Thursday, 22 March 2018

भाजपा आणि शाहरुख

भाजपा सध्या नव्वदीतल्या शाहरूख खानसारखी झालीये, हिरॉईनचं लग्न हिरोसोबत लागणारच असायचं तर हा खान फ्रॉम द एपिक गोटीज , नेमका पोहचायचा आणि हिरोईनला गटवायचा.
कुछ कुछ होता है मध्ये काजोल आणि सलमान खानचं लग्न लागतच असतं तर हा तिथे येतो आणि काजोल सलमानला "#केन्फ्युजन केन्फ्युजन" मध्ये टाकून टाकून “नाम तो सुना ही होगा” कडे पळते.

दिल तो पागल है मध्ये माधुरी चांगला समजूतदार जुना मित्र अक्की कुमारसोबत नांदा सौख्य भरे करणारच असते तर तिथेही शेवटच्या क्षणी व्यासपीठावरच शाहरुखकडे पळते.

बाजीगरमध्ये पहिल्यांदा, प्लास्टिक सर्जरीपूर्वीच्या तत्कालीन चपट्या नाकाच्या शिल्पा शेट्टीला तिच्या मित्रापासून पळवतो नंतर जॉईंट आयब्रोजवाल्या काजोलला तिच्या फौजदार मित्रापासून. बिचारा फ्रेंडझोन्ड फौजदार  मग दुःखात “ छुपाना भी नही आता जताना भी नही आता..” गात अखख्या फ्रेंडझोन्ड दुःखी पोरांसाठी गाणं देऊन गेला.

आता मेघालयाततरी काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं सगळ्यांना वाटत असतानाच बीजेपी…. असो.

#गोवामेघालय

-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment