ज्याने अरण्याशी मैत्री केली त्याच्याशी अरण्यातील हिरव्या पानांची वस्त्र लपेटलेली झाडं संवाद साधतात..झाडांना कवटाळून राहणाऱ्या वेलीही बोलतात. अरण्य उपाशी ठेवत नाही. माकडं ,पोपट अर्धवट खाऊन फळं खाली टाकतात.पक्षांनी उष्टावलेली फळं मधुर असतात.
चालताना अरण्य नेहमी डोक्यावर हिरवं छत्र धरतं.जंगलात चालताना दमत नाही.पण वाटलंच तर जंगलातील कुठल्याही विशाल वृक्षाखाली अंग पसरावं.आजीच्या मायेनं अरण्य मांडीवर घेउन थोपटतं. फांद्यावरून पक्षी अंगाईगीत गातात. वारा कानात रुंजी घालत राहतो.जंगलात सहज निद्रा लागते.इथे कोणी झोपेतून उठवणार नाही.निवांत झोपी जावं!
पावसाळ्यातील हिरव्या कंच, ओलसर, श्रीमंत अरण्याशी मैत्री करावी. शिशिरातील ,ग्रीष्मातील उतारवयात स्वतःहून आपली सारी संपत्ती, जायदाद धरेला अर्पित करून विरक्त झालेल्या मौन धारण केलेल्या " आता उरलो फक्त समाजापूरता " वैचारिक बैठक असलेल्या पारदर्शक अरण्याशीही करावी.
ज्यांना तत्वज्ञान कळलं नाही ते फार वाचाळपणा करतात. तत्वज्ञ मात्र शांत असतो. आनंदात मग्न असतो.अरण्य म्हणूनच मौनात असतं. माणसे एकत्र आली की बडबड ,भांडणं, मत्सर सुरु होतात. जंगलात मात्र एकमेकांना खेटुनही मत्सर द्वेष नाही.जो तो आपल्या मस्तीत आपल्यानुसार वाढत असतो. जंगल खऱ्या अर्थाने '
पण जंगल सहजासहजी मैत्री करत नाही.नवख्याशी कडक ,फटकून वागतं. रानभुल पाडतं. या भुलीला न फसणाऱ्याला जंगल मैत्रीने आलिंगन देतं.अरण्यातील वाऱ्याची बासरी, शेहनाई ,पक्षांचा कोरस ऐकायला अरण्याशी मैत्र जुळावं लागतं.
जंगल स्वतःच एक परिपूर्ण ऊर्जेची, अन्नाची साखळी आहे.
F- Food
R- Resources
E- Energy
S- Storage
T- Trees
21 march, #WorldForestDay
चालताना अरण्य नेहमी डोक्यावर हिरवं छत्र धरतं.जंगलात चालताना दमत नाही.पण वाटलंच तर जंगलातील कुठल्याही विशाल वृक्षाखाली अंग पसरावं.आजीच्या मायेनं अरण्य मांडीवर घेउन थोपटतं. फांद्यावरून पक्षी अंगाईगीत गातात. वारा कानात रुंजी घालत राहतो.जंगलात सहज निद्रा लागते.इथे कोणी झोपेतून उठवणार नाही.निवांत झोपी जावं!
पावसाळ्यातील हिरव्या कंच, ओलसर, श्रीमंत अरण्याशी मैत्री करावी. शिशिरातील ,ग्रीष्मातील उतारवयात स्वतःहून आपली सारी संपत्ती, जायदाद धरेला अर्पित करून विरक्त झालेल्या मौन धारण केलेल्या " आता उरलो फक्त समाजापूरता " वैचारिक बैठक असलेल्या पारदर्शक अरण्याशीही करावी.
ज्यांना तत्वज्ञान कळलं नाही ते फार वाचाळपणा करतात. तत्वज्ञ मात्र शांत असतो. आनंदात मग्न असतो.अरण्य म्हणूनच मौनात असतं. माणसे एकत्र आली की बडबड ,भांडणं, मत्सर सुरु होतात. जंगलात मात्र एकमेकांना खेटुनही मत्सर द्वेष नाही.जो तो आपल्या मस्तीत आपल्यानुसार वाढत असतो. जंगल खऱ्या अर्थाने '
लिबरल' असतं.
पण जंगल सहजासहजी मैत्री करत नाही.नवख्याशी कडक ,फटकून वागतं. रानभुल पाडतं. या भुलीला न फसणाऱ्याला जंगल मैत्रीने आलिंगन देतं.अरण्यातील वाऱ्याची बासरी, शेहनाई ,पक्षांचा कोरस ऐकायला अरण्याशी मैत्र जुळावं लागतं.
जंगल स्वतःच एक परिपूर्ण ऊर्जेची, अन्नाची साखळी आहे.
F- Food
R- Resources
E- Energy
S- Storage
T- Trees
21 march, #WorldForestDay
No comments:
Post a Comment