आज
चहा टपरीवर कानावर पडलं एक जण म्हणत होता की उद्या त्याचा सोमवारचा उपास असल्याने आज रविवारी 31 डिसेंबर च्या पार्टीला रात्री बारा पर्यंतच दारू पिणार तो!
त्यामुळे काही वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा 31dec #गुरुवारी होता.
माझ्या एका मित्राने त्याला उपास असल्याने रात्री येताना घरून साबुदाण्याची खिचडी आणली होती. आणि सर्व जण चिकन हादडत असताना तो दुसऱ्या खोलीत जाउन खिचडी खात होता !
पण जसे रात्रीचे बारा वाजले तसा ''हा संपला गुरूवारचा उपास! ''हर्षोन्मादाने आरोळी ठोकत सव्वा बाराला त्याने कोंबडीच्या मांडीचे लचके तोडायला सुरवात केली!!
कारण याआधीच तो दुसऱ्या खोलीतुन
''माझ्यासाठी चिकन ठेवा बे! संपवू नका!!
'' हे साबुदाण्याची खिचडी खाताना सतत ओरडत होता!
यावरून तेव्हा हसायलाही येत होतं पण हा मुर्खपणा आहे हेही कळत होतं.
कारण कशाला इतका घोळ करायचा!
आता उपासाचा उपचार आहे हिंदु शास्त्रानुसार !
थर्टी फस्ट आहे हा इंग्रजी वर्षानुसार!
इंग्रजी दिवस सुरू होतो रात्री बारा वाजता! तर हिंदू शास्त्रानुसार नवा दिवस ,रात्री बारा वाजता नाही तर दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयाला सुरू होतो !
मग तेव्हाच उपवास संपतो असा अर्थ होतो!
आता लोकांचे उपास काही रेल्वेचं वेळापत्रक नाही!रात्री बाराला संपण्यासाठी!
दिवस बदलण्यासाठी!!
शेवटी अस्सल आणि अट्टल खाण्याऱ्यांनी घड्याळाच्या काट्यांची तमा बाळगायचीच
कशाला मग!!
"खाण्याऱ्याने खात जावे..पिण्याऱ्याने पीत जावे...खाता पिता..बाटलीच्या 'बुडाला उर्ध्व' करावे!"
"BOTTOM UP"!
-अभिजित पानसे🤓
चहा टपरीवर कानावर पडलं एक जण म्हणत होता की उद्या त्याचा सोमवारचा उपास असल्याने आज रविवारी 31 डिसेंबर च्या पार्टीला रात्री बारा पर्यंतच दारू पिणार तो!
त्यामुळे काही वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. तेव्हा 31dec #गुरुवारी होता.
माझ्या एका मित्राने त्याला उपास असल्याने रात्री येताना घरून साबुदाण्याची खिचडी आणली होती. आणि सर्व जण चिकन हादडत असताना तो दुसऱ्या खोलीत जाउन खिचडी खात होता !
पण जसे रात्रीचे बारा वाजले तसा ''हा संपला गुरूवारचा उपास! ''हर्षोन्मादाने आरोळी ठोकत सव्वा बाराला त्याने कोंबडीच्या मांडीचे लचके तोडायला सुरवात केली!!
कारण याआधीच तो दुसऱ्या खोलीतुन
''माझ्यासाठी चिकन ठेवा बे! संपवू नका!!
'' हे साबुदाण्याची खिचडी खाताना सतत ओरडत होता!
यावरून तेव्हा हसायलाही येत होतं पण हा मुर्खपणा आहे हेही कळत होतं.
कारण कशाला इतका घोळ करायचा!
आता उपासाचा उपचार आहे हिंदु शास्त्रानुसार !
थर्टी फस्ट आहे हा इंग्रजी वर्षानुसार!
इंग्रजी दिवस सुरू होतो रात्री बारा वाजता! तर हिंदू शास्त्रानुसार नवा दिवस ,रात्री बारा वाजता नाही तर दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयाला सुरू होतो !
मग तेव्हाच उपवास संपतो असा अर्थ होतो!
आता लोकांचे उपास काही रेल्वेचं वेळापत्रक नाही!रात्री बाराला संपण्यासाठी!
दिवस बदलण्यासाठी!!
शेवटी अस्सल आणि अट्टल खाण्याऱ्यांनी घड्याळाच्या काट्यांची तमा बाळगायचीच
कशाला मग!!
"खाण्याऱ्याने खात जावे..पिण्याऱ्याने पीत जावे...खाता पिता..बाटलीच्या 'बुडाला उर्ध्व' करावे!"
"BOTTOM UP"!
-अभिजित पानसे🤓
No comments:
Post a Comment