परवा भाऊबीजेला..जिला "यम द्वितीया" ही म्हणतात, सकाळपासून यम म्हणजे गॉड ऑफ डेथ गायब झाला होता. त्याच्या बहिणीने यमुनेने त्याला फॅमिली वॉट्सअप ग्रुप वर "हॅप्पी भाऊबीज यम ब्रो" मेसेज टाकला. वडील सूर्यानेही कौतुकाने त्यावर मेसेज केला. पण यमाचा काहीही रिप्लाय नाही.
तिने दुसऱ्या भावाला शनीला फोन केला. त्याने नेहमीप्रमाणे फोन उचलला नाहीच.
त्यालाही '' हे हॅपी भाऊबीज बिग ब्रो शनी!" मेसेज करून यमाबद्दल काही माहिती आहे का विचारलं. पण शनीने काही रिप्लाय केला नाही.
इंद्राने त्या संध्याकाळी खास रॉयल डान्स इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. पण यम हरवण्याची बातमी समजताच त्याने सर्व कार्यक्रम रद्द केलेत. आणि काळजीत पडला.
त्याच्या आज्ञेनुसार सगळे देवगण त्यांचे सबऑर्डीनेटस यमाला शोधू लागलेत.
इंद्राने यमाला शोधण्यासाठी देवगणांना यमाच्या मोठ्या टोलेजंगी राजवाडा बंगलोमध्ये शोधायला पाठवले.
आजवर इंद्र काय कोणीही यमाजी पंतांच्या रॉयल बंगलोला भेट दिली नव्हती. नियमितपणे यम आपल्या ऑफिसलाच येत असल्याने शिवाय कधीही रजा न घेत असल्याने कोणालाही त्यांच्या बंगलोमध्ये जाण्याची 'वेळ' आली नव्हती.
पण इतर देवांप्रमाणे यमाचाही लक्झरिअस टोलेजंग बंगला असेलच हे माहिती होतं.
"डेड एन्ड गल्लीत" यमाजीपंतांचं अगदी साधंसं छोटंसं घर होतं. घराच्या बाहेरील भिंतीवर नाव घराचं नाव होतं "रेस्ट इन पीस."
राहणीमान अगदी साधं असायचं त्यांचं.
घराबाहेर गोठ्यात यमाचा जाडा काळाभिन्न रेडा कडबा, गवत खाऊन झाल्याने रवंथ करीत बसला होता.
यमुनेने संपूर्ण घर धुंडाळलं पण यमाजी पंत आपल्या सदनिकेत नव्हते.
तेवढ्यात यमुनेचा सेल वाजला.
त्यावर शनीचा बराच उशीरा मेसेजला रिप्लाय आला होता. यमुनाबाई मनात बोलल्या "तसाही हा शनी त्याच्या दिरंगाईसाठी प्रदिद्ध आहेच. प्रत्येक गोष्टीला उशिरा करतो. पण चला किमान रिप्लाय आला .
यमुनेने मेसेज वाचला, "यमुने मी माझ्या कामात व्यस्त असल्याने यमुने मला यमाबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे मी काहीही तुला सांगू शकत नाही!
आणि मला "हॅप्पी भाऊबीज..दिवाळी " सारखे मेसेजेस मला पुन्हा पाठवू नका! या भावनिक अटॅचमेन्ट गोष्टीत मला रस नाही! तुम्ही लोक तुमचं काम करा मला माझं करू दे!
-तुझा ज्येष्ठ भ्राता शनी सूर्यवंशम!"
यमुनेला शनीच्या या अश्या रुक्ष रिप्लाय ची कल्पना होतीच तरीही तिला यावेळी जरा जास्तच वाईट वाटले.
शेवटी थोडी शोधाशोध करून यमुना आपल्या उत्तराखंड ..दिल्ली..मथुरा आणि अलाहाबाद प्रयाग अश्या रूटने वाहायला परत गेली.
इकडे देवगण मात्र घाबरलेत जर यम कुठेतरी निघून गेला झाला तर कसं करायचं! आपल्या बॉसेस ला काय सांगायचं!
त्यांनी 'विष्णूला' यम गायब झालाय सांगण्याचं ठरवलं. पण लक्षात आलं की विष्णू तर अजूनही निद्रेत आहेत. त्यांना उठायला अजून सात आठ दिवस बाकी आहेत. निद्रेतून जागे झालेत की प्रथम ते तुळसीसोबत विवाहाच्या तयारीला लागतील. तो येऊ घातलेला एक मोठा इव्हेंट आपल्याला मॅनेज करायचाय त्यात आता यमाचा इश्यू झालाय.
एका देवाने सुचवलं," देवाधिदेव महादेवांच्या कानी घालायचं का?"
तर इंद्र बोलला " नाही ! महादेव अश्या डोमेस्टिक गोष्टीत लक्ष घालत नाहीत! देवराष्ट्रावर वा पृथ्वीवर काही प्रचंड संकट, इमरंजन्सी आली तरच त्यांना हेल्प मागायची असते!
नाहीतर उगा आपल्यावरच त्यांची थर्ड आय ओपन व्हायची!
इंद्राने सगळ्यांना यमाच्या शोधास पाठवले.
सगळयांना काळजी वाटू लागली यमाची!
शेवटी यम हरवला कुठे?
बराच शोधानंतर एका देवगणाने इंद्राला त्याच्या 'गॉडाफोन' 33G कनेक्शनवरून फोन करून सांगितले की त्यांना यम एका निबिड अरण्यात एका तळाकाठी दगडावर बसलेला दिसला आहे.
घनदाट अरण्यात एका तळ्याकाठी पसरट दगडावर यम दोन पाय खाली करून बसला होता. सोन्याचा मुकुट खाली दगडावर आ वासलेल्या स्थितीत पडला होता.
दुरुनही त्याचा निरुत्साही निस्तेज नाराज चेहरा दिसत होता.
शून्यात नजर लावून म्लान चेहऱ्याने तळ्यात उमटणाऱ्या तरंगाकडे बघत होता.
यमाची दुःखी मुद्रा बघून समोरील तळ्यातून "जल महाभूत" उभं ठाकलं.
"यमराज हे काय बघतोय मी तुम्ही आज दुःखी मुद्रेत! तुमच्यासारखे रुबाबदार , कणखर व्यक्तिमत्त्व आज असं का मलूल झालंय?
कोणतं दुःख आहे तुमहाला?
यम एक दीर्घ उसासा टाकून जल महाभूताला अभिवादन करत बोलला, " संपूर्ण मानव जात माझा तिरस्कार करते! इतर सर्व देवगणाची पूजा होते, त्यांची स्तुती गायली जाते, स्तोत्रे म्हटली जातात! पण माझा मात्र सगळेच दुस्वास करतात!
माझ्यासाठी नेहमीच राग, अस्वीकार्यता, असंतोष असतो! मी यामुळे खूप दुःखी आहे. माझा कुठेच जयजयकार होत नाही.
म्हणून मी जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्याने इथे दूर येऊन बसलोय.
तुम्ही जीवन.. जल आहात! तुमच्यामुळे मात्र जीवननिर्मिती होते आणि माझ्यामुळे...पुढे भावना अनावर झाल्याने काहीही न बोलता निराशेने यम खाली दगडकडे बघत राहिला.
जल महाभूत यमाचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ जाऊन बोललं, "यमराज तुमच्या दुःखाचं कारण मला कळलं .
ऐका, तुम्ही म्हणता मी जीवनाचा कारक आहे .
पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. मी जीवन निर्मिती करतो तर तुम्ही त्या निर्मितीला योग्य आणि अत्यन्त आवश्यक असा पूर्णविराम देता.
'बदल' हे जसं शाश्वत सत्य आहे तसंच
प्रत्येक गोष्टीला 'शेवट' असणे हेही त्रिकालाबाधित सत्य आहे.
आणि या दोन्ही गोष्टीशी तुमचा जवळचा संबंध आहे.
तुम्ही मृत्यूचे कारक आहात .त्यामुळेच निर्मितीप्रक्रिया अविरत सुरू राहते. आणि निर्मितीमध्ये कालानुरूप योग्य अयोग्य ते बदल होत राहतात.
"Diversity in the unity" कायम राहते.
जल महाभुताचे ते बोलणे काळजीपूर्वक ऐकतानाच तिथे "वायू महाभूत " हजर झाले. यावेळी नैऋत्य मान्सून उशिरापर्यंत टिकल्याने वायू ला ही बराच ओव्हरटाईम करावा लागला होता. आता काही महिने तरी किमान हिवाळा उन्हाळा संपेपर्यंत मे महिनीच्या अखेरपर्यंत निवांत विश्रांती घ्यावी म्हणून तो आता निद्रावस्थेत जाणार होता. फेब्रुवारीत अवकाळी पाऊस , वादळ वारा निर्माण करायला वायूचे जुनीअर्स होतेच.
"आरं आरं यम भौ तुम्ही हिकडं कुणीकडं? तिकडं तुम्हास्नी देवलोक हुडकून ऱ्हायलेत ना!
वायू यमाच्या पायाला नमस्कार करत बोलला.
यमानेही वायूला कसेनुकसे हसून अभिवादन केले.
वायूने यमाला काय झालं म्हणून विचारलं. सर्व वृत्तांत कळल्यावर वायू बोलला, " यम देवा तुम्ही असे दुःखी कष्टी होऊ नका! तुम्ही आम्ही फकस्त आपापले कामं करतोय!आपल्याला त्या जगननियंता निसर्गाने अपॉईंट केलं हाय! जल देव ,मी ,अग्नी आणि तुम्ही स्वतः हे सर्व एकाच शिष्टीमचे भाग हाओत!
तुम्ही हात म्हणून आम्हला महत्व हाये.
मान्सून महाराष्ट्रात लांबल्याने वायूने गावरान भाषा शिकली होती त्यातच तो बोलत होता.
'अग्नीचा' नामोच्चार झाल्याने तो ही तिथे यमशोधार्थ प्रकट झाला.
अग्नीला ही यमाची सर्व मानसिक स्थिती कळल्यावर तो बोलू लागला.
"यम देवा विध्वंसाबद्दल सगळ्यांचंच मन कलुषित आहे. सगळेजण विध्वंसाला घाबरतात, नाश होण्याला नावे ठेवतात. पण नष्ट होणे , कोणत्याही गोष्टीचे रूप पालटणे हे महत्वाचे आहे.
मी सगळं काही नष्ट करू शकतो म्हणून पुन्हा उत्पत्ती होत राहते.
बघा ना स्वयंपाक घरात मी पदार्थांना त्यांच्या मूळ रूपाला नष्ट करतो आणीन स्वादिष्ट आणि पचवता येतील असं अन्न निर्माण करतो. तरीही लोक मृत्यूला, नाशाला वाईट समजतात."
हे सगळं बोलणं सुरू असतानाच एरवी शांत सहनशील असलेलं पण क्वचितच कोपल्यावर मात्र हाहाकार उलथापालथ घडवणारं पृथ्वीतत्व तिथे हजर होत बोलू लागलं,
"यमराज तुम्ही आहात म्हणून माझं पर्यायाने जीवसृष्टीचं अस्तित्व टिकून आहे. तुम्ही योग्य कर्म करीत आहात! जर मृत्यू नसता तर पृथ्वीवर जीवन माजलं असतं ! मी तरी किती भाजीपाला, झाडे , खनिजसंपत्ती उत्पन्न करणार! तुम्ही नसता तर लोक भुकेने तडफडत राहिले असते. पण मेले नसते! सर्व खनिज, खाद्य संपत्तीचा तुटवडा पडला असता! जीवन हे शाप ठरलं असतं!
तुम्ही संपावर जाण्याची आणि त्यानंतरच्या परिणामाची कल्पनाही करवू शकत नाही!
यमा, मृत्यू आहे म्हणून जीवनाची क्षणभंगुरता कायम आहे,तुम्ही आहात म्हणून जीवनाचे मोल आहे. मृत्यू आहे म्हणून जीवनाचे महत्व आहे. तुम्ही आहात म्हणून पृथ्वी सुंदर आहे.
मगावसून सर्व संवाद ऐकत असलेलं सर्वच ठिकाणी कायम अस्तित्व "मैं समय हुं" फेम "आकाश तत्व" तेव्हा कुठल्याही रुपात अवतीर्ण न होता फक्त 'वाणी' रुपात बोललं,
"हे यमदेव सर्व जण मृत्यूला घाबरतात म्हणून तर अजूनही कुठंतरी सात्विकता टिकून आहे! फक्त गोडबोले शिक्षक नाही तर कडक, शिक्षा देणारे मास्तर ही गरजेचे असतातच!
जखम झाल्यावर फक्त फुंकर मारणाऱ्यांपेक्षा जबरस्तीने त्या जखमेचं ड्रेसिंग करणारा डॉक्टर महत्वचा असतो.
