(फोटो गरुडेश्वर, सूर्योदय)
नर्मदा जयंती
फेब्रुवारी 2016
नर्मदा जयंती निमित्त, रथसप्तमी
नद्या,समुद्र,पर्वत यांच्यावर माझं पुर्वीपासुन प्रेम आहे.
धार्मिक ग्रंथात पंच महानद्यांचा उल्लेख दिसतो.
काही नद्यांसाठी माझ्या वैयक्तिक वेगवेगळ्या भावना आहेत.पण या सगळ्यात मला 'नर्मदा माता' भावनीकरित्या सर्वात जास्त जवळची वाटते.
तशी प्रत्येकासाठी सगळ्यात महत्वाची आणि लोकप्रीय 'गंगा' नदीच!तीलासुद्धा मैया,माताच म्हणतात.पण मला ही करारी,तेजस्वी '#राजमाता' प्रकारातील वाटते.म्हणजे गंगा नदीमध्ये एक प्रकारचा ROYALNESS आहे.पर्यायाने तिच्यात थोडा गर्व,शिष्टपणाही जाणवतो.She swaggers throughout her journey with royalty.
''मी तर हिमालय कन्या!''..मला तुमच्या पृथ्वीवर आणण्यासाठी 'भगिरथ प्रयत्न' करावे लागलेत,साक्षात महादेवालाही मध्ये पडावं लागलं!''असा विचार ती करत असावी.म्हणुन थोडा Attitude आहे तिच्यात असं वाटतं.
हिचीच दुसरी बहीण 'यमुना'!ही तर गर्वीष्ठच वाटते!''माझ्या काठीतर साक्षात श्रीकृष्ण बागडला..असंख्य लीला केल्यात..रास केला..!''म्हणुन यमुनेतही खुप गर्विष्ठपणा जाणवतो.
माणसांनी हिच्यात स्नान केल्यावर त्यांची पापं बिपं नष्ट करण्यासारखी 'Basic' गोष्टी करायला तिला आवडत नसाव्यात कदाचीत.म्हणुनच सलग 'सात दिवस' यमुनेत स्नान करुन तिची मनधरणी केल्यावरच ती जराशी अनिच्छेनेच त्यांची पापे वगैरे नाहिशी करत असावी.आणि थोडं फार पुण्य प्रदान करत असावी.
साक्षात यमाचीच बहीण असल्याने तशी तापटतच!अशा या दोन्ही गंगा यमुना बहिणी,हिमालय कन्या,त्यातल्या त्यात 'पुर्ववाहिन्या' असल्याने तशा तोऱ्यातच असतात.वाटतात.
गोदावरी नदी म्हणजे White collar people's,मध्यमवर्गीयांची प्रतिनिधीत्व करणारी वाटते.जणु ''गरीबाची गंगा''!
दोघींच्याही अवतरणाची कथा..दंतकथा तशी सारखीच.पण गंगा झाली Royal celebrity आणि गोदाआक्का राहिली मध्यमवर्गीय!
उगाच कोणावर जीवापाड,out of the way जाउन प्रेम करणं नाही किंवा कोणाचा टोकाचा तिरस्कार करणं नाही.आपण बरं आपलं काम बरं.
निमुटपणे ती त्र्यंबकेश्वर ते राजमुंड्री आपला मार्गक्रमण करीत असते.
जुन्या काळातील घरातील शांत,प्रेमळ,समंजस,विचारी,
आध्यात्मीक बैठक असलेली,मंद स्मित करणारी,जणु काही आयुष्याचा सार गवसलाय,ज्ञान प्राप्ती झालीये त्यामुळे कोणाकडुनही कुठलीही अपेक्षा न ठेवणारी,सतत नामस्मरणात गुंग असणारी प्रेमळ आजी म्हणजे ''कृष्णा नदी''!
कृष्णा नदी म्हणजे शांत गरीब गायच!
म्हणुन ग.दी.मांनी लिहीलं आणि सुधीर फडकेंनी गायलं असावं ''संथ वाहते कृष्णामायी..''
मला तर ही माई पेक्षा आजीच योग्य वाटतं.
हां पावसाळ्यात तिला पुर वगैरे येतो.पण तिही दत्तप्रभुंची इच्छा असावी.त्यांनाही स्वार्थी मनुष्याच्या पुजेचा,स्पर्शाचा वीट येत असावा म्हणुन ते नृसिंह वाडीला पावसाळ्यातील एक महिना स्वत:ला कृष्णा नदीत एकांतात ध्यानस्थ होत असावे.हा मान फक्त कृष्णा नदीलाच!
मला व्यक्तिश: कृष्णा नदीवर विशेष प्रेम आहे.कारण हीचा संबंध दत्तांशी,नृसिंह सरस्वती स्वामी महाराद,श्रीपादश्रीवल्लभांशी,
पर्यायाने संपुर्ण दत्त संप्रदायाशीच येतो.
कुरवपुरला हीच कृष्णा चारी बाजुने वेढुन टाकते.याच पवित्र ठिकाणी श्रीपादश्रीवल्लभांनी वास्तव्य केले आणि अवतार समाप्ती केली.
NRI i.e.Non Residential Indians जसे असतात;जन्म भारतात,तरूण इथे होतात आणि कारकीर्द दुसऱ्या देशात.तशा या कृष्णा आणि गोदावरी"Non residential Maharashtrians'' आहेत.जन्मतात महाराष्ट्रात,तरूणही इथे होतात पण कर्तुत्व,सेवा मात्र कर्नाटकात, आंध्रात देतात.तेथील धरणी सुजलाम सुफलाम करतात.
भीमा नदी म्हणजे मला ''डाॅन ब्रॅडमन''प्रमाणे वाटते.छोटं करीअर पण Impact प्रभाव मात्र युगानुयुगे राहणारा!
भीमा नदीचंही करीअर छोटंसच आहे पण अत्यंत प्रभावशाली.
भीमाशंकरला जन्मुन रायचुरजवळ कृष्णा नदीत स्वत:ला विलीन करुन स्व अस्तीत्वाचा, 'नावाचा' अहंकार टाकुन देते.पण या छोट्या प्रवासात ती स्वत:चा ठसा उमटवुन जाते.पंढरपुरला 'चंद्रभागा' नाव धारण प्र्रत्येक वारकऱ्यांच्या ह्रदयात चिरकाल स्थानापन्न होते.पांडुरंगाची भक्ती,सेवा करते.वारकरी वैष्णवांचा भक्तीसोहळा बघते.
आळंदीला भिमेच्याच काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे ही माऊलीच्या विरहात स्वत:ला लवकरच कृष्णेत समर्पित करुन टाकते.
16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थदिपीका लिहीली आणि तारूण्यातच लवकरच समाधीस्थ झालेत.पण ज्ञानेश्वरी मात्र युगानुयुगे संजीवन आहे.राहणारेय.तशीच भीमा नदीसुद्धा चंद्रभागेच्या नावाने प्रत्येकाच्या ह्रदयात नेहमीसाठी विराजमान आहे.राहील.
गाणगापुरला हीच भीमा अमरजेचा हात हाती घेउन श्रीगुरूंचे पादप्रक्षालन करायला धावत येते.
तिकडे आणखी एक हिमालयकन्या 'ब्रम्हपुत्रा',जणु जन्मल्यापासुन राग,द्वेष,'बगावत' डोक्यात घेउन आलीए!त्यामुळे तिच्या बहिणींशी गंगा यमुनेशी तिचं पटत नसावं.
आदळआपट करीत,दरवर्षी पावसाळ्यात ईशान्येकडे उत्पात माजवते.कुठलच बंधन नसलेली,मानत नसलेलीही True Rebel आहे.
नद्या या देश,काल,सिमांच्या पलिकडे असतात..पण चिनाब,झेलम..सिंधु..या Identity Crisis मध्ये अडकलेल्या वाटतात...''आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी..की फक्त बहता पानी?''
पण आता मात्र त्या identity crisis,उद्वेग यांच्या पलिकडे जाउन आता त्यांच्यात सतत एक विष्ण्णता..दु:ख..गुदमरणं..स्मशान शांतता जाणवते ..कित्येक वर्षांपासुन आजुबाजुला फक्त किंकाळ्या..राग द्वेष..रक्त..असंतोष अनुभवतायेत..
प्रवासात अनेक छोट्या मोठ्या नाव नसलेल्या नद्या दिसतात.त्यांना पाहुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावेळी स्टेडियममध्ये सिमारेषेअलिकडील आलेला बाॅल फेकण्यासाठी असलेली क्रिकेट खेळणारी छोट्या मुलांची आठवण येते.
त्या मुलांच्या डोळ्यातही स्वप्ने असतात की एक दिवस आपणही समोर सिमारेषेपलिकडे खेळु.. आपलंही एक दिवस नाव होइल.
तश्याच या छोट्या नद्यांचेही स्वप्न असतात की एक दिवस आपणही प्रमुख मोठ्या नद्या होउ..आपलंही नाव होइल..आपणही स्वत:मध्ये अनेक इतर छोट्या नद्यांना सामाउन घेउ.
पण या सगळ्यात जवळची वाटणारी, मातृत्वाचा साक्षात्कार करुन देणारी अशी ''नर्मदा माताच''!
गरीब आदिवासींवर प्रेम करणारी..साधं low profile जीवन जगणारी..जंगल,पहाडातुन वाहणारी..गरीब,साध्या आदिवासींची नर्मदा मैय्या!
परिक्रमावासीला उपाशी न झोपु देणारी..वेळपरत्वे दर्शन देउन खडतर परिक्रमेत 'अनुभव' देणारी..संकटे हरणारी..आणि फक्त तिच्या दर्शनानेही पुण्य प्राप्त करुन देणारी माझी सर्वात आवडती नर्मदा माताच!
म्हणुनच कदाचीत शिवशंकरही तिच्या पात्रातील प्रत्येक दगडात वास करतात.कारण तेही नर्मदेसारखेच साधे low profile जगणारे,easily accessible असलेले आहेत.
म्हणुनच प्रत्येक नर्मदा परिक्रमावासी म्हणत असावे ''नर्मदे हर''..नर्मदे हर..नर्मदे हर हर....
(माघ शु.सप्तमी,नर्मदा जयंती)
(फोटो गरूडेश्वर;सुर्योदय)
-Abhijeet Panse
नर्मदा जयंती
फेब्रुवारी 2016
नर्मदा जयंती निमित्त, रथसप्तमी
नद्या,समुद्र,पर्वत यांच्यावर माझं पुर्वीपासुन प्रेम आहे.
धार्मिक ग्रंथात पंच महानद्यांचा उल्लेख दिसतो.
काही नद्यांसाठी माझ्या वैयक्तिक वेगवेगळ्या भावना आहेत.पण या सगळ्यात मला 'नर्मदा माता' भावनीकरित्या सर्वात जास्त जवळची वाटते.
तशी प्रत्येकासाठी सगळ्यात महत्वाची आणि लोकप्रीय 'गंगा' नदीच!तीलासुद्धा मैया,माताच म्हणतात.पण मला ही करारी,तेजस्वी '#राजमाता' प्रकारातील वाटते.म्हणजे गंगा नदीमध्ये एक प्रकारचा ROYALNESS आहे.पर्यायाने तिच्यात थोडा गर्व,शिष्टपणाही जाणवतो.She swaggers throughout her journey with royalty.
''मी तर हिमालय कन्या!''..मला तुमच्या पृथ्वीवर आणण्यासाठी 'भगिरथ प्रयत्न' करावे लागलेत,साक्षात महादेवालाही मध्ये पडावं लागलं!''असा विचार ती करत असावी.म्हणुन थोडा Attitude आहे तिच्यात असं वाटतं.
हिचीच दुसरी बहीण 'यमुना'!ही तर गर्वीष्ठच वाटते!''माझ्या काठीतर साक्षात श्रीकृष्ण बागडला..असंख्य लीला केल्यात..रास केला..!''म्हणुन यमुनेतही खुप गर्विष्ठपणा जाणवतो.
माणसांनी हिच्यात स्नान केल्यावर त्यांची पापं बिपं नष्ट करण्यासारखी 'Basic' गोष्टी करायला तिला आवडत नसाव्यात कदाचीत.म्हणुनच सलग 'सात दिवस' यमुनेत स्नान करुन तिची मनधरणी केल्यावरच ती जराशी अनिच्छेनेच त्यांची पापे वगैरे नाहिशी करत असावी.आणि थोडं फार पुण्य प्रदान करत असावी.
