प्रवासवर्णन अंतीमभाग
सर्वांग ठणकत असताना वैष्णवी देवी दर्शन झाल्यावर दर्शन मी खाली बसणार तर भैरवनाथ शिखरला जायचं आठवल्याने तिकडे निघालो.हा खडा तीन किमी चा रस्ता सरळसोट ६ किमी रस्त्याच्या बरोबर आहे. संपुर्णपणे शरीर पिळवटुन टाकतो.
पोळ्यातील बैलासारखा नाकाने फुस फुस करत दम टाकत शेवटी एकदाचा शिखरावर जाउन पोहचलो!आणि जे अप्रतीम दृश्य दिसलं ते शब्दातीत होतं.
खाली कटरा गावातुन चालणं सुरू करताना वर उंचच उंच पर्वत शिखरे दिसतात ,ते या भैरवशिखरावर आल्यावर व्यक्तीच्या डोळ्यांच्या समांतर येतात.तिथुन संपुर्ण परिसर दृष्टीपथात येतो.पलिकडे काश्मिर खोऱ्याकडे जाणारे डोंगर..अलिकडे कटरा गाव..वाहणारी नदी.आजूबाजूला जंगल..जिकडे बघावं तिकडे पर्वत माळा..लोकांचे कँमेरे सरसावु लागतात.त्या अजस्त्र पर्वतमाळांना आपल्या प्रमाणेच क्षुद्र कँमेरात चित्रबंद करू पाहण्यासाठी!.
भैरवनाथाचं दर्शन घेतलं .दुपारचे साडे पाच वाजले होते. माझा संकल्प पुर्ण झाला होता.आणि मी माझ्या पायांना ,पाठीला,शरीराला,शरीराच्या आतील चैतन्याला धन्यवाद म्हणत जमिनीला कृतज्ञतेच्या भावनेतुन नमस्कार करून एकदाचा खाली बसलो.
हुश्श....!! खुप खुप बरं वाटलं.आराम मिळाला.
सुर्यास्त होउ लागला.नागमोडी वाहणारी नदी क्षितिजाला स्पर्शत होती तिथेच सुर्य ही विसावत होता.जणु भगव्या सुर्यबिंबातून नदी उगम पावतेय भासत होतं.
पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेण्यात मग्न होती.त्यामुळे काही क्षणात सुर्य दिसेनासा झाला.
या जागेवरून सूर्योदय ही खूप सुंदर असा विचार मनात आला.
सुर्यास्त झाला तशी अचानक इतक्या वेगाने थंडी वाढली की सहन करणं अशक्य होउन बसलं.खाली वैष्णो देवीचं मंदीर लाईट्स ने उजाळुन उठलं होतं.तिथुन नमस्कार करुन मी पळत खाली निघालो.
उतरत्या रस्त्यावर सलग १८ किमी एका लयीत धावत खाली उतरलो.जेव्हा त्या गल्लीबोळातील हॉटेल शोधुन काढत बँग उचलुन बाहेर आलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.फक्त दोन ते अडीच तासात मी न थांबता धावत पोहचलो होतो.
पुन्हा काही खाण्यासाठी परत त्याच हॉटेलला गेलो तो सकाळचाच दाक्षिणात्य मॅनेजर भेटला. त्याला वाटलं त्याने सांगितल्या प्रमाणे मी आता निघतोय वरती चालायला..
त्याला जेव्हा कळलं मी दर्शन करून परत ही आलोय तेव्हा खूप आश्चर्यचकित झाला.
बाहेर येऊन बघितलं तर अजून एक सुखद धक्का चौकात हरियाणा सरकारची कटरा ते दिल्ली बस लागलेली होती.पूर्ण बस रिकामी आणि स्वच्छ होती. सकाळी 10 ला पोहचलो होतो आणि रात्री 10 ला 30 किमी चालत दर्शन आटोपून परत ही निघालो होतो.
