5 एप्रिल 2009
''स्वये श्रीराम प्रभु ऐकती''
बऱ्याच दिवसांनी मी एका बाहेर शिकत असलेल्या मित्राला फोन केला आणि मला धक्काच बसला; त्याच्या सेलवर चक्क मराठी तेही ''गीतरामायणावरील'' एक गीत ''काॅलर ट्युन'' 'म्हणुन सेट होते.नेहमी त्याच्या फोनमध्ये कोणीतरी इंग्रजीत किंचाळणारं असायचं पण आज हा चक्क गीतरामायणातील काव्यस्वर काॅलर्सना ऐकवतोय!
व्हाॅट एक्झॅटली मेड हीम टु चेंज!!माझ्यासाठी हा खरच धक्का होता!
त्याला विचारले तर तो म्हणाला
''यार दिज मराठी डिवोशनल साॅँग्स आर रिअली कूल!
और अभी तो सिजन भी चल रहा है!''
त्याच्या मते 'सिजन' म्हणजेे चैत्रातलं रामाचं नवरात्र होतं.
नुकताचएक गायक मित्र गीत रामायणाच्या कार्यक्रमासाठी सराव करत होता.
तर बासरीवादक 'मनाली' संस्कृत गीत रामायणाचा कार्यक्रम नुकतीच करून आली होती.
मला आठवलं की लहानपणी बाबा नेहमी गीत रामायणाची कॅसेट लावायचे.जास्त काही कळायचं नाही पण हळुहळु कानाला ते स्वर गोड वाटायचे.
खरंच आजच्या काळातही; लिरिक्सवर बिट्स वरचढ झालेल्या आधुनिक संगीताच्या प्रेमात असलेली आमची पिढी अजुनही ''गीतरामायणावर'' अजुनही उत्कट प्रेम करते.दाद देते.
आजही विशेषत: गुढी पाडवा ते राम नवमी या काळात मंदीरांमधुन..घरांमधुन गीत रामायण सुरू असतं.
कदाचित बरेचदा घरातील जेष्ठांच्या आग्रहाखातर वा त्यांच्या पुढारानेच गीतरामायणातील गाणे वाजत असतात.कदाचित प्रारंभी नाखुषीनेच आम्ही ते ऐकतही असु..पण जसा जसा गीतरामायणाचा संगीत प्रवास पुढे पुढे जातो..जसा जसा सुधीर फडकेंचा मधुर खडा स्पष्ट गद्यात्मक पद्यात्मक आवाज कानी पडतो तस तसे सर्व गीत रामायणात समरस होउन जातात.
इतक्यात मी एका पुस्तकप्रदर्शनीत गेलो असता तेथे ''जगाच्या पाठीवर'' हे श्री सुधीर फडकेंचे आत्मचरित्र असलेले पुस्तक दिसले.उभ्या उभ्या जितके वाचता येइल तितके वेगाने वाचुन काढले.
त्यांनी आपल्या आत्मचरित्रात गीतरामायणाच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
ज्या दिवशी गीत रामायणाचं पहिलं गीत प्रसारीत होणार होतं त्याच्या आदल्या रात्री सुधीर फडकेंचे पुत्र श्रीधर अगदी लहान असताना त्यांना मेंदुज्वर झालेला.तब्येत पुर्ण बिघडलेली..बाबुजी i.e. सुधीर फडके हे त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्रात रेकार्डिंगला गेले होते.
त्यामुळे गायिका माणिक वर्मा स्टुडिओतुन सुधीर फडकेंच्या घरी गेल्या.रात्री उशीरा बाबुजींच्या पत्नी आणि माणिक वर्मांनी श्रीधर यांना हाॅस्पिटलमध्ये न्यायला निघालेत.पण कुठलच वाहन नसल्याने हातगाडीमधुन त्यांना न्यावं लागलं.
तिकडे आकाशवाणी केंद्रात वेगळंच वातावरण झालं होतं.
ग.दि.माडगुळकरांनी लिहीलेल्या पहिल्या गीताची एकमेव ओरिजिनल प्रत बाबुजींना दिली होती.ती वेळेवर हरवली.त्यावरून ग.दि.मा म्हणजे अण्णा आणि बाबुजींमध्ये प्रचंड शाब्दीक खडाजंगी झाली.त्यांच्या घनिष्ठ मैत्रीत अशा चकमकी व्हायच्याच.
