चार पाच वर्षांपूर्वी एकदा साताऱ्यावरून बीडला एसटीने जात होतो. दुपारी उशिरा सातारावरून निघालो होतो. संध्याकाळी बस एका गावी रोडवर थांबली होती. जवळपासच्या लोकांकडून ‘गोंदवले’ असं ऐकू आलं. खिडकीतून बाहेच्या व्यक्तीला कोणतं गाव आहे विचारल्यावर “महाराजांचं गोंदवलं” असं म्हणाला.
मला तरीही त्याच्या उत्तरावरून कळत नव्हतं की मी ज्या गोंदवलेबद्दल ऐकलं होतं ते हेच का.
म्हणून मी “गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हेच गाव का?” असा प्रश्न केला. पण माझ्या मूर्खपणाच्या विचित्र बोलण्यामुळे मीच ओशाळत हसलो. त्या माणसानेही हो हो तेच हे गोंदवले!” माझ्या बोलण्यावर हसत म्हणाला.
गाडी सुरू व्हायला एक मिनिटांचा अवकाश होता. त्या मिनिटात मला आजवर ऐकलेलं गोंदवले, के. वि. बेलसरे यांनी लिहिलेलं गोंदवलेकर महारांजांचं चरित्र वाचलेलं आठवलं.
काय करावं काय करावं..बसल्या बसल्या उजवा गुढघा जागच्या जागी भरभर हलू लागला. चार दिवसांची एसटीची पास काढली होती. त्यामुळे तिकीटाचा प्रश्न नव्हता. ड्रायव्हरने आत येऊन गाडी स्टार्ट केली.
जाऊ दे बघू काय होईल ते..विचार करून जय श्रीराम म्हंटलं आणि मी पटकन दरवाज्याकडे गेलो. कंडक्टर दार लावतच असताना मी त्यांना थांबवून बाहेर पडलो.
संध्याकाळ झाली होती. अंधार बऱ्यापैकी झालेला होता. पावसाळा नुकताच संपलेला. आकाश स्वच्छ होतं. मी मंदिर विचारत विचारत गेलो.
आवारात खूप गर्दी होती. सगळीकडे लोक होते. मला तेथील काहीही माहिती नव्हतं. राहता येईल की नाही, व्यवस्था नसेल तर परत जायला पुन्हा बस मिळेल का..काहीही कळत नव्हतं.
तिथे एकाने चौकशी केंद्रात चौकशी करायला सांगितलं. राहायला खोली मिळेलही सांगितलं.
चौकशी केंद्रातील एका वृद्ध व्यक्तीने प्रेमाने विचारलं “ “पोर्णिमेसाठी आलात का?”
मी , नाही सहज आलोय सांगितल्यावर ते म्हणाले , “आज पौर्णिमा आहे! इथे पौर्णिमेचं महत्व आहे. खास पौर्णिमेसाठी लोक दुरून येतात इथे! त्यामुळे आज गर्दी आहे.. म्हणून तुम्हाला खोली मिळणार नाही..पण कॉमन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था होईल. रात्री महाप्रसाद घ्या..”
पावती घेऊन मी विचारत हॉलकडे निघालो. पहिले आकाशाकडे बघितलं , काळ्या आकाशात चंद्र पूर्ण कलांनी मस्तपैकी चमकत होता.
ओह खरंच पौर्णिमा आहे तर!
फार खुश झालो. मूड फ्रेश झाला. सूर्योदयाचं उगवतं केशरी बिंब, पौर्णिमेचा पूर्व क्षितिजावरून हळूहळू आकाशात वरती जाणारा संपूर्ण चंद्र मला नेहमी खूप आवडतो.
राहण्याची सोयीचही टेन्शन गेलं होतं.
हॉलमध्ये बरेच लोक होते. बिनधास्तपणे सॅक हॉलमध्ये भिंतीला टेकवून बाहेर आलो.
समाधी मंदिरात गेलो. सभागृह संपूर्ण भरलेलं होतं. शुभ्र कुर्ता घातलेले बरेच लोक होते. सगळेजण शिस्तबद्ध बसलेले. कुठेही धावपळ , आवाज धक्काबुक्की नाही. मीही शेवटी जाऊन बसलो.
समोर कृष्णाची मूर्ती होती.
त्यांची रात्रीची उपासना सुरू होती.
त्यांनतर रात्रीची आरती झाली. आरतीनंतर खाली आत जाऊन समाधीचं दर्शन झालं.
कपूर, आणि धुपाचा सुगंध आत दरवळत होता. समई तेवत होती. तोवर फक्त फोटोत बघितलेलं मंदिर, काळ्या रंगाचं पादुका असलेलं स्थान, त्यावरील हार, जवळ माळ, हे प्रत्यक्षात बघत होतो.
संपूर्ण वातावरणात एक स्पष्टपणे जाणवणारी सात्विकता भरली होती.
काही वेळ बाहेर थांबून रात्रीचा महाप्रसाद घ्यायला गेलो.
तिथेही खूप शिस्त दिसली.
शेवयाची खीर, मसाले भात, आमटी , भाजी पोळी असा चविष्ट प्रसाद होता. जेवणानंतर आपापले ताट भांडी सूचनेनुसार त्या त्या पात्रातच टाकण्याची शिस्त होती.
जेवून बाहेर आलो तर घरून फोन आला. गोंदवलेला उतरून गेलो म्हणून सांगितलं. राहण्याची व्यवस्था हॉलमध्ये झाली सांगितल्यावर बॅग कुठे आहे हे विचारल्यावर, तेव्हा माझ्या डोक्यात रकसॅकचा विचार आला. मी म्हटलं हॉलमध्येच बाहेर ठेवली आहे. जागेवर आहे का कोणी नेली तर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर मी नेहमीप्रमाणे बोललो की मी लोकांवर विश्वास टाकतो. त्यांनी तो निभवायचा का हा त्यांचा प्रश्न. मी माझ्या कर्माने. लोक त्यांच्या.
मी ताबडतोब हॉलकडे गेलो. माझी रकसॅक जागच्या जागी भिंतीला टेकून विश्रांती घेत होती.
मी ही थकलो होतो. त्या दिवशी सकाळी सज्जनगडला श्रीरामाचे दर्शन झालं होतं संध्याकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महारांजाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून थोरले, धाकटे श्रीराम मंदिरात जाऊन आलो. तोवर फक्त के. वि. बेलसरेंच्या गोंदवलेकर महारांजाचं चरित्र पुस्तकातच या सर्व जागांबद्दल वाचलं, फोटोज बघितले होते. कित्येकदा त्यांतील प्रसंग वाचताना, विशेषतः राम नवमीला तुकामाई चैतन्य त्यांच्या गुरूंनी गोंदवलेकर महाराजांना अशोक वनात दुपारी बारा वाजता दिलेला दीक्षा प्रसंग..अनेकवेळा अश्रूपात व्हायचा.
सकाळी आजूबाजूचा परिसर बघितला आणि आठ वाजता परत निघालो. काहीही कल्पना नसताना, ठरवलेलं नसताना अचानक गोंदवलेचं हे दर्शन कायम लक्षात राहिलं.
-अभिजित पानसे
मला तरीही त्याच्या उत्तरावरून कळत नव्हतं की मी ज्या गोंदवलेबद्दल ऐकलं होतं ते हेच का.
म्हणून मी “गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले हेच गाव का?” असा प्रश्न केला. पण माझ्या मूर्खपणाच्या विचित्र बोलण्यामुळे मीच ओशाळत हसलो. त्या माणसानेही हो हो तेच हे गोंदवले!” माझ्या बोलण्यावर हसत म्हणाला.
गाडी सुरू व्हायला एक मिनिटांचा अवकाश होता. त्या मिनिटात मला आजवर ऐकलेलं गोंदवले, के. वि. बेलसरे यांनी लिहिलेलं गोंदवलेकर महारांजांचं चरित्र वाचलेलं आठवलं.
काय करावं काय करावं..बसल्या बसल्या उजवा गुढघा जागच्या जागी भरभर हलू लागला. चार दिवसांची एसटीची पास काढली होती. त्यामुळे तिकीटाचा प्रश्न नव्हता. ड्रायव्हरने आत येऊन गाडी स्टार्ट केली.
जाऊ दे बघू काय होईल ते..विचार करून जय श्रीराम म्हंटलं आणि मी पटकन दरवाज्याकडे गेलो. कंडक्टर दार लावतच असताना मी त्यांना थांबवून बाहेर पडलो.
संध्याकाळ झाली होती. अंधार बऱ्यापैकी झालेला होता. पावसाळा नुकताच संपलेला. आकाश स्वच्छ होतं. मी मंदिर विचारत विचारत गेलो.
आवारात खूप गर्दी होती. सगळीकडे लोक होते. मला तेथील काहीही माहिती नव्हतं. राहता येईल की नाही, व्यवस्था नसेल तर परत जायला पुन्हा बस मिळेल का..काहीही कळत नव्हतं.
तिथे एकाने चौकशी केंद्रात चौकशी करायला सांगितलं. राहायला खोली मिळेलही सांगितलं.
चौकशी केंद्रातील एका वृद्ध व्यक्तीने प्रेमाने विचारलं “ “पोर्णिमेसाठी आलात का?”
मी , नाही सहज आलोय सांगितल्यावर ते म्हणाले , “आज पौर्णिमा आहे! इथे पौर्णिमेचं महत्व आहे. खास पौर्णिमेसाठी लोक दुरून येतात इथे! त्यामुळे आज गर्दी आहे.. म्हणून तुम्हाला खोली मिळणार नाही..पण कॉमन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था होईल. रात्री महाप्रसाद घ्या..”
पावती घेऊन मी विचारत हॉलकडे निघालो. पहिले आकाशाकडे बघितलं , काळ्या आकाशात चंद्र पूर्ण कलांनी मस्तपैकी चमकत होता.
ओह खरंच पौर्णिमा आहे तर!
फार खुश झालो. मूड फ्रेश झाला. सूर्योदयाचं उगवतं केशरी बिंब, पौर्णिमेचा पूर्व क्षितिजावरून हळूहळू आकाशात वरती जाणारा संपूर्ण चंद्र मला नेहमी खूप आवडतो.
राहण्याची सोयीचही टेन्शन गेलं होतं.
हॉलमध्ये बरेच लोक होते. बिनधास्तपणे सॅक हॉलमध्ये भिंतीला टेकवून बाहेर आलो.
समाधी मंदिरात गेलो. सभागृह संपूर्ण भरलेलं होतं. शुभ्र कुर्ता घातलेले बरेच लोक होते. सगळेजण शिस्तबद्ध बसलेले. कुठेही धावपळ , आवाज धक्काबुक्की नाही. मीही शेवटी जाऊन बसलो.
समोर कृष्णाची मूर्ती होती.
त्यांची रात्रीची उपासना सुरू होती.
त्यांनतर रात्रीची आरती झाली. आरतीनंतर खाली आत जाऊन समाधीचं दर्शन झालं.
कपूर, आणि धुपाचा सुगंध आत दरवळत होता. समई तेवत होती. तोवर फक्त फोटोत बघितलेलं मंदिर, काळ्या रंगाचं पादुका असलेलं स्थान, त्यावरील हार, जवळ माळ, हे प्रत्यक्षात बघत होतो.
संपूर्ण वातावरणात एक स्पष्टपणे जाणवणारी सात्विकता भरली होती.
काही वेळ बाहेर थांबून रात्रीचा महाप्रसाद घ्यायला गेलो.
तिथेही खूप शिस्त दिसली.
शेवयाची खीर, मसाले भात, आमटी , भाजी पोळी असा चविष्ट प्रसाद होता. जेवणानंतर आपापले ताट भांडी सूचनेनुसार त्या त्या पात्रातच टाकण्याची शिस्त होती.
जेवून बाहेर आलो तर घरून फोन आला. गोंदवलेला उतरून गेलो म्हणून सांगितलं. राहण्याची व्यवस्था हॉलमध्ये झाली सांगितल्यावर बॅग कुठे आहे हे विचारल्यावर, तेव्हा माझ्या डोक्यात रकसॅकचा विचार आला. मी म्हटलं हॉलमध्येच बाहेर ठेवली आहे. जागेवर आहे का कोणी नेली तर प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर मी नेहमीप्रमाणे बोललो की मी लोकांवर विश्वास टाकतो. त्यांनी तो निभवायचा का हा त्यांचा प्रश्न. मी माझ्या कर्माने. लोक त्यांच्या.
मी ताबडतोब हॉलकडे गेलो. माझी रकसॅक जागच्या जागी भिंतीला टेकून विश्रांती घेत होती.
मी ही थकलो होतो. त्या दिवशी सकाळी सज्जनगडला श्रीरामाचे दर्शन झालं होतं संध्याकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महारांजाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून थोरले, धाकटे श्रीराम मंदिरात जाऊन आलो. तोवर फक्त के. वि. बेलसरेंच्या गोंदवलेकर महारांजाचं चरित्र पुस्तकातच या सर्व जागांबद्दल वाचलं, फोटोज बघितले होते. कित्येकदा त्यांतील प्रसंग वाचताना, विशेषतः राम नवमीला तुकामाई चैतन्य त्यांच्या गुरूंनी गोंदवलेकर महाराजांना अशोक वनात दुपारी बारा वाजता दिलेला दीक्षा प्रसंग..अनेकवेळा अश्रूपात व्हायचा.
सकाळी आजूबाजूचा परिसर बघितला आणि आठ वाजता परत निघालो. काहीही कल्पना नसताना, ठरवलेलं नसताना अचानक गोंदवलेचं हे दर्शन कायम लक्षात राहिलं.
-अभिजित पानसे