एका गुरुकुलात गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली दोन शिष्य शिकत होते. त्यातील वयाने मोठा शिष्य सुरवातीला जरासा विक्षिप्त , शिघ्रसंतापी ,फणसासारखा बोचणारा होता. दुसरा लहान शिष्य समंजस, मेहनती होता.
गुरुजी दोघांना दररोज एक सुविचार सांगायचे. तो त्यांच्या शिकवणीचा प्रमुख भाग होता.
त्यामुळेच मोठा शिष्य हळूहळू फणसाच्या गऱ्याप्रमाणे पिकून गोड मिठास झाला. दुसरा शिष्य फार मोठा अधिकारी झाला.
एक दिवस दोघांनी गुरुजींकडे जाऊन कृतज्ञतेतून त्यांनी दिलेल्या ज्ञानाप्रीत्यर्थ गुरुदक्षिणा द्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गुरुजींना काय गुरुदक्षिणा द्यावी हे सविनय विचारले.
गुरुजींनी क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि मंद स्मित करत बोलले की या जगात द्वेष , राग, चंचलता ,ईर्षा ,भय प्रचंड नकारात्मकता खूप वाढली आहे. तेव्हा मी जे सुविचारांचे , उपदेशांचे ज्ञान तुम्हा दोघांना दिले तेच तुम्ही या जगाला परत द्यावे हीच माझी इच्छा आहे.
तुम्ही दररोज एक #सुविचार या समाजात फेसबुक, वॉटस ऍप द्वारे पसरवायचा हीच माझी गुरुदक्षिणा राहील. दोन्ही शिष्यांनी आनंदाने ते मान्य केले. तेव्हापासून दररोज ते ,त्यांच्या नावाने एक सुविचार ,उपदेश सामाजिक माध्यमांद्वारे समाजात पसरवण्याचे पुण्यदायी काम करतात.
सांगायची गरज नाही या दोन्ही शिष्यांचे नावे , नांगरे पाटील आणि पाटेकर अशी आहेत.
विशेष टीप:- याच गुरुजींच्या पूर्वीच्या 'बॅच'मध्ये "धीरुभाई अंबानी"आणि "रतनटाटा" सुद्धा होते.त्या दोघांनाही गुरुजींनी हीच गुरुदक्षिणा मागितली होती.
आजचा सुविचार:- " हा संदेश, पोस्ट जो एका व्यक्तीला पाठवेल त्याच्या सोबत आज एक चांगली घटना घडेल."
ही गोष्ट जो चार जणांना पाठवेल त्याच्या आयुष्यात कित्येक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होईल.सात जणांना पाठविल्यास लक्ष्मी प्राप्ती होईल.
(आदेशान्वये नाही उपदेशान्वये)
- गुरुकुलाचा पी.आर.अधिकारी -अभिजित पानसे
गुरुजी दोघांना दररोज एक सुविचार सांगायचे. तो त्यांच्या शिकवणीचा प्रमुख भाग होता.
त्यामुळेच मोठा शिष्य हळूहळू फणसाच्या गऱ्याप्रमाणे पिकून गोड मिठास झाला. दुसरा शिष्य फार मोठा अधिकारी झाला.
एक दिवस दोघांनी गुरुजींकडे जाऊन कृतज्ञतेतून त्यांनी दिलेल्या ज्ञानाप्रीत्यर्थ गुरुदक्षिणा द्यायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गुरुजींना काय गुरुदक्षिणा द्यावी हे सविनय विचारले.
गुरुजींनी क्षणभर डोळे मिटून विचार केला आणि मंद स्मित करत बोलले की या जगात द्वेष , राग, चंचलता ,ईर्षा ,भय प्रचंड नकारात्मकता खूप वाढली आहे. तेव्हा मी जे सुविचारांचे , उपदेशांचे ज्ञान तुम्हा दोघांना दिले तेच तुम्ही या जगाला परत द्यावे हीच माझी इच्छा आहे.
तुम्ही दररोज एक #सुविचार या समाजात फेसबुक, वॉटस ऍप द्वारे पसरवायचा हीच माझी गुरुदक्षिणा राहील. दोन्ही शिष्यांनी आनंदाने ते मान्य केले. तेव्हापासून दररोज ते ,त्यांच्या नावाने एक सुविचार ,उपदेश सामाजिक माध्यमांद्वारे समाजात पसरवण्याचे पुण्यदायी काम करतात.
सांगायची गरज नाही या दोन्ही शिष्यांचे नावे , नांगरे पाटील आणि पाटेकर अशी आहेत.
विशेष टीप:- याच गुरुजींच्या पूर्वीच्या 'बॅच'मध्ये "धीरुभाई अंबानी"आणि "रतनटाटा" सुद्धा होते.त्या दोघांनाही गुरुजींनी हीच गुरुदक्षिणा मागितली होती.
आजचा सुविचार:- " हा संदेश, पोस्ट जो एका व्यक्तीला पाठवेल त्याच्या सोबत आज एक चांगली घटना घडेल."
ही गोष्ट जो चार जणांना पाठवेल त्याच्या आयुष्यात कित्येक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होईल.सात जणांना पाठविल्यास लक्ष्मी प्राप्ती होईल.
(आदेशान्वये नाही उपदेशान्वये)
- गुरुकुलाचा पी.आर.अधिकारी -अभिजित पानसे
No comments:
Post a Comment