आकाशवाणी केंद्र अध्यक्ष शशिकांत लाड यांनी ग.दि.मांना पुन्हा गीत लिहिण्यास सांगितले.पण संतापलेल्या ग.दि.मांनी स्पष्ट नकार दिला!
तेव्हा शशिकांत लाड यांनी ग.दि.मांना हातात कागद आणि त्यांचं लिखाणाचं सर्व साहित्य दिलं आणि त्यांना जबरदस्तीने रेकाॅर्डिंग स्टुडिओच्या खोलीमध्ये बसवुन बाहेरून दरवाजा बंद केला.आणि गीत लिहील्यावरच दरवाजा उघडला जाईल असं सांगितलं.
पंधरा मिनीटातच लाड यांना दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तेव्हा ग.दिमांना काही हवं असेल म्हणुन दरवाजा ठोठवला असावा असे वाटुन त्यांनी दरवाजा उघडला.तेव्हा ग.दि.माडगुळकर हातात गीत लिहिलेला कागद धरून उभे होते.
सुधीर फडकेंनी ते पाहताच त्यांनी ग.दिमांना जोरदार मिठी मारली!
आणि 1एप्रिल 1955,शुक्रवार रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणीवरून सकाळी 8:45 वाजता श्री सुधीर फडकेंच्या अप्रतीम आवाजात गीत रामायणाचे पहिले गीत प्रसारीत झाले..
''स्वये श्री राम प्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती..''
या गीत रामायणाने पुढे लोकप्रियतेचे शिखर गाठले.
सार्वजनिक कार्यक्रम बरेचदा रात्री मोकळ्या जागेत होई.त्यामुळे लाईट्समुळे किटकं यायची.अशावेळी गीत रामायण गाताना बाबुजींच्या मुखात किटक जायचे पण मध्येच रसभंग होउ नये म्हणुन ते त्याला सरळ गिळुन टाकायचे.''त्यामुळे असा मला मांसाहार घडायचा!'' असं त्यांनी म्हटलय.
''सेतु बांधा रे सागरी..''हे गीत सार्वजनीक कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांमध्ये फार लोकप्रीय होतं.कार्यक्रमात लहान मुलं झोपुन जाई..पण सेतु बांधा रे सागरी हे गीत सुरू झालं की एकमेकांना आपलं गीत सुरू झालं रे म्हणुन उठवीत.आणि जल्लोषात गीत म्हणत तेव्हा ''सेतु बांधा..''चा आवाज काही किलोमिटरपर्यंत ऐकु येई.
एकदा नागपुरात गीत रामायणाचा कार्यक्रम होता.आदल्या रात्री एका प्रियजनाकडे जेवायला गेले असता त्यांनी आग्रहाखातर भरपुर श्रीखंड पुरी खाल्ली.दुसऱ्या दिवशी सुधीर फडकेंचा आवाज बसला!!साधं बोलणंही कठीण झालं.शब्दोच्चारातही त्रास होउ लागला..
कार्यक्रम संध्याकाळी ठरलेला.संपुर्ण मैदान भरलेलं.पण गाणं अशक्य असल्याने कार्यक्रम रद्द करण्याचं ठरलं.
कार्यक्रम रद्द होणार हे कळल्यावर माईक आणि साउंड सिस्टमवाला घाबरुन आपलं सामान बांधु लागला तेव्हा सुधीर फडकेंनी त्याला घाबरण्याचं कारण विचारलं.तो म्हणाला'' अहो इथले लोकं फार रागीट आहेत!कार्यक्रम रद्द झाल्याचं कळलं तर लोकं सामानाची तोडफोड करतील!''
बाबुजींनी त्याला शांत बसायला सांगितलं.
पडदा उघडला गेला.सुधीर फडकेंनी शांतपणे लोकांना सांगितलं,आज माझा आवाज बसलेला आहे! कार्यक्रम दोन दिवसांनी होईल.
लोकं शांत होते.प्रेक्षकापैकी एकाने ''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...'' फक्त हे गीत गाण्याची विनंती केली.बाबुजींनी ते गीत म्हटले.
