जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेचे सुप काल वाजले. दर चार वर्षांनी होणारी ही बहूक्रीडा स्पर्धा आहे. आशियाई स्पर्धा ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या खालोखाल मानली जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पाल्य समिती “आशिया ऑलिम्पिक समिती” हीच या स्पर्धेचे आयोजन करत असते.
2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या मोठ्या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होईल यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. या आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 69 पदकांची कमाई केली.
यात भारताने 15 वेळा सुवर्ण लुटले, 24वेळा भारताची चांदी झाली तर 30 वेळा भारताच्या हाती कांस्य आले. प्रथमच 1951 पासून सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आजवरील आशियाई स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या स्पर्धेतून भारताला काही नवीन चांगले खेळाडू मिळाले ज्यांच्याकडे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आशेने बघता येईल.
बजरंग पुनियाने भारताकडून सुवर्णपदकाचं श्रीफळ वाढवलं. त्यानंतर , म्हारी छोरीया छोरो से कम है के म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील छोरी विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदात अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि ती फायनल्समध्ये प्रवेशली. फायनल्समध्ये तिने संघर्ष करून ‘सोनं’ जिंकलं. आणि भारताची आशियाई स्पर्धेतील पहिली ‘सोनपरी’ बनली. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी’ कोरलं. महावीर फोगट हे तिचे काका आणि गुरू.
महाराष्ट्रकन्या राही सरनौबतही सोनपरी बनली. तिने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक मिळवले.
रिले या खेळात भारताची कामगिरी चांगली झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय अॅथलिट्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारून ‘सुवर्ण’संधी साधली. तो गोल्डन बॉय ठरला.
भारताच्या महिला रिले संघाने रिले दौड स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकवले. या सोनेरी यशात हिमा दास, पूवम्मा राजू माचेतीरा, सरिता लक्ष्मीबाई गायकवाड यांचा समावेश होता. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले होते. तिने या आशियाई स्पर्धेत एकूण तीन पदक मिळवलेत.
यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
यानंतर नेमबाजीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक मिळवलीत.
भारताने रोविंगमध्येही एक सुवर्णपदक मिळवलं. शिवाय टेनिसमध्येही एक गोल्ड मिळवलं..
बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने सेमिफायनलसाठी शारीरिकरित्या फिट नसल्याचे सांगून त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवण्याची संधी गेली. सोनं गेलं चांदीही गेली हाती कांस्य आले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती.
अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.
स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावलीत.
कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले.
थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तां मदत करून आपली सामजिक बांधिलकीही जपली.
गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजींदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला.
शूटिंगमध्ये सौरभ चौधरी हा मुलगा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. एअर पिस्तुलने त्याने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक गळ्यात घातले.
भाला फेकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.
या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. एक रौप्य तर दोन कांस्य. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली. तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्य मिळवले.
हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले.
दुभत्या म्हशीला टोणगा तसा भारताने कबड्डी आणि हॉकीमध्ये टोणगा मिळाला. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डीसंघाने यावर्षी सुवर्णपदकाची गवसणी घातली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघाला सुवर्णस्पर्श झाला नाही.
स्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीसहित तीने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून सुवर्ण मिळवलं. हेप्टॉथ्लॉन खेळा प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदि सात प्रकारच्या खेळाचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.
पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात जिंकून सुवर्णपदक मिळवू शकली नाही, पण तिने रौप्यपदक मिळवून पहिली भारतीय महिला जिने आशियाई खेळात रौप्यपदक मिळवलं हा मान पटकावला.
ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. पण ब्रीज या खेळात भारतीय खेळाडूंनी पदके कमावलीत.
या प्रकारे संमिश्र कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या स्पर्धातालिकेत सर्वोच्च राहिला. त्या खालोखाल जपान तर नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन , जपान या देशात लहानपणापासून खेळाडू , अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजली आहे. भारतात मूळचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितके पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंनी या आशियाई स्पर्धेत आजतागायतच्या एशियन स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली.
जिथे आजकाल “बिग बॉस” , दस का दम सारख्या टुकार टीव्ही ‘शोज’ ला ‘खेळ’ संबोधून खऱ्या खेळाचा, खेळाडूंचा नकळत अपमान होतो. तिथे अथक मेहनत करून जिद्दीने खेळणाऱ्या , देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या या खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या मोठ्या स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होईल यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारतीय खेळाडूंनी निराश केले नाही. या आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 69 पदकांची कमाई केली.
यात भारताने 15 वेळा सुवर्ण लुटले, 24वेळा भारताची चांदी झाली तर 30 वेळा भारताच्या हाती कांस्य आले. प्रथमच 1951 पासून सुरू झालेल्या या आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आजवरील आशियाई स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
या स्पर्धेतून भारताला काही नवीन चांगले खेळाडू मिळाले ज्यांच्याकडे येत्या ऑलिम्पिक्समध्ये आशेने बघता येईल.
बजरंग पुनियाने भारताकडून सुवर्णपदकाचं श्रीफळ वाढवलं. त्यानंतर , म्हारी छोरीया छोरो से कम है के म्हणणारे महावीर फोगट यांच्या घराण्यातील छोरी विनेश फोगटने पंच्याहत्तर सेकंदात अक्षरशः मगरीप्रमाणे आपल्या विरोधी खेळाडूला फिरवून बाहेर नेले आणि ती फायनल्समध्ये प्रवेशली. फायनल्समध्ये तिने संघर्ष करून ‘सोनं’ जिंकलं. आणि भारताची आशियाई स्पर्धेतील पहिली ‘सोनपरी’ बनली. आपल्या चुलत बहिणींप्रमाणे तिनेही देशाचे नाव ‘सुवर्णाक्षरांनी’ कोरलं. महावीर फोगट हे तिचे काका आणि गुरू.
महाराष्ट्रकन्या राही सरनौबतही सोनपरी बनली. तिने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक मिळवले.
रिले या खेळात भारताची कामगिरी चांगली झाली. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भारतीय अॅथलिट्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली. धावपटू जीन्सन जॉन्सनने 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारून ‘सुवर्ण’संधी साधली. तो गोल्डन बॉय ठरला.
भारताच्या महिला रिले संघाने रिले दौड स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकवले. या सोनेरी यशात हिमा दास, पूवम्मा राजू माचेतीरा, सरिता लक्ष्मीबाई गायकवाड यांचा समावेश होता. हिमा दासने याच स्पर्धेत दोन रौप्यपदक पटकावले होते. तिने या आशियाई स्पर्धेत एकूण तीन पदक मिळवलेत.
यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके पटकावण्याचा मान भारतीय पथकातील अॅथलेटिक्स संघाच्या खेळाडूंना मिळाला. भारताने अॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
यानंतर नेमबाजीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य, तीन कांस्यपदक मिळवलीत.
भारताने रोविंगमध्येही एक सुवर्णपदक मिळवलं. शिवाय टेनिसमध्येही एक गोल्ड मिळवलं..
बॉक्सिंगमध्ये भारताची कामगिरी यथातथाच राहिली. विकास कृष्णनने सेमिफायनलसाठी शारीरिकरित्या फिट नसल्याचे सांगून त्याचे सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळवण्याची संधी गेली. सोनं गेलं चांदीही गेली हाती कांस्य आले. उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या बॉक्सरशी लढताना त्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती.
अमित पांघळने भारताकडून बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.
स्क्वॅशमध्ये महिला संघाने चांगली कामगिरी केली. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लीकलने पदके कमावलीत.
कुराश या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात समस्त भारतीय क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधले ते पिंकी बलहारने. तिने रौप्यपदक मिळवले.
थाळीफेक क्रीडाप्रकारात कांस्यपदक मिळवणाऱ्या सीमा पुनियाने मिळालेल्या रकमेतून केरळ पूरग्रस्तां मदत करून आपली सामजिक बांधिलकीही जपली.
गोळाफेक स्पर्धेत भारताचा ताजींदर सिंग तूरने गोळा फेकून सुवर्णपदक मिळवून महाविक्रम केला.
शूटिंगमध्ये सौरभ चौधरी हा मुलगा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाला. एअर पिस्तुलने त्याने लक्ष्यभेद करून सुवर्णपदक गळ्यात घातले.
भाला फेकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.
या आशियाई स्पर्धेत नौकायन स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. एक रौप्य तर दोन कांस्य. वर्षा गौतम, श्वेता शेर्वेगर या जोडीने रौप्यकमाल केली. तर वरुण ठक्कर आणि चेंगप्पा केलापांडा या जोडीने कांस्य मिळवले.
हर्षिता तोमरने एक कांस्यपदक मिळवले.
दुभत्या म्हशीला टोणगा तसा भारताने कबड्डी आणि हॉकीमध्ये टोणगा मिळाला. कायम सुवर्णपदक मिळवणाऱ्या कबड्डीसंघाने यावर्षी सुवर्णपदकाची गवसणी घातली नाही. पुरुष आणि महिला दोन्ही कबड्डी संघाला सुवर्णस्पर्श झाला नाही.
स्वप्ना बर्मन ही हेप्टॉथ्लॉन प्रकारात सोनपरी बनली. तिने या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला. स्वप्ना बर्मनच्या दोन्ही पायांना सहा बोटे आहेत. या अडचणीसहित तीने आत्मविश्वासाने स्पर्धेत कामगिरी करून सुवर्ण मिळवलं. हेप्टॉथ्लॉन खेळा प्रकारात धावणे, फेकी, उड्या आदि सात प्रकारच्या खेळाचा समावेश असतो, त्यामुळे सातही खेळांचा सराव करावा लागतो. त्यामुळे स्वप्ना बर्मनची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद ठरते.
पीव्ही सिंधू अंतिम सामन्यात जिंकून सुवर्णपदक मिळवू शकली नाही, पण तिने रौप्यपदक मिळवून पहिली भारतीय महिला जिने आशियाई खेळात रौप्यपदक मिळवलं हा मान पटकावला.
ज्यूडो आणि सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपयशी ठरली. पण ब्रीज या खेळात भारतीय खेळाडूंनी पदके कमावलीत.
या प्रकारे संमिश्र कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी या वर्षीची आशियाई स्पर्धा गाजवली. अपेक्षेप्रमाणे चीन या स्पर्धातालिकेत सर्वोच्च राहिला. त्या खालोखाल जपान तर नंतर दक्षिण कोरिया. भारत पदकांच्या तालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. चीन , जपान या देशात लहानपणापासून खेळाडू , अॅथलिट्स घडवले जातात. तिथे खेळ संस्कृती खूप खोलवर रुजली आहे. भारतात मूळचे इन्फ्रास्ट्रक्चरच तितके पूरक नाही. तरीही भारतीय खेळाडूंनी या आशियाई स्पर्धेत आजतागायतच्या एशियन स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली.
जिथे आजकाल “बिग बॉस” , दस का दम सारख्या टुकार टीव्ही ‘शोज’ ला ‘खेळ’ संबोधून खऱ्या खेळाचा, खेळाडूंचा नकळत अपमान होतो. तिथे अथक मेहनत करून जिद्दीने खेळणाऱ्या , देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या या खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
No comments:
Post a Comment