भूतांनी पछाडलेल्या जागा याबद्दल कथा दंतकथा भारतात तसेच जगभरात प्रसिद्ध आहेत. ,भूतकथा, 'हॉंटेड' जागा यांचं वर्णन लेखकांनी भयरस पुरेपूर ओतून अंगावर शहारे येतील असं रसभरीत वर्णन केलेलं असतं.
मुंबईतील काही जागा, देशातील, महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले, वाडे, हॉटेल्स मधील विशिष्ट खोली, हे सुद्धा बाधित स्थळं आहेत याबद्दल बरेचदा ऐकायला, वाच्यायला मिळतं.
यातील किती विश्वसनीय, खोटं हे लेखकाला , त्या त्या स्थळांना आणि तेथील असलेल्या नसलेल्या
भूतांनाच माहिती.
पण अगदी लिखाणातील भीष्माचार्य गो. नि. दांडेकरांनी सुद्धा किल्ले भ्रमंती वेळी आलेले गूढ अनुभव सांगितले आहेत.
अभिनेता ,लेखक आणि ट्रेकर मिलिंद गुणजीनेही त्यांच्या पुस्तकात महाराष्टातील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल गूढ, अमानवी अनुभव विशद केले आहेत.
एकंदर यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण भ्रमंती करणाऱ्या व्यक्तींना अश्या स्थळांबद्दलच्या कथा बरेचदा माहिती असतात.
याचप्रकारे "खुनी नाला" आणि "शैतानी नाला" हे दोन विचित्र , गूढ भीतीदायक नावांची स्थळे काश्मीर खोऱ्यात शिरायच्या आधी लागतात.
या जागा बाधित आहेत असे म्हणतात. नवख्या प्रवाशाला या दोन वेगवेगळ्या जागा कळून येत नाहीत. एकाच जागेला हे दोन नावे आहेत असेही काही लोक म्हणतात.
खुनी नाला, शैतानी नाला हे काही नदी नाले नाहीत तर वाहन आतून जाईल असे एक प्रकारचं पुलासारखं छोटं बांधकाम आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याचा इथे अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून या जागेला बाधित समजून या जागेबद्दल बरेच कथा दंतकथा तयार झाल्यात.
जवळ तान्हं बाळ असलेली एक स्त्री रात्री येथून प्रवास करताना 'लिफ्ट' मागते आणि अमानवी अनुभव येतात असं काही लोक म्हणतात, मानतात.
खुनी , शैतानी नाला पार करताना ते इंग्रजी अधिकाऱ्याचं भूत समोरील बांधकाम दृष्टीस पडू देत नाही, सरळ रस्ता दिसतो आणि चालक समोरील पुलावर धडकतो आणि अपघाती मृत्यू होतात अशी एक वदंता आहे.
पण खरोखर या भागात अपघातांचं प्रमाण जास्त आहे. हे सत्य आहे.
बुद्धीने विचार करताना एक कळतं ,खुनी नाला आणि शैतानी नाला या स्थळांची भौगोलिक स्थितीही या अपघाताना कारणीभूत आहे. ही जागा बर्फाच्या सुनामीसाठी 'प्रोन' आहे.
बर्फाची सुनामी म्हणजे 'अॅवलॉन्च' या भागात होतात. या बांधकामाला , पुलाला लागूनच डोंगर आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, अॅवलॉन्चेस येणे हे या भागात होत असतं. शिवाय रात्री धुक्यामुळे अनोळखी प्रवास्याला येथील पुरेपूर माहिती नसते त्यामुळे येथे अपघात होतात.
रात्रीच्या प्रवासात या भागात कृत्रिम दिवे नाहीत त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात दरडी कोसळल्याने, अरुंद जागेमुळे रहदारी खोळंबते यातूनही अपघात होतात. या सगळ्या नकारात्मक भावनेतून खुनी नाला, शैतानी नाला या भुताने बाधीत जागा आहेत हे भूतबाधित क्षेत्र आहे ही कथा, दंतकथा, वदंता निर्माण झाली आहे.