साक्षात यमाचीच बहीण असल्याने तशी तापटतच!अशा या दोन्ही गंगा यमुना बहिणी,हिमालय कन्या,त्यातल्या त्यात 'पुर्ववाहिन्या' असल्याने तशा तोऱ्यातच असतात.वाटतात.
गोदावरी नदी म्हणजे White collar people's,मध्यमवर्गीयांची प्रतिनिधीत्व करणारी वाटते.जणु ''गरीबाची गंगा''!
दोघींच्याही अवतरणाची कथा..दंतकथा तशी सारखीच.पण गंगा झाली Royal celebrity आणि गोदाआक्का राहिली मध्यमवर्गीय!
उगाच कोणावर जीवापाड,out of the way जाउन प्रेम करणं नाही किंवा कोणाचा टोकाचा तिरस्कार करणं नाही.आपण बरं आपलं काम बरं.
निमुटपणे ती त्र्यंबकेश्वर ते राजमुंड्री आपला मार्गक्रमण करीत असते.
जुन्या काळातील घरातील शांत,प्रेमळ,समंजस,विचारी,
आध्यात्मीक बैठक असलेली,मंद स्मित करणारी,जणु काही आयुष्याचा सार गवसलाय,ज्ञान प्राप्ती झालीये त्यामुळे कोणाकडुनही कुठलीही अपेक्षा न ठेवणारी,सतत नामस्मरणात गुंग असणारी प्रेमळ आजी म्हणजे ''कृष्णा नदी''!
कृष्णा नदी म्हणजे शांत गरीब गायच!
म्हणुन ग.दी.मांनी लिहीलं आणि सुधीर फडकेंनी गायलं असावं ''संथ वाहते कृष्णामायी..''
मला तर ही माई पेक्षा आजीच योग्य वाटतं.
हां पावसाळ्यात तिला पुर वगैरे येतो.पण तिही दत्तप्रभुंची इच्छा असावी.त्यांनाही स्वार्थी मनुष्याच्या पुजेचा,स्पर्शाचा वीट येत असावा म्हणुन ते नृसिंह वाडीला पावसाळ्यातील एक महिना स्वत:ला कृष्णा नदीत एकांतात ध्यानस्थ होत असावे.हा मान फक्त कृष्णा नदीलाच!
मला व्यक्तिश: कृष्णा नदीवर विशेष प्रेम आहे.कारण हीचा संबंध दत्तांशी,नृसिंह सरस्वती स्वामी महाराद,श्रीपादश्रीवल्लभांशी,
पर्यायाने संपुर्ण दत्त संप्रदायाशीच येतो.
कुरवपुरला हीच कृष्णा चारी बाजुने वेढुन टाकते.याच पवित्र ठिकाणी श्रीपादश्रीवल्लभांनी वास्तव्य केले आणि अवतार समाप्ती केली.
NRI i.e.Non Residential Indians जसे असतात;जन्म भारतात,तरूण इथे होतात आणि कारकीर्द दुसऱ्या देशात.तशा या कृष्णा आणि गोदावरी"Non residential Maharashtrians'' आहेत.जन्मतात महाराष्ट्रात,तरूणही इथे होतात पण कर्तुत्व,सेवा मात्र कर्नाटकात, आंध्रात देतात.तेथील धरणी सुजलाम सुफलाम करतात.
भीमा नदी म्हणजे मला ''डाॅन ब्रॅडमन''प्रमाणे वाटते.छोटं करीअर पण Impact प्रभाव मात्र युगानुयुगे राहणारा!
भीमा नदीचंही करीअर छोटंसच आहे पण अत्यंत प्रभावशाली.
भीमाशंकरला जन्मुन रायचुरजवळ कृष्णा नदीत स्वत:ला विलीन करुन स्व अस्तीत्वाचा, 'नावाचा' अहंकार टाकुन देते.पण या छोट्या प्रवासात ती स्वत:चा ठसा उमटवुन जाते.पंढरपुरला 'चंद्रभागा' नाव धारण प्र्रत्येक वारकऱ्यांच्या ह्रदयात चिरकाल स्थानापन्न होते.पांडुरंगाची भक्ती,सेवा करते.वारकरी वैष्णवांचा भक्तीसोहळा बघते.