मी निवांत पूर्ण सीटवर झोपलो.जाग आली ती सकाळी हालचाल जाणवल्याने.मी उठून बसलो तर बघितलं संपूर्ण बस सरदारजींनी भरलेली होती.
काही लोक उभेही होते!पण कोणीही मला उठवलं नव्हतं.मला फार अवघडल्यासारखं वाटलं.बाहेर बघितलं, संपुर्ण रस्ता धुक्याने दिसेनासा झाला होता.स्वच्छ काळाशार NH1 वरून वेगाने बस आणि इतर गाड्या जात होत्या. अंबाला नुकतंच सोडलं होत.दुपारी 1 वाजता दिल्ली काश्मिरी गेट बस स्टॅन्डला बस थांबली .आणि पहिल्या वहिल्या उत्तरेकडील प्रवासाचा शेवट झाला.
त्याच्या पुढच्या वर्षी 13 फेब ला पुन्हा एकदा वैष्णो देवीला जाण्याचा योग आला. दोन दिवसांनी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच होती.यावेळी कटराला ओळख झालेल्या दिल्लीच्या 2 मुलींसोबत संपूर्ण ट्रेक झाला.मागच्या वेळी सकाळी चालत गेलो असल्याने यावेळी रात्री चालण्याच ठरवलं होतं.
उत्तरेकडील थंडी हुकूमशाहा असते तिच्यापुढे झुकावंच लागतं. हे पहिल्यांदा अनुभवलं.अंगावर तीन तीन जॅकेट्स असूनही ते बर्फासारखे थंड पडले होते.रात्रभर आम्ही चालत होतो.काही किमी तर संपुर्ण रस्त्यावर फक्त आम्ही तिघेच होतो!रात्री 2 वाजता मंदिरापशी पोचलो.
यावेळी आश्चर्यचा मोठा सुखद धक्का बसला.मूळगुफेचा रस्ता उघडा केला होता. मला इतका प्रचंड आनंद झाला होता की मागच्या लोकांना की पुढे जाऊ दिलं आणि मी एका ठिकाणी उभा राहून संपूर्ण गुफा काहीवेळ न्याहाळत राहिलो!!खूप सुंदर पिवळ्या दगडाची गुफा आहे.खाली बर्फासारखं गार पाणी!वैष्णवी मातेचं दर्शन झालं!मागच्या वेळीची गुफेतून जाण्याची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती.
बाहेर येऊन पाय जोड्यांमध्ये घालेपर्यत आपल्यला पाय आहेत याचा विसर पडला होता इतके थंडीने बधीर झाले होते!
काहीजागी उबेसाठी धगधगते निखारे मोठ्या भांड्यात ठेवले होते.लोक तिथे हात पाय शेकत होते.
आम्ही सकाळची वाट न बघता भैरवनाथ ला निघालो.गुफेतून दर्शन झाल्याने उत्साह संचारला होता.रस्त्यात मुद्दामून त्या हरियाणवी ऍक्सेन्ट मध्ये गंमती सांगत आम्ही चाललो होतो. सोनम ही मूळची हरियाणाची असल्याने ऑनर किलिंग च्या खऱ्या गोष्टी सांगितल्या. हिंदी मुविज मराठी ऍक्टर्स..मुविज यावर ही मी बोललो.
त्यांना तीन चार मराठी वाक्य बोलायला लावलेच!!
मग सोडतो की काय!!!!
भैरवनाथ ला पहाटे पाच वाजता पोचलो! रस्त्यात बरेच ठिकाणी खूप बर्फ पडला होता!
तिथेही निखाऱ्यांची सोय केली होती.जेथुन आधीच्या वर्षी सूर्यास्त बघितला होता.त्याच जागेवरून पलीकडच्या शिखराआडून पुढच्याच वर्षी 14 फेब्रुवारीला सुंदर सूर्योदय बघितला!
सूर्य पूर्व क्षितिजावर प्रकट होत होता.
सूर्याच्या केशरी किरणांनी संपुर्ण खोरं ..पर्वत शिखरे न्हाऊन निघाले होते..
(समाप्त)
सर्वांग ठणकत असताना वैष्णवी देवी दर्शन झाल्यावर दर्शन मी खाली बसणार तर भैरवनाथ शिखरला जायचं आठवल्याने तिकडे निघालो.हा खडा तीन किमी चा रस्ता सरळसोट ६ किमी रस्त्याच्या बरोबर आहे. संपुर्णपणे शरीर पिळवटुन टाकतो.
पोळ्यातील बैलासारखा नाकाने फुस फुस करत दम टाकत शेवटी एकदाचा शिखरावर जाउन पोहचलो!आणि जे अप्रतीम दृश्य दिसलं ते शब्दातीत होतं.
खाली कटरा गावातुन चालणं सुरू करताना वर उंचच उंच पर्वत शिखरे दिसतात ,ते या भैरवशिखरावर आल्यावर व्यक्तीच्या डोळ्यांच्या समांतर येतात.तिथुन संपुर्ण परिसर दृष्टीपथात येतो.पलिकडे काश्मिर खोऱ्याकडे जाणारे डोंगर..अलिकडे कटरा गाव..वाहणारी नदी.आजूबाजूला जंगल..जिकडे बघावं तिकडे पर्वत माळा..लोकांचे कँमेरे सरसावु लागतात.त्या अजस्त्र पर्वतमाळांना आपल्या प्रमाणेच क्षुद्र कँमेरात चित्रबंद करू पाहण्यासाठी!.
भैरवनाथाचं दर्शन घेतलं .दुपारचे साडे पाच वाजले होते. माझा संकल्प पुर्ण झाला होता.आणि मी माझ्या पायांना ,पाठीला,शरीराला,शरीराच्या आतील चैतन्याला धन्यवाद म्हणत जमिनीला कृतज्ञतेच्या भावनेतुन नमस्कार करून एकदाचा खाली बसलो.
हुश्श....!! खुप खुप बरं वाटलं.आराम मिळाला.
सुर्यास्त होउ लागला.नागमोडी वाहणारी नदी क्षितिजाला स्पर्शत होती तिथेच सुर्य ही विसावत होता.जणु भगव्या सुर्यबिंबातून नदी उगम पावतेय भासत होतं.
पृथ्वी स्वतःभोवती गिरकी घेण्यात मग्न होती.त्यामुळे काही क्षणात सुर्य दिसेनासा झाला.
या जागेवरून सूर्योदय ही खूप सुंदर असा विचार मनात आला.
सुर्यास्त झाला तशी अचानक इतक्या वेगाने थंडी वाढली की सहन करणं अशक्य होउन बसलं.खाली वैष्णो देवीचं मंदीर लाईट्स ने उजाळुन उठलं होतं.तिथुन नमस्कार करुन मी पळत खाली निघालो.
उतरत्या रस्त्यावर सलग १८ किमी एका लयीत धावत खाली उतरलो.जेव्हा त्या गल्लीबोळातील हॉटेल शोधुन काढत बँग उचलुन बाहेर आलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते.फक्त दोन ते अडीच तासात मी न थांबता धावत पोहचलो होतो.
पुन्हा काही खाण्यासाठी परत त्याच हॉटेलला गेलो तो सकाळचाच दाक्षिणात्य मॅनेजर भेटला. त्याला वाटलं त्याने सांगितल्या प्रमाणे मी आता निघतोय वरती चालायला..
त्याला जेव्हा कळलं मी दर्शन करून परत ही आलोय तेव्हा खूप आश्चर्यचकित झाला.
बाहेर येऊन बघितलं तर अजून एक सुखद धक्का चौकात हरियाणा सरकारची कटरा ते दिल्ली बस लागलेली होती.पूर्ण बस रिकामी आणि स्वच्छ होती. सकाळी 10 ला पोहचलो होतो आणि रात्री 10 ला 30 किमी चालत दर्शन आटोपून परत ही निघालो होतो.
मी निवांत पूर्ण सीटवर झोपलो.जाग आली ती सकाळी हालचाल जाणवल्याने.मी उठून बसलो तर बघितलं संपूर्ण बस सरदारजींनी भरलेली होती.
काही लोक उभेही होते!पण कोणीही मला उठवलं नव्हतं.मला फार अवघडल्यासारखं वाटलं.बाहेर बघितलं, संपुर्ण रस्ता धुक्याने दिसेनासा झाला होता.स्वच्छ काळाशार NH1 वरून वेगाने बस आणि इतर गाड्या जात होत्या. अंबाला नुकतंच सोडलं होत.दुपारी 1 वाजता दिल्ली काश्मिरी गेट बस स्टॅन्डला बस थांबली .आणि पहिल्या वहिल्या उत्तरेकडील प्रवासाचा शेवट झाला.
त्याच्या पुढच्या वर्षी 13 फेब ला पुन्हा एकदा वैष्णो देवीला जाण्याचा योग आला. दोन दिवसांनी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मॅच होती.यावेळी कटराला ओळख झालेल्या दिल्लीच्या 2 मुलींसोबत संपूर्ण ट्रेक झाला.मागच्या वेळी सकाळी चालत गेलो असल्याने यावेळी रात्री चालण्याच ठरवलं होतं.
उत्तरेकडील थंडी हुकूमशाहा असते तिच्यापुढे झुकावंच लागतं. हे पहिल्यांदा अनुभवलं.अंगावर तीन तीन जॅकेट्स असूनही ते बर्फासारखे थंड पडले होते.रात्रभर आम्ही चालत होतो.काही किमी तर संपुर्ण रस्त्यावर फक्त आम्ही तिघेच होतो!रात्री 2 वाजता मंदिरापशी पोचलो.
यावेळी आश्चर्यचा मोठा सुखद धक्का बसला.मूळगुफेचा रस्ता उघडा केला होता. मला इतका प्रचंड आनंद झाला होता की मागच्या लोकांना की पुढे जाऊ दिलं आणि मी एका ठिकाणी उभा राहून संपूर्ण गुफा काहीवेळ न्याहाळत राहिलो!!खूप सुंदर पिवळ्या दगडाची गुफा आहे.खाली बर्फासारखं गार पाणी!वैष्णवी मातेचं दर्शन झालं!मागच्या वेळीची गुफेतून जाण्याची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती.
बाहेर येऊन पाय जोड्यांमध्ये घालेपर्यत आपल्यला पाय आहेत याचा विसर पडला होता इतके थंडीने बधीर झाले होते!
काहीजागी उबेसाठी धगधगते निखारे मोठ्या भांड्यात ठेवले होते.लोक तिथे हात पाय शेकत होते.
आम्ही सकाळची वाट न बघता भैरवनाथ ला निघालो.गुफेतून दर्शन झाल्याने उत्साह संचारला होता.रस्त्यात मुद्दामून त्या हरियाणवी ऍक्सेन्ट मध्ये गंमती सांगत आम्ही चाललो होतो. सोनम ही मूळची हरियाणाची असल्याने ऑनर किलिंग च्या खऱ्या गोष्टी सांगितल्या. हिंदी मुविज मराठी ऍक्टर्स..मुविज यावर ही मी बोललो.
त्यांना तीन चार मराठी वाक्य बोलायला लावलेच!!
मग सोडतो की काय!!!!
भैरवनाथ ला पहाटे पाच वाजता पोचलो! रस्त्यात बरेच ठिकाणी खूप बर्फ पडला होता!
तिथेही निखाऱ्यांची सोय केली होती.जेथुन आधीच्या वर्षी सूर्यास्त बघितला होता.त्याच जागेवरून पलीकडच्या शिखराआडून पुढच्याच वर्षी 14 फेब्रुवारीला सुंदर सूर्योदय बघितला!
सूर्य पूर्व क्षितिजावर प्रकट होत होता.
सूर्याच्या केशरी किरणांनी संपुर्ण खोरं ..पर्वत शिखरे न्हाऊन निघाले होते..
(समाप्त)
No comments:
Post a Comment