पण तरीही कुठल्याही गोष्टीवर निष्कर्षाचं शिक्कामोर्तब करताना व्यक्तिपरत्वे अनुभवासाठी एक छोटी पोकळी , जागा रिक्त ठेवावी लागते. ठेवायला हवी कारण अनुभव घेणाऱ्याने तो प्रत्यक्ष घेतला असतो तर इतर फक्त बुद्धी, अंदाज, आणि लॉजिक साहाय्याने त्यावर निष्कर्ष काढून एक सोयीस्कर शिक्कामोर्तब करत असतात.
आमच्या दुपारी दोन वाजता आमच्या बसने खुनी आणि शैतानी नाला पार केला.
थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्द जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा बोगदा भारतातील अत्यन्त महत्वाचा आणि संवेदनशील स्थळ आहे.
हा एकमेव बोगदा भारताला आणि काश्मीर खोऱ्याला जोडतो. या जागेला सामरिक दृष्ट्या, राष्ट्रीय दृष्टीने अत्यन्त महत्व आहे. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. या बोगद्यावर पाकिस्तानचे लक्ष असतं.
कारण इथून पाकिस्तान सीमारेषा अगदी जवळ आहे.
कारगिल युद्धात "जवाहरलाल टनेल " ज्याला बनिहाल बोगदा ही म्हणतात या बोगद्यवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. हा बोगदा एकदा नष्ट केला की भारताचं काश्मीर खोऱ्यात परिवहन बंद होईल, भारतीय सैन्य वाहनाद्वारे काश्मीरमध्ये प्रवेश करू शकणार नाही , परिणामी पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवणे खूप सहज होईल यामुळे कारगिल युद्धात या बनिहाल बोगद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते ; पण भारतीय सैन्याने संपूर्ण शक्तीनिशी या बोगद्याचे रक्षण केले .
या टनेलला बनिहाल टनेलही म्हणतात कारण बनिहाल नावाच्या टुमदार पर्वतीय आणि भारत आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या सीमेवर वसलेल्या गावात हा बोगदा सुरू होतो.
आजूबाजूला उंच उंच विशाल पर्वत, घरे, हॉटेल्स, दवाखाना, दुकाने , शाळा, मेडिकल स्टोअर्स आणि मोठा बाजार असलेलं हे गाव आहे.पण जितकं सुंदर गाव तितकिच अशांतता येथे नांदते. जणू येथूनच शापित सौंदर्य असलेल्या काश्मीरच्या नंदनवनाची सुरवात होते. येथे बरेचदा आतंकवादी चकमक, अपघात, अॅवलॉन्चेस होतात. गावात चुकूनही कुठेही हिंदी भाषेत काहीही आढळत नाही , दरवाज्यावरील प्रत्येक पाटी, दुकानावरील प्रत्येक बोर्ड, भिंतीवरील लिखाण सर्वकाही उर्दु भाषेतच वा क्वचित इंग्रजीमध्ये.
बनिहाल गावाला निरोप देऊन ,सैन्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आमच्या बसने बनिहाल बोगद्यात प्रवेश केला.
हा मे 2017 पर्यंत भारतातील सगळ्यात लांब बोगदा होता. जुना बोगदा असल्याने आतून अरुंद आणि हवा येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने आत काही प्रवाश्यांना गुदमरायला होत होतं. शिवाय आतमध्ये उजेड नाही . अरुंद असल्याने आत काहीवेळा रहदारी ठप्प होऊन थांबावे लागत होते.परिणामी काही प्रवाश्याचा जीव घाबरा झाला.
एकदाचं आम्ही त्या अंधेरी गुंफेतून बाहेर आलो.
बसने एक वळण घेतलं, समोर लिहिलं होतं ," वेलकम टु काश्मीर!" " काश्मीर घाटीचं प्रथम दर्शन करवणारी ही जागा आहे!" असं एका मोठ्या शिळेवर लिहीलं होतं.
खाली काश्मीर खोरं दिसत होतं. वरून शांत , सुंदर निसर्ग असलेलं काश्मीर खोरं आणि प्रत्यक्षात....
