Saturday 27 May 2017

बाहुबली , देवसेना चित्र

बाहुबली मधली सगळ्यात जास्त मला एक गोष्ट आवडली; ज्यांना ते लक्षात आलं नसेल त्यांनी पुन्हा पुढे कधी चित्रपट बघताना आठवणीने ते बघा. भल्लालदेव सर्वप्रथम देवसेनेचं चित्र बघतो आणि नंतर त्याच्या महालात तिचं तेच मोठं चित्र लावलेलं असतं , त्या चित्रात ती सिंहासनावर बसलेली आणि तिच्या हातात  'तलवार' असते.

 ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. Its a statement.
पूर्वी पुरुषांचे चित्र काढले जाई त्यात त्यांच्या हाती बंदूक, वा तलवार असे किंवा पायापाशी वाघ, किंवा मेलेल्या वाघावर पाय ठेऊन चित्र काढले जाई. आणि ते शौर्याचे प्रतीक म्हणून दिवानखान्यात लावले जात किंवा वधू संशोधनाला राजकन्येकडे पाठवले जात. आणि दुसरीकडे युवतींचे चित्र हातात पुष्प घेऊन वा वेली , वृक्षाभोवती..तळ्याकाठी विहार करतानाचं दाखवले जात.

इथे मात्र देवसेनेच्या हाती #तलवार दाखवली आहे. आणि हे दाखवताना तिला ;परिस्थितीमुळे वा पर्याय नसल्याने हाती तलवार घेतलेली पुरुषी पेहरावतील राजकन्या दाखवली नाही ; तर जात्याच शौर्यवान आणि सौंदर्यवान असे ते चित्र असते. ते 'लादलेलं' शौर्य नसून मुळातच असलेलं तेजस्वी  राजकन्येचं ,स्त्री चं ते चित्र असतं, इतर सर्व स्त्रीसुलभ भावना असलेली युवती. She is jus being a normal woman nothing is forced.
हि गोष्ट राजमौलिने दाखवल्याबद्दल खरंच त्याचं अभिनंदन करायला हवं.

तेजस्वी देवसेना विवाहाचा प्रस्ताव धुडकावून लावते तेव्हा माहिष्मती राज्याकडुन प्रस्ताव आणणारा तो माणूस देवसेनेच्या भावाला तुम्ही देवसेनेला समजावा म्हणतो , तेव्हा तीचा भाऊ तात्काळ उत्तर देतात की तो तिचा निर्णय आहे.
ही गोष्ट फार आवडली. यावरून पूर्वी मुळात व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला , मुलीलाही होतं हे दाखवलं.
#स्वयंवर ही कल्पनासुद्धा मुळात स्त्री केंद्रित होती.ज्यात युवती निर्णय घायची की कोणासोबत विवाह करायचा.

बाहुबलीमधली आणखी एक गोष्ट मला फार आवडली ते '#शिवगामीचं' पात्र. (पहिल्या भागात) माहिष्मती साम्राज्यच्या सिंहासनावर बसलेली शिवगामीनी हे "स्त्रीवादाचं"  प्रतीक नाही तर 'योग्यतेचं' प्रतीक आहे.
नवरा शरीराने आणि मनाने तर नक्कीच पंगू , ना - लायक असल्यामुळे जी व्यक्ती त्या सिंहासनासाठी लायक, capable,  योग्य अशी ती स्वतः सिंहासनावर बसते. अश्या व्यक्तीचेच "वचन हे शासन" असतं.

इथे उथळ स्त्रीवाद, feminism नाही. तर 'योग्यतेची' गोष्ट आहे. त्यामुळेच पुढे भलालदेव आणि अमरेंद्र बाहुबलीमध्ये जो शौर्य , योग्यता , लायकी सिद्ध करेल तोच पुढे साम्राज्याचा अधिकारी जागी बसेल असे ती म्हणते.
येथे उथळ ,एकसुरी स्त्रीवाद वा स्त्रीप्रधान संस्कृती वा अंध पुरुषीवर्चस्व वा पुरुषप्रधान संस्कृती नाही तर लायकीचा प्रश्न आहे. जो लायक तोच शासक. त्याचे वचन हे शासन.

- अभिजित पानसे.


No comments:

Post a Comment