सचिन महाआख्यान
अंतिमभाग
२००३ साली आफ्रिकेत पुन्हा जागतीक महायुद्ध छेडले गेले.
तो एक मार्च चा दिन उजाडला.देशात त्यावेळी महाशिवरात्रीचा सण होता.
तिकडे दक्षिण आफ्रिकेत पारंपारिक शत्रू पाकिस्तानासोबत युद्ध आरंभ झाले. देशाची स्थिती बिकट होती.पाकी सैन्याकडे अक्रम, वकार, अख्तर, रझाक सारखे बलाढ्य अरिहंतक गोलंदाज होते. देशात इकडे प्रजा महाशिवरात्रीला शंकराला आळवू लागली! तांडव स्तोत्र पठण करू लागली!
"जटाटविगज्जल प्रवाहिपाविस्थले..डमड्मड्मड्मडम्ड् निनाद ..चकार चंड तांडवम् तनो तनुः शिवः शिवम्!
सेहवाग 'वीराला' सोबतीला घेऊन राजे सचिन हाती खड्ग घेउन रणांगणात उतरले.
जणू साक्षात रुद्रच त्यांच्यात प्रवेश करून शिवतांडव करू लागला!
'क्रिकेटशाहीर' त्या दृश्याचं वर्णन करतो ,
"दौडुनी आला शोएब अख्तर,
टाकीला त्याने शिरवेध #आपटबार!
तत्क्षणी
राजे सचिन मागील पावलावर झपकन सरले
हातातील खड्ग
सपकन फिरवले !
अखतर तर चे शिराचा वेध घेणारे आपटबार सीमारेषेपलीकडे जाऊन पडले!
झाला अख्तर जर्जर!
सचिन राजेंचा जयजयकार!!
पुढचा काळ मात्र राजेंसाठी कठीण होता! सततच्या अति युद्धामुळे परप्रांतावरील आक्रमणांमुळे कुमारचे 'कोपर' झिजले.
सगळयांना वाटले कुमार संपला!पण कुमारावर साक्षात ईश्वराचा आणि मातेचा आशीर्वाद होता!!
तोही काळ संपला आणि कुमार त्वेषाने तुटून पडला! आफ्रिकेविरुद्ध दोनशे रत्न लुटलीत!
दरम्यान अत्यंत कठीण दुर्गम अपराजित ऑस्ट्रेलिया बेटावर देशाच्या सैन्याने विजय मिळवला. तेव्हा त्या बेटावरील स्वारीत शतक रत्ने लुटल्यावर किर्तनकार रवी 'शास्त्री'ने तत्क्षणी राजेंची आंग्ल भाषेत स्तुती केली " Cometh the hour cometh the champion!"
2011 वर्ष उजाडले. हे वर्ष होते विश्वयुद्धचे!! वेळ होती अश्वमेध यज्ञाची! 'कुरुक्षेत्र' साक्षात स्वदेश भूमी होती! या विश्वयुद्धात राजेंनी पराक्रमाची पराकाष्टा केली आणि लंकेविरुद्ध महाविजय भारतीय सेनेचा सेनापती महेंद्रबाहुबलीने सीमापार फटका हाणून जिंकला! राजेंना अश्रू अनावर झाले.
संपूर्ण संघाने राजे सचिनला खांद्यावर उचलून त्यांची वरात काढली!
देश जिंकला. राष्ट्र विजयी झाले. विश्वयुद्ध जिंकले. अश्वमेध यज्ञ यशस्वी झाला! राष्ट्राने विजयपत्र मिळवले.
यासाठीच केला होता अट्टाहास!
ईश्वराने यासाठीच जणू अवतार घेतला होता! ते कार्य पूर्तीस गेले.
घेतलेला अवतार संपवावा लागतोच.
ती वेळ नजीक येत होती. दरम्यान राजेंनी एक महापराक्रम केला तो म्हणजे शतकांचे शतक करण्याचा! शंभर रत्ने शंभर वेळा लुटलीत!!
आणि तो दिन आला जेव्हा राजे सचिनने युद्धातून सक्रिय निवृत्ती घेतली.
त्यांची कर्मभूमी मुंबापुरी , येथे त्यानी त्यांच्या जीवनातील अखेरचे युद्ध खेळले. त्यातही पराक्रमाची शर्थ केली.
त्यापूर्वी प्रथम युद्धभूमीला नमन केले. रणांगणातून बाहेर पडताना प्रतिस्पर्धी योद्धे यांनीही राजेंना मानवंदना दिली. युद्ध संपल्यावर भर रणांगणात त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलं, भाऊ हजारो प्रजा उपस्थित होती.संपूर्ण विश्व राजेंना अखेरचे रणांगणात बघत होतं.सगळयांचे डोळे पाणावले. गळे भरून आले. अश्रुधारा लागल्यात!
विरुद्ध सैन्य ही स्वतःला नशीबवान समज होते त्या सोहळ्याचे साक्षीदार झालेत म्हणून !
वर आकाशातुन देवगण जणू त्यांना युद्ध निवृत्तीला शुभेच्छा देत पुष्पवर्षाव करत होते.
अश्याप्रकारे या ईश्वराने आपली रणांगणावरील अवतार समाप्ती केली.
एक सचिन पर्व सरले. सचिनाख्यान संपले.
पण खरेच का सचिनाख्यान संपले? नाही सचिनाख्यान संपले नाही. 'सचिनाख्यान' संपत नसतात.
-अभिजित दिलीप पानसे
अंतिमभाग
२००३ साली आफ्रिकेत पुन्हा जागतीक महायुद्ध छेडले गेले.
तो एक मार्च चा दिन उजाडला.देशात त्यावेळी महाशिवरात्रीचा सण होता.
तिकडे दक्षिण आफ्रिकेत पारंपारिक शत्रू पाकिस्तानासोबत युद्ध आरंभ झाले. देशाची स्थिती बिकट होती.पाकी सैन्याकडे अक्रम, वकार, अख्तर, रझाक सारखे बलाढ्य अरिहंतक गोलंदाज होते. देशात इकडे प्रजा महाशिवरात्रीला शंकराला आळवू लागली! तांडव स्तोत्र पठण करू लागली!
"जटाटविगज्जल प्रवाहिपाविस्थले..डमड्मड्मड्मडम्ड् निनाद ..चकार चंड तांडवम् तनो तनुः शिवः शिवम्!
सेहवाग 'वीराला' सोबतीला घेऊन राजे सचिन हाती खड्ग घेउन रणांगणात उतरले.
जणू साक्षात रुद्रच त्यांच्यात प्रवेश करून शिवतांडव करू लागला!
'क्रिकेटशाहीर' त्या दृश्याचं वर्णन करतो ,
"दौडुनी आला शोएब अख्तर,
टाकीला त्याने शिरवेध #आपटबार!
तत्क्षणी
राजे सचिन मागील पावलावर झपकन सरले
हातातील खड्ग
सपकन फिरवले !
अखतर तर चे शिराचा वेध घेणारे आपटबार सीमारेषेपलीकडे जाऊन पडले!
झाला अख्तर जर्जर!
सचिन राजेंचा जयजयकार!!
पुढचा काळ मात्र राजेंसाठी कठीण होता! सततच्या अति युद्धामुळे परप्रांतावरील आक्रमणांमुळे कुमारचे 'कोपर' झिजले.
सगळयांना वाटले कुमार संपला!पण कुमारावर साक्षात ईश्वराचा आणि मातेचा आशीर्वाद होता!!
तोही काळ संपला आणि कुमार त्वेषाने तुटून पडला! आफ्रिकेविरुद्ध दोनशे रत्न लुटलीत!
दरम्यान अत्यंत कठीण दुर्गम अपराजित ऑस्ट्रेलिया बेटावर देशाच्या सैन्याने विजय मिळवला. तेव्हा त्या बेटावरील स्वारीत शतक रत्ने लुटल्यावर किर्तनकार रवी 'शास्त्री'ने तत्क्षणी राजेंची आंग्ल भाषेत स्तुती केली " Cometh the hour cometh the champion!"
2011 वर्ष उजाडले. हे वर्ष होते विश्वयुद्धचे!! वेळ होती अश्वमेध यज्ञाची! 'कुरुक्षेत्र' साक्षात स्वदेश भूमी होती! या विश्वयुद्धात राजेंनी पराक्रमाची पराकाष्टा केली आणि लंकेविरुद्ध महाविजय भारतीय सेनेचा सेनापती महेंद्रबाहुबलीने सीमापार फटका हाणून जिंकला! राजेंना अश्रू अनावर झाले.
संपूर्ण संघाने राजे सचिनला खांद्यावर उचलून त्यांची वरात काढली!
देश जिंकला. राष्ट्र विजयी झाले. विश्वयुद्ध जिंकले. अश्वमेध यज्ञ यशस्वी झाला! राष्ट्राने विजयपत्र मिळवले.
यासाठीच केला होता अट्टाहास!
ईश्वराने यासाठीच जणू अवतार घेतला होता! ते कार्य पूर्तीस गेले.
घेतलेला अवतार संपवावा लागतोच.
ती वेळ नजीक येत होती. दरम्यान राजेंनी एक महापराक्रम केला तो म्हणजे शतकांचे शतक करण्याचा! शंभर रत्ने शंभर वेळा लुटलीत!!
आणि तो दिन आला जेव्हा राजे सचिनने युद्धातून सक्रिय निवृत्ती घेतली.
त्यांची कर्मभूमी मुंबापुरी , येथे त्यानी त्यांच्या जीवनातील अखेरचे युद्ध खेळले. त्यातही पराक्रमाची शर्थ केली.
त्यापूर्वी प्रथम युद्धभूमीला नमन केले. रणांगणातून बाहेर पडताना प्रतिस्पर्धी योद्धे यांनीही राजेंना मानवंदना दिली. युद्ध संपल्यावर भर रणांगणात त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांची पत्नी, मुलं, भाऊ हजारो प्रजा उपस्थित होती.संपूर्ण विश्व राजेंना अखेरचे रणांगणात बघत होतं.सगळयांचे डोळे पाणावले. गळे भरून आले. अश्रुधारा लागल्यात!
विरुद्ध सैन्य ही स्वतःला नशीबवान समज होते त्या सोहळ्याचे साक्षीदार झालेत म्हणून !
वर आकाशातुन देवगण जणू त्यांना युद्ध निवृत्तीला शुभेच्छा देत पुष्पवर्षाव करत होते.
अश्याप्रकारे या ईश्वराने आपली रणांगणावरील अवतार समाप्ती केली.
एक सचिन पर्व सरले. सचिनाख्यान संपले.
पण खरेच का सचिनाख्यान संपले? नाही सचिनाख्यान संपले नाही. 'सचिनाख्यान' संपत नसतात.
-अभिजित दिलीप पानसे
No comments:
Post a Comment