Thursday, 22 March 2018

निदहास..

'निदाहास'! सर्वप्रथम शब्द ऐकला..वाचला तर जरा विचित्र ..वेगळा वाटला.. म्हणून माहिती काढली. “निदाहास ट्रॉफी” सध्या श्रीलंकेत भारत श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळली जातेय.
निदहास हा 'सिंहली' भाषेतील शब्द आहे. निदहास म्हणजे 'स्वातंत्र्य'. आझादी..

श्रीलंकेला स्वातंत्र्य’ मिळून सत्तर वर्षे पूर्ण झालेत . त्यानिमित्ताने ही निदहास सिरीज खेळली जातेय.

याआधीही 1998 मध्ये श्रीलंकेत भारत, पाकिस्तान श्रीलंका या आशियाई देशांत निदहास कप खेळला गेला होता.

मी त्या काळात नुकताच क्रिकेट बघायला सुरवात केली होती.

लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याने ते करणाऱ्या माणसाबद्दल कायम प्रचंड भीती मनात घर करून राहावी. तसं माझं मानसिक शोषण लहानपणी #अॅलनडोनाल्ड या गोऱ्या आफ्रिकनने केलं होतं. त्याशिवाय #सनथजयसूर्या हा दुसरा शोषण करणारा!
माझं  बाल्य नासवणारे हे दोन नराधम!

त्याकाळात जयसूर्या तुफान होता. जग्गुदादा श्रीनाथ, व्येंकी परश्याचा फडशा पाडणे हे त्याच्या "डाव्या हाताचं" काम होतं.

त्यापूर्वी 1997 च्या उन्हाळ्यात, भारताला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे पूर्ण झालेत म्हणून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दूरवरचा न्यूझीलंड यांच्यात सिरीज खेळली गेली होती.

त्याचवर्षी कदाचित, काही महिने उणे अधिक,
बांग्लादेशला स्वतंत्र होऊन 25 वर्ष झालीत म्हणून भारत, पाकी, लंका बांग्लादेश यांच्यात एक सिल्वर ज्यूबली सिरीज खेळली गेली होती.
(या सिरीजचं फायनल, अंतिम सामना आजवरचा एक अत्यंत चित्तथरारक सामना , असो तो  एक सामना संपूर्ण वेगळा विषय आहे.)

अश्याप्रकारे आजवर भारत बांग्लादेश आणि श्रीलंकेमध्ये निदहास..फ्रीडम ट्रॉफी खेळली गेली आहे, त्या त्या देशाला इंडपेंडन्स मिळाल्याबद्दल.

पण एक अजब योगायोग या सिरीज आणि विजेत्याबद्दल आहे.
आजवर ज्या एशियन देशाने अशी स्वतंत्रतेला 25, पन्नास वर्षे झालेत म्हणून सिरीज खेळवली ती त्या देशाने मात्र जिंकली नाही.

1998 मध्ये स्वातंत्र्याला 50 वर्षे झालीत म्हणून श्रीलंकेने #निदाहास ट्रॉफी खेळवली. त्यात भारत विजेता होता.

भारताने 1997 मध्ये चार देशांत सिरीज खेळवली, ती ट्रॉफी श्रीलंकेने जिंकली.
यातील भारत आणि पाकिस्तानमधील सामना तर अजूनही आठवतो..एक दुःखी आठवण म्हणून..

सईद अनवरने काढलेले 194 रन्स सोळा वर्षे अस्पर्शीत राहिलेत. या सामन्यात राहुल द्रविडने पहिलं वन डे शतक केलं होतं. पण भारत मॅच हरला. फायनलला पोहचू शकला नव्हता.

आणि त्यानंतर आला, बांग्लादेशचा सिल्वर ज्युबिली कप..स्वतंत्र होऊन 25 वर्षे झाल्यानिमित्त..एक अत्यंत सुखद आठवण!
यात अंतिम सामना रंगला पाकिस्तान आणि भारतामध्ये..

शेवटच्या क्षणी सकलेन मुश्ताकला #ऋषिकेशकानिकटरने चौका मारून तो अत्यन्त थाररक सामना जिंकून दिला होता. त्या एक बाऊंडरीच्या भरवशावर तो पुढे काही मॅचेस खेळला.

बांग्लादेशने स्वतंत्रतेचा उत्सव म्हणून खेळवलेली सिरीज भारताने जिंकली होती. Destiny served it right, म्हणायला हरकत नाही. बांग्लादेशला स्वातंत्र्यही भारतानेच मिळवून दिलं ना! पण त्या *** त्याची किंमत नाही. ते भारतीय टीमचा फार द्वेष करतात. आठवा 2015 वर्ल्डकपचे फोटोशॉप्स!

असो. गेल्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये द. आफ्रिकेत "फ्रिडम सिरीज" झाली आहे.
च्या मारी या इंग्रजांनी , जिथे गेले तिथे 'चहा' आणि क्रिकेटचं व्यसन लावलं.

सध्या सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निदाहास ट्रॉफी लंकेत सुरू आहे.

आजवरचा या ट्रॉफीचा इतिहास बघता , श्रीलंकेची जिंकण्याची शक्यता कमी आहे असं म्हणता येईल.

बाकी 'निदहास' हा शब्द गोड आणि छान अर्थपूर्ण शब्द मला फार आवडला!

हमे चाहीये निदहासी ! निदहासी! निदहासी!

-    Abhijeet Panse

  8 मार्च 2018

No comments:

Post a Comment