Friday 14 September 2018



"संपुर्ण़ भारतीयांसाठी एक अविस्मरणीय गणपती विसर्जन आणि क्रिकेट दिन"

दसरा आला की बँगलोरची श्रीनाथ कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेले सिमोल्लंघन आठवतं. महाशिवरात्रीला सचिनने ०३ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध केलेले रूद्रतांडव आठवते..पण दरवर्षी गणपतीच्या दिवसात आणि विसर्जनाच्या दिवशी आठवतो तो संपुर्ण भारतवासीयांच्या मनात कोरला गेलेला २४ सप्टेंबर २००७ चा दिवस.
पहिल्या वहिल्या ट्वेंटी ट्वेंटी प भारत वि.पाकिस्तान सुपर डुपर फायनल!!
 उत्साहाची आणि उत्सवाची परिसिमा !

पण टुर्नामेंट सुरू होण्यापुर्वी परिस्थिती पुर्णपणे वेगळी विरूद्ध होती.संपुर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी आणि भारतीय क्रिकेट नैराश्याच्या ,विषण्णतेच्या गडद छायेतुन चाललं होतं.क्रिकेट मध्ये  निरूत्साहाचं दमट जड वातावरण होतं.

भारतासाठी आजवरचा सर्वात वाइट विंडीजमध्ये ०७ चा वर्ल्ड कप झाला होता.राहुल द्रविडने कँप्टन्सीचा राजीनामा दिला होता.
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू अजाण होते.तोवर फक्त न्युझिलंड व इतर इंग्लिश टीम्स ट्वेंटी क्रिकेट खेळु लागले होते.
भारतीय खेळाडुंचं अपयश आणि क्रिकेटप्रेंमींची नाराजी बघता खुद्द बिसिसिआयने सचिन राहुल गांगुली त्रयीला या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापासुन रोखले होते.त्यामुळे गांगुली व सचिनचा अहंकार दुखावला होता.
नवे तरूण चेहरे ,अननुभवी नवा कँप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत आफ्रिकेत पाठवल होते.

८३ च्या वर्ल्ड कप सारखीच परिस्थिती होती की कोणालाही या टीम कडुन कुठलिही अपेक्षा नव्हती!औपचारिकता म्हणुन आणि पुन्हा हारण्यासाठीच वर्ल्ड कपमध्ये गेले होते.

पण बघता बघता गोष्टी बदलत गेल्या! सुखकर्ता दुखहर्ता  गणपतीने जणू चमत्कार केला !१४ तारखेला घराघरात गणपती स्थानापन्न झाले.

इकडे गणपतीचीे  प्राणप्रतिष्ठा झाली तसे गणपतीने भारतीय टीममध्ये  प्राण फुंकले.

चौदा तारखेलाच रात्री पाकड्यांविरूद्ध भारताने  "शुट आउट अॅट डरबन" करुन  3/0 ने हरवुन विजयाचा श्रीगणेशा केला.

पण  "द्वितीए ग्रासे मक्षिकापात:" झाला! शुभ्र सुंदर चविष्ट उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवुन खाण्यास सुरवात करणार तर त्यात दुर्वेच्या जागी केस निघावा तसं पुढच्या मँचमध्ये  Blackcaps न्युझिलंडने भारताला हरवलं.

देशभर  दासरामाचा वाट पाहे सजणा आर्ततेने आरती सुरू झाली. फळिवरी वंदना म्हणत  फळिवरुन उतरलेली  वंदना पुन्हा फळिवर जाउन बसली. दिपक जोशी नमोस्तुते प्रार्थना करू लागले.

गणपती प्रसन्न झाले . "नथिंग टु फिअर व्हेन आय अॅम् हिअर "म्हणाले.
पुढे सलग दोन दिवस इंग्लंड आणि साउथ आफ्रिके विरूद्ध भारताने यश मिळवले.आफ्रिका नेहमी प्रमाणे सोप्या सामन्यात #चोक झाली.आणि भारत सेमिफायनलमध्ये धडकला तो ह्युज जाएन्ट ऑस्ट्रेलियाविरूद्ध! बावीस सप्टेंबरच्या रात्री पुन्हा एकदा  युवि ने राज्य करत ऑस्ट्रेलियाला हरवले.

आणि संपुर्ण क्रिकेट जगाला कल्पनातित  क्रिकेट मेजवानी मिळण्याची पुर्व व्यवस्था झाली.कारण तिकडे पाकिस्तान फायनलला आधीच पोहचला होता.

वर्ल्डकप फायनल तेही भारत वि. पाकिस्तान !!!याहुन अधिक थरारक काय असणार होतं!!

संपुर्ण देशात गणपतीची प्रार्थना ..यdnya सुरू होते. सिद्धिविनायकापासुन पुणे..टेकडीचा गणपती येथे पुजा प्रार्थना सुरू होती.दोन दिवस न्युज चँनल्स फक्त फायनलबद्दल चर्चा करत होते.

आणि आदल्या रात्री एक वाईट बातमी कळली! विरेंद्रसेहवाग जखमी झाल्याने फायनल खेळु शकणार नाही!!!!
संपुर्ण देशासाठी तो प्रचंड धक्का होता!

पाकिस्तानची टीम कँप्टन आफ्रिदी सकट फुल फॉर्ममध्ये होती.उमर गुल सकट विचित्र अक्शन असलेला सोहेल तनवीर जबरदस्त बॉलिंग करत होते.पेस बँटरी स्ट्रॉंग होती.

गणपती विसर्जनाचे ते दिवस होते.मी तेव्हा एका नातेवाईकांकडे गेलो होतो.त्यांच्याकडे त्याच दिवशी संध्याकाळी गणपती विसर्जन होत.त्यामुळे आम्ही पोट्टेसोट्टे काळजीत होतो की मँच मिस होणार का!!

पण सर्वानुमती ठरलं  आधी विसर्जन पाकिस्तानचं मग बाप्पाच्या मुर्तीचं!!!!!

दुपारी मित्राकडे गणपतीचं जेवायला गेलो घाईगडबडीत गिळलं  आणि परत निघालो तोवर मँच वॉज ऑन!

सेहवागच्या जागी इरफान पठानचा भाऊ  युसूफपठाण खेळतोय कळलं.पहिल्यांदाच भारताच्या टीममध्ये दोन सख्खे भाउ खेळताना पाहत होतो.

भारताची बँटिंग सुरू होती. रस्त्यात पान टपरीवर पहिला ओवर पाहिला.मोहम्मद हफिज अंगावर धावुन आला.हाच तो हाफिज  विणामलिकचा पहिला पिठ्ठु! ज्याच्या भरवशावर ती भारतात सेलेब बनली.

ओवरच्या दुसऱ्याच बॉलवर; तोवर एकही बॉल न खेळलेला पठाण रन आउट होता अगदी थोडक्यात वाचला!पुढे त्याच ओवरमध्ये हापिजला स्ट्रेट प्रेक्षकांमध्ये पठाणने उडवलं.पहिलीच मँच खेळणारा युसूफ पठाण आमच्यासाठी हिरो बनला!!!

पण त्याचीही विकेट गेली. गौतमगंभीर एक बाजु लढवत होता.१२ बॉल्समध्ये पन्नास काढणारा युवराज सिंग मात्र फायनलमध्ये पुर्णपणे आउट ऑफ टच भासत होता.सतराव्या ओवरपर्यंत रनरेट
खुप नव्हताच.

 सेट झालेल्या युवीची आतातरी फटकेबाजी सुरू होइल असं वाटत असतानाच काल्पनिक  लॉ ऑफ अँवरेजेसने युवराजचा घात केला!त्याच ओवरमध्ये उमर गुलने युविच्या जागी आलेल्या धोनीवर  बिमर फेकला!दुसऱ्या बॉलवर धोनीचेही स्टंप्स उडालेत!

गौतम गंभीरने संरक्षण आणि अटॅकचं सुरेख मिश्रण करत शेवटपर्यंत एक टोक सांभाळत भारताच्या वीस ओवर्समध्ये 157 धावा लावल्या.

मध्यांतर झाला.सगळ्यांच्या मनात एकच धाकधुक !फुल फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानसमोर इतके कमी रन्स भारत वाचवु शकेल का?पुन्हा एकदा 83चा वर्ल्ड कप होइल का?

पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये आम्ही संध्याकाळची गणपतीची आरती 'उरकली'.

मनात मागणं एकच!माझ्या..आमच्या..सर्व देशवासीयांच्या....
गणपतीच्या गंभीर डोळ्यांमध्येही आम्हाला काळजी दिसली.आपल्याला आपल्याच भावनांचं प्रतिबिंब दिसत असतं.

पाकिस्तानची बँटिंग सुरू झाली.रूद्रप्रतापने सुरवातीलाच बळी मिळवला.इरफान पठाणने विकेट्स काढल्यात आणि आमचा जिवात जीव आला

पण मँच सतत दोन्ही बाजुने कलत होती.एकवेळ खात्री झाली की आता भारत जिंकणार!
आणि तसा वयस्कर पण नवोदित खेळाडु पाकिस्तानचा  बमन इराणी मिसबाह उल हकने मँच पलटवण्यास सुरवात केली!

अठरा एकोणीस ओवर्समध्ये गोलंदाजांना फोडुन काढले! हरभजनच्या एक ओवरमध्ये 3 सिक्स मारत शेवटच्या ओवरला फक्त 13 रन्स शिल्लक ठेवलेत.

मिसबाह हकचा त्यावेळचा अवतार बघता तो हे रन्स अगदी सहज काढेल हे स्पष्ट होतं.पण भारताची जबरदस्त जमेची बाजु ही होती की पाकिस्तानची फक्त एकच विकेट शिल्लक होती.

पण शेवटचा ओवर कोण टाकणार!! मिसबाह मांजराच्या गळ्यात घंटा कोण अडकवणार!

प्रमुख वेगवान बॉलर्सचे ओवर्स संपले होते.प्रमुख आणि अनुभवी बॉलर हरभजनचा एक ओवर शिल्लक होता.

पण मोठं घर 'पोकळवासा हे हरभजनच्या रूपात दिसलं.

त्याने शेवटचा ओवर टाकण्यास नकार दिला.धोनीने बॉल अनुभव नसलेल्या जोगिंदरशर्माला दिला.

लिमिटेड सोर्सेचा योग्य उपयोग हे धोनीने दाखवुन दिले ते जोगिंदर शर्माला त्याने जे शेवटचा ओवर सुरू करण्यापुर्वी सांगितले त्यावरून!!!

धोनीने त्याला म्हटलं "तु जितका टेन्शनमध्ये आहेस तितकाच पुढचा बँटस्मनसुद्धा आहे!बिनधास्त बॉलिंग कर!"

संपुर्ण देशभरातील सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत..

शर्माचा पहिला बॉल वाइड टेन्शनमध्ये वाढ!
पुढचा डॉट बॉल . आणि त्यानंतरच्या बॉलवर मिसबाहने सिक्स ठोकला.
पाकिस्तानला जिंकायला फक्त 6 रन्स हवे होते तेही चार बॉल्समध्ये!
मिसबाह ते सहज काढु शकत होता.

आपण मँच हारलोय  जवळपास सगळ्यांची खात्री झाली होती.

अब सब कुछ भगवानके हात मे अशी आम्हा सगळ्यांची अवस्था!
बाप्पाची प्रार्थना केली.
आमची दृष्टी टिव्हीच्या स्क्रिनकडे..हॉलमधल्या गणपतीचीही दृष्टी टिव्हीकडेच!

जोगिंदर शर्मा तिसरा बॉल टाकायला धावु लागला ..आम्ही आपलेच येउ घातलेले मरण आपल्या थंड नजरेने पाहावे तसे पाहु लागलो.बॉल टाकला..मिसबाह लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्याही बाहेर जात किपरच्या डोक्यावरून मारण्यासाठी त्याने #स्कुप केला..बॉल हवेत उंच..अशावेळी टिव्ही स्क्रिनवर बॉल किती अंतराने दुर गेला आहे कळत नाही.तेव्हाही कळलं नाही.सर्वांना वाटलं बॉल बाउंड्रीजवळ गेलाय सिक्स किंवा फोर आहे..आपण फायनल हारलोय!!!

बॉल हवेत उंचीचा परमोच्च बिंदु  गाठत खाली येउ लागला होता..

आणि जसा खाली आला तसे दोन हात दिसलेत..तो श्रीशांत होता.बॉलने उंची तर गाठली पण अंतर नाही!!!

मिसबाह आउट बोल्ड जोगिंदर शर्मा कॉट श्रीशांत!!

पाकिस्तान ऑल आउट ऑन
 152.

भारताने वर्ल्डकप जिंकला होता.

सगळे जोरदार घसा फाटेल अशे ओरडलेत गणपती बाप्पा मोरया!!

सगळीकडे जल्लोष सुरू होता..

आमचीही त्यानंतर विसर्जनाची मिरवणुक निघाली..सगळीकडे विजयाचा जल्लोष..ढोल ताषे...
कुठे वडा पाव कुठे उसाचा रस दुकानदार फ्रीमध्ये वाटत होते..

तिकडे लांब केसांच्या महेंद्रसिंग धोनीच्या हातात वर्ल्ड कप इकडे रस्त्यावरील प्रत्येकाच्या हातात गणपतीची मुर्ती होती!
पण जणु काही तोच वर्ल्ड कप आहे असेच वाटत होते!!

गणपतीबाप्पाने संपुर्ण दहा जिवसात आणि परत जाताना विजयाचा कप भारतीयांना आशिर्वाद रूपात दिला होता.

"गणपती निघाले गावाला वर्ल्ड कप मिळाला आम्हाला!!!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!

- अभिजित पानसे

Sunday 9 September 2018

गणेश तत्व आणि मूर्ती

एका मैत्रिणीने आणि तिच्या मुलाने मिळून ही गणपती मूर्ती केली आहे. मागच्या वर्षीच्याच विसर्जित गणपतीच्या मूर्तीच्या मातीपासूनच त्यांनी केली. ही गोष्ट मला फार आवडली.

आपला गणपती आपल्याच घरात विसर्जित. बाहेरील नैसर्गिक जलस्रोतांना खराब करण्याचा अधिकार कोणाला नाही.

लहानपणी मुलांना घरी मोठ्या आकाराच्या गणपतीच्या मुर्ती आणण्याचं फार आकर्षण असतं. पूर्वी तर फार असायचं. शाळेतील मित्रांमध्ये तो प्रेस्टिज इश्यू असायचा.

वाहत्या पाण्यातच मूर्त्यांचं विसर्जन करायला हवं वगैरे.. या कट्टरवादी गोष्टी लॉजिकली कधीच पटल्या नाहीत. अगदी पर्यावरणसंबंधित गोष्टी थोडयावेळासाठी बाजूला ठेवल्या तरीही धार्मिक ‘टेक्निकल’ गोष्टींनुसारही पटत नाही.

मूर्तीला घरात आणून गणेश चतुर्थीला स्वतःच्या हृदयावर डावा हात ठेवून आणि गणेश ‘मूर्तीच्या’ हृदयाच्या जागी उजवा हात ठेवून प्राणप्रतिष्ठा केली जाते. (पिंडी ते ब्रह्मांडी हे इथे स्पष्टपणे कळतं.)  त्यानंतरच त्या गणेश मूर्तीमध्ये 'गणेशतत्व' प्रकट होऊन ती मूर्ती गणपतीचं रूप होते. असा भाव निर्माण होतो.

त्यामुळे गणेश तत्व, प्राण शक्ती ही मूर्तीचा आकार, रंग, मूर्ती आकर्षक की कमी आकर्षक या टेक्निकल गोष्टींना Irrespective असते. मग उपासनेच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने मूर्ती छोटी की मोठी हा प्रश्नच राहत नाही.

कट्टर लोक वाहत्या पाण्यातच गणपती मूर्तीचं विसर्जन करायचं म्हणतात. तेही पटत नाही. एकतर  धार्मिक गोष्टी, घरचा गणपती ही वैयक्तिक बाब असते, नैसर्गिक जल स्रोत खराब करण्याचा अधिकार कोणालाच नाही.

पण भारतासारख्या कमी लोकसंख्या असलेल्या, शिस्तप्रिय, सामाजिक, पर्यावरण बांधिलकी असलेल्या ‘शांत’ देशात सार्वजनिक मालमत्ता आपल्याच पणजोबाची मानतात. ते असो.
बंद’ असो की ‘चालू’ असो सगळं तोडफोड करायलाच हात शिवशिवतात.

गणपती मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन करणे धार्मिक टेक्निकल गोष्टीनुसारही पटत नाही.

कारण दीड, पाच, दहा दिवस गणपती पूजल्यावर शेवटच्या दिवशी अक्षता टाकून “#पुनरागमनायंचं’ म्हटल्यावर मूर्तीला हलवलं की त्यातून गणेशतत्व निघून जातं. निघून गेलं हाच समज , भाव असतो. मग पुन्हा गणपतीपासून ती गणपतीची मातीची ‘मूर्ती’ उरते. आता ती मातीची मूर्ती पाण्यात कशीही विसर्जित केली तरीही तिचा अपमान वगैरे होत नाही. वा मूर्तीला वाहत्या स्रोतात किंवा मोठ्या नैसर्गिक जलस्रोतांतच विसर्जित केली पाहिजे हा मुद्दाच संपतो. धार्मिक टेक्निकल गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी लॉजिकली पटत नाही. कारण मूर्तीत प्राणतत्व, गणेशतत्व त्यावेळी नसतंच.
विसर्जन 'गणपतीचं'  करत नसतो , गणेश 'मूर्तीचं' करत असतो.

मातीचा , मातीच्या मूर्तीचा फक्त ‘आधार’ घेऊन दहा दिवसांत ते चराचरात व्याप्त गणेश तत्व, ऊर्जा त्यात प्राणप्रतिष्ठेद्वारे ‘अॅक्टिव्हेट’ होते, त्यात संचारते , पुनरागमनायंचं म्हणून अक्षता टाकल्या की ती ऊर्जा मूर्तीतून निघून जाते.

बाजारात शेकडो गणपतीच्या मुर्त्या ठेवल्या असतात, त्यावेळी त्या मूर्त्याना कोणीही नमस्कार करत नाही. कारण त्यावेळी ती फक्त ‘मूर्ती’ असते. ‘गणपती’ नसतो.

विकत घेतानाही आपण गणपतीच्या ‘मुर्ती’चा भाव विचारतो, मूर्ती विकत घेतो. ‘गणपती’  विकत घेत नाही.

सार्वजनिक गणपतीच्या मोठ्या मूर्तींनाही रस्त्यावरून मंडपात  नेताना नमस्कार करत नाही, कारण त्यांची ‘प्राणप्रतिष्ठा’ झाली नसते.

मूर्ती, माती फक्त ‘कॅरिअरचं’ काम करत असते.  मग त्या मूर्तीतून गणपती बॉसच निघून गेलेत की उरते ती फक्त माती, मातीची मूर्ती. ती कुठेही विसर्जित करता येते. पण आजच्या काळात वाढती लोकसंख्या, कमी  आणि प्रदूषीत होत चाललेले जलस्रोत बघता घरातच मूर्तीचं विसर्जन करणं सर्वोत्तम उपाय. शिवाय ती माती कुंडीत टाकल्यास त्या पार्थिव गणपतीचा घरातच एकप्रकारे सहवास आहे ही भावनाही होऊ शकते.

या मैत्रणीने तर त्याच मातीची मूर्ती केली. हाही एक सुंदर भाव निर्माण करतो. Coz at d end its only about energy n feelings.

- Abhijeet Panse

Saturday 8 September 2018

एलजीबीटीक्यू, 377,



   मागच्या वर्षी लोकप्रभामधील लेख वाचून  मुंबईतील एका मुलाचा  फोन आला होता. त्याने सांगितलं  लोकप्रभा ऑफिसमध्ये फोन करून माझा नंबर घेतला. त्याने सांगितलं की त्याने एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. तिला कुठलातरी अवॉर्डही मिळाला आहे. ती शॉर्टफिल्म,  LGBT ग्रुपमधून त्याने फेस्टिव्हलला पाठवली होती. शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर केली आहे.
तो स्वतः LGBT ग्रुपमध्ये येतो.

सुरवातीला मला हा मित्राचा प्रॅंक वाटला. म्हणून तत्कालीन उपसंपादक चैताली जोशीला विचारून पक्कं केलं की खरंच त्याने फोन करून माझा नंबर घेतला होता.

त्याच्याशी बोलून खूप छान वाटलं होतं. सगळ्यात विशेष गोष्ट ही होती की त्याच्या आईने स्वतः त्याला ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात खूप मदत केली. शिवाय त्याच्या आईनेही त्यात काम करून एक बाजू मांडली आहे.

त्याचं नाव आठवत नाही. त्याचा नंबरही आता नाही. पण आज समलैंगिकता हा अपराध नाही हे 377 कलम सुप्रीम कोर्टाने रद्द करून ‘नैसर्गिक’ LGBTना खूप दिलासा दिला आहे. त्यामुळे आज त्याची आठवण झाली.

तो जिथे कुठे असेल त्याच्यासहित
सर्व नैसर्गिक लेस्बियन्स, गे, बायदेक्शुअल, ट्रान्सजेंडर्स लोकांचे अभिनंदन.

आता त्यांना अटक होण्याची भीती राहणार नाही. .ते  उघडपणे समाजात वावरू शकतील शिवाय आपले नाते उघडपणे सांगू शकतील. फक्त याचा दुरुपयोग लैंगिक शोषणात होऊ नये ही आशा. कोर्टाने शिशुंसोबत आणि प्राण्यांसोबत केलेले लैंगिक व्यवहार हे अपराध ठरवले आहेत. हे अत्यंत योग्य.

सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक जजमेंट दिलंय. प्रोग्रेसिव्ह, पुरोगामी भारताचा एक सकारात्मक अभिनंदनीय पुरोगामी निर्णय.

- Abhijeet Panse

गुदबाय रुद्रप्रताप सिंग, धोनीचा पक्षपातीपणा, धोनीचा दोस्त

"गुडबाय रुद्रप्रतापस्विंग"
  "गोड कटू आठवणी" "धोनीचा दोस्त"  "धोनीचा पक्षपातीपणा"

टिपिकल उत्तर प्रदेशी बॉलर, खूप वेगवान नाही पण ‘मनगटा’च्या जोरावर हवेत स्विंग करणारा ,योग्य सीमवर टाकून  सीमही करणारा बॉलर. प्रवीण कुमार, आर पी सिंग, भुवनेश्वर कुमार युपी स्विंग बॉलिंगचा एक विशेष वारसा चालवणारे भैय्याबॉलर्स.

उत्तर प्रदेशी बॉलर्स नैसर्गिक स्विंग कसे करू शकतात हा एक चर्चेचा विषय राहिलाय. मेरठला बॉलची फॅक्टरी आहे, त्यांना आधीपासूनच शाळा कॉलेजपासूनच नवा कोरा एस.जी. टेस्ट बॉल खेळायला मिळतो हे एक कारण असं मानतात.

प्रवीण कुमार आणि आर पी सिंग हे मागे पुढे भारतीय टीममध्ये खेळत राहिले.

आर पी सिंग म्हटलं की आठवतो 2007 , 20-20वर्ल्डकप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच, साऊथ आफ्रिकेला त्याने अक्षरशः त्यांच्याच जमीनीवर वर्ल्डकपमधून बाहेर केले होते.
पाकिस्तान विरुद्धची फायनलमध्येही चांगली बॉलिंग केली.
त्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर केलेला रुद्रप्रताप! कॅप्टन धोनीच्या टीमने साकारलेल्या 07च्या विश्वविजयात तो भागीदार होता.

एका पाकिस्तान विरुद्ध मालिकेत रुद्रप्रतापने तीन वेळा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही मिळवला होता.

भारताचे अनेक अविस्मरणीय विजय, क्षणांचा तो भागीदार, साक्षीदार राहिला.

भारताने 2007 मध्ये इंग्लंड टूर, कॅप्टन राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली मालिका विजयाचा तोही महत्वपूर्ण भागीदार होता.

2011 इंग्लंड टूर! एक वाईट आठवण.

नेहमीप्रमाणे चार वर्षांनी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय टीम गेल्यावर पहिल्याच टेस्टमॅचमध्ये पहिल्या काही ओव्हरमध्येच #झहीरखान ने घाण केली.

तो मुळातच अनफिट असताना झहीर खानने ते बीसीसीआय, निवड समितीपासून लपवुन ठेवलं, तसाच तो खेळायला गेला. तेव्हा #योयोटेस्ट नव्हती ना.
 ही वाईट खोड झहीर खानमध्ये कायम होती. त्याआधीही सर्वच 90s चे प्लेयर्स तसे करायचे. झहीर खान  मोठ्या महत्वाच्या दौऱ्यातील पहिल्याच टेस्टमध्ये बॉलिंग डिपार्टमेंट कमकुवत असताना दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मॅचमध्येच मैदान सोडून गेला. त्याला चालू असलेला ओव्हरसुद्धा पूर्ण करता आला नाही.

लेकीन कहाणी में ट्विस्ट अभि बाकी था! इथून कॅप्टन धोनीचे कारनामे सुरू झाले.

ती टेस्ट वाईटरीत्या हरल्यावर झहीर खान हुझुर भारतात परत गेले. आणि त्यांच्या जागी बोलवल्या गेलं आर पी सिंगला. आर पी सिंग हा मुळात त्या काळात पूर्णपणे फॉर्म हरवलेला, बॉलिंग स्पीड अत्यंत कमी झालेला एक सामान्य बॉलर झालेला होता. त्याला भारतातून इंग्लंडमध्ये मालिकेत बोलवावं असा कुठलाही त्याचा फॉर्म नव्हता.

तरीही त्याला इंग्लंड टूरला बोलावण्यात आले कारण होते #धोनीसोबतची_मैत्री.

भारतीय उपखंडात क्रिकेटमध्ये कॅप्टनस हे आपापल्या मित्रांना कायम संधी देण्यासाठी, कॅप्टनपदाचा दुरूपयोग करण्यासाठी , पक्षपाती वागण्यासाठी प्रसिद्ध असतातच. महेंद्र सिंग धोनी याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे.

चौथ्या टेस्टमध्ये आर पी ला संधी देण्यात आली. पहिला ओव्हर त्यालाच देण्यात आला. #सरइयनबोथमने कमेंट्री करताना म्हटलं होतं, मी आजवरचा बघितलेला सगळ्यात वाईट ओपनर टेस्ट बॉलर आणि ओपनिंग ओव्हर्स. सुनील गावस्करांनीही आर पी सिंगच्या टीममधील एन्ट्रीवरून खूप टीका केली. पण "आले धोनीयाच्या मना तेथे काही कुणाचे चालेना"!

त्या काळात तर धोनी बेफाम हुकूमशहा झालेला होता.  जे कोहली सध्या झालाय. फक्त कोहली एक्सप्रेसिव्ह आहे म्हणून तो लोकांना डोळ्यांत खुपतो. धोनी मात्र कोल्डकिलर कॅप्टन होता. मनमानी, पक्षपातीपणा तोही करायचा.

अत्यंत सुमार बॉलिंग करून आर पी सिंग ला मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही. धोनीच्या दोस्ताची आर पी सिंगची ती शेवटची मॅच ठरली.

त्या मॅचनंतर भारतीय मीडियासोबतच इंग्लिश  मीडियाने भारतीय टीम, विशेषतः झहीर खानवर , भारतीय क्रिकेटपटूंच्या  स्वार्थी वृत्तीवर उघडपणे खूप टीका केली होती.

शेवटच्या टेस्टमध्ये आर पी सिंगच्या समावेशामुळे , आणि त्याच्या सुमार  आणि अनफिट बॉलिंगमुळे पुनः टीका झाली. भारत चारही टेस्ट हरला.

भारतीय संघाचे पानिपत त्या दौऱ्यात झाले. शिवाय कॅप्टनचा पक्षपातीपणा पुनः उघडा पडला.

रुद्रप्रताप सिंगने एकेकाळी भारतीय टीममध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्यामुळे अनेक अविस्मरणीय विजय भारतने  साकारले. पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जाऊन हरवले.

आर पी सिंगने आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्या सुखद आठवणीसोबत रुद्रप्रताप सिंग स्विंगला अलविदा!

- Abhijeet Panse

आशा भोसले, ढुंढता हूं यहा..


ताकदीचा कलावंत कधी कधी छोटी भूमिका स्वीकारूनही संपूर्ण कलाकृतीवर आपली छाप सोडतो. तसं “जाने जा ढुंढता फिर रहा...मैं यहा से वहा.." हे गाणं किशोर कुमारचं आहे. यात आशा भोसले यांनी आलाप देऊन साथ दिली आहे. एकंच कडवं गायलंय.  हे गाणं आशा भोसलेंचं एक विशेष गाणं वाटतं. या गाण्यात त्यांनी वेगळा आवाज.. आलाप लावलाय, वेगळा  खर्ज लावलाय. खर्जात्मक आवाजाने 'हमिंग' चा फील येतो. ज्यामुळे तो नेजल खर्ज भासतो. मुळात नेजल नाही.
खर्ज आणि नेजल व्हॉइस या दोन ध्रुवावरील दोन गोष्टी.

 किशोर कुमारने नेहमीप्रमाणे गाणं सहज गायलं आहेच पण वेगळ्या खर्जातील साथ आशा भोसलेंनी देऊन संपूर्ण गाणं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

आशा भोसलेंनी , VIBGYOR , सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. पण हे जुनं गाणं मला वेगळं वाटतं.



- Abhijeet Panse

Monday 3 September 2018

कृष्ण triology of आध्यात्म.




कृष्ण म्हणजे रोमँस, कृष्ण म्हणजे सखा, प्रेमाचं प्रतीक, खोडकर हे जास्त प्राचिलीत आहे. पण कृष्णाची कर्तव्य कठोर भूमिका झाकोळते. कृष्ण हा अध्यात्माचं संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे.
भक्तिमार्ग, कर्म मार्ग, ज्ञानमार्ग असे तीन आध्यात्मिक मार्ग जे म्हणतात, हे तिन्ही श्रीकृष्णापासून सुरू होतात, कृष्णात येउन मिसळतात.

ज्ञान मार्ग:- “मृत्य म्हणजे शरीर बदल फक्त..” “हे विश्व माझ्यात आहे मीच या विश्वात आहे..” हे त्याने अर्जुनाला सांगितलं.
अर्जुनाला रणांगणावर विराट दर्शन देऊन मी जे दिसतो ते शरीर म्हणजेच मी नाही, मी संपूर्ण विश्व आहे. जीवन आणि मृत्यू दोन्ही माझेच रूप आहेत. हे समजावून सांगून अर्जुनाला ‘ज्ञान’ दिलं.

कर्म मार्ग:- अर्जुन त्याच्या नातेवाईकांना मारण्यासाठी मानसिकरित्या दुबळा, इमोशनल झाला असता त्याला युद्ध करणे हेच तुझं कर्तव्य आहे. रिझल्ट डजंट मॅटर, सांगितलं. त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली.

भक्ती मार्ग:-  कृष्ण भक्तीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही. भक्तीमार्गाचा महास्रोत आहे तो. राधा, मीरा अनेक संत कृष्णभक्त प्रसिद्ध आहेत.
पण एक प्रसंग मला विशेष आवडतो कृष्ण चरित्रातील. उद्धव आणि राधेचा.

उद्धव हा महाज्ञानी होता. सत्य म्हणजे काय हे त्याला कळत असे. श्रीकृष्ण म्हणजे काय प्रकरण आहे हे त्याला ज्ञानाच्या अनुषंगाने कळलं होतं. श्रीकृष्ण हे निराकार ईश्वरी रूप आहे , शरीर नाही. हे ज्ञान त्याला होतं.

पण त्याच्यात भक्ती नव्हती. प्रेम नव्हते. भक्ती मार्गाला उद्धव कमी लेखात असे. सगुण रूप, नामस्मरण वगैरे हे अज्ञानी लोकांचं काम आहे असा त्याचा विश्वास होता.
 त्यामुळे त्याच्यात कोरड्या ज्ञानाचा अहंकार वाढला होता. श्रीकृष्णालाही त्याची कल्पना होती.

एकदा कृष्ण महालात म्लान चेहऱ्याने दुःखी होऊन बसला होता. उध्दवाने त्याला  कारण विचारलं असता, म्हणाला, की मला वृंदावनातील गोपींची, नंदची, राधेची आठवण येतेय. म्हणून मी दुःखी झालोय.

कृष्णाचं उत्तर ऐकून उद्धव आश्चर्यचकित झाला. कृष्ण जो साक्षात ईश्वर, त्याला मुळात कोणाची आठवण, ‘अटॅचमेंट” कशाला वाटायला हवी. कारण मूळ ज्ञान हे आहे की सर्वजण आत्मा, चैतन्य आहे. बाकी सगळी माया आहे. खोटं आहे.
भावना, प्रेम , विरह हे चूक अज्ञानी लोकांचं काम हे तो कृष्णाला सांगू लागतो.
उद्धव कृष्णाला समजावतो की तुम्हीच ईश्वर आहात, मग या मायेला का फसता आहात!?

ते ऐकून कृष्ण म्हणाला की धन्यवाद उद्धवा मला सत्याची  जाणीव करून दिल्याबद्दल. पण आता हेच ज्ञान तू वृंदावनात जाऊन गोपीकांनाही सांग. त्यांनाही सत्य कळू दे. डिटॅचमेंटचं महत्व समजू दे. तेही माझ्या विरहात तळमळत आहेत. त्यांना सत्य,  ज्ञान दे.

गावातील अडाणी, भोळ्या अज्ञानी गोपिकांना समजवून सांगणे काय कठीण म्हणून  उद्धव रथात बसून तोऱ्यात वृंदावनात जातो.

 वृंदावन जेथे भक्ती मातीमातीत, फुलात, पानात , हवेत ओथंबून वाहते. ( सध्या मात्र तेथे फक्त ढोंगीपणा, फसवेगिरी वाहते, धर्माच्या नावाने ब्लॅकमेलिंग चालते.) तेथे गेल्यापासून त्याला विचित्र अनुभव येऊ लागतात. त्याला त्रास होऊ लागतो.  कारण त्याच्याकडे कोरडं ज्ञान तर असतं पण कृष्णाच्या  ईश्वराच्या भक्तीचा , प्रेमाचा ओलावा नसतो.

वृंदावनात गोपिका कृष्ण विरहात तळमळत, दुःखी असतात. जेव्हा गोपिका कृष्णाबद्दल विचारतात, तो कसा आहे, तो आमची आठवण करतो का..
उद्धव त्यांना सांगतो तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही त्याला अजूनही तुमचा गोकुळातील कान्हा समजताहात. त्याला शरीर समजत आहात.
तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याला कोणता आकार नाही, शरीर नाही, नाम् नाही. तो अजन्मा आहे. त्यानेच सांगितलं तुम्हाला की त्याला विसरून जा. तो कधीच परत गोकुळात येणार नाही. त्याच्या मोहात अडकून, प्रेम, भक्ती, आसक्ती सोडून ज्ञानी व्हा.

हे सगळं (कोरडं) ज्ञान ऐकून त्या गावातील, साध्या गोपिका त्यालाच मूर्खात काढतात, “नको तुझं काही ज्ञान. तो आमचा कान्हाच आहे. आमच्या मनात त्याच्याविषयी अपार प्रेम आहे!”

गोपिका उद्धवाला राधेकडे घेऊन जातात. राधाही विरहात तळमळत , दुःखी बसली असते. सगळ्यात कृष्णाला शोधत असते. कृष्ण कधी येईल प्रत्येकाला विचारत असते. उद्धव राधेलाही तेच ज्ञानाच्या सत्य गोष्टी सांगतो. कृष्णाचं मूळ रूप समजावून सांगतो. परब्रह्म फक्त शरीरूपी दिसतंय  ते खोटं आहे. कृष्णाला मनुष्य शरीर समजून हे कृष्णाबद्दलचं ; त्याच्या लीला आठवून , प्रेम, आसक्ती, विरह मूर्खपणा आहे. तो सगळीकडे आहे तत्वरुपात. शरीराने फक्त मथुरेला आहे.

राधा म्हणते कृष्ण कायम आमच्या सोबत शरीर रूपानेही असतो. आमचं प्रेम हीच भक्ती आहे. तो मुळात कधीच आमच्यापासून दूर नसतो.
उद्धव त्यावर म्हणतो की कृष्ण शरीररुपाने जवळ असणं ही फक्त तुमची मनोकल्पना आहे. भास आहे विरहात तळमळणाऱ्या अज्ञानी व्यक्तीचा.

राधा उद्धवाला म्हणते “तू आमच्या कृष्ण प्रेमाला मनोकल्पना समजतोय! तुला बघायचंय कृष्ण आत्ताही इथेच आहे?”

त्या क्षणाला श्रीकृष्ण राधेजवळ अवतीर्ण  होतो.
उद्धव आश्चर्यचकित होतो. तो कृष्णाला स्पर्श करून बघतो.  तो भास नसतो. कृष्णाचा स्पर्श तो अनुभवतो.
तो कृष्णाला पुन्हा पुन्हा स्पर्श करून भास नसल्याचं निश्चित करतो.
कृष्णाचा त्याला स्पर्श होत राहतो.
  कृष्ण आणि राधा त्याच्याकडे बघून स्मित करत असतात.

"कृष्णा तू मथुरेत शरीररूपाने असताना इथे कसा!" विचारल्यावर कृष्ण सांगतो, मी सांगितलं ना मी फक्त भक्तीने पकडल्या जातो. जेथे प्रेम , भक्ती तेथे मी असतोच. येतोच. कृष्ण अंतर्धान पावतो.

त्या क्षणाला उद्धवातील अहंकार संपतो. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.  त्याच्यात भक्ती प्रेम जागृत होतं. राधा गोपिकांबद्दल , त्यांच्या अपार कृष्णप्रेमाबद्दल आदर जागृत होतो. भक्तीची शक्ती कळते. उद्धव त्या क्षणापासून “राधे राधे” करत “राधे कृष्ण” म्हणत भक्तीत न्हाहून , नामस्मरण करतच पायी गोकुळातून मथुरेला येतो. शरीराची, कपड्यांची शुद्ध नसते. धुळीत मातीत माखलेला, मुखी “राधे कृष्ण” “राधे राधे” प्रेमाने, भक्तीत नामस्मरण सुरू असतं.
उध्दवतील अहंकार संपला असतो.

मुळात उद्धव , राधा- गोपी, अर्जुन हे सगळे आपापल्या मार्गावर योग्य असतात. उद्धव महाज्ञानी होता. पण माझाच योग्य मार्ग आणि इतरांचा अध्यात्मिक मार्ग चुकीचा हा अहंकार त्याच्यात होतो. त्यामुळे त्याला भक्ती मार्गाचंही श्रेष्ठत्व समजण्यासाठी हे सगळं घडवतो.
हेच आजच्या काळात धर्माबद्दल होतं आहे. माझाच धर्म श्रेष्ठ दुसऱ्याचा छोटा. आपल्या धर्माशी अतिलिप्त अनहेल्दी अटॅचमेंट होऊन इतरांचा राग. इथूनच थिंग्स स्टार्ट टू गो रॉंग.

“#योगमार्ग” हा ही एक स्वतंत्र वेगळा रस्ता. पूर्वी योगी या मार्गानेही ईश्वरी तत्व प्राप्त करून घ्यायला योगसाधना करायचे.
 “पिंडी ते ब्रह्मांडी” हे यांचं तत्व. हा मार्गही कृष्णापासून सुरू होतो, त्यातच मिळतो.
बालकृष्णाने लोणी खाल्लं म्हणून यशोदा कृष्णाला मुख उघडायला सांगते , तेव्हा त्याच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांड दर्शन तिला होतं.
जे बाहेर आहे तेच आत आहे, आतीलच बाहेर आहे. “पिंडी ते ब्रह्मांडी”.

ज्ञान, कर्म, भक्ती, योग सर्व अध्यात्मिक मार्ग यांचा संबंध आणि अधिष्ठान कृष्ण आहे. म्हणून तो खास आहे. संपूर्ण आहे.

कृष्णाच्या बाबतीत ‘#नामस्मरण’ हा शब्द मला विशेष आवडतो. या शब्दात सगळं काही येतं. ‘नाम’ म्हणजे भक्ती येते. ‘स्म’ म्हणजे अहं ब्रह्मास्मि, म्हणजे मीच ईश्वर आहे, हे ‘ज्ञान’ही येतं. ‘रण’ म्हणजे युद्धभूमी. जिथे कर्म योग सांगितला. प्रॅक्टिकल आयुष्यही ‘रण’.
कृष्ण हा म्हणून मला संपूर्ण वाटतो.

- Abhijeet Panse

गुड बाय हँडसम कूक

GoodbyeHandsomeCook

जेव्हा जेव्हा श्री श्री सचिन तेंडुलकर यांच्या शतकांच्या रेकॉर्ड्सवर विदेशी संकट आलं, वादळ घोंघावू लागलं, आमच्यासारखे तेंडुलकरभगत नर्व्हस नाईन्टीजमध्ये गेलेत. पण दरवेळी ते विदेशी वादळ कुंपणावरच शमलं. आणि आम्ही हुश्श केलं.


सचिनच्या वन डे शतकांवर #संगकाराचं डावखोरं संकट आलं होतं पण ते वर्ल्डकपमध्येच थबकलं. त्यापूर्वी पॉंटिंग पंटरचंही संकट दूर झालं.

तेंडुलकरचा सगळ्यात जास्त टेस्ट शतकांच्या  रेकॉर्डची डिश अॅलिस्टर कूक शिजवणार हे जवळपास पक्कं होतं दोन वर्षांपूर्वी. कारण इंग्लंड टेस्ट क्रिकेट जास्त खेळतं. पण अचानक त्याचा फॉर्म खराब झाला आणि तो अपयशी होत गेला.
श्री श्री  सचिन तेंडुलकरच्या सगळ्यात जास्त शतके, रन्स वर फक्त विराट कोहलीचा हक्क आहे. वही उसे तोडगा फोडेगा. चुण चुण के बदला लेगा!

आज असंच एक सचिन तेंडुलकरच्या सगळ्यात जास्त कसोटी शतकांवरील इंग्लिश वादळ आधीच शमलं. अॅलिस्टर कुकने संन्याचा निर्णय घेतला.

आपला पहिला सामना नागपूरला खेळत असताना , “विल यु मॅरी मी” “अॅलिस्टर आय लव यु” असे बोर्ड घेऊन मुली स्टँड्समध्ये होत्या. क्रिकेटमधील एक सगळ्यात हँडसम खेळाडू. सुरवातीला तर तो आणखीच किलर दिसायचा.
 
अस्सल  कसोटी, पारंपरिक बॅटिंग शैलीचा खेळाडू. एक जेंटलमन प्लेयर.

मागच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या कसोटीतील खेळपट्टी भारतीय पाटा खेळपट्टीला कॉम्प्लेक्स देत होती, अशा सिमेंट,  #डेडरबर शेवटच्या दिवशी अॅलिस्टर कूकने मजा म्हणून बॉलिंग करत काही निवृत्त इंग्लिश बॉलर्सची  ‘मिमिक्री’ केली होती. ते सगळं हलक्याफुलक्या वातावरणात होतं. कारण मॅच ड्रॉ होणार होती. शिवाय कॅप्टन तोच होता.

तिसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेचा जबरदस्त कॅच पकडल्यावर देखील त्याची बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरील वेगळं हास्यभाव बघता त्याचा आत्मविश्वास आता संपला असून अॅलिस्टर कूक आता क्रिकेटमध्ये काही महिन्यांचा पाहुणा आहे असं वाटून गेलं होतं.
तेच झालं.

कसोटी क्रिकेटमधील एक मोठं नाव निवृत्त होतंय. यामागे कारण भारतीय बॉलर्स आहेत. भारताविरुद्ध चार कसोटीत संपूर्णपणे अपयशी ठरल्याने शेवटी त्याने पुढील पाचव्या कसोटीत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.
अभिनंदन इंडियन बॉलर्सचेसुद्धा.

ग्रेट चॅम्प अॅलिस्टर कूक!

- Abhijeet Panse

भारत की छोरे छोरिया

जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेचे सुप काल वाजले. दर चार वर्षांनी होणारी ही बहूक्रीडा स्पर्धा आहे. आशियाई स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या खालोखाल मानली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पाल्य समिती “आशिया ऑलिम्पिक समिती” हीच या स्पर्धेचे आयोजन करत असते.

2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या मोठ्या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होईल यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. या आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 69 पदकांची कमाई केली.

यात भारताने 15 वेळा सुवर्ण लुटले, 24वेळा भारताची चांदी झाली तर 30 वेळा भारताच्या हाती कांस्य आले. प्रथमच 1951 पासून सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आजवरील आशियाई स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.


या स्पर्धेतून भारताला काही नवीन चांगले खेळाडू मिळाले ज्यांच्याकडे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आशेने बघता येईल.


बजरंग पुनियाने भारताकडून सुवर्णपदकाचं श्रीफळ वाढवलं. त्यानंतर , म्हारी  छोरीया छोरो से कम है के म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील छोरी विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदात अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि ती फायनल्समध्ये प्रवेशली. फायनल्समध्ये तिने संघर्ष करून ‘सोनं’ जिंकलं. आणि भारताची आशियाई स्पर्धेतील पहिली ‘सोनपरी’ बनली. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी’ कोरलं. महावीर फोगट हे तिचे काका आणि गुरू.


महाराष्ट्रकन्या राही सरनौबतही सोनपरी बनली. तिने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक मिळवले.

रिले या खेळात भारताची कामगिरी चांगली झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय अॅथलिट्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारून ‘सुवर्ण’संधी साधली.  तो गोल्डन बॉय ठरला.


भारताच्या महिला रिले संघाने रिले दौड स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकवले. या सोनेरी यशात हिमा दास, पूवम्मा राजू माचेतीरा, सरिता लक्ष्मीबाई गायकवाड यांचा समावेश होता. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले होते. तिने या आशियाई स्पर्धेत एकूण तीन पदक मिळवलेत.


यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.

यानंतर नेमबाजीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक मिळवलीत.


भारताने रोविंगमध्येही एक सुवर्णपदक मिळवलं. शिवाय टेनिसमध्येही एक गोल्ड मिळवलं..


बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने सेमिफायनलसाठी शारीरिकरित्या फिट नसल्याचे सांगून त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवण्याची संधी गेली. सोनं गेलं चांदीही गेली हाती कांस्य आले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती.

अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.


स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावलीत.


कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले.


थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तां मदत करून आपली सामजिक बांधिलकीही जपली.


गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजींदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला.


शूटिंगमध्ये सौरभ चौधरी हा मुलगा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. एअर पिस्तुलने त्याने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक गळ्यात घातले.

भाला फेकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.


या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. एक रौप्य तर दोन कांस्य. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली. तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्य मिळवले.

हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले.


दुभत्या म्हशीला टोणगा तसा भारताने कबड्डी आणि हॉकीमध्ये टोणगा मिळाला. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डीसंघाने यावर्षी सुवर्णपदकाची गवसणी घातली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघाला सुवर्णस्पर्श झाला नाही.


स्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीसहित तीने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून सुवर्ण मिळवलं. हेप्टॉथ्लॉन खेळा प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदि सात प्रकारच्या खेळाचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.


पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात जिंकून सुवर्णपदक मिळवू शकली नाही, पण तिने रौप्यपदक मिळवून पहिली भारतीय महिला जिने आशियाई खेळात रौप्यपदक मिळवलं हा मान पटकावला.


ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. पण ब्रीज या खेळात भारतीय खेळाडूंनी पदके कमावलीत.


या प्रकारे संमिश्र कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या स्पर्धातालिकेत सर्वोच्च राहिला. त्या खालोखाल जपान तर नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन , जपान या देशात लहानपणापासून खेळाडू , अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजली आहे. भारतात मूळचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितके पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंनी या आशियाई स्पर्धेत आजतागायतच्या एशियन स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली.

जिथे आजकाल “बिग बॉस” , दस का दम सारख्या टुकार टीव्ही ‘शोज’ ला ‘खेळ’ संबोधून खऱ्या खेळाचा, खेळाडूंचा नकळत अपमान होतो. तिथे अथक मेहनत करून जिद्दीने खेळणाऱ्या , देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या  या खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.