दोन दिवसांनी गीतरामायणाचा यशस्वी कार्यक्रम झाला.
पुढे गीत रामायणाच्या रौप्य महोत्सवात श्री विनायक दामोदर सावरकर,श्री अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार ही हजर होते.
गीतरामायणात सर्व काव्य रस भरलेले आहेत.''सूड घे त्याचा लंका पती'' हे माणिक वर्मांनी गायलेलं..''दशरथा घे हे पायस दान..''
''मार ही त्राटीका..''
''राम जन्मला गं सखी राम जन्मला..'' सर्वच
गाणे ह्रदयाला स्पर्श करतात.
पण सर्वात आवडतं गाणं ''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...''
हे गीत ऐकताना वि.दा.सावरकरांचेही डोळे पाणावले होते.
''विठ्ठला तु वेडा कुंभार..''जग हे बंदीशाळा..''
''माना मानव वा परमेश्वर''..''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे सुधीर फडकेंचे गीत माझ्यासाठी प्रचंड जवळचे आहेत.शांत..अंतर्मुख करतात..
काही गीत..काही रचना तयार होणं हे जणु त्या अगम्य शक्तीचीच ईच्छा असते.गीतरामायण ही त्यातलेच.
कालप्रवाहामध्ये संगीतात..काव्यात..अभिरूचीत बदल होत गेला..पण गीतरामयणाच्या अभिजात संगीताची मोहिनी मराठी माणसावर कायम आहे.आणि राहील.
रामायणाचा जिथे पाठ होत असतो तिथे हनुमान अदृश्य रूपात हजर होउन ऐकत असतो असे म्हणतात.
कदाचीत जिथे ''गीत रामायण'' सुरू असेल तिथे कदाचित प्रत्यक्ष श्रीरामसुद्धा हे ''सुधिरायन'' ऐकत असतील.
स्वये श्रीराम प्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती....
-अभिजित पानसे
5 एप्रिल 2009 (युथफुल,लोकसत्ता.)
''स्वये श्रीराम प्रभु ऐकती''
बऱ्याच दिवसांनी मी एका बाहेर शिकत असलेल्या मित्राला फोन केला आणि मला धक्काच बसला; त्याच्या सेलवर चक्क मराठी तेही ''गीतरामायणावरील'' एक गीत ''काॅलर ट्युन'' 'म्हणुन सेट होते.नेहमी त्याच्या फोनमध्ये कोणीतरी इंग्रजीत किंचाळणारं असायचं पण आज हा चक्क गीतरामायणातील काव्यस्वर काॅलर्सना ऐकवतोय!
व्हाॅट एक्झॅटली मेड हीम टु चेंज!!माझ्यासाठी हा खरच धक्का होता!
त्याला विचारले तर तो म्हणाला
''यार दिज मराठी डिवोशनल साॅँग्स आर रिअली कूल!
और अभी तो सिजन भी चल रहा है!''
त्याच्या मते 'सिजन' म्हणजेे चैत्रातलं रामाचं नवरात्र होतं.
नुकताचएक गायक मित्र गीत रामायणाच्या कार्यक्रमासाठी सराव करत होता.
तर बासरीवादक 'मनाली' संस्कृत गीत रामायणाचा कार्यक्रम नुकतीच करून आली होती.
मला आठवलं की लहानपणी बाबा नेहमी गीत रामायणाची कॅसेट लावायचे.जास्त काही कळायचं नाही पण हळुहळु कानाला ते स्वर गोड वाटायचे.
खरंच आजच्या काळातही; लिरिक्सवर बिट्स वरचढ झालेल्या आधुनिक संगीताच्या प्रेमात असलेली आमची पिढी अजुनही ''गीतरामायणावर'' अजुनही उत्कट प्रेम करते.दाद देते.
आजही विशेषत: गुढी पाडवा ते राम नवमी या काळात मंदीरांमधुन..घरांमधुन गीत रामायण सुरू असतं.
कदाचित बरेचदा घरातील जेष्ठांच्या आग्रहाखातर वा त्यांच्या पुढारानेच गीतरामायणातील गाणे वाजत असतात.कदाचित प्रारंभी नाखुषीनेच आम्ही ते ऐकतही असु..पण जसा जसा गीतरामायणाचा संगीत प्रवास पुढे पुढे जातो..जसा जसा सुधीर फडकेंचा मधुर खडा स्पष्ट गद्यात्मक पद्यात्मक आवाज कानी पडतो तस तसे सर्व गीत रामायणात समरस होउन जातात.
इतक्यात मी एका पुस्तकप्रदर्शनीत गेलो असता तेथे ''जगाच्या पाठीवर'' हे श्री सुधीर फडकेंचे आत्मचरित्र असलेले पुस्तक दिसले.उभ्या उभ्या जितके वाचता येइल तितके वेगाने वाचुन काढले.
त्यांनी आपल्या आत्मचरित्रात गीतरामायणाच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत.
ज्या दिवशी गीत रामायणाचं पहिलं गीत प्रसारीत होणार होतं त्याच्या आदल्या रात्री सुधीर फडकेंचे पुत्र श्रीधर अगदी लहान असताना त्यांना मेंदुज्वर झालेला.तब्येत पुर्ण बिघडलेली..बाबुजी i.e. सुधीर फडके हे त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्रात रेकार्डिंगला गेले होते.
त्यामुळे गायिका माणिक वर्मा स्टुडिओतुन सुधीर फडकेंच्या घरी गेल्या.रात्री उशीरा बाबुजींच्या पत्नी आणि माणिक वर्मांनी श्रीधर यांना हाॅस्पिटलमध्ये न्यायला निघालेत.पण कुठलच वाहन नसल्याने हातगाडीमधुन त्यांना न्यावं लागलं.
तिकडे आकाशवाणी केंद्रात वेगळंच वातावरण झालं होतं.
ग.दि.माडगुळकरांनी लिहीलेल्या पहिल्या गीताची एकमेव ओरिजिनल प्रत बाबुजींना दिली होती.ती वेळेवर हरवली.त्यावरून ग.दि.मा म्हणजे अण्णा आणि बाबुजींमध्ये प्रचंड शाब्दीक खडाजंगी झाली.त्यांच्या घनिष्ठ मैत्रीत अशा चकमकी व्हायच्याच.
आकाशवाणी केंद्र अध्यक्ष शशिकांत लाड यांनी ग.दि.मांना पुन्हा गीत लिहिण्यास सांगितले.पण संतापलेल्या ग.दि.मांनी स्पष्ट नकार दिला!
तेव्हा शशिकांत लाड यांनी ग.दि.मांना हातात कागद आणि त्यांचं लिखाणाचं सर्व साहित्य दिलं आणि त्यांना जबरदस्तीने रेकाॅर्डिंग स्टुडिओच्या खोलीमध्ये बसवुन बाहेरून दरवाजा बंद केला.आणि गीत लिहील्यावरच दरवाजा उघडला जाईल असं सांगितलं.
पंधरा मिनीटातच लाड यांना दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला तेव्हा ग.दिमांना काही हवं असेल म्हणुन दरवाजा ठोठवला असावा असे वाटुन त्यांनी दरवाजा उघडला.तेव्हा ग.दि.माडगुळकर हातात गीत लिहिलेला कागद धरून उभे होते.
सुधीर फडकेंनी ते पाहताच त्यांनी ग.दिमांना जोरदार मिठी मारली!
आणि 1एप्रिल 1955,शुक्रवार रामनवमीच्या दिवशी पुणे आकाशवाणीवरून सकाळी 8:45 वाजता श्री सुधीर फडकेंच्या अप्रतीम आवाजात गीत रामायणाचे पहिले गीत प्रसारीत झाले..
''स्वये श्री राम प्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती..''
या गीत रामायणाने पुढे लोकप्रियतेचे शिखर गाठले.
सार्वजनिक कार्यक्रम बरेचदा रात्री मोकळ्या जागेत होई.त्यामुळे लाईट्समुळे किटकं यायची.अशावेळी गीत रामायण गाताना बाबुजींच्या मुखात किटक जायचे पण मध्येच रसभंग होउ नये म्हणुन ते त्याला सरळ गिळुन टाकायचे.''त्यामुळे असा मला मांसाहार घडायचा!'' असं त्यांनी म्हटलय.
''सेतु बांधा रे सागरी..''हे गीत सार्वजनीक कार्यक्रमात लहान विद्यार्थ्यांमध्ये फार लोकप्रीय होतं.कार्यक्रमात लहान मुलं झोपुन जाई..पण सेतु बांधा रे सागरी हे गीत सुरू झालं की एकमेकांना आपलं गीत सुरू झालं रे म्हणुन उठवीत.आणि जल्लोषात गीत म्हणत तेव्हा ''सेतु बांधा..''चा आवाज काही किलोमिटरपर्यंत ऐकु येई.
एकदा नागपुरात गीत रामायणाचा कार्यक्रम होता.आदल्या रात्री एका प्रियजनाकडे जेवायला गेले असता त्यांनी आग्रहाखातर भरपुर श्रीखंड पुरी खाल्ली.दुसऱ्या दिवशी सुधीर फडकेंचा आवाज बसला!!साधं बोलणंही कठीण झालं.शब्दोच्चारातही त्रास होउ लागला..
कार्यक्रम संध्याकाळी ठरलेला.संपुर्ण मैदान भरलेलं.पण गाणं अशक्य असल्याने कार्यक्रम रद्द करण्याचं ठरलं.
कार्यक्रम रद्द होणार हे कळल्यावर माईक आणि साउंड सिस्टमवाला घाबरुन आपलं सामान बांधु लागला तेव्हा सुधीर फडकेंनी त्याला घाबरण्याचं कारण विचारलं.तो म्हणाला'' अहो इथले लोकं फार रागीट आहेत!कार्यक्रम रद्द झाल्याचं कळलं तर लोकं सामानाची तोडफोड करतील!''
बाबुजींनी त्याला शांत बसायला सांगितलं.
पडदा उघडला गेला.सुधीर फडकेंनी शांतपणे लोकांना सांगितलं,आज माझा आवाज बसलेला आहे! कार्यक्रम दोन दिवसांनी होईल.
लोकं शांत होते.प्रेक्षकापैकी एकाने ''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...'' फक्त हे गीत गाण्याची विनंती केली.बाबुजींनी ते गीत म्हटले.
दोन दिवसांनी गीतरामायणाचा यशस्वी कार्यक्रम झाला.
पुढे गीत रामायणाच्या रौप्य महोत्सवात श्री विनायक दामोदर सावरकर,श्री अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार ही हजर होते.
गीतरामायणात सर्व काव्य रस भरलेले आहेत.''सूड घे त्याचा लंका पती'' हे माणिक वर्मांनी गायलेलं..''दशरथा घे हे पायस दान..''
''मार ही त्राटीका..''
''राम जन्मला गं सखी राम जन्मला..'' सर्वच
गाणे ह्रदयाला स्पर्श करतात.
पण सर्वात आवडतं गाणं ''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...''
हे गीत ऐकताना वि.दा.सावरकरांचेही डोळे पाणावले होते.
''विठ्ठला तु वेडा कुंभार..''जग हे बंदीशाळा..''
''माना मानव वा परमेश्वर''..''पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे सुधीर फडकेंचे गीत माझ्यासाठी प्रचंड जवळचे आहेत.शांत..अंतर्मुख करतात..
काही गीत..काही रचना तयार होणं हे जणु त्या अगम्य शक्तीचीच ईच्छा असते.गीतरामायण ही त्यातलेच.
कालप्रवाहामध्ये संगीतात..काव्यात..अभिरूचीत बदल होत गेला..पण गीतरामयणाच्या अभिजात संगीताची मोहिनी मराठी माणसावर कायम आहे.आणि राहील.
रामायणाचा जिथे पाठ होत असतो तिथे हनुमान अदृश्य रूपात हजर होउन ऐकत असतो असे म्हणतात.
कदाचीत जिथे ''गीत रामायण'' सुरू असेल तिथे कदाचित प्रत्यक्ष श्रीरामसुद्धा हे ''सुधिरायन'' ऐकत असतील.
स्वये श्रीराम प्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती....
-अभिजित पानसे
5 एप्रिल 2009 (युथफुल,लोकसत्ता.)
No comments:
Post a Comment