आम्ही काश्मीर मध्ये प्रवेशते झालो. अमरनाथ यात्रेला खरी सुरवात आता होणार होती.देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा... - http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801&title=Amarnath%20Yatra%20%E2%80%93%20Part%208&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Amarnath%20trek
मुंबईतील काही जागा, देशातील, महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले, वाडे, हॉटेल्स मधील विशिष्ट खोली, हे सुद्धा बाधित स्थळं आहेत याबद्दल बरेचदा ऐकायला, वाच्यायला मिळतं.
यातील किती विश्वसनीय, खोटं हे लेखकाला , त्या त्या स्थळांना आणि तेथील असलेल्या नसलेल्या
भूतांनाच माहिती.
पण अगदी लिखाणातील भीष्माचार्य गो. नि. दांडेकरांनी सुद्धा किल्ले भ्रमंती वेळी आलेले गूढ अनुभव सांगितले आहेत.
अभिनेता ,लेखक आणि ट्रेकर मिलिंद गुणजीनेही त्यांच्या पुस्तकात महाराष्टातील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल गूढ, अमानवी अनुभव विशद केले आहेत.
एकंदर यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण भ्रमंती करणाऱ्या व्यक्तींना अश्या स्थळांबद्दलच्या कथा बरेचदा माहिती असतात.
याचप्रकारे "खुनी नाला" आणि "शैतानी नाला" हे दोन विचित्र , गूढ भीतीदायक नावांची स्थळे काश्मीर खोऱ्यात शिरायच्या आधी लागतात.
या जागा बाधित आहेत असे म्हणतात. नवख्या प्रवाशाला या दोन वेगवेगळ्या जागा कळून येत नाहीत. एकाच जागेला हे दोन नावे आहेत असेही काही लोक म्हणतात.
खुनी नाला, शैतानी नाला हे काही नदी नाले नाहीत तर वाहन आतून जाईल असे एक प्रकारचं पुलासारखं छोटं बांधकाम आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याचा इथे अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून या जागेला बाधित समजून या जागेबद्दल बरेच कथा दंतकथा तयार झाल्यात.
जवळ तान्हं बाळ असलेली एक स्त्री रात्री येथून प्रवास करताना 'लिफ्ट' मागते आणि अमानवी अनुभव येतात असं काही लोक म्हणतात, मानतात.
खुनी , शैतानी नाला पार करताना ते इंग्रजी अधिकाऱ्याचं भूत समोरील बांधकाम दृष्टीस पडू देत नाही, सरळ रस्ता दिसतो आणि चालक समोरील पुलावर धडकतो आणि अपघाती मृत्यू होतात अशी एक वदंता आहे.
पण खरोखर या भागात अपघातांचं प्रमाण जास्त आहे. हे सत्य आहे.
बुद्धीने विचार करताना एक कळतं ,खुनी नाला आणि शैतानी नाला या स्थळांची भौगोलिक स्थितीही या अपघाताना कारणीभूत आहे. ही जागा बर्फाच्या सुनामीसाठी 'प्रोन' आहे.
बर्फाची सुनामी म्हणजे 'अॅवलॉन्च' या भागात होतात. या बांधकामाला , पुलाला लागूनच डोंगर आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, अॅवलॉन्चेस येणे हे या भागात होत असतं. शिवाय रात्री धुक्यामुळे अनोळखी प्रवास्याला येथील पुरेपूर माहिती नसते त्यामुळे येथे अपघात होतात.
रात्रीच्या प्रवासात या भागात कृत्रिम दिवे नाहीत त्यामुळे पावसाळ्यात, हिवाळ्यात दरडी कोसळल्याने, अरुंद जागेमुळे रहदारी खोळंबते यातूनही अपघात होतात. या सगळ्या नकारात्मक भावनेतून खुनी नाला, शैतानी नाला या भुताने बाधीत जागा आहेत हे भूतबाधित क्षेत्र आहे ही कथा, दंतकथा, वदंता निर्माण झाली आहे.
पण तरीही कुठल्याही गोष्टीवर निष्कर्षाचं शिक्कामोर्तब करताना व्यक्तिपरत्वे अनुभवासाठी एक छोटी पोकळी , जागा रिक्त ठेवावी लागते. ठेवायला हवी कारण अनुभव घेणाऱ्याने तो प्रत्यक्ष घेतला असतो तर इतर फक्त बुद्धी, अंदाज, आणि लॉजिक साहाय्याने त्यावर निष्कर्ष काढून एक सोयीस्कर शिक्कामोर्तब करत असतात.
आमच्या दुपारी दोन वाजता आमच्या बसने खुनी आणि शैतानी नाला पार केला.
थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्द जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा बोगदा भारतातील अत्यन्त महत्वाचा आणि संवेदनशील स्थळ आहे.
हा एकमेव बोगदा भारताला आणि काश्मीर खोऱ्याला जोडतो. या जागेला सामरिक दृष्ट्या, राष्ट्रीय दृष्टीने अत्यन्त महत्व आहे. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. या बोगद्यावर पाकिस्तानचे लक्ष असतं.
कारण इथून पाकिस्तान सीमारेषा अगदी जवळ आहे.
कारगिल युद्धात "जवाहरलाल टनेल " ज्याला बनिहाल बोगदा ही म्हणतात या बोगद्यवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. हा बोगदा एकदा नष्ट केला की भारताचं काश्मीर खोऱ्यात परिवहन बंद होईल, भारतीय सैन्य वाहनाद्वारे काश्मीरमध्ये प्रवेश करू शकणार नाही , परिणामी पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवणे खूप सहज होईल यामुळे कारगिल युद्धात या बनिहाल बोगद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते ; पण भारतीय सैन्याने संपूर्ण शक्तीनिशी या बोगद्याचे रक्षण केले .
या टनेलला बनिहाल टनेलही म्हणतात कारण बनिहाल नावाच्या टुमदार पर्वतीय आणि भारत आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या सीमेवर वसलेल्या गावात हा बोगदा सुरू होतो.
आजूबाजूला उंच उंच विशाल पर्वत, घरे, हॉटेल्स, दवाखाना, दुकाने , शाळा, मेडिकल स्टोअर्स आणि मोठा बाजार असलेलं हे गाव आहे.पण जितकं सुंदर गाव तितकिच अशांतता येथे नांदते. जणू येथूनच शापित सौंदर्य असलेल्या काश्मीरच्या नंदनवनाची सुरवात होते. येथे बरेचदा आतंकवादी चकमक, अपघात, अॅवलॉन्चेस होतात. गावात चुकूनही कुठेही हिंदी भाषेत काहीही आढळत नाही , दरवाज्यावरील प्रत्येक पाटी, दुकानावरील प्रत्येक बोर्ड, भिंतीवरील लिखाण सर्वकाही उर्दु भाषेतच वा क्वचित इंग्रजीमध्ये.
बनिहाल गावाला निरोप देऊन ,सैन्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आमच्या बसने बनिहाल बोगद्यात प्रवेश केला.
हा मे 2017 पर्यंत भारतातील सगळ्यात लांब बोगदा होता. जुना बोगदा असल्याने आतून अरुंद आणि हवा येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने आत काही प्रवाश्यांना गुदमरायला होत होतं. शिवाय आतमध्ये उजेड नाही . अरुंद असल्याने आत काहीवेळा रहदारी ठप्प होऊन थांबावे लागत होते.परिणामी काही प्रवाश्याचा जीव घाबरा झाला.
एकदाचं आम्ही त्या अंधेरी गुंफेतून बाहेर आलो.
बसने एक वळण घेतलं, समोर लिहिलं होतं ," वेलकम टु काश्मीर!" " काश्मीर घाटीचं प्रथम दर्शन करवणारी ही जागा आहे!" असं एका मोठ्या शिळेवर लिहीलं होतं.
खाली काश्मीर खोरं दिसत होतं. वरून शांत , सुंदर निसर्ग असलेलं काश्मीर खोरं आणि प्रत्यक्षात....
आम्ही काश्मीर मध्ये प्रवेशते झालो. अमरनाथ यात्रेला खरी सुरवात आता होणार होती.देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा... - http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5451589720613916801&title=Amarnath%20Yatra%20%E2%80%93%20Part%208&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Amarnath%20trek
No comments:
Post a Comment