराट कोहली आहे. त्याच्यासारखा मग्रूर, जिद्दी आणि स्वतःच्या खेळाबाबत परिपक्व असलेला , आणि निसर्ग नियमप्रमाणे पाण्याचा प्रवाह नेहमी समोरच जात असतो , त्यानुसार आधीच्या टॅलेंट पेक्ष समोरच्या पिढीत गुणवत्ता वाढलेली दिसत असते.त्यानुसार सचिन तेंडुलकरपेक्षाही तो आता गुणवत्तेच्या बाबतीत काकणभर समोर आहे. भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा 'स्टार' यशस्वी खेळाडू तो असणार आहे.
पण यासगळ्यात स्वतःच मत असलेल्या कोच चा, साईड स्टाफ चा बळी जात राहणार हे ही सत्य. आणि याला विराट कोहली वा पुढे निर्माण होणारे स्टार्स जबाबदार नाहीत, नसतील त्यासाठी आपलीच भारतीय मान#sickता जबाबदार आहे.
- अभिजित दिलीप पानसे
( सेहवाग ने ट्विटरच्या शब्दांपेक्षही कमी शब्दात कोचचा अर्ज भरल्याने त्याचा अहंकार इथेच दिसून येतो. त्यामुळे सेहवाग हा एकेकाळचा स्टार भारतीय क्रिकेट टीमचा कोच व्हावा ही सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींची इच्छा असुनही कोहलीकडे बघता टीम मध्ये दोन गुंडे राहू शकत नाही. त्यामुळे सेहवाग कोच म्हणून कितीही ग्लॅमरस वाटत असला तरी कुंबळे प्रकरणावरून आता सेहवाग कोच होण्याची शक्यता मावळली आहे.)
भारतीय क्रिकेट टीम कोच आणि राष्ट्रपती निवडणूक
स्टीव्हन स्पिलबर्गच्या वा हॉलिवूडमधील चित्रपटाची प्रेस कॉन्फरन्स असते तेव्हा बहुतांशवेळी डायरेक्टर हा मध्यभागी असतो. त्याच्या आजूबाजुला मुव्हीतील मेन 'एक्टर्स' असतात मग ते कितीही मोठे स्टार्स असो. कारण मुव्ही ही पूर्णपणे 'डायरेक्टर' ची असते. पण आपल्याकडे असं नसतं .चित्रपटाच्या शेवटी लिहून येतं " इट्स ....(डिरेक्टर्स) फिल्म' पण सर्व सूत्र हे स्टारच्या हाती असतात.
कारण आपल्याकडे व्यक्ती महात्म्य खूप आहे. आपल्याला स्टार्स हवे असतात सतत, पूजायला,डोक्यावर बसवायला.
त्यांना आपणच नकळतपणे सर्व हक्क देत असतो.
कोहलीने जे कुंबळेसोबत केलं ते याच भारतीय वृत्तीमुळे.
कारण त्याला माहिती आहे तो स्टार आहे.
तो स्वतःची मनमानी करणार. त्याचा (टीम चा कॅप्टन असेलेला)आभाळाएव्हढा अहंकार भारतीय मानसिकतेमुळे वाढलेला आहे.
एकंदरीतच भारतीय कोच हा #राष्ट्रपती सारखा असतो. अधिकार कागदावर भरपूर असतात. पण त्याने ते वापरावे हे त्याच्याकडून 'अभिप्रेत' कोणालाही नसतं.
त्याला पंतप्रधानाच्या कलेने राहायचं असतं. आणि आपलं पद भूषवायचं असतं.
आणि टीमचा पंतप्रधानाच्या, टीमच्या कॅप्टनच्या मर्जीतीलच कोच असावा अशी त्याची अपेक्षा असते.
भारतीय क्रिकेट टीम चा कॅप्टन आणि भारतीय राष्ट्रपती निवडणूक यात बरंच साम्य असतं. कार्य पद्धतीनुसार..
मुळात भारतीय क्रिकेट मध्ये एकंदरीतच आशियाई क्रिकेट मध्ये कोच कल्चरच नाही आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये फक्त होयबा होयबा करणारेच कोच यशस्वी होतात. म्हणजे त्याना यशस्वी किताब 'दिला' जातो. गॅरी कर्स्टर्नने हेच केलं होतं. त्याला ग्रेग चॅपल ची झालेली अवस्था, प्रकरण माहिती होतं, त्याने पूर्ण होमवर्क केला होता. म्हणून यशस्वी झाला. ठरवला गेला.
त्यापूर्वी अंशुमन गायकवाड ही असाच यशस्वी ठरवला गेला.
आपल्याकडे कोच हा नावानेच असतो. कॅप्टन ला तो नावानेच असायला हवा असतो. त्याने कॅप्टनच्या मनाप्रमाणे किमान कॅप्टनच्याच हातात सर्व सूत्र असावेत , कोच ने फक्त आपलं लॅपटॉप वरती काम करावे, नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करावं आणि कॅप्टनला काही गोष्टी 'सुचवाव्यात' .
बदल्यात बीसीसीआय कडून प्रचंड मोठी रक्कम घेत राहावी. भारतीय कोच असण्याचे मनाचे पद मिरवावे, टीम ला कॅप्टन पूर्ण मोकळीक द्यावी. ही भारतीय क्रिकेटची आदर्श कार्यप्रणाली असते.
जेव्हा जेव्हा कोच हा स्वतंत्र्य बाण्याचा असतो तेव्हा तेव्हा अडचणी होतातच. हा आजवरचा इतिहास आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या अत्यन्त व्यावसायिक खेळाचे बाळकडू प्यायलेला ग्रेग चॅपल असो की मग आता 100% देणारा अनिल कुंबळे असो हे कोच भारतीय मानसिकतेला मानवतच नाही. ही एकंदरीतच आशियाई मानसिकता आहे. पाकिस्तान टीम लाही आफ्रिकेचा बॉब वूलमर मानवला नव्हता.
कारण टीम चा कॅप्टन हाच प्रमुख असतो. त्याचा अहंकार आभाळाहुन मोठा असतो.
परंतु याचीच एक दुसरी बाजू . आपल्याकडे अपयशासाठी सर्वप्रथम आणि संपूर्ण दोष कॅप्टनलाच दिला जातो. टीम अपयशी ठरू लागली की प्रथम कॅप्टनलाच जाब विचारला जातो आणि राजीनाम्याची मागणी केली जाते.
तेव्हा कॅप्टनला सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हव्या असतील तर काय बिघडले?
प्रत्येक भारतीय कॅप्टन हा आपली मनमानी करतो हा आजवरचा इतिहास आहे. आपल्या मर्जीतील 'स्टाफ' त्याला हवा असतो. अशी मनमानी गांगुलीने केली, धोनीने प्रचंड केली, फक्त तो मुरलेला राजकारणी असल्याने कोल्ड किलर असल्याने, तो गाजावाजा करीत नाही. आणि आता विराट कोहली करतोय.
यात नवीन काहीच नाही.
अनिल कुंबळे हा अत्यन्त समंजस, आणि 100 % देणारा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे हे ट्रॅफिक हवालदार असते तरी त्यांनी तेही काम शंभर टक्के पूर्ण मनापासून केलं असतं.
अनिल कुंब्लेशी कोहलीने जमवून ,जुळवून घ्यायला हवं होतं., असं सर्व म्हणतात. त्याने का जुळवून घ्यावं? ते काय एकमेकांसोबत संसार करताय? की रेल्वेतील सीट शेअर करताय!
विराट कोहली हा ऍक्टिव्ह खेळाडू आणि कॅप्टन आहे. तो पूर्णपणे भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे.आणि आपल्या पारंपरिक मानसिकतेप्रमाणे स्टार आहे सर्व यशापयाशचं खापर त्याच्यावर फोडलं जाणार आहे. मग त्याने त्याला हवं तसा स्टाफ मागितला , वा निषेध नोंदवला तर काय चुकले!
आणि हा अवास्तव हक्क आपणच त्याला दिला आहे. जो आपण सर्व स्टार्स ना देतो.मग ते क्रिकेटर्स असो वा सिनेस्टार्स! कारण आपल्याकडे टीम वर्क पेक्षा स्टार वर्क करतो.
कुंबळे हा कोच म्हणून चांगला किंवा वाईट असेल तो भाग वेगळा.पण मुळात कोच ला प्रत्यक्षरित्या जबाबदार धरल्या जात नाही. त्यामुळे कुंबळे ने राजीनामा दिला हा त्याचा स्वाभिमान झालाच पण तेच योग्यही होतं.
पण आपल्याच व्यक्ती महात्म्य मानसिकतेमुळे अनिल कुंबळे चा बळी गेला आहे. यासाठी सर्वच जबाबदार आहेत.
पण आता ही मानसिकता आहे ते आहे. ती आपल्या जीवनारणीचा भाग आहे. ती रात्रीतून बदलू शकत नाही.
भारताचं नशीब आहे की भारताकडे विराट कोहली आहे. त्याच्यासारखा मग्रूर, जिद्दी आणि स्वतःच्या खेळाबाबत परिपक्व असलेला , आणि निसर्ग नियमप्रमाणे पाण्याचा प्रवाह नेहमी समोरच जात असतो , त्यानुसार आधीच्या टॅलेंट पेक्ष समोरच्या पिढीत गुणवत्ता वाढलेली दिसत असते.त्यानुसार सचिन तेंडुलकरपेक्षाही तो आता गुणवत्तेच्या बाबतीत काकणभर समोर आहे. भारतीय क्रिकेटचा पुढचा मोठा 'स्टार' यशस्वी खेळाडू तो असणार आहे.
पण यासगळ्यात स्वतःच मत असलेल्या कोच चा, साईड स्टाफ चा बळी जात राहणार हे ही सत्य. आणि याला विराट कोहली वा पुढे निर्माण होणारे स्टार्स जबाबदार नाहीत, नसतील त्यासाठी आपलीच भारतीय मान#sickता जबाबदार आहे.
- अभिजित दिलीप पानसे
( सेहवाग ने ट्विटरच्या शब्दांपेक्षही कमी शब्दात कोचचा अर्ज भरल्याने त्याचा अहंकार इथेच दिसून येतो. त्यामुळे सेहवाग हा एकेकाळचा स्टार भारतीय क्रिकेट टीमचा कोच व्हावा ही सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींची इच्छा असुनही कोहलीकडे बघता टीम मध्ये दोन गुंडे राहू शकत नाही. त्यामुळे सेहवाग कोच म्हणून कितीही ग्लॅमरस वाटत असला तरी कुंबळे प्रकरणावरून आता सेहवाग कोच होण्याची शक्यता मावळली आहे.)
No comments:
Post a Comment