Saturday, 30 December 2017

कविता

सकाळी चहा पिताना जेंव्हा पाऊस बघत
होते तेंव्हा वाटल कि पावसाला सुद्धा काही
भावना असतील, त्याला पण आनंद होत असेल, हेच विचार कवितेत बांधण्याचा केलेला छोटासा प्रयत्न

आजचा दिवस माझा या विचाराने च
मी खूप खुश होत आहे,
बरसून साऱ्या धरतीवर
मनसोक्त बागडत आहे...

मेघाच्या उदरातून बाहेर येताना
ऊर त्याचे भरून येत असेल,
त्याने डोळ्यात साठवलेले पाणी
माझ्या वाटे मोकळे होत असेल...

तू माझी वाट बघतेस तेंव्हा वाटत
माझ्या पेक्षा महत्वाच काहीच नाही,
कोसळताना प्रेमानी बघतेस तेंव्हा वाटत
माझ्या पेक्षा सुंदर या जगात कोणीच नाही...

माझे चार थेंब हातावर घेऊन
चेहऱ्या वरून फ़िरवतोस तेंव्हा वाटत,
कित्येक महिन्यांनी भेटलेला
आपुलकी दाखवणारा तूच खरा दोस्त...

भिजून जा, हो ओला चिंब
माझ्या प्रेमाच्या वर्षावातून,
चार महिन्यांची सोबत आपली
साठवून ठेव आठवणीतून...

माझे इथले काम झाल्यावर
मला परत जाव लागेल,
असे क्षण बरोबर न्यायचेत कि
तुला भेटायला मला परत यावच लागेल...

- अभिजित पानसे

No comments:

Post a Comment