ट्रॅपड TRAPPED
घराचा प्रमुख दरवाजा हवं तेव्हा उघडता बंद करता येणे,प्रवेश करणे बाहेर जाणे या खूपच शुल्लक आणि नेहमीच्या गोष्टी आहेत आणि अति परिचयात गोष्टीचं महत्व नसते. कृतज्ञतेची भावना तर नसतेच. जेव्हा हे स्वातंत्र्यच अडचणीत येतं तेव्हा EXIT' फलकाचं महत्व कळतं.बाहेर पडायला प्रयत्न सुरु होतात कारण स्वातंत्र्य हे 'बेसिक इन्स्टीन्क्ट "आहे.
त्यातही जेव्हा आयुष्यवर घाला घालणारं पारतंत्र्य ओढवलं असल्यास मग जगण्यासाठी व्यक्ती त्यालाही परिचित नसलेल्या त्याच्या सर्व मर्यादा पार करू लागते.शक्य अशक्यतेचे परीघ लांघण्यास मुसंडी मारण्यास प्रवृत्त होऊ लागते.
मुंबई सारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरातील, कोणीही राहात नसलेल्या, वीज, अन्न ,पाणी नसलेल्या तीस मजले उंच एका इमारतीत फ्लॅटमध्ये अडकलेल्या माणसाच्या बाहेर पडण्यासाठी , जगण्यासाठीच्या धडपडीची ही गोष्ट आहे.
स्वातंत्र्य , जीवन समोर डोळ्यांनी समोर दिसत असतं पण ते मिळवणं कुवतीच्या बाहेर गेलेलं असतं.हेच जास्त क्लेशकारक असतं. भर समुद्रात वा एकाकी बेटावर अडकल्यावर मनाला किमान कोणाची मदत मिळणार नाही ही स्पष्ट जाणीव असते.पण दृष्टीसमोर जगरहाटी दिसत असताना शक्य अशक्यतेचा, आशा निराशेचा हिंदळणारा लोलक मनाला विदीर्ण करत जातो.
विक्रमादित्य मोटवानीने 'उडान'आणि 'लुटेरा' हे क्लासिक्स दिलेत. ट्रॅप्ड द्वारे त्याची हॅट्रीक झाली आहे. समांतर आणि कमर्शिअल ची सांगड घालणारे जे शुजीत सरकार, सुजॉय घोष, दिबाकर बॅनर्जी इ.जे दिग्दर्शक आहेत त्यातील हा एक.
राजकुमार राव काय चीज आहे हे काही कोडं आता राहिलं नाही .ट्रॅप्डचा संपूर्ण भार त्याने एकट्याने पेलून अलिगढ, सिटीलाईट्स नंतर आणखी जबरदस्त अभिनयाची ट्रीट दिली आहे.
त्याची उंदरांची भीती, होणारे भास , भूक तहान यात तो एकटाच न अडकता प्रेक्षकाही सोबत ओढतो.
"सर्वायवल इन्स्टिक्ट' ची त्याची धडपड त्याची एकट्याची उरत नाही.
आणि प्रेक्षकाला वाटत राहतं हे जर माझ्यासोबत घडलं तर!आणि ते घडुही 'शकतं' हा अंतर्मनात हळूच शिरलेला विचार प्रेक्षकाला सतावतो, अस्वस्थ करतो, विचार कऱयाला लावतो..आणि शेवटी अतिपरिचयातील शुल्लक गोष्टीसाठी सतर्कता आणि कृतज्ञता बाळगायला लावतो हेच दिग्दर्शकाचं , अभिनेत्याचं आणि चित्रपटाचं यश आहे.
-अभिजित पानसे
घराचा प्रमुख दरवाजा हवं तेव्हा उघडता बंद करता येणे,प्रवेश करणे बाहेर जाणे या खूपच शुल्लक आणि नेहमीच्या गोष्टी आहेत आणि अति परिचयात गोष्टीचं महत्व नसते. कृतज्ञतेची भावना तर नसतेच. जेव्हा हे स्वातंत्र्यच अडचणीत येतं तेव्हा EXIT' फलकाचं महत्व कळतं.बाहेर पडायला प्रयत्न सुरु होतात कारण स्वातंत्र्य हे 'बेसिक इन्स्टीन्क्ट "आहे.
त्यातही जेव्हा आयुष्यवर घाला घालणारं पारतंत्र्य ओढवलं असल्यास मग जगण्यासाठी व्यक्ती त्यालाही परिचित नसलेल्या त्याच्या सर्व मर्यादा पार करू लागते.शक्य अशक्यतेचे परीघ लांघण्यास मुसंडी मारण्यास प्रवृत्त होऊ लागते.
मुंबई सारख्या कधीही न झोपणाऱ्या शहरातील, कोणीही राहात नसलेल्या, वीज, अन्न ,पाणी नसलेल्या तीस मजले उंच एका इमारतीत फ्लॅटमध्ये अडकलेल्या माणसाच्या बाहेर पडण्यासाठी , जगण्यासाठीच्या धडपडीची ही गोष्ट आहे.
स्वातंत्र्य , जीवन समोर डोळ्यांनी समोर दिसत असतं पण ते मिळवणं कुवतीच्या बाहेर गेलेलं असतं.हेच जास्त क्लेशकारक असतं. भर समुद्रात वा एकाकी बेटावर अडकल्यावर मनाला किमान कोणाची मदत मिळणार नाही ही स्पष्ट जाणीव असते.पण दृष्टीसमोर जगरहाटी दिसत असताना शक्य अशक्यतेचा, आशा निराशेचा हिंदळणारा लोलक मनाला विदीर्ण करत जातो.
विक्रमादित्य मोटवानीने 'उडान'आणि 'लुटेरा' हे क्लासिक्स दिलेत. ट्रॅप्ड द्वारे त्याची हॅट्रीक झाली आहे. समांतर आणि कमर्शिअल ची सांगड घालणारे जे शुजीत सरकार, सुजॉय घोष, दिबाकर बॅनर्जी इ.जे दिग्दर्शक आहेत त्यातील हा एक.
राजकुमार राव काय चीज आहे हे काही कोडं आता राहिलं नाही .ट्रॅप्डचा संपूर्ण भार त्याने एकट्याने पेलून अलिगढ, सिटीलाईट्स नंतर आणखी जबरदस्त अभिनयाची ट्रीट दिली आहे.
त्याची उंदरांची भीती, होणारे भास , भूक तहान यात तो एकटाच न अडकता प्रेक्षकाही सोबत ओढतो.
"सर्वायवल इन्स्टिक्ट' ची त्याची धडपड त्याची एकट्याची उरत नाही.
आणि प्रेक्षकाला वाटत राहतं हे जर माझ्यासोबत घडलं तर!आणि ते घडुही 'शकतं' हा अंतर्मनात हळूच शिरलेला विचार प्रेक्षकाला सतावतो, अस्वस्थ करतो, विचार कऱयाला लावतो..आणि शेवटी अतिपरिचयातील शुल्लक गोष्टीसाठी सतर्कता आणि कृतज्ञता बाळगायला लावतो हेच दिग्दर्शकाचं , अभिनेत्याचं आणि चित्रपटाचं यश आहे.
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment