"संपुर्ण़ भारतीयांसाठी एक अविस्मरणीय गणपती विसर्जन आणि क्रिकेट दिन"
दसरा आला की बँगलोरची श्रीनाथ कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलेले सिमोल्लंघन आठवतं. महाशिवरात्रीला सचिनने ०३ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध केलेले रूद्रतांडव आठवते..पण दरवर्षी गणपतीच्या दिवसात आणि विसर्जनाच्या दिवशी आठवतो तो संपुर्ण भारतवासीयांच्या मनात कोरला गेलेला २४ सप्टेंबर २००७ चा दिवस.
पहिल्या वहिल्या ट्वेंटी ट्वेंटी प भारत वि.पाकिस्तान सुपर डुपर फायनल!!
उत्साहाची आणि उत्सवाची परिसिमा !
पण टुर्नामेंट सुरू होण्यापुर्वी परिस्थिती पुर्णपणे वेगळी विरूद्ध होती.संपुर्ण भारतीय क्रिकेट प्रेमी आणि भारतीय क्रिकेट नैराश्याच्या ,विषण्णतेच्या गडद छायेतुन चाललं होतं.क्रिकेट मध्ये निरूत्साहाचं दमट जड वातावरण होतं.
भारतासाठी आजवरचा सर्वात वाइट विंडीजमध्ये ०७ चा वर्ल्ड कप झाला होता.राहुल द्रविडने कँप्टन्सीचा राजीनामा दिला होता.
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटबद्दल भारतीय क्रिकेटप्रेमी आणि खेळाडू अजाण होते.तोवर फक्त न्युझिलंड व इतर इंग्लिश टीम्स ट्वेंटी क्रिकेट खेळु लागले होते.
भारतीय खेळाडुंचं अपयश आणि क्रिकेटप्रेंमींची नाराजी बघता खुद्द बिसिसिआयने सचिन राहुल गांगुली त्रयीला या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यापासुन रोखले होते.त्यामुळे गांगुली व सचिनचा अहंकार दुखावला होता.
नवे तरूण चेहरे ,अननुभवी नवा कँप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत आफ्रिकेत पाठवल होते.
८३ च्या वर्ल्ड कप सारखीच परिस्थिती होती की कोणालाही या टीम कडुन कुठलिही अपेक्षा नव्हती!औपचारिकता म्हणुन आणि पुन्हा हारण्यासाठीच वर्ल्ड कपमध्ये गेले होते.
पण बघता बघता गोष्टी बदलत गेल्या! सुखकर्ता दुखहर्ता गणपतीने जणू चमत्कार केला !१४ तारखेला घराघरात गणपती स्थानापन्न झाले.
इकडे गणपतीचीे प्राणप्रतिष्ठा झाली तसे गणपतीने भारतीय टीममध्ये प्राण फुंकले.
चौदा तारखेलाच रात्री पाकड्यांविरूद्ध भारताने "शुट आउट अॅट डरबन" करुन 3/0 ने हरवुन विजयाचा श्रीगणेशा केला.
पण "द्वितीए ग्रासे मक्षिकापात:" झाला! शुभ्र सुंदर चविष्ट उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवुन खाण्यास सुरवात करणार तर त्यात दुर्वेच्या जागी केस निघावा तसं पुढच्या मँचमध्ये Blackcaps न्युझिलंडने भारताला हरवलं.
देशभर दासरामाचा वाट पाहे सजणा आर्ततेने आरती सुरू झाली. फळिवरी वंदना म्हणत फळिवरुन उतरलेली वंदना पुन्हा फळिवर जाउन बसली. दिपक जोशी नमोस्तुते प्रार्थना करू लागले.
गणपती प्रसन्न झाले . "नथिंग टु फिअर व्हेन आय अॅम् हिअर "म्हणाले.
पुढे सलग दोन दिवस इंग्लंड आणि साउथ आफ्रिके विरूद्ध भारताने यश मिळवले.आफ्रिका नेहमी प्रमाणे सोप्या सामन्यात #चोक झाली.आणि भारत सेमिफायनलमध्ये धडकला तो ह्युज जाएन्ट ऑस्ट्रेलियाविरूद्ध! बावीस सप्टेंबरच्या रात्री पुन्हा एकदा युवि ने राज्य करत ऑस्ट्रेलियाला हरवले.
आणि संपुर्ण क्रिकेट जगाला कल्पनातित क्रिकेट मेजवानी मिळण्याची पुर्व व्यवस्था झाली.कारण तिकडे पाकिस्तान फायनलला आधीच पोहचला होता.
वर्ल्डकप फायनल तेही भारत वि. पाकिस्तान !!!याहुन अधिक थरारक काय असणार होतं!!
संपुर्ण देशात गणपतीची प्रार्थना ..यdnya सुरू होते. सिद्धिविनायकापासुन पुणे..टेकडीचा गणपती येथे पुजा प्रार्थना सुरू होती.दोन दिवस न्युज चँनल्स फक्त फायनलबद्दल चर्चा करत होते.
आणि आदल्या रात्री एक वाईट बातमी कळली! विरेंद्रसेहवाग जखमी झाल्याने फायनल खेळु शकणार नाही!!!!
संपुर्ण देशासाठी तो प्रचंड धक्का होता!
पाकिस्तानची टीम कँप्टन आफ्रिदी सकट फुल फॉर्ममध्ये होती.उमर गुल सकट विचित्र अक्शन असलेला सोहेल तनवीर जबरदस्त बॉलिंग करत होते.पेस बँटरी स्ट्रॉंग होती.
गणपती विसर्जनाचे ते दिवस होते.मी तेव्हा एका नातेवाईकांकडे गेलो होतो.त्यांच्याकडे त्याच दिवशी संध्याकाळी गणपती विसर्जन होत.त्यामुळे आम्ही पोट्टेसोट्टे काळजीत होतो की मँच मिस होणार का!!
पण सर्वानुमती ठरलं आधी विसर्जन पाकिस्तानचं मग बाप्पाच्या मुर्तीचं!!!!!
दुपारी मित्राकडे गणपतीचं जेवायला गेलो घाईगडबडीत गिळलं आणि परत निघालो तोवर मँच वॉज ऑन!
सेहवागच्या जागी इरफान पठानचा भाऊ युसूफपठाण खेळतोय कळलं.पहिल्यांदाच भारताच्या टीममध्ये दोन सख्खे भाउ खेळताना पाहत होतो.
भारताची बँटिंग सुरू होती. रस्त्यात पान टपरीवर पहिला ओवर पाहिला.मोहम्मद हफिज अंगावर धावुन आला.हाच तो हाफिज विणामलिकचा पहिला पिठ्ठु! ज्याच्या भरवशावर ती भारतात सेलेब बनली.
ओवरच्या दुसऱ्याच बॉलवर; तोवर एकही बॉल न खेळलेला पठाण रन आउट होता अगदी थोडक्यात वाचला!पुढे त्याच ओवरमध्ये हापिजला स्ट्रेट प्रेक्षकांमध्ये पठाणने उडवलं.पहिलीच मँच खेळणारा युसूफ पठाण आमच्यासाठी हिरो बनला!!!
पण त्याचीही विकेट गेली. गौतमगंभीर एक बाजु लढवत होता.१२ बॉल्समध्ये पन्नास काढणारा युवराज सिंग मात्र फायनलमध्ये पुर्णपणे आउट ऑफ टच भासत होता.सतराव्या ओवरपर्यंत रनरेट
खुप नव्हताच.
सेट झालेल्या युवीची आतातरी फटकेबाजी सुरू होइल असं वाटत असतानाच काल्पनिक लॉ ऑफ अँवरेजेसने युवराजचा घात केला!त्याच ओवरमध्ये उमर गुलने युविच्या जागी आलेल्या धोनीवर बिमर फेकला!दुसऱ्या बॉलवर धोनीचेही स्टंप्स उडालेत!
गौतम गंभीरने संरक्षण आणि अटॅकचं सुरेख मिश्रण करत शेवटपर्यंत एक टोक सांभाळत भारताच्या वीस ओवर्समध्ये 157 धावा लावल्या.
मध्यांतर झाला.सगळ्यांच्या मनात एकच धाकधुक !फुल फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानसमोर इतके कमी रन्स भारत वाचवु शकेल का?पुन्हा एकदा 83चा वर्ल्ड कप होइल का?
पंधरा मिनिटांच्या ब्रेकमध्ये आम्ही संध्याकाळची गणपतीची आरती 'उरकली'.
मनात मागणं एकच!माझ्या..आमच्या..सर्व देशवासीयांच्या....
गणपतीच्या गंभीर डोळ्यांमध्येही आम्हाला काळजी दिसली.आपल्याला आपल्याच भावनांचं प्रतिबिंब दिसत असतं.
पाकिस्तानची बँटिंग सुरू झाली.रूद्रप्रतापने सुरवातीलाच बळी मिळवला.इरफान पठाणने विकेट्स काढल्यात आणि आमचा जिवात जीव आला
पण मँच सतत दोन्ही बाजुने कलत होती.एकवेळ खात्री झाली की आता भारत जिंकणार!
आणि तसा वयस्कर पण नवोदित खेळाडु पाकिस्तानचा बमन इराणी मिसबाह उल हकने मँच पलटवण्यास सुरवात केली!
अठरा एकोणीस ओवर्समध्ये गोलंदाजांना फोडुन काढले! हरभजनच्या एक ओवरमध्ये 3 सिक्स मारत शेवटच्या ओवरला फक्त 13 रन्स शिल्लक ठेवलेत.
मिसबाह हकचा त्यावेळचा अवतार बघता तो हे रन्स अगदी सहज काढेल हे स्पष्ट होतं.पण भारताची जबरदस्त जमेची बाजु ही होती की पाकिस्तानची फक्त एकच विकेट शिल्लक होती.
पण शेवटचा ओवर कोण टाकणार!! मिसबाह मांजराच्या गळ्यात घंटा कोण अडकवणार!
प्रमुख वेगवान बॉलर्सचे ओवर्स संपले होते.प्रमुख आणि अनुभवी बॉलर हरभजनचा एक ओवर शिल्लक होता.
पण मोठं घर 'पोकळवासा हे हरभजनच्या रूपात दिसलं.
त्याने शेवटचा ओवर टाकण्यास नकार दिला.धोनीने बॉल अनुभव नसलेल्या जोगिंदरशर्माला दिला.
लिमिटेड सोर्सेचा योग्य उपयोग हे धोनीने दाखवुन दिले ते जोगिंदर शर्माला त्याने जे शेवटचा ओवर सुरू करण्यापुर्वी सांगितले त्यावरून!!!
धोनीने त्याला म्हटलं "तु जितका टेन्शनमध्ये आहेस तितकाच पुढचा बँटस्मनसुद्धा आहे!बिनधास्त बॉलिंग कर!"
संपुर्ण देशभरातील सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत..
शर्माचा पहिला बॉल वाइड टेन्शनमध्ये वाढ!
पुढचा डॉट बॉल . आणि त्यानंतरच्या बॉलवर मिसबाहने सिक्स ठोकला.
पाकिस्तानला जिंकायला फक्त 6 रन्स हवे होते तेही चार बॉल्समध्ये!
मिसबाह ते सहज काढु शकत होता.
आपण मँच हारलोय जवळपास सगळ्यांची खात्री झाली होती.
अब सब कुछ भगवानके हात मे अशी आम्हा सगळ्यांची अवस्था!
बाप्पाची प्रार्थना केली.
आमची दृष्टी टिव्हीच्या स्क्रिनकडे..हॉलमधल्या गणपतीचीही दृष्टी टिव्हीकडेच!
जोगिंदर शर्मा तिसरा बॉल टाकायला धावु लागला ..आम्ही आपलेच येउ घातलेले मरण आपल्या थंड नजरेने पाहावे तसे पाहु लागलो.बॉल टाकला..मिसबाह लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्याही बाहेर जात किपरच्या डोक्यावरून मारण्यासाठी त्याने #स्कुप केला..बॉल हवेत उंच..अशावेळी टिव्ही स्क्रिनवर बॉल किती अंतराने दुर गेला आहे कळत नाही.तेव्हाही कळलं नाही.सर्वांना वाटलं बॉल बाउंड्रीजवळ गेलाय सिक्स किंवा फोर आहे..आपण फायनल हारलोय!!!
बॉल हवेत उंचीचा परमोच्च बिंदु गाठत खाली येउ लागला होता..
आणि जसा खाली आला तसे दोन हात दिसलेत..तो श्रीशांत होता.बॉलने उंची तर गाठली पण अंतर नाही!!!
मिसबाह आउट बोल्ड जोगिंदर शर्मा कॉट श्रीशांत!!
पाकिस्तान ऑल आउट ऑन
152.
भारताने वर्ल्डकप जिंकला होता.
सगळे जोरदार घसा फाटेल अशे ओरडलेत गणपती बाप्पा मोरया!!
सगळीकडे जल्लोष सुरू होता..
आमचीही त्यानंतर विसर्जनाची मिरवणुक निघाली..सगळीकडे विजयाचा जल्लोष..ढोल ताषे...
कुठे वडा पाव कुठे उसाचा रस दुकानदार फ्रीमध्ये वाटत होते..
तिकडे लांब केसांच्या महेंद्रसिंग धोनीच्या हातात वर्ल्ड कप इकडे रस्त्यावरील प्रत्येकाच्या हातात गणपतीची मुर्ती होती!
पण जणु काही तोच वर्ल्ड कप आहे असेच वाटत होते!!
गणपतीबाप्पाने संपुर्ण दहा जिवसात आणि परत जाताना विजयाचा कप भारतीयांना आशिर्वाद रूपात दिला होता.
"गणपती निघाले गावाला वर्ल्ड कप मिळाला आम्हाला!!!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!
- अभिजित पानसे