चित्रपटाचं नाव अगदी योग्य आहे. #ट्युबलाईट .
कित्येक वर्षांपासून ट्युबलाईट हे विजेचे उपकरण काळाच्या मागे गेलय. त्यानंतर सीएफएल ..आणि आता एलइडी बल्ब ही घराघरात आले आहेत. सरकार कडून कमी किमतीत ही मिळतात सध्या.
ट्यूबलाईट ,अगदी नावाप्रमाणेच मुव्ही ची थीम
आहे. आणि ट्रीटमेंट आहे.कालविपर्यस्त!
राजू हिराणी ला व्यावसायिक चित्रपटाची संपूर्ण जाण, बारकावे माहिती आहे. तो अगदी योग्य प्रकारे ह्युमर ,आणि समाजातील विरोधाभास चा आधार घेऊन आपला विषय मांडतो आणि नवा विचार देतो.
"लगे रहो.." मध्ये अगदी अप्रतिम दिगदर्शनाद्वारे त्याने गांधीगिरी , gandhian thoughts लोकांना सांगितले.
कबीर खाननेही पुन्हा गांधीगिरी ट्युबलाईट द्वारे पेरली आहे. पण पद्धत अतिशय रटाळ, मांडणी आणि चित्रपटाचं टायमिंग ही आजच्या काळाला अनुसरून नसल्याने मुव्ही अत्यन्त रटाळ, बोअर झालाय.
कबीर खान हा ; काबुल एक्सप्रेस मुळे , एकेकाळचा आवडता दिग्दर्शक आता सलमान प्रेमामुळे अत्यन्त प्रेडिक्टेबल आणि बोअर झालाय. काबुल एक्सप्रेस थिएटर मध्ये बघितला होता.मुव्ही अप्रतिम झाला कारण त्यात कोणीही 'स्टार' नव्हतं. विषयावर 'स्टार्स' चे अतिक्रमण झाले नव्हते.
पण न्यूयॉर्क नंतर सलमानसोबत त्याने काम सुरू केल्यावर "एक था टायगर" सारखा सर्वार्थाने अत्यन्त निकृष्ट चित्रपट देणं सुरू केले. आता तो राजू हिराणीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. एक निरागस पात्र घेऊन त्याद्वारे विनोद निर्मितीकरून , इमोशन्स घालून चित्रपटात मग एक क्रांती वगैरे निर्माण ..
ट्युबलाईट मध्येही तेच केलंय.बजरंगी भाईजान मध्येही तोच प्रकार होता. यावेळी फक्त भारत पाकिस्तान न घेता भारत चीन विषय घेतला आहे.
पण चित्रपट एक क्षणालाही भिडत नाही. कारण मांडणीतच दम नाही.
चित्रपटात सलमान आणि शाहरुख खानचं एक मोठं दृश्य आहे. तोच एक बरा सिन आहे. आणि शाहरुख खान त्या दृश्यात मस्त दिसला आहे. करन अर्जुन , कुछ कुछ होता है नंतर पाहिल्यांदाच दोघे एक फ्रेममध्ये दिसलेत. त्या दृश्यात शाहरुख सलमानवर भारी वाटतो.
मुव्ही बघतानाच हा " माय नेम इज खान" प्रमाणे समोर जाईल वाटतं. दोघांचेही पात्रांमध्ये साम्य आहे. "माय नेम इज खान" हा क्लासिक ,एपिक चित्रपट आहे. शाहरुख खानचं सर्वोत्तम काम असलेला तो एक चित्रपट. पण सलमान खान चं हे पात्र मात्र अगदी सुमार!
सलमान खान अभिनय करतो ही अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांचही ट्युबलाईट द्वारे अंधश्रद्धा निर्मूलन होईल.
इतकी ओव्हर एकटिंग काही दृश्यात केली आहे.
सलमान मुवीत असतात ते नेहमीचे अत्यन्त
बाळबोध विनोद यातही आहेत. यात ते जरा जास्तच बाळबोध आहे कारण सल्लूने बालबोधच पात्र साकारले आहे. जबरदस्तीने निरागस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटात सलमान खानचा चेहरा वय झालेला दिसलाय.
तो ही आता फेसलिफ्टिंग करून पुढच्या मुव्हीत तरणाबांड दिसेल यात शंका नाही.
फना मधला चेहऱ्यावर सुरकुत्या असलेला आमीर खान आणि पुढे तारे जमीन पर, थ्री एडिट्स मधला अमीर , कुर्बान मधला म्हातारा सैफ अली खान आणि पुढे दिसलेला सैफ..यामागे संतूर साबण ,मेन ब्युटी क्रीम नाही तर "फेस लिफ्टिंग"असतं. बोटॉक्स चे इंजेक्शन्स आता एक्सपायर्ड झालेलेत.
पण सलमान खान ची एक गोष्ट खूप कौतुकास्पद वाटते तो नेहमी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन असतो. भावांना संधी देतो. त्यांच्यासोबत काम करत असतो. त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या सुरवातीला संपूर्ण खान कुटुंबाचा फोटो असतो.
या भावांची ही सोबत खरंच खूप कौतुकास्पद आहे. उलट जेव्हा जेव्हा सलमानने आपल्या भावासोबत काम केलंय त्याचा वीर आणि हलोब्रदर झालाय. नेहमी मुव्ही फ्लॉप होतोच. दबंगच्या यशामागे सलमान आणि अभिनव कश्यप होते.
मुव्ही आपटणार हे सुरवातीलाच वाटलं जेव्हा सलमान ची झकास एन्ट्री शुभ्र घोड्यावर होते! एरवी थिएटर टाळ्यानी , शिट्यांनी, टाळ्यानी, आवाजाने दणाणून उठलं असतं. ओह माय गॉड मुवीत सुरवातीला फक्त सलमान खान चं नाव दिसल्यावरही लोकांच्या शिट्या ऐकल्या आहेत.
पण यावेळी एकही शिटी ,आवाज झाला नाही कारण सलमान एकटा घोड्यावर नसतो सोबत "सोहेल खान" ही दुसऱ्या घोड्यावर असतो. तेव्हाच वाटलं मुव्ही आपटणार! "क्या तुममे यकीन है?" हा मुझे यकीन है ये मुव्ही फ्लॉप होगी!
सलमान खानचे एका गोष्टीसाठी अभिनंदन करावे लागेल त्याने पहिल्यांदा स्वतःसाठी नायिका नसलेला चित्रपट केलाय. नाहीतर एरवी तो खूप सेफ खेळत असतो.
चित्रपटाची मूळ थीम चांगलं असूनही दिग्ददर्शन न जमल्यामुळे एकंदरीतच रटाळ झालेला आहे.
ट्यूबलाईट तसाही जास्त वीज गिळून बिल वाढवतो. हा ट्युबलाईटही असाच आहे. यापेक्षा मल्टिप्लेक्समधील इतर स्क्रीनवरील सीएफएल, एलइडी घेणे केव्हाही चांगले!
-अभिजीत पानसे
कित्येक वर्षांपासून ट्युबलाईट हे विजेचे उपकरण काळाच्या मागे गेलय. त्यानंतर सीएफएल ..आणि आता एलइडी बल्ब ही घराघरात आले आहेत. सरकार कडून कमी किमतीत ही मिळतात सध्या.
ट्यूबलाईट ,अगदी नावाप्रमाणेच मुव्ही ची थीम
आहे. आणि ट्रीटमेंट आहे.कालविपर्यस्त!
राजू हिराणी ला व्यावसायिक चित्रपटाची संपूर्ण जाण, बारकावे माहिती आहे. तो अगदी योग्य प्रकारे ह्युमर ,आणि समाजातील विरोधाभास चा आधार घेऊन आपला विषय मांडतो आणि नवा विचार देतो.
"लगे रहो.." मध्ये अगदी अप्रतिम दिगदर्शनाद्वारे त्याने गांधीगिरी , gandhian thoughts लोकांना सांगितले.
कबीर खाननेही पुन्हा गांधीगिरी ट्युबलाईट द्वारे पेरली आहे. पण पद्धत अतिशय रटाळ, मांडणी आणि चित्रपटाचं टायमिंग ही आजच्या काळाला अनुसरून नसल्याने मुव्ही अत्यन्त रटाळ, बोअर झालाय.
कबीर खान हा ; काबुल एक्सप्रेस मुळे , एकेकाळचा आवडता दिग्दर्शक आता सलमान प्रेमामुळे अत्यन्त प्रेडिक्टेबल आणि बोअर झालाय. काबुल एक्सप्रेस थिएटर मध्ये बघितला होता.मुव्ही अप्रतिम झाला कारण त्यात कोणीही 'स्टार' नव्हतं. विषयावर 'स्टार्स' चे अतिक्रमण झाले नव्हते.
पण न्यूयॉर्क नंतर सलमानसोबत त्याने काम सुरू केल्यावर "एक था टायगर" सारखा सर्वार्थाने अत्यन्त निकृष्ट चित्रपट देणं सुरू केले. आता तो राजू हिराणीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. एक निरागस पात्र घेऊन त्याद्वारे विनोद निर्मितीकरून , इमोशन्स घालून चित्रपटात मग एक क्रांती वगैरे निर्माण ..
ट्युबलाईट मध्येही तेच केलंय.बजरंगी भाईजान मध्येही तोच प्रकार होता. यावेळी फक्त भारत पाकिस्तान न घेता भारत चीन विषय घेतला आहे.
पण चित्रपट एक क्षणालाही भिडत नाही. कारण मांडणीतच दम नाही.
चित्रपटात सलमान आणि शाहरुख खानचं एक मोठं दृश्य आहे. तोच एक बरा सिन आहे. आणि शाहरुख खान त्या दृश्यात मस्त दिसला आहे. करन अर्जुन , कुछ कुछ होता है नंतर पाहिल्यांदाच दोघे एक फ्रेममध्ये दिसलेत. त्या दृश्यात शाहरुख सलमानवर भारी वाटतो.
मुव्ही बघतानाच हा " माय नेम इज खान" प्रमाणे समोर जाईल वाटतं. दोघांचेही पात्रांमध्ये साम्य आहे. "माय नेम इज खान" हा क्लासिक ,एपिक चित्रपट आहे. शाहरुख खानचं सर्वोत्तम काम असलेला तो एक चित्रपट. पण सलमान खान चं हे पात्र मात्र अगदी सुमार!
सलमान खान अभिनय करतो ही अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांचही ट्युबलाईट द्वारे अंधश्रद्धा निर्मूलन होईल.
इतकी ओव्हर एकटिंग काही दृश्यात केली आहे.
सलमान मुवीत असतात ते नेहमीचे अत्यन्त
बाळबोध विनोद यातही आहेत. यात ते जरा जास्तच बाळबोध आहे कारण सल्लूने बालबोधच पात्र साकारले आहे. जबरदस्तीने निरागस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटात सलमान खानचा चेहरा वय झालेला दिसलाय.
तो ही आता फेसलिफ्टिंग करून पुढच्या मुव्हीत तरणाबांड दिसेल यात शंका नाही.
फना मधला चेहऱ्यावर सुरकुत्या असलेला आमीर खान आणि पुढे तारे जमीन पर, थ्री एडिट्स मधला अमीर , कुर्बान मधला म्हातारा सैफ अली खान आणि पुढे दिसलेला सैफ..यामागे संतूर साबण ,मेन ब्युटी क्रीम नाही तर "फेस लिफ्टिंग"असतं. बोटॉक्स चे इंजेक्शन्स आता एक्सपायर्ड झालेलेत.
पण सलमान खान ची एक गोष्ट खूप कौतुकास्पद वाटते तो नेहमी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन असतो. भावांना संधी देतो. त्यांच्यासोबत काम करत असतो. त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या सुरवातीला संपूर्ण खान कुटुंबाचा फोटो असतो.
या भावांची ही सोबत खरंच खूप कौतुकास्पद आहे. उलट जेव्हा जेव्हा सलमानने आपल्या भावासोबत काम केलंय त्याचा वीर आणि हलोब्रदर झालाय. नेहमी मुव्ही फ्लॉप होतोच. दबंगच्या यशामागे सलमान आणि अभिनव कश्यप होते.
मुव्ही आपटणार हे सुरवातीलाच वाटलं जेव्हा सलमान ची झकास एन्ट्री शुभ्र घोड्यावर होते! एरवी थिएटर टाळ्यानी , शिट्यांनी, टाळ्यानी, आवाजाने दणाणून उठलं असतं. ओह माय गॉड मुवीत सुरवातीला फक्त सलमान खान चं नाव दिसल्यावरही लोकांच्या शिट्या ऐकल्या आहेत.
पण यावेळी एकही शिटी ,आवाज झाला नाही कारण सलमान एकटा घोड्यावर नसतो सोबत "सोहेल खान" ही दुसऱ्या घोड्यावर असतो. तेव्हाच वाटलं मुव्ही आपटणार! "क्या तुममे यकीन है?" हा मुझे यकीन है ये मुव्ही फ्लॉप होगी!
सलमान खानचे एका गोष्टीसाठी अभिनंदन करावे लागेल त्याने पहिल्यांदा स्वतःसाठी नायिका नसलेला चित्रपट केलाय. नाहीतर एरवी तो खूप सेफ खेळत असतो.
चित्रपटाची मूळ थीम चांगलं असूनही दिग्ददर्शन न जमल्यामुळे एकंदरीतच रटाळ झालेला आहे.
ट्यूबलाईट तसाही जास्त वीज गिळून बिल वाढवतो. हा ट्युबलाईटही असाच आहे. यापेक्षा मल्टिप्लेक्समधील इतर स्क्रीनवरील सीएफएल, एलइडी घेणे केव्हाही चांगले!
-अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment