Monday, 25 December 2017

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी, श्रीराम नवमी


फोटो, पुण्यातील पाताळेश्वर, PC-अभिजित पानसे
एप्रिल 2016


मला प्रामाणीकपणे नेहमी वाटतं की श्रीरामावर 'देवत्व' लादल्यामुळे त्यांच्यावरच फार अन्याय झाला आहे.
विशेषत: 'श्रीरामा'ला 'देव' म्हणुन प्रोजेक्ट केल्यामुळे त्याचे गुण, पराक्रम झाकोळल्या गेले आहेत.
''आपुलीच प्रतिमा(मुर्ती) होते आपुलीच वैरी....''

एकदा कोणाला देव म्हटलं,मुर्ती तयार केली की आपण मोकळे! आपली जबाबदारी संपली!मग हार,फुलं,अक्षताची उधळण करणं इतकच उरतं.

देवाने केलेले कृत्य ही 'लीला' म्हणुनच बघितली जातात. स्वत: श्रीरामांनी त्यांच्या आयष्यात कुठलिही लीला केली नाही.मर्यादा पुरूषोत्तम म्हणुन वागलेत.

पण त्यांच्या संयमी, नियमबद्ध जीवन, पराक्रमाचं श्रेय रामाला न मिळता त्यांच्यातील 'देवत्वालाच' मिळतं.

सर्व साधारणपणे रोजच्या आयुष्यात कसं वागावं..राहावं..ह्याचं उदाहरण म्हणुन कोणा ओळखीच्या व्यक्तीचं..सर्वसामान्य माणंसाचं उदाहरण म्हणुन दिलं जातं; देवाचं नाही. कारण तेच! तो तर 'देव' आहे  त्याला काय अशक्य! ही डजन्ट बिलाँग टु अस!

त्यामुळे त्या बिचाऱ्याला त्याच्या श्रेष्ठत्वाचं क्रेडिटही मिळत नाही. 'देवत्वाच्या' प्रखर वलयाखाली त्याचे मानवी सद्गुण झाकोळले जातात.

पण आजच्या काळात श्रीराम हा व्यक्ती म्हणुन प्रत्येक वेळी उपयोगी ठरू शकतो.

आजच्या समाजात #STD(Sexually transmitted diseases) चं प्रमाण किती वाढलय ह्याचा अंदाज घ्यायचा असेल तर कोणत्याही मोठ्या सरकारी दवाखान्यात सकाळी ओपीडी टायमिंगला जाउन बघावं.
AIDS च्या पेशंट्सच्या औषध वितरण खिडकीसमोर रांगा दिसतील.

आज संपुर्ण जगात AIDS एड्स आणि इतर लैंगिक रोग आणि लैंगिक विकृतीचं प्रमाण प्रचंड वाढलय. कारण मनाचा संयम..वैचारीक खोली..तत्वांची कमतरता..किंवा असलेल्या तत्वांशी आणि जोडीदाराशी एकनिष्ठ नसणे...

अँड धिस इज व्हेअर श्रीराम कम्स इन टु द अॅक्शन!!एकनिष्ठ,एक बाणी,एक वचनी चारित्र्यवान श्रीराम!

आज नात्यातील प्रामाणिकता हरवतेय.शारिरीक स्तरावरही आणि मानसीक पातळीवर तर नक्कीच प्रत्येक जण व्याभिचार करतोच!अॅडलटरी इज नाॅट नो लाॅँगर आउट आॅफ द इक्वेशन नाउ.

ज्या काळात बहुपत्नीत्व होतं..तथापी बहुपत्नित्व ही क्षत्रीयांची शान मानली जायची. स्वत:च्या वडिलांना बहुपत्नी असतानाही श्रीरामाने मात्र त्तव आणि प्रेमाखातर एकपत्नित्व स्विकारले.

टुडे एवरीवन एक्सपेक्ट अनटच्ड अँड वर्जिन वाईफ टु हॅव!
त्यासाठी लोकं सीतेच्या पातिव्रत्याचे उदाहरण वगैरे देतात की रावणाकडे सर्व श्रीमंती होती..विद्वत्ता होती इतका काळ रामापासुन दुर राहुनही  रावणाला ती शरण गेली नाही. अशीच बायको पाहिजे वगैरे...

पण सीतेसारखी पतिव्रता प्रामाणिक, निर्मळ स्त्रीची इच्छा ठेवताना स्वत: आपलं चारित्र्य श्रीरामाच्या जवळपासही आहे का हे अंतर्मुख होउन आम्ही पाहातो का??

लक्ष्मण तर मला श्रीरामापेक्षाही थोडासा उजवा वाटतो.सावत्र भाऊ वडिलांना दिलेल्या शब्दापोटी वनवासात जाताना तोही सावत्र भावाच्या प्रेमासाठी आपला  संसार सोडुन त्याच्यासोबत जातो.

अशोकवनातुन सितेने दिलेले दागिने जेव्हा हनुमान श्रीरामाला दाखवतो.तेव्हा लक्ष्मण फक्त सीतेच्या पायाच्या बोटातीलच अलंकार ओळखतो.लक्ष्मण कारण सांगतो की आजवर त्याने सीतेच्या मुखाकडे कधीच पाहिलं नाही फक्त तिच्या पायाच्या बोटांकडेच दृष्टी असायची.
असा भाऊ..असं चारित्र्य..आज या तिघांचीही आदर्श म्हणुन गरज आहे.
कदाचीत त्यामुळे लैंगिक रोग..नात्यातील वाढती अप्रामाणीकता..घटस्फोटाचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल.

देवाची मुर्ती ही आपल्या प्रवासातील माईलस्टोन..दिशादर्शक प्रमाणे असते.माईलस्टोन म्हणजे मंजील..डेस्टिनेशन नसतं.आपला पडाव त्याच्या समोर असतो.तसंच हळुहळु  'मुर्ती'च्या पलीकडे जाउन ईश्वर..श्रीरामतत्व भेटतं.
जगताना..आचरण करताना..

 घराजवळच एक राम मंदीर अाहे.रामनवमीला दरवर्षी रांगच रांग..झुंबड असते.वर्षभर पुन्हा त्या  तिघांकडे  कोणी पाहत नाही.
मी खास रामनवमीला कधीच दर्शनाला जात नाही. कारण वर्षभरात  कधी माझं थोबाड त्यांना न दाखवणारा मी फक्त आजच्या दिवशी गर्दीत रांगेत लागुन त्या तिघांना फुलं,अक्षता वाहताना माझा हात थरथरतो. हिंमत होत नाही.
आणि मुळात रामापुढे मला जाण्याची लाज वाटते.कारण श्रीरामाचा,लक्ष्मणाचा,सीता मातेचा एकही गुण माझ्यात नाही...

यापुढे कधी कणभर जरी' राम' जगु शकलो..किंवा जीवनात 'राम' आला तर जाईन दर्शनाला..तथापि तेव्हा 'मंदीरात' दर्शनाला जाण्याची गरजच उरणार नाही...

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment