26 जून 2017, ईद निमित्ताने
मागच्या वर्षी स्नो स्कीइंग शिकायला पहलागम जवळील आरू या गावी गेलो होतो.पण त्या वर्षी बर्फ पडला नव्हता. फेब्रुवारी महिना संपायला आला होता पण त्या महिन्यात बर्फ पडला नव्हता. आमचे परतीचे दिवस जवळ आले होते .आम्ही सगळे आकाशाकडे दृष्टी लावून होतो पण आमच्यापेक्षाही अस्वस्थ काश्मिरी लोक होते.
त्यांच्यासाठी बर्फ अत्यन्त महत्वाचा होता. त्यांच्या तेथील भौगोलिक जीवन चक्रासाठी , आणि प्रवासी आकर्षित होण्यासाठी. तरंच त्या पुस्तकातील पहाडी छोट्या गावाप्रमाणे सुंदर असलेल्या त्या गावातील आर्थिक व्यवहार नीट चालणार होते.
आम्ही त्या लोकांना जवळपास रोजच विचारत असू "आज बरफ गिरेगी क्या?" त्यांचं उत्तर मला फार आवडायचं. मानवी मानसिकतेचं दर्शन करवायचं.
ते म्हणत हम तो अल्लाह से दुआ कर रहे है आप भी अपने भगवान से , राम, किशन, शंकरजिसे दुवा करो की बरफ गिरे!" अश्याच प्रकारचे काही वाक्य तरुण पोरं, म्हातारे ,दुकानदार बरेच जणांकडुन ऐकलं.
तेव्हा वाटलं जेव्हा अडचण येते , संकटं येतात , मूळ आयुष्यावरच, घाला बसू लागतो तेव्हा सारा #कट्टरपणा दूर होतो.
तेव्हा मी , माझं ,माझाच विश्वास , माझाच धर्म तेवढा श्रेष्ठ म्हणणाऱ्यांचा अंध अहंकार दूर होतो.मग तो कोणाही धर्माचा असो.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग सारख्या अत्यंत कट्टर विघटनवादी जिल्हा परिसरातील, भारतद्वेषी भागातील ते लोक आपल्या #कम्फर्टझोन, स्वस्थ आयुष्यावर नैसर्गिक संकट येऊ पाहता कट्टरवाद तात्पुरता का होईना विसरून इतर शक्तीवरही स्वतः विश्वास ठेवू लागतात.
संकटसमयी एक तर मनुष्यतील योद्धा किंवा भाबडेपणा जागृत होते. ते दुसऱ्यांचं उदाहरण होतं.
कित्येक हिंदूही मुलबाळ होत नाहीये म्हणून किंवा इतर काही अडचणीमुळे नामस्कारासाठी, नवसा बिवसासाठी पीर, दर्ग्यावर जातात.
अडचण लोकांमधील कट्टरता, अहंकार सोडायला लावून भाव, आणि माणुसकी जागृत करते.
थोडेसे विषयांतर, तेथिल तरुण पोरं सांगत लहानपणी घरासमोर बारा चौदा फूट बर्फ पडायचा आता काही वर्षांपासून फक्त 3 ते चार फूट बर्फच पडतो. ग्लोबल वॉर्मिंग चा परिणाम असा निसर्गात कळतो.
ते असो. ग्लोबल वॉर्मिंग विषयाला आपण 'असो' या सदारातच टाकतो.
सोनमर्गला उंचावरती ग्लेशिअमधून पाण्याचा प्रवाह वाहत एक छोटी नदी वाहते.तिथे त्या नदीच्या पलीकडील तीरावर एक छोटंसं मंदिर आहे.आजूबाजूला हिरवंगार कुरण, देवदार वृक्ष, उतरत्या छपराचं..कोंकणात उतरत्या छपराच कौलारू मंदिरं असतात अगदी तसंच छोटं उतरत्या टीनाचं ते मंदिर मी रोज बघायचो. पण जायला वेळ मिळत नव्हता. अप्रतिम फोटोजनिक जागा, मंदिर ते आहे.