आणि मृत्यूबद्दल सगळयांना गैरसमज आहे की मृत्यू हा वाईटच असतो. पण सत्य हे आहे की मृत्यू ही जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट आहे फक्त तो स्वतःहून यायला हवा! हां मात्र स्वतः त्याला कवटाळण्याचा प्रयत्न केल्यास मात्र शिक्षा मिळते.
मृत्यू बद्दल गैरसमज आहे म्हणून तो दुःखाचा कारण समजल्या जातं. खरे तर ज्याचा मृत्यू होतो तो सुखी होतो त्याचे आप्त फक्त त्या व्यक्तीच्या 'वियोगाने' दुःखी होतात आणि मृत्यूला नावे ठेवतात.
या जगात मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. यमा तुमच्यासारखा प्रामाणिक मित्र नाही. तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत असतोच! तो मिठी मारतोच."
यम द गॉड ऑफ डेथ, पाचही महाभूतांचे ते ज्ञानयुक्त कॉन्सलिंग ऐकून त्यांचा निरुत्साह , नैराश्य, तक्रारी दूर पळाल्यात. ते पाचही महाभूत त्यांचे सोबती होते. कारण मृत्यू झाल्यावर शरीराला कोणी 'अग्नीच्या' हवाली करतं, कोणी 'जमिनीत' पुरतं, कोणी 'नदीत' टाकतं, कोणी उघड्यावर पशु पक्ष्यांच्या हवाली करतं .
यमाजीपंत आता पूर्वीसारखे तेजस्वी दिसु लागलेत. मळभ दूर झालं. खाली पडलेला सोन्याचा मुकूट पुन्हा धारण केला. नुकत्याच ट्रिम केलेल्या भरदार मिशीला पिळ देताना मनात विचार आला आता हे पारंपरिक मिशिवालं, सोन्याचा हेल्मेट हे राकट रूप त्यागावं आणि स्मार्टफोन, सोशिअल मीडियाच्या काळात जरा मॉडर्न व्हावं.
तोवर त्यांचं पारंपरिक वाहन त्यांचा गुटगुटीत रेडा हजर झाला होता. आपल्या गॉडाफोन 33G कनेक्टिव्हिटी असलेल्या सिमकार्ड सेलवरून इंद्राला मेसेज टाकला, "आय एम कमिंग टू द ऑफिस! नो मोर ब्ल्यूज! हॅपी दिवाळी"
-अभिजीत पानसे
तिने दुसऱ्या भावाला शनीला फोन केला. त्याने नेहमीप्रमाणे फोन उचलला नाहीच.
त्यालाही '' हे हॅपी भाऊबीज बिग ब्रो शनी!" मेसेज करून यमाबद्दल काही माहिती आहे का विचारलं. पण शनीने काही रिप्लाय केला नाही.
इंद्राने त्या संध्याकाळी खास रॉयल डान्स इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. पण यम हरवण्याची बातमी समजताच त्याने सर्व कार्यक्रम रद्द केलेत. आणि काळजीत पडला.
त्याच्या आज्ञेनुसार सगळे देवगण त्यांचे सबऑर्डीनेटस यमाला शोधू लागलेत.
इंद्राने यमाला शोधण्यासाठी देवगणांना यमाच्या मोठ्या टोलेजंगी राजवाडा बंगलोमध्ये शोधायला पाठवले.
आजवर इंद्र काय कोणीही यमाजी पंतांच्या रॉयल बंगलोला भेट दिली नव्हती. नियमितपणे यम आपल्या ऑफिसलाच येत असल्याने शिवाय कधीही रजा न घेत असल्याने कोणालाही त्यांच्या बंगलोमध्ये जाण्याची 'वेळ' आली नव्हती.
पण इतर देवांप्रमाणे यमाचाही लक्झरिअस टोलेजंग बंगला असेलच हे माहिती होतं.
"डेड एन्ड गल्लीत" यमाजीपंतांचं अगदी साधंसं छोटंसं घर होतं. घराच्या बाहेरील भिंतीवर नाव घराचं नाव होतं "रेस्ट इन पीस."
राहणीमान अगदी साधं असायचं त्यांचं.
घराबाहेर गोठ्यात यमाचा जाडा काळाभिन्न रेडा कडबा, गवत खाऊन झाल्याने रवंथ करीत बसला होता.
यमुनेने संपूर्ण घर धुंडाळलं पण यमाजी पंत आपल्या सदनिकेत नव्हते.
तेवढ्यात यमुनेचा सेल वाजला.
त्यावर शनीचा बराच उशीरा मेसेजला रिप्लाय आला होता. यमुनाबाई मनात बोलल्या "तसाही हा शनी त्याच्या दिरंगाईसाठी प्रदिद्ध आहेच. प्रत्येक गोष्टीला उशिरा करतो. पण चला किमान रिप्लाय आला .
यमुनेने मेसेज वाचला, "यमुने मी माझ्या कामात व्यस्त असल्याने यमुने मला यमाबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे मी काहीही तुला सांगू शकत नाही!
आणि मला "हॅप्पी भाऊबीज..दिवाळी " सारखे मेसेजेस मला पुन्हा पाठवू नका! या भावनिक अटॅचमेन्ट गोष्टीत मला रस नाही! तुम्ही लोक तुमचं काम करा मला माझं करू दे!
-तुझा ज्येष्ठ भ्राता शनी सूर्यवंशम!"
यमुनेला शनीच्या या अश्या रुक्ष रिप्लाय ची कल्पना होतीच तरीही तिला यावेळी जरा जास्तच वाईट वाटले.
शेवटी थोडी शोधाशोध करून यमुना आपल्या उत्तराखंड ..दिल्ली..मथुरा आणि अलाहाबाद प्रयाग अश्या रूटने वाहायला परत गेली.
इकडे देवगण मात्र घाबरलेत जर यम कुठेतरी निघून गेला झाला तर कसं करायचं! आपल्या बॉसेस ला काय सांगायचं!
त्यांनी 'विष्णूला' यम गायब झालाय सांगण्याचं ठरवलं. पण लक्षात आलं की विष्णू तर अजूनही निद्रेत आहेत. त्यांना उठायला अजून सात आठ दिवस बाकी आहेत. निद्रेतून जागे झालेत की प्रथम ते तुळसीसोबत विवाहाच्या तयारीला लागतील. तो येऊ घातलेला एक मोठा इव्हेंट आपल्याला मॅनेज करायचाय त्यात आता यमाचा इश्यू झालाय.
एका देवाने सुचवलं," देवाधिदेव महादेवांच्या कानी घालायचं का?"
तर इंद्र बोलला " नाही ! महादेव अश्या डोमेस्टिक गोष्टीत लक्ष घालत नाहीत! देवराष्ट्रावर वा पृथ्वीवर काही प्रचंड संकट, इमरंजन्सी आली तरच त्यांना हेल्प मागायची असते!
नाहीतर उगा आपल्यावरच त्यांची थर्ड आय ओपन व्हायची!
इंद्राने सगळ्यांना यमाच्या शोधास पाठवले.
सगळयांना काळजी वाटू लागली यमाची!
शेवटी यम हरवला कुठे?
बराच शोधानंतर एका देवगणाने इंद्राला त्याच्या 'गॉडाफोन' 33G कनेक्शनवरून फोन करून सांगितले की त्यांना यम एका निबिड अरण्यात एका तळाकाठी दगडावर बसलेला दिसला आहे.
घनदाट अरण्यात एका तळ्याकाठी पसरट दगडावर यम दोन पाय खाली करून बसला होता. सोन्याचा मुकुट खाली दगडावर आ वासलेल्या स्थितीत पडला होता.
दुरुनही त्याचा निरुत्साही निस्तेज नाराज चेहरा दिसत होता.
शून्यात नजर लावून म्लान चेहऱ्याने तळ्यात उमटणाऱ्या तरंगाकडे बघत होता.
यमाची दुःखी मुद्रा बघून समोरील तळ्यातून "जल महाभूत" उभं ठाकलं.
"यमराज हे काय बघतोय मी तुम्ही आज दुःखी मुद्रेत! तुमच्यासारखे रुबाबदार , कणखर व्यक्तिमत्त्व आज असं का मलूल झालंय?
कोणतं दुःख आहे तुमहाला?
यम एक दीर्घ उसासा टाकून जल महाभूताला अभिवादन करत बोलला, " संपूर्ण मानव जात माझा तिरस्कार करते! इतर सर्व देवगणाची पूजा होते, त्यांची स्तुती गायली जाते, स्तोत्रे म्हटली जातात! पण माझा मात्र सगळेच दुस्वास करतात!
माझ्यासाठी नेहमीच राग, अस्वीकार्यता, असंतोष असतो! मी यामुळे खूप दुःखी आहे. माझा कुठेच जयजयकार होत नाही.
म्हणून मी जॉब सॅटिस्फॅक्शन नसल्याने इथे दूर येऊन बसलोय.
तुम्ही जीवन.. जल आहात! तुमच्यामुळे मात्र जीवननिर्मिती होते आणि माझ्यामुळे...पुढे भावना अनावर झाल्याने काहीही न बोलता निराशेने यम खाली दगडकडे बघत राहिला.
जल महाभूत यमाचं बोलणं ऐकून त्यांच्या जवळ जाऊन बोललं, "यमराज तुमच्या दुःखाचं कारण मला कळलं .
ऐका, तुम्ही म्हणता मी जीवनाचा कारक आहे .
पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. मी जीवन निर्मिती करतो तर तुम्ही त्या निर्मितीला योग्य आणि अत्यन्त आवश्यक असा पूर्णविराम देता.
'बदल' हे जसं शाश्वत सत्य आहे तसंच
प्रत्येक गोष्टीला 'शेवट' असणे हेही त्रिकालाबाधित सत्य आहे.
आणि या दोन्ही गोष्टीशी तुमचा जवळचा संबंध आहे.
तुम्ही मृत्यूचे कारक आहात .त्यामुळेच निर्मितीप्रक्रिया अविरत सुरू राहते. आणि निर्मितीमध्ये कालानुरूप योग्य अयोग्य ते बदल होत राहतात.
"Diversity in the unity" कायम राहते.
जल महाभुताचे ते बोलणे काळजीपूर्वक ऐकतानाच तिथे "वायू महाभूत " हजर झाले. यावेळी नैऋत्य मान्सून उशिरापर्यंत टिकल्याने वायू ला ही बराच ओव्हरटाईम करावा लागला होता. आता काही महिने तरी किमान हिवाळा उन्हाळा संपेपर्यंत मे महिनीच्या अखेरपर्यंत निवांत विश्रांती घ्यावी म्हणून तो आता निद्रावस्थेत जाणार होता. फेब्रुवारीत अवकाळी पाऊस , वादळ वारा निर्माण करायला वायूचे जुनीअर्स होतेच.
"आरं आरं यम भौ तुम्ही हिकडं कुणीकडं? तिकडं तुम्हास्नी देवलोक हुडकून ऱ्हायलेत ना!
वायू यमाच्या पायाला नमस्कार करत बोलला.
यमानेही वायूला कसेनुकसे हसून अभिवादन केले.
वायूने यमाला काय झालं म्हणून विचारलं. सर्व वृत्तांत कळल्यावर वायू बोलला, " यम देवा तुम्ही असे दुःखी कष्टी होऊ नका! तुम्ही आम्ही फकस्त आपापले कामं करतोय!आपल्याला त्या जगननियंता निसर्गाने अपॉईंट केलं हाय! जल देव ,मी ,अग्नी आणि तुम्ही स्वतः हे सर्व एकाच शिष्टीमचे भाग हाओत!
तुम्ही हात म्हणून आम्हला महत्व हाये.
मान्सून महाराष्ट्रात लांबल्याने वायूने गावरान भाषा शिकली होती त्यातच तो बोलत होता.
'अग्नीचा' नामोच्चार झाल्याने तो ही तिथे यमशोधार्थ प्रकट झाला.
अग्नीला ही यमाची सर्व मानसिक स्थिती कळल्यावर तो बोलू लागला.
"यम देवा विध्वंसाबद्दल सगळ्यांचंच मन कलुषित आहे. सगळेजण विध्वंसाला घाबरतात, नाश होण्याला नावे ठेवतात. पण नष्ट होणे , कोणत्याही गोष्टीचे रूप पालटणे हे महत्वाचे आहे.
मी सगळं काही नष्ट करू शकतो म्हणून पुन्हा उत्पत्ती होत राहते.
बघा ना स्वयंपाक घरात मी पदार्थांना त्यांच्या मूळ रूपाला नष्ट करतो आणीन स्वादिष्ट आणि पचवता येतील असं अन्न निर्माण करतो. तरीही लोक मृत्यूला, नाशाला वाईट समजतात."
