10 जुलै 2007
लोकसत्ता
पावसाळा सुरू झाला आहे तेव्हा आमच्या आजवरच्या पावसाळ्यांच्या स्वानुभवांवरुन खालील विशेष काळजी प्रत्येकाने घ्यावी.
(1) पावसाळ्यात संडास बाथरूमच्या दरवाज्यांना सुज येते..ते फुगल्यामुळे नीट बंद होत नाहीत.तेव्हा आतमध्ये हिशेब चुकता करत बसले असताना जोरात नळ सुरू ठेवणे.नाहीतर फजितीचा बाका प्रसंग 'गुदरू' शकतो.
ही काळजी मुख्यत्वे होस्टेलाईट्स जीवांसाठी.
(2) GF किंवा BF धारकांनी भर पावसात दुर कुठे एकांतात फिरायला जाणं टाळा.ओलेत्या वातावरणात पाय घसरण्याचा' संभव असतो.
(3) उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायले तरी काही प्रश्न नसतो पण पावसाळ्यात थोडेही पाणी प्यायल्यास रात्री बेरात्री झोप मोड होउन सतत विसर्जनासाठी जावं लागतं.तेव्हा योग्य प्रमाणात (आणि गरम करून पाणी पिणे.ही एक टिपीकल पावसाळी काळजी असते.)
(4) उन्हाळ्यात देवदर्शनाला वगैरे बाहेर गेले असाल.तिथे तीर्थ प्रसाद हातावर घेतला की पुसला हात डोक्याला!!
ही सवय आता टाळा.पावसाळी कुंद हवेत केस वाळत नाहीत त्यामुळे तुमच्या चिकट केसांना मुंग्या,मुंगळे लागतील.
(5) बालकनी,किचन ते हाॅलपर्यंत कितिही दोऱ्या बांधुन कपड्यांचे तोरणं बांधली तरिही कुंद आर्द हवेत कपडे वाळत नाही.त्यातल्या त्यात सर्वसाधारण वरचे कपडे थोडा भाव खाउन निमुटपणे काही तासाने वाळतात तरी.पण ती शिष्ठ अंतर्वस्त्रे मात्र अशावेळी फार अॅटिट्युड दाखवतात.लवकर वाळत नाही.अशावेळी कोण्या बहाद्दराने तेच ओलसर अंर्तवस्त्र परिधान करून गेल्यास मग मात्र त्याची काही खाज....खैर नाही!!
(6) ''...खेलेंगे प्रेम गेम आॅन द रूफ इन द रेन''ही असली 'मीतगिरी' टिव्हीवरच बरी दिसते तुम्ही असली 'मस्ती' करायला गेलात तर रूफवरुन खाली पडुन तुमचं मणका मोडु शकतं.
(7) (पुन्हा एकदा) GF आणि BF धारकांनी पावसाळ्यात बागेत वा शहराबाहेर कुठे झाडा झुुडपांमागे कुठल्याही प्रकारच्या क्रीडेसाठी जाउ नये.बिळात पाणी गेल्याने साप,इंगळ्या, विंचु बाहेर अालेले असतात.त्यामुळे तुम्ही चंबाचुंबीत मग्न असताना एखादा सरपटणारा वा नांगीधारक जीव तुमच्या पायाचे 'चुंबन' नक्की घेउ शकतो.
(8) हेसुद्धा GF/BF धारकांसाठीच!
पावसाळी कुंद हवेत जिवाणु विषाणुंची संख्या आधीच वाढली असते.त्यामुळ कदाचीत दोघंही सर्दी पडश्याने त्रस्त असु शकाल.तेव्हा प्रणयक्रिडेत दोघांची मुखे एकमेकांजवळ आलेली असतानाच; शत्रुसोबत पण न होवो असं पण नेमकी त्याक्षणी तिच्या किंवा त्याच्या फुफ्फुसात उदान वायुचा क्षोभ होउन तिला/त्याला जोरदार शिंक आलीच!तेव्हा भरलेल्या नाकातुन वायु त्याचा मार्ग काढणारच!शेवटी वायुच तो !उर्ध्वगत वा 'अधोगत'; वायु आपल्या मार्गाने बाहेर पडतोच!
त्यामुळे येथे उदान वायु जोराने उर्ध्वगत होउन सोबत नाकातील सर्व द्रवमय..सेमीसाॅलीड पदार्थ आपल्यासोबत वाहुन नेणारच! तेव्हा ''अशा चिंब वेळी तुझा हात हाती हवा''!
म्हणण्याचा ऐवजी ''अशा चिंब_वेळी नाकास तुझ्या रूमाल हवा!!'' म्हणावं लागेल.
त्यामुळे अशी जीवघेणे खजिल करणारे पेचप्रसंग टाळण्यासाठी पावसाळ्यात प्रणय टाळावा.
(9) पावसाळ्यातील अत्यंत मोहक व फसव्या महत्वाच्या गोष्टीची काळजी घेणं म्हणजे ते पावसात "मिर्ची भजी" वा तत्सम बेसनाचे तळलेले पदार्थ फक्त फेसबुकवर फोटो टाकण्या पुरतेच आणि ''हॅपीनेस इज पावसात गरम मिर्ची भजी! वाह!!''
हे असले स्टेटसे फक्त लिहिण्या वाचण्यातच मजा असते.
प्रत्यक्षात पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत झाली असल्याने 'ढगाळ' वातावरणात मिर्ची भजे वगैरे खाल्ले असता 'ढाळ' लागुन विचारगृहाकडे सतत धाव घ्यावी लागते.आणि मग आत ढर्रर्रर्रर्र.....पर्रर्रर्र.......
असो.पावसाळ्यातील काळजी; ही ढगाळ वातावरण.. ढाळ ते..ढर्रर्र..पर्यंत येउन पोहचल्याने आता यावर आणखी काही बोलावं वाटत नाही.
''सो गप्पी मासे पाळा हिवताप टाळा हॅपी पावसाळा!!''
- अभिजित पानसे
No comments:
Post a Comment