आज शनि अमावस्या.सकाळपासून शनिमंदीरात (शनीच्या दहशतीत असलेल्या) भक्तांची हातात तेलाचं पुडकं..काळे तीळ घेउन झुंबड उडालीए!
कारण अनेक गैरसमजांमुळे आणि टिव्ही वरील बिनडोक उथळ ज्योतिषी कार्यक्रमांमुळे शनिला खलनायक गब्बरसिंग..दहशतवादी..खुनी लुटैरा बनवलंय.
पण मुळात शनि हा अत्यंत कर्मवादी निष्ठुर न्यायाधीश आहे आणि आपल्यासाठी Blessing आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा 'भावनांचा' कारक,चंचल,भावनीक ओलावा..Unhealthy emotional attachments..wordly desires निर्माण करणारा..भावनीक गुंतागुंत निर्माण करणारा..व्यक्तीला मायेत फसवणारा,स्वप्नाळु बनवणारा.. तर शनि चंद्राच्या पुर्ण विरूद्ध!स्थिर,संथ,कठोर आणि रूक्ष!!
''तेलकट भांड्याचा चिकटा पाण्याने निघत नाही त्यासाठी नारळाची रुक्ष सालच लागते''
नंतर ते भांडं पुन्हा लखलखायला लागतं.
मनरूपी भांड्यावर चंद्रामुळे निर्माण झालेला भावनांचा चिकटा,मोह,UNHEALTHY ATACHMENTS शनि दुर करतात.
चंद्र पत्रिकेत ज्या राशीत असतो तीच आपली जन्मरास असते!त्यामुळेच शनिची साडेसाती चंद्र स्थानातील राशीला i.e.जन्मराशीला आणि चंद्राच्या मागच्या व पुढच्या राशीला लागते.
साडेसाती ही आपल्या प्रत्येकासाठी मुळात ''वरदान'' आहे.
भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही practical शिकवण साडेसातीत देउन जीवाला शिवाच्या भेटीच्या मार्गी लावतात.
मी, माझं, माझे मित्र, माझे नातेवाइक, माझे प्रेयस यातच गुरफुटलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात ''वास्तवाचं'' झणझणीत अंजन घालुन त्याला धाडकन वास्तवात जमिनीवर आणतात.म्हणुन साडेसाती हा अत्यंत महत्वाचा कालावधी असतो.जीवनाचे खरे कठोर पैलु..कंगोरे..लक्षात येतात.
चुकीचे unhealthy भावनीक गोग्गोड समज prejudices दुर होतात.
दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत पडलेला माणुस मनात मनोरे निर्माण करत स्वत:ला राजवाड्यात झोपलेला समजतो पण वास्तवात तो गटारात लोळत असतो.
शनी ही नशा..झिंग दुर करतात.
अडचणी आल्यामुळे..आजुबाजुच्या लोकांचे बुरखे फाटल्यामुळे होणाऱ्या वेदनांसाठी शनीला दोष देण्यापेक्षा त्याने 'सत्य' दाखवले यासाठी धन्यवाद म्हणायला हवं.
शेवटी ''सत्यं शिवम् सुंदरम्''!
चंचल,वैचारीकरित्या..भावनीकरित्या अपरिपक्व..उथळ व्यक्ती साडेसातीनंतर एक पुर्णत: मानसिक स्तरावर एक वेगळा Changed for better व्यक्ती होते.
अडचणी..(दिवा)स्वप्नभंग..ज्यांना आपण आपले समजत असतो त्यांचे मुळ चेहरे दाखवुन शनी व्यक्तीला जीवनातील वास्तवात आणतो.
अडचणींच्या..कर्माच्या भट्टीत व्यक्तीला तापवुन त्याच्यातील दोष..अहंकार नष्ट करून खणखणीत वास्तवात आणतो.
फक्त कर्तव्य आणि परिश्रमातुन निर्माण झालेली कर्मफुलेच शनिदेवाला वाहिली तर ते प्रसन्न राहतात.त्यासाठी शनिच्या कुठल्याही Shallow..superficial कर्मकांडाची गरज नाही.
कर्मकांडापेक्षा कर्मच श्रेष्ठ हेच शनिचं म्हणणं असतं.
मला स्वत:ला हे फार उशीरा कळले.कदाचीत यानंतर नेहमीसाठी लक्षात राहील.
- अभिजित पानसे
No comments:
Post a Comment