आळंदीला भिमेच्याच काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली त्यामुळे ही माऊलीच्या विरहात स्वत:ला लवकरच कृष्णेत समर्पित करुन टाकते.
16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थदिपीका लिहीली आणि तारूण्यातच लवकरच समाधीस्थ झालेत.पण ज्ञानेश्वरी मात्र युगानुयुगे संजीवन आहे.राहणारेय.तशीच भीमा नदीसुद्धा चंद्रभागेच्या नावाने प्रत्येकाच्या ह्रदयात नेहमीसाठी विराजमान आहे.राहील.
गाणगापुरला हीच भीमा अमरजेचा हात हाती घेउन श्रीगुरूंचे पादप्रक्षालन करायला धावत येते.
तिकडे आणखी एक हिमालयकन्या 'ब्रम्हपुत्रा',जणु जन्मल्यापासुन राग,द्वेष,'बगावत' डोक्यात घेउन आलीए!त्यामुळे तिच्या बहिणींशी गंगा यमुनेशी तिचं पटत नसावं.
आदळआपट करीत,दरवर्षी पावसाळ्यात ईशान्येकडे उत्पात माजवते.कुठलच बंधन नसलेली,मानत नसलेलीही True Rebel आहे.
नद्या या देश,काल,सिमांच्या पलिकडे असतात..पण चिनाब,झेलम..सिंधु..या Identity Crisis मध्ये अडकलेल्या वाटतात...''आम्ही भारतीय आहोत की पाकिस्तानी..की फक्त बहता पानी?''
पण आता मात्र त्या identity crisis,उद्वेग यांच्या पलिकडे जाउन आता त्यांच्यात सतत एक विष्ण्णता..दु:ख..गुदमरणं..स्मशान शांतता जाणवते ..कित्येक वर्षांपासुन आजुबाजुला फक्त किंकाळ्या..राग द्वेष..रक्त..असंतोष अनुभवतायेत..
प्रवासात अनेक छोट्या मोठ्या नाव नसलेल्या नद्या दिसतात.त्यांना पाहुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावेळी स्टेडियममध्ये सिमारेषेअलिकडील आलेला बाॅल फेकण्यासाठी असलेली क्रिकेट खेळणारी छोट्या मुलांची आठवण येते.
त्या मुलांच्या डोळ्यातही स्वप्ने असतात की एक दिवस आपणही समोर सिमारेषेपलिकडे खेळु.. आपलंही एक दिवस नाव होइल.
तश्याच या छोट्या नद्यांचेही स्वप्न असतात की एक दिवस आपणही प्रमुख मोठ्या नद्या होउ..आपलंही नाव होइल..आपणही स्वत:मध्ये अनेक इतर छोट्या नद्यांना सामाउन घेउ.
पण या सगळ्यात जवळची वाटणारी, मातृत्वाचा साक्षात्कार करुन देणारी अशी ''नर्मदा माताच''!
गरीब आदिवासींवर प्रेम करणारी..साधं low profile जीवन जगणारी..जंगल,पहाडातुन वाहणारी..गरीब,साध्या आदिवासींची नर्मदा मैय्या!
परिक्रमावासीला उपाशी न झोपु देणारी..वेळपरत्वे दर्शन देउन खडतर परिक्रमेत 'अनुभव' देणारी..संकटे हरणारी..आणि फक्त तिच्या दर्शनानेही पुण्य प्राप्त करुन देणारी माझी सर्वात आवडती नर्मदा माताच!
म्हणुनच कदाचीत शिवशंकरही तिच्या पात्रातील प्रत्येक दगडात वास करतात.कारण तेही नर्मदेसारखेच साधे low profile जगणारे,easily accessible असलेले आहेत.
म्हणुनच प्रत्येक नर्मदा परिक्रमावासी म्हणत असावे ''नर्मदे हर''..नर्मदे हर..नर्मदे हर हर....
(माघ शु.सप्तमी,नर्मदा जयंती)
(फोटो गरूडेश्वर;सुर्योदय)
-Abhijeet Panse
No comments:
Post a Comment