Tuesday, 26 December 2017

तीन भावंडांची ट्रिपलिंग


तीन सिब्लिंग्सची रोड ट्रीप 'ट्रिपलिंग'

"रोड ट्रिप" म्हटलं की डोळ्यासमोर येतो झोया अख्तर चा “जिंदगी ना मिलेगी दोबारा"... कोणाला फरहान अख्तरचा "दिल चाहता है" ही आठवेल..

या दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य आहे की यात रोड ट्रिप ही मित्रांसोबत केली जाते.

मुळातच ट्रिप म्हटलं की मित्रांसोबतच जाऊन धम्माल करण्याची गोष्ट, किंवा बऱ्याच वर्षांनी कब के बिछडे हुये हम आज यहा आके मिले.." रियुनिअन करून जुन्या आठवणी ताज्या करणे, वा जुने काही मतभेद दूर करून नवे बॉण्ड्स स्थापित करणे हे आपल्या मानसिक सॉफ्टवेअरमध्ये इनबिल्ट असतं किंवा तसंच आपलं मानसिक प्रोग्रामिंग झालेलं असतं. पण कधी विचार केलाय का किंवा आयडिया सुचलीये का की फक्त आपल्या सख्ख्या भावंडांसोबतच रोड ट्रिप जाण्याची!!!

बालपण ते किशोरवयापर्यंत आई बाबांच्या छत्राखाली असल्यामुळे तेव्हा मुलं, भावंडं ही फक्त "रिसिविंग एन्ड" लाच असतात.त्यावेळची सोबत फिरण्याची, सहलीची मजा  वेगळी असते.पण जसे जसे मोठे होतात तसे विचार वेगळे, मित्र मैत्रिणी वेगळे वेगळे होतात .स्वतंत्र व्यक्तिमत्व तयार होतं.. अहंकार वाढतो.आणि भावंडांसोबतचा संवाद ,संवादाची खोली कमी होते.

त्यामुळे सख्या भावंडांसोबत म्हणजे 'सिबलिंग'सोबत रोड ट्रिप हि कल्पनाच कोणी करत नाही.
यावरच प्रफुल व्यासने 'ट्रिपलिंग' नावाची वेब सिरीज ची स्क्रिप्ट लिहिली.

परिस्थितीमुळे घडलेल्या तीन भावंडांची ,सिब्लिंग्सच्या रोड ट्रिपची गोष्ट म्हणजे 'ट्रिपलिंग'!
पर्मनंट रूममेट्स नंतर प्रफुल व्यासची ही दुसरी वेब सिरीज.ट्रिपलिंगला नेटीजन्सने पूर्णतः स्वीकारलं.

चंदन ,चंचल आणि चितवन असे हे दोन भाऊ आणि एक बहिण या ट्रिपलिंगच्या रोड ट्रिप ची ही गोष्ट.

चंदन म्हणजे प्रफुल व्यास हा मोठा, वय आणि परिस्थितीमुळे शांत समजूतदार,विदेशात नोकरी करणारा तिथल्याच त्याच्या एका मुलीसोबत लग्न केलेला आणि ती त्याला 'चिट' करतेय हे कळल्यावर तिच्याविरुद्ध विश्वासघाटाची तक्रार करून घटस्फोट मागितल्यावर तेथील कायद्यानुसार त्याला तिच्याकडून 'पोटगी' मिळाल्यावर दुःख हलकं करण्यासाठी आपल्या छोट्या सख्या भावाला चितवन ला भेटायला मुंबईत येतो.

चितवन हा स्वतःच अत्यंत किचकट आयुष्य असलेला,अनेक फ्रॉड्स करणारा, "हू केअर्स" वृत्ती असलेला, मजा मस्ती आपल्याच विश्वात मस्त आणि अनेक कारणांमुळे त्रस्त असलेला स्टुडिओमध्ये 'डीजे' असतो.

चंदन प्रथम त्याला भेटायला त्याच्या स्टुडिओत जातो तिथे खूपे दारू पिऊन तिथेच पडतो.त्याचा भाऊ चितवन  त्याला त्याच्या घरी न नेता रात्रभर गाडीत झोपवतो.

दुसऱ्या दिवशी जाग येते तेव्हा मुंबईबाहेर तो गुजरात हायवेवर वडोदरा जवळ थांबलेले दिसतात. चितवनने गाडीच्या इन्स्टॉलमेंटचे पैसे न भरल्यामुळे बँकेचा ससेमिरा टाळण्यासाठी तो पळून जात असतो.

यामुळे चिडलेला समंजस चंदन त्याला समजावतो. पण शेवटी ते बहिणीला भेटायला, चंचलला भेटायला तिच्या सासरी जोधपूरला जायचं ठरवतात.

