बाहुबलीपेक्षा मी दोन चित्रपटांची वाट पहात होतो 'सरकार' आणि आयुष्यमान खुराणाचा "..बिंदू".
पहिला सरकार जी मुळातच गॉडफादरची कॉपी आहे; जबरदस्त सिनेमा होता. प्रत्येक पात्र योग्य, सिनेमाला वेग होता तरीही कलात्मक होता. खास रामू 'टच' होता.
पण या सरकारमध्ये सुरवातीपासूनच काहीतरी कमतरता जाणवू लागते. वर्षभर गजबलेली शाळा अनुभवल्यावर उन्हाळयाच्या सुट्टीत शाळेत गेल्यावर भकास वाटतं तसं काहीसं या सरकार मध्ये वाटत राहतं. सतत रिकामं रिकामं..
एकटा अमिताभ सिनेमाला सांभाळायचा प्रयत्न करतो. पण कथा , पात्र कशातच खोली नाही. चित्रपट बनवला नसून उरकून टाकलाय असं वाटतं.
राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीत एकटा पडलाय हे चित्रपट बघताना स्पष्ट जाणवत राहतं. कोणीही मोठे कलाकार त्याच्यासोबत काम करायला तयार नाहीत. त्यामुळे एक अमिताभ सोडल्यास दुय्यम फळीतल्या कलाकारांची निवड करावी लागलीये.
सत्या, कंपनी, बनवणारा रामूची खरंच अधोगती झालीये हे दर्शवणारं एक दृश्य आहे गणपती विसर्जनाचं. आजवरच्या सुमारहून सुमार चित्रपटांमध्ये मुंबई गणपती विसर्जनाचं इतकं खराब दृश्य दाखवलेलं नसेल तितकं सरकार 3 मध्ये आहे. सेट वरील वीस तीस लोकांना घेऊन ते चित्रीकरण केलंय असं वाटतं. उरकून टाकणे याला म्हणतात.
हा चित्रपट बघण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं "यामी गौतम".
आयुष्यमान खुरणामुळे विकी डोनर थिएटर मध्ये दोनदा बघितल्यावर नंतर मी यामी गौतमचा फॅन झालो होतो. पण त्यानंतर तिने सतत इरिटेटिंगली अर्थहीन भूमिका केल्यात.
दिव्या कुमार खोसला, यारीया वाली या मूर्ख दिग्दर्शकाच्या सिनेमात काम केलं. अतुल अग्निहोत्रीच्या सिनेमात काम करण्याचा गुन्हा केला. अतुल अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट!! May God save viewers n actors!!
पण या सरकार मध्ये तिला कामच नाही. संपूर्ण चित्रभरातील ती दहा मिनिटं दिसली असावी. पण यामी गौतम आजवर तिच्या करिअरमध्ये इतकी मादक, सेन्स्यूअस दिसली नसेल तितकी सरकार मध्ये! जबरदस्त लूक! लूक्स साठी टेन ऑन टेन!
एकेकाळी हॉलिवूडच्या , #RichardAttenborough च्या #गांधी चित्रपटात " बेन किंग्सले" सोबत काम करणारी रोहिणी हट्टंगडी , पुढे टुकार मराठी सिरियल्स मध्ये काम करताना बघून आलेली शिसारी सरकारमधील तिच्या दोन सीन्समुळे गेली.
'अग्निपथ ' नंतर पाहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि रोहिणी हट्टंगडी एका चित्रपटात काम करताय. पण यात दोघांचं एकही सोबत दृश्य नाही.
सरकारचा खरा फायदा करून घेतलाय तो अमित सधने! अमिताभ समोर हा अमित चांगला उभा ठाकलाय.
संपूर्ण चित्रपटात अमिताभ बच्चन चे दोनेक दृश्य , मनोज वाजपेयीचा पहिला सिन, आणि यामी गौतमचं दिसणं याखेरीज काहीही बघण्यासरखं नाही.
रामूचं स्टँडर्ड खरंच घसरलय असं वाटत राहतं.त्याच्यात तेलुगू दिग्दर्शक घुसल्याप्रमाणे बकवास क्लोज अप्स आणि जॅकी श्रॉफची जो मुख्य व्हिलन आहे त्याला तेलुगू चित्रपटातील एक भडक व्हिलन बनवुन हास्यस्पद करून टाकलाय.
पहिला सरकार अप्रतिम ,दुसरा सरासरी आणि तिसरा अत्यन्त सुमार अशी उतरंड रामुची झाली आहे.
त्यावरून रामगोपाल वर्मा संपला असा प्रश्न पडतो. पण हे प्रेक्षकांसाठी , चित्रपट सृष्टीसाठी योग्य नाही , करण जोहर , फराह खान, साजिद खान यांच्या चित्रपटांचे बळींसाठी रामू आणि त्याच्याच मुशीत तयार झालेला अनुराग कश्यप चे चित्रपट पर्वणी असते.
26/11 च्या हल्ल्यानंतर हॉटेल ताजमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकेकाळी रुबाबाने जाणारा रामू आता मात्र त्याच्या कामामुळे बुडत चालला आहे असं वाटतं. आणि या बुडत्या रामुला सध्यातरी सरकारच्या आधाराचा काडीचाही काही उपयोग होणार नाही हे स्पष्ट.
*Abhijeet Panse*
No comments:
Post a Comment