एकदा अलीकडील तिरावरील कावा ,मॅगी च्या दुकानात असताना तेथील एक मध्यमवयीन चांगला माणूस ,नियाजभाई शी ओळख झाली होती तो ऑक्टोबर नंतर येथे कोणीच राहत नाही, कारण येथे मग जीवंत राहणं अशक्य असतं, बर्फ पडायला सुरुवात होते, त्यामुळे वरून पहाडी जंगलातील अस्वलं खाली येतात घोडे मारतात, माणसालाही सहज मारतात वगैरे सांगत असताना मी त्याला सहज एकदम विचारलं की पलीकडील ते मंदिर कोणाचं आहे. तेव्हा एक क्षणासाठी तो ओशाळला , बोलला ते मंदिर नाही मश्जीद आहे!
कोणालाही ते मंदिरच वाटेल बाहेरून बघताना इतकं त्यात साम्य होतं.
तेव्हाही वाटलं मंदिर मशीद जर एकसारखी वाटू शकते तर मग यात नक्की फरक कोणता? कशाचा?
क्रूरता, द्वेष हेच यांना वेगळे करतात का!!??
या माणसानेच मला श्रीनगरमधील नौहट्ट भागातील प्रसिद्ध ऐहासिक , वास्तुकलेचा नमुना असलेल्या मशिदीला बिनदिक्कत जाऊ शकता येतं सांगितल्यावर मी तेथे थोडसं घाबरत गेलो होतो.
असो. जे मुस्लिम खरंच शांतिप्रिय आहेत, द्वेषी नाहीत , जे अब्दुल कलामांच्या मृत्यूमुळे हळहळतात, मेनन च्या शवयात्रेत भाग घेत नाहीत त्यांच्यासाठीच ईदीच्या शुभेच्छा.
आणि अशे काही आहेत त्यांना मी ओळखतो.
लहानपणी दरवर्षी शिरखुरमा खायला मुस्लिम मित्र मैत्रिणींकडे कडे आम्ही अनेक हिंदू मित्र जात असू.
-अभिजित पानसे
मागच्या वर्षी स्नो स्कीइंग शिकायला पहलागम जवळील आरू या गावी गेलो होतो.पण त्या वर्षी बर्फ पडला नव्हता. फेब्रुवारी महिना संपायला आला होता पण त्या महिन्यात बर्फ पडला नव्हता. आमचे परतीचे दिवस जवळ आले होते .आम्ही सगळे आकाशाकडे दृष्टी लावून होतो पण आमच्यापेक्षाही अस्वस्थ काश्मिरी लोक होते.
त्यांच्यासाठी बर्फ अत्यन्त महत्वाचा होता. त्यांच्या तेथील भौगोलिक जीवन चक्रासाठी , आणि प्रवासी आकर्षित होण्यासाठी. तरंच त्या पुस्तकातील पहाडी छोट्या गावाप्रमाणे सुंदर असलेल्या त्या गावातील आर्थिक व्यवहार नीट चालणार होते.
आम्ही त्या लोकांना जवळपास रोजच विचारत असू "आज बरफ गिरेगी क्या?" त्यांचं उत्तर मला फार आवडायचं. मानवी मानसिकतेचं दर्शन करवायचं.
ते म्हणत हम तो अल्लाह से दुआ कर रहे है आप भी अपने भगवान से , राम, किशन, शंकरजिसे दुवा करो की बरफ गिरे!" अश्याच प्रकारचे काही वाक्य तरुण पोरं, म्हातारे ,दुकानदार बरेच जणांकडुन ऐकलं.
तेव्हा वाटलं जेव्हा अडचण येते , संकटं येतात , मूळ आयुष्यावरच, घाला बसू लागतो तेव्हा सारा #कट्टरपणा दूर होतो.
तेव्हा मी , माझं ,माझाच विश्वास , माझाच धर्म तेवढा श्रेष्ठ म्हणणाऱ्यांचा अंध अहंकार दूर होतो.मग तो कोणाही धर्माचा असो.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग सारख्या अत्यंत कट्टर विघटनवादी जिल्हा परिसरातील, भारतद्वेषी भागातील ते लोक आपल्या #कम्फर्टझोन, स्वस्थ आयुष्यावर नैसर्गिक संकट येऊ पाहता कट्टरवाद तात्पुरता का होईना विसरून इतर शक्तीवरही स्वतः विश्वास ठेवू लागतात.
संकटसमयी एक तर मनुष्यतील योद्धा किंवा भाबडेपणा जागृत होते. ते दुसऱ्यांचं उदाहरण होतं.
कित्येक हिंदूही मुलबाळ होत नाहीये म्हणून किंवा इतर काही अडचणीमुळे नामस्कारासाठी, नवसा बिवसासाठी पीर, दर्ग्यावर जातात.
अडचण लोकांमधील कट्टरता, अहंकार सोडायला लावून भाव, आणि माणुसकी जागृत करते.
थोडेसे विषयांतर, तेथिल तरुण पोरं सांगत लहानपणी घरासमोर बारा चौदा फूट बर्फ पडायचा आता काही वर्षांपासून फक्त 3 ते चार फूट बर्फच पडतो. ग्लोबल वॉर्मिंग चा परिणाम असा निसर्गात कळतो.
ते असो. ग्लोबल वॉर्मिंग विषयाला आपण 'असो' या सदारातच टाकतो.
सोनमर्गला उंचावरती ग्लेशिअमधून पाण्याचा प्रवाह वाहत एक छोटी नदी वाहते.तिथे त्या नदीच्या पलीकडील तीरावर एक छोटंसं मंदिर आहे.आजूबाजूला हिरवंगार कुरण, देवदार वृक्ष, उतरत्या छपराचं..कोंकणात उतरत्या छपराच कौलारू मंदिरं असतात अगदी तसंच छोटं उतरत्या टीनाचं ते मंदिर मी रोज बघायचो. पण जायला वेळ मिळत नव्हता. अप्रतिम फोटोजनिक जागा, मंदिर ते आहे.
एकदा अलीकडील तिरावरील कावा ,मॅगी च्या दुकानात असताना तेथील एक मध्यमवयीन चांगला माणूस ,नियाजभाई शी ओळख झाली होती तो ऑक्टोबर नंतर येथे कोणीच राहत नाही, कारण येथे मग जीवंत राहणं अशक्य असतं, बर्फ पडायला सुरुवात होते, त्यामुळे वरून पहाडी जंगलातील अस्वलं खाली येतात घोडे मारतात, माणसालाही सहज मारतात वगैरे सांगत असताना मी त्याला सहज एकदम विचारलं की पलीकडील ते मंदिर कोणाचं आहे. तेव्हा एक क्षणासाठी तो ओशाळला , बोलला ते मंदिर नाही मश्जीद आहे!
कोणालाही ते मंदिरच वाटेल बाहेरून बघताना इतकं त्यात साम्य होतं.
तेव्हाही वाटलं मंदिर मशीद जर एकसारखी वाटू शकते तर मग यात नक्की फरक कोणता? कशाचा?
क्रूरता, द्वेष हेच यांना वेगळे करतात का!!??
या माणसानेच मला श्रीनगरमधील नौहट्ट भागातील प्रसिद्ध ऐहासिक , वास्तुकलेचा नमुना असलेल्या मशिदीला बिनदिक्कत जाऊ शकता येतं सांगितल्यावर मी तेथे थोडसं घाबरत गेलो होतो.
असो. जे मुस्लिम खरंच शांतिप्रिय आहेत, द्वेषी नाहीत , जे अब्दुल कलामांच्या मृत्यूमुळे हळहळतात, मेनन च्या शवयात्रेत भाग घेत नाहीत त्यांच्यासाठीच ईदीच्या शुभेच्छा.
आणि अशे काही आहेत त्यांना मी ओळखतो.
लहानपणी दरवर्षी शिरखुरमा खायला मुस्लिम मित्र मैत्रिणींकडे कडे आम्ही अनेक हिंदू मित्र जात असू.
-अभिजित पानसे
No comments:
Post a Comment