चंचल जोधपुरच्या 'रॉयल' कुटुंबाची एकमेव सून असते. चंचल 'प्रेग्नन्ट' असल्यामुळे त्या निमित्त असलेल्या समारंभामुळे त्यांची किल्लास्वरूप हवेली  सजली असते. नंतर ती दोघांना सांगते की ती प्रेग्नन्सीचं फक्त नाटक करते आहे.

चंचल चा नवरा प्रणव तिथला राजा असतो.

आदित्य रॉय कपूर चा भाऊ कुणाल रॉय कपूर हा मुळातच एक चांगला अभिनेता आहे. येऊ जवानी है दिवानी, डेल्ही बेली चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिका फार लोकप्रिय झाल्या आहेतच. त्याने साकारलेला राजस्थानी राजा,चंचलचा नवरा ही भावतो.

इकडे चंदन आणि बहीण चंचलही तिच्या आयुष्यात असमाधानी, दुःखी असते.

काही नकारात्मक घटनांमुळे ते तिघेही जोधपुरहून रात्री उशिरा निघतात.आणि मग सुरु होते त्यांची रोड ट्रिप. सिब्लिंग्सची रोड ट्रिप 'ट्रिपलिंग'.

प्रवासात अनेक विनोदाचे प्रसंग, अडचणी, भांडणे करीत भावनिकरित्या जवळ येत करीत शेवटी त्यांच्या आई बाबांकडे मनालीला जाऊन पोहचतात.

त्यांच्या वडिलांची भूमिका कुमुद मिश्रा आणि आईची भूमिका शेरनाज पटेल या परिपाकव अभिनेत्यांनी केली आहे. तिन्ही मुलांपेक्षा त्यांचे आई वडील अगदी वेगळ्या स्वभाव, विचारांचे, व्यक्तिमत्वाचे असतात. तिन्ही मुलं आपल्याला आयुष्यात असमाधानी, अडचणीत, ताणामध्ये असतात. तर आई वडील अगदी सर्वार्थाने आनंदी, 'कूल', सकारात्मक विचारांचे, आयुष्य खऱ्या अर्थाने जगणारे असतात.

"रोड ट्रिप "ही संकल्पना त्यांच्या वडिलांनी पूर्वीपासून घरात रुजवली असते.

अगदी कुठलीही तयारी,आखणी न करता वर्षातून एकदा कुटुंबासोबत (चंदन, चंचल ,चितवन लहान असताना) रोड ट्रिप ला जात असत.

आई बाबांना भेटल्यावर, संवाद झाल्यावर विचारसरणीत अगदी छोटा बदल झाल्यावर मात्र तिघेही शांत होतात. तिघांनाही आपापले मार्ग मिळतात.

मानवी गागृ या वेब सिरीज मध्ये काम करणाऱ्या गुणी अभिनेत्रीने चंचलची भूमिका अगदी रास्त निभावली आहे. अभिषेक पराशर हा ही पूर्णतः नवोदित अभिनेता. त्याने चितवन अगदी योग्य साकारला आहे.

जोधपूरहून अपरात्री निघाल्यावर वाळवंटात रस्ता चुकल्यामुळे एका ठिकाणी थांबून तिथे "बॉनफायर' करीत तिघेही 15 वर्षनंतर पाहिल्यांदा नीट संवाद साधतात. तो भाग या वेब सिरीजचा सर्वोत्तम भाग आहे.

मनालीला पोहचल्यावर चंदन त्याच्या वडिलांशी रात्री बाल्कनीमध्ये संवाद करताना तो म्हणतो की त्याला थंडी वाजते आहे तेव्हा आता बोलणं थांबूयात. तेव्हा त्याचे वडील त्याला इतकंच म्हणतात "तो शॉल ओढलो ना!" शॉल अंगावर घेऊन चंदन वडिलांना म्हणतो की किती सोपा उपाय होता ना यावर!"

असे मनाला स्पर्श करणारे, विचार करायला लावणारे काही दृश्य.. क्षण ट्रिपलिंग या वेब सिरीजमध्ये आहेत.

यातील भूमिका इतक्या प्रभावी लिहिल्या आहेत की आपल्याला आपला लहान भावात कुठेतरी चितवन दिसू लागतो,बहिणीत चंचल सापडते.

प्रफुल व्यास या गुणी अभिनेत्याने या वेब सिरीजमध्येही कमाल केली आहे. 'रूममेट्स'मधील बावळट प्रेमी आणि 'ट्रिपलिंग'मधील समंजस, परिपक्व माणूस अप्रतिमरित्या साकारला आहे.
शिवाय ट्रिपलिंग या वेबसिरीजचं लिखाणही त्याने केलंय.

एक सकारात्मक विषय, वेगळी संकल्पना घेऊन त्याला पूर्णतः आजच्या भाषाशैलीत मांडून मनाला स्पर्श करणारे संवाद, दृश्य असलेली विनोदाचे आवरण असलेली ही तीन सिब्लिंग्सची 'ट्रिपलिंग' वेब सिरीज 'हिट' झालेली आहे.

No comments:

Post a Comment