हे सगळं बोलणं सुरू असतानाच एरवी शांत सहनशील असलेलं पण क्वचितच कोपल्यावर मात्र हाहाकार उलथापालथ घडवणारं पृथ्वीतत्व तिथे हजर होत बोलू लागलं,
"यमराज तुम्ही आहात म्हणून माझं पर्यायाने जीवसृष्टीचं अस्तित्व टिकून आहे. तुम्ही योग्य कर्म करीत आहात! जर मृत्यू नसता तर पृथ्वीवर जीवन माजलं असतं ! मी तरी किती भाजीपाला, झाडे , खनिजसंपत्ती उत्पन्न करणार! तुम्ही नसता तर लोक भुकेने तडफडत राहिले असते. पण मेले नसते! सर्व खनिज, खाद्य संपत्तीचा तुटवडा पडला असता! जीवन हे शाप ठरलं असतं!
तुम्ही संपावर जाण्याची आणि त्यानंतरच्या परिणामाची कल्पनाही करवू शकत नाही!
यमा, मृत्यू आहे म्हणून जीवनाची क्षणभंगुरता कायम आहे,तुम्ही आहात म्हणून जीवनाचे मोल आहे. मृत्यू आहे म्हणून जीवनाचे महत्व आहे. तुम्ही आहात म्हणून पृथ्वी सुंदर आहे.
मगावसून सर्व संवाद ऐकत असलेलं सर्वच ठिकाणी कायम अस्तित्व "मैं समय हुं" फेम "आकाश तत्व" तेव्हा कुठल्याही रुपात अवतीर्ण न होता फक्त 'वाणी' रुपात बोललं,
"हे यमदेव सर्व जण मृत्यूला घाबरतात म्हणून तर अजूनही कुठंतरी सात्विकता टिकून आहे! फक्त गोडबोले शिक्षक नाही तर कडक, शिक्षा देणारे मास्तर ही गरजेचे असतातच!
जखम झाल्यावर फक्त फुंकर मारणाऱ्यांपेक्षा जबरस्तीने त्या जखमेचं ड्रेसिंग करणारा डॉक्टर महत्वचा असतो.
आणि मृत्यूबद्दल सगळयांना गैरसमज आहे की मृत्यू हा वाईटच असतो. पण सत्य हे आहे की मृत्यू ही जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट आहे फक्त तो स्वतःहून यायला हवा! हां मात्र स्वतः त्याला कवटाळण्याचा प्रयत्न केल्यास मात्र शिक्षा मिळते.
मृत्यू बद्दल गैरसमज आहे म्हणून तो दुःखाचा कारण समजल्या जातं. खरे तर ज्याचा मृत्यू होतो तो सुखी होतो त्याचे आप्त फक्त त्या व्यक्तीच्या 'वियोगाने' दुःखी होतात आणि मृत्यूला नावे ठेवतात.
या जगात मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे. यमा तुमच्यासारखा प्रामाणिक मित्र नाही. तो कायमस्वरूपी तुमच्यासोबत असतोच! तो मिठी मारतोच."
यम द गॉड ऑफ डेथ, पाचही महाभूतांचे ते ज्ञानयुक्त कॉन्सलिंग ऐकून त्यांचा निरुत्साह , नैराश्य, तक्रारी दूर पळाल्यात. ते पाचही महाभूत त्यांचे सोबती होते. कारण मृत्यू झाल्यावर शरीराला कोणी 'अग्नीच्या' हवाली करतं, कोणी 'जमिनीत' पुरतं, कोणी 'नदीत' टाकतं, कोणी उघड्यावर पशु पक्ष्यांच्या हवाली करतं .
यमाजीपंत आता पूर्वीसारखे तेजस्वी दिसु लागलेत. मळभ दूर झालं. खाली पडलेला सोन्याचा मुकूट पुन्हा धारण केला. नुकत्याच ट्रिम केलेल्या भरदार मिशीला पिळ देताना मनात विचार आला आता हे पारंपरिक मिशिवालं, सोन्याचा हेल्मेट हे राकट रूप त्यागावं आणि स्मार्टफोन, सोशिअल मीडियाच्या काळात जरा मॉडर्न व्हावं.
तोवर त्यांचं पारंपरिक वाहन त्यांचा गुटगुटीत रेडा हजर झाला होता. आपल्या गॉडाफोन 33G कनेक्टिव्हिटी असलेल्या सिमकार्ड सेलवरून इंद्राला मेसेज टाकला, "आय एम कमिंग टू द ऑफिस! नो मोर ब्ल्यूज! हॅपी दिवाळी"
-अभिजीत पानसे