दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर आलो तेव्हा ओळखीच्या लोकांचे, जुन्या नवीन मित्र मैत्रिणींचे प्रोफाईल्स, फोटोज बघत होतो. एकदा एका मैत्रिणीचे तिच्या बहिणीच्या लग्नातील फोटोज बघून तिच्याशी एकदा सहज बोलताना आठवल्यावर मेसेज केला की बहिणीच्या लग्नातील फोटोज खूप मस्त! लग्नासाठी केलेला वेगळा हेअर कट मस्त दिसतोय त्यात!
तेव्हा मध्येच तिने बोलणं थांबवलं. पुढे रिप्लाय केला नाही. मलाही खटकलं नाही .आणि विसरून गेलो.दुसऱ्या दिवशी तिचा स्वतःहुन एक मेसेज आला," सॉरी मी मुद्दाम मेसेज केला नाही. तुला जो नवा हेअर कट वाटतोय तसं काहीही नव्हतं.
तो केसांचा विग होता.
मला कॅन्सर झाला होता."
हे कळून मला प्रचंड धक्का बसला ! माझा विश्वास बसत नव्हता आपल्या मित्र मैत्रिणीपैकी कोणाला कॅन्सर होऊ शकतो! यामागे काहीही तर्क नाही! फक्त भावना होती.
तिने सांगितलं #बारावीत असताना तीला कॅन्सर झाला. घरी सगळे जण शॉक आणि ताणात होते. तिच्यावर उपचार सूरु झालेत. प्रचंड वेदना, त्रास..
केमोथेरपी सुरू झाल्यावर एके दिवशी सकाळी उठल्यावर केसांना हात लावला तर केसच हातात आलेत.
तो क्षण तिच्यासाठी कसा असेल! याचा विचार करू शकत नाही.एक तरुण मुलगी या काळात वेगळ्या भावविश्वात असते.
अश्या वेळी केश विरहित डोक्याने तीला वावरायचं होतं. काय अवस्था झाली असेल मनाची! प्रथम आरसा बघताना !
घरचं वातावरण अश्यावेळी किती दुःखी असेल..
तिने सांगितलं तिला उपाचारा दरम्यान खूप त्रास झाला.
कॅन्सरसारख्या अत्यन्त जालीम आणि खूप चिवट रोगाला संपवण्यासाठी केमोथेरपी सारखा जालीम इलाज केला जातो. ज्याचा शरीरावरही परिणाम होतो.
त्या काळातच तिच्या बहिणीचं लग्न होतं. ती दोन दिवसांपूर्वी केमोथेरपी घेऊन बहिणीच्या लग्नात
थकवा असताना काही वेळ, केसांचा विग घालून बहिणीच्या लग्नसमारंभात आली. नंतर परत गेली. इतक्या वाईट शारीरिक , मानसिक अवस्थेतही ती खूप सुंदर दिसत होती.
तिच्या उपचारांमुळे तिचे काही महिने वाया गेलेत.
इतक्या लहान वयात कोणाला कर्करोग होत असेल तेव्हा त्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल! तिने सांगितल्यावर मला त्या क्षणी इतकं भरून आलं की मी तेव्हाच ठरवलं आयुष्यात कधीच मैत्री तुटू द्यायची नाही तिच्यासोबत.
आज ती पुर्णपणे बरी झालीये. एक अप्रतिम कलाकार म्हणून प्रसिद्ध होतेय, स्वतःच्या मेरिटवर गव्हर्नमेंट कॉलेज मधून एमबीबीएस डॉक्टर होऊन आता एमडी/ एमएस साठी प्रयत्न करतेय. तिच्या बहिणीला गोड बाळ झाल्याने ती हसत म्हणत असते की आता तिला बालरोग तज्ञ व्हायचंय.कारण काही महिन्यांपूर्वी तिची बहीण गर्भिणी असताना तिला स्त्रीरोगतज्ञ व्हायचंय असं ती म्हणायची.
मला माहिती आहे तिला हवी तिथे ऍडमिशन मिळणारच. ती खूप बुद्धिवंत आहे.
पण आजही तिला काही शारिरीक त्रास झाला की तिला खूप काळजी वाटते की पुन्हा तो त्रास परत नको. तिला वर्षातून 3 वेळा तपासणी करत राहावी लागते. पण ती त्याचा कुठलाही बाऊ करत नाही. आनंदी राहते.
आमच्या कुटुंबाच्या अत्यन्त जवळचे स्नेही, कुटुंबीयांपैकीच एक असे आणि माझ्यासाठी एक व्यक्ती म्हणून अत्यन्त आदर्श असे 70 वर्षाचे एक व्यक्ती.
त्यांच्या काळात लोकप्रिय डॉक्टर, खूप मस्त लाईफ पार्टनर , वडील, सासरे आणि आजोबा ते त्यांच्या कुटुंबात आहे. आनंदी, शांत समंजस, आणि सकारत्मकतेचं जिवंत उदाहरण म्हणून आजवर लहानपणापासून बघत आलोय.
चेन्नईला मुलाकडे असताना काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं. घरचं वातावरण दुःखी झालं. त्यांच्या सोबत जन्मभर अत्यन्त आनंदी संसार केलेल्या आणि त्यांच्यासारख्याच सकारात्मक असलेल्या त्यांच्या पत्नीने घरात सगळयांना एकत्र बसवून सांगितले की कोणीही उगाच चिंता करत बसायची नाही. या विषयावर नकारात्मक बोलायचं नाही. सर्वजण आनंदी राहायचं. कारण दुःखी होऊन काळजी करत राहिल्याने काहीही होणार नाहीये उलट नुकसानच होईल. घरातील वातावरण आनंदी ठेवायचं.
ते ही हसत म्हणालेत की कॅन्सर मला झालाय घराला होऊ द्यायचा नाही. सगळेजण अगदी त्यांचा छोटा नातूही त्यांना औषधांची आठवण करून घ्यायचा. आजोबांची झालेली अवस्था बघुन त्याच्या बालसुलभ प्रश्नांनाही ते गंमतीने उत्तर द्यायचे.
काही महिन्यांनी ते कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झालेत. याचं क्रेडिट ते चेन्नईतील डॉक्टरांना देतात पण त्यांच्या पत्नीला, मुलाला, विशेष करून सुनेला आणि 9 वर्षाच्या नातवालाही सर्व कुटुंबियांनाही , देतात.
त्यांचा व्यक्तित्वचा सगळयांना इतका इतका आधार वाटतो की काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा पनवेलला खूप मोठा अपघात झाल्यावर शुद्धीवर आल्यावर सोबत नवरा, मुलं, सर्व कुटुंब असतानाही पाहिले त्यांची मुलगी बोलली की बाबांना पहिले माझ्याजवळ बोलवा. ते ही नुकतेच कॅन्सरमधून बरे झालेले चेन्नईहुन पनवेलला मुलीकडे गेलेत मल्टी फ्रॅक्चर असल्याने 2 महिने मुलीच्या सोबत राहिलेत.
एका मैत्रिणीच्या आईलाही कर्करोग झाल्यावर केमोथेरपी सुरू झाल्यावर सर्व केस गेलेत, ती अवस्था बघून मुलगी रडायला लागली. पण त्या काकू हसत बोलल्या की अगं रडते कशाला केस विंचरण्याचा त्रास संपला.
या अश्या लोकांना त्रिवार सलाम!
कर्करोग हा अत्यन्त भयंकर, वेळेत निदान ना झाल्यास जीवघेणा आजार आहे. जडतो एका व्यक्तीला पण संपूर्ण घराला तो सफर करतो.
यात स्वतःही खूप काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य जीवन पद्धती ने जगणे आवश्यक असतं. आपण रोग्यासाठी काही करत नसू तर
किमान त्यांना सकारत्मक विचार, आशा दाखवायला हवी.
आणि मुख्य म्हणजे स्वतः ही स्वतःच्या शरीराला गृहीत धरू नये.
#मोठीतळटीप:- " काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक (किमान माझ्यासाठी तरी) संतापजनक फॅड पसरलं होतं, एक विचित्र वन लायनर टाकायचं, "ohhh i found deer in my car|!"
I lost my keys in home..." असे आणि आणखी काही. लोकांनी त्यावर कन्सर्न म्हणून रिऍक्ट केलं, किंवा खरं समजून काही कमेंट केली की करणाराच्या इनबॉक्समध्ये मेसेज करून, हास्याची थोबाडं टाकून म्हणायचं की " u r caught. Now choose any one of these one liner post on your wall. n keep this circle goin on. This is for awareness of cancer"
मला गंमती कोणत्याही प्रकारच्या आवडतात. एन्जॉय करतो. पण शेवटचं कॅन्सर अवेअरन्सचं वाक्य वाचलं आणि प्रचंड चीड, संताप आला. या असल्या फालतू टाईमपास करण्यासाठी कॅन्सर अवेअरन्स चे शब्द टाकायची काय गरज!
याशिवाय अधून मधुन काहितरी पोस्ट करून ते कॉपी पेस्ट आपापल्या वॉलवर पोस्ट करायचं आवाहन करतात.आणि हे सर्व कॅन्सर जागृतीसाठी अशी पुस्ती जोडलेली असते.
त्या निरर्थक वन लायनर्समधून किंवा इतर कॉपीपेस्ट आवाहन पोस्ट मध्ये 'कॅन्सरबद्दलची' माहिती मात्र, लोकांचे अनुभव, वा घेण्याची काळजी बद्दल एक शब्दही नसतो. उगाच काही ट्रेंड निर्माण करावेत म्हणून #कॅन्सरअवेअरनेस असले भावनिक शब्द टाकायचेत.
मला अश्या मेंढरूवृत्तीची फार चीड येते. तेव्हा ठरवलं होतं यावर एकदा लिहायचं.
ज्या क्षणी मला तो I hav caught u ..now copy paste for कॅन्सर awareness..मेसेज आला त्याक्षणी त्या व्यक्तीला काढून टाकलं आणि इतर जे ते वन लायनर्स टाकायचेत त्यांनाही.
कारण हे करताना ते कर्करोग झालेल्या लोकांची एक प्रकारे थट्टा करताय. आणि असले प्रकार तेच करू शकतात ज्यांनी कधी कर्करोगी बघितले नाहीत किंवा जे स्वतःच्या शरीराला कायम स्वस्थ राहील हे गृहीत धरतात.
कर्करोगांतुन बरे झालेल्यासाठी , दुर्दैवाने न होऊ शकलेले वा सध्या जे या व्याधीचा सामना करताहेत त्यांच्यासाठी हे समर्पित.
💐💐
- अभिजित पानसे
तेव्हा मध्येच तिने बोलणं थांबवलं. पुढे रिप्लाय केला नाही. मलाही खटकलं नाही .आणि विसरून गेलो.दुसऱ्या दिवशी तिचा स्वतःहुन एक मेसेज आला," सॉरी मी मुद्दाम मेसेज केला नाही. तुला जो नवा हेअर कट वाटतोय तसं काहीही नव्हतं.
तो केसांचा विग होता.
मला कॅन्सर झाला होता."
हे कळून मला प्रचंड धक्का बसला ! माझा विश्वास बसत नव्हता आपल्या मित्र मैत्रिणीपैकी कोणाला कॅन्सर होऊ शकतो! यामागे काहीही तर्क नाही! फक्त भावना होती.
तिने सांगितलं #बारावीत असताना तीला कॅन्सर झाला. घरी सगळे जण शॉक आणि ताणात होते. तिच्यावर उपचार सूरु झालेत. प्रचंड वेदना, त्रास..
केमोथेरपी सुरू झाल्यावर एके दिवशी सकाळी उठल्यावर केसांना हात लावला तर केसच हातात आलेत.
तो क्षण तिच्यासाठी कसा असेल! याचा विचार करू शकत नाही.एक तरुण मुलगी या काळात वेगळ्या भावविश्वात असते.
अश्या वेळी केश विरहित डोक्याने तीला वावरायचं होतं. काय अवस्था झाली असेल मनाची! प्रथम आरसा बघताना !
घरचं वातावरण अश्यावेळी किती दुःखी असेल..
तिने सांगितलं तिला उपाचारा दरम्यान खूप त्रास झाला.
कॅन्सरसारख्या अत्यन्त जालीम आणि खूप चिवट रोगाला संपवण्यासाठी केमोथेरपी सारखा जालीम इलाज केला जातो. ज्याचा शरीरावरही परिणाम होतो.
त्या काळातच तिच्या बहिणीचं लग्न होतं. ती दोन दिवसांपूर्वी केमोथेरपी घेऊन बहिणीच्या लग्नात
थकवा असताना काही वेळ, केसांचा विग घालून बहिणीच्या लग्नसमारंभात आली. नंतर परत गेली. इतक्या वाईट शारीरिक , मानसिक अवस्थेतही ती खूप सुंदर दिसत होती.
तिच्या उपचारांमुळे तिचे काही महिने वाया गेलेत.
इतक्या लहान वयात कोणाला कर्करोग होत असेल तेव्हा त्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल! तिने सांगितल्यावर मला त्या क्षणी इतकं भरून आलं की मी तेव्हाच ठरवलं आयुष्यात कधीच मैत्री तुटू द्यायची नाही तिच्यासोबत.
आज ती पुर्णपणे बरी झालीये. एक अप्रतिम कलाकार म्हणून प्रसिद्ध होतेय, स्वतःच्या मेरिटवर गव्हर्नमेंट कॉलेज मधून एमबीबीएस डॉक्टर होऊन आता एमडी/ एमएस साठी प्रयत्न करतेय. तिच्या बहिणीला गोड बाळ झाल्याने ती हसत म्हणत असते की आता तिला बालरोग तज्ञ व्हायचंय.कारण काही महिन्यांपूर्वी तिची बहीण गर्भिणी असताना तिला स्त्रीरोगतज्ञ व्हायचंय असं ती म्हणायची.
मला माहिती आहे तिला हवी तिथे ऍडमिशन मिळणारच. ती खूप बुद्धिवंत आहे.
पण आजही तिला काही शारिरीक त्रास झाला की तिला खूप काळजी वाटते की पुन्हा तो त्रास परत नको. तिला वर्षातून 3 वेळा तपासणी करत राहावी लागते. पण ती त्याचा कुठलाही बाऊ करत नाही. आनंदी राहते.
आमच्या कुटुंबाच्या अत्यन्त जवळचे स्नेही, कुटुंबीयांपैकीच एक असे आणि माझ्यासाठी एक व्यक्ती म्हणून अत्यन्त आदर्श असे 70 वर्षाचे एक व्यक्ती.
त्यांच्या काळात लोकप्रिय डॉक्टर, खूप मस्त लाईफ पार्टनर , वडील, सासरे आणि आजोबा ते त्यांच्या कुटुंबात आहे. आनंदी, शांत समंजस, आणि सकारत्मकतेचं जिवंत उदाहरण म्हणून आजवर लहानपणापासून बघत आलोय.
चेन्नईला मुलाकडे असताना काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं. घरचं वातावरण दुःखी झालं. त्यांच्या सोबत जन्मभर अत्यन्त आनंदी संसार केलेल्या आणि त्यांच्यासारख्याच सकारात्मक असलेल्या त्यांच्या पत्नीने घरात सगळयांना एकत्र बसवून सांगितले की कोणीही उगाच चिंता करत बसायची नाही. या विषयावर नकारात्मक बोलायचं नाही. सर्वजण आनंदी राहायचं. कारण दुःखी होऊन काळजी करत राहिल्याने काहीही होणार नाहीये उलट नुकसानच होईल. घरातील वातावरण आनंदी ठेवायचं.
ते ही हसत म्हणालेत की कॅन्सर मला झालाय घराला होऊ द्यायचा नाही. सगळेजण अगदी त्यांचा छोटा नातूही त्यांना औषधांची आठवण करून घ्यायचा. आजोबांची झालेली अवस्था बघुन त्याच्या बालसुलभ प्रश्नांनाही ते गंमतीने उत्तर द्यायचे.
काही महिन्यांनी ते कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झालेत. याचं क्रेडिट ते चेन्नईतील डॉक्टरांना देतात पण त्यांच्या पत्नीला, मुलाला, विशेष करून सुनेला आणि 9 वर्षाच्या नातवालाही सर्व कुटुंबियांनाही , देतात.
त्यांचा व्यक्तित्वचा सगळयांना इतका इतका आधार वाटतो की काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा पनवेलला खूप मोठा अपघात झाल्यावर शुद्धीवर आल्यावर सोबत नवरा, मुलं, सर्व कुटुंब असतानाही पाहिले त्यांची मुलगी बोलली की बाबांना पहिले माझ्याजवळ बोलवा. ते ही नुकतेच कॅन्सरमधून बरे झालेले चेन्नईहुन पनवेलला मुलीकडे गेलेत मल्टी फ्रॅक्चर असल्याने 2 महिने मुलीच्या सोबत राहिलेत.
एका मैत्रिणीच्या आईलाही कर्करोग झाल्यावर केमोथेरपी सुरू झाल्यावर सर्व केस गेलेत, ती अवस्था बघून मुलगी रडायला लागली. पण त्या काकू हसत बोलल्या की अगं रडते कशाला केस विंचरण्याचा त्रास संपला.
या अश्या लोकांना त्रिवार सलाम!
कर्करोग हा अत्यन्त भयंकर, वेळेत निदान ना झाल्यास जीवघेणा आजार आहे. जडतो एका व्यक्तीला पण संपूर्ण घराला तो सफर करतो.
यात स्वतःही खूप काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य जीवन पद्धती ने जगणे आवश्यक असतं. आपण रोग्यासाठी काही करत नसू तर
किमान त्यांना सकारत्मक विचार, आशा दाखवायला हवी.
आणि मुख्य म्हणजे स्वतः ही स्वतःच्या शरीराला गृहीत धरू नये.
#मोठीतळटीप:- " काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक (किमान माझ्यासाठी तरी) संतापजनक फॅड पसरलं होतं, एक विचित्र वन लायनर टाकायचं, "ohhh i found deer in my car|!"
I lost my keys in home..." असे आणि आणखी काही. लोकांनी त्यावर कन्सर्न म्हणून रिऍक्ट केलं, किंवा खरं समजून काही कमेंट केली की करणाराच्या इनबॉक्समध्ये मेसेज करून, हास्याची थोबाडं टाकून म्हणायचं की " u r caught. Now choose any one of these one liner post on your wall. n keep this circle goin on. This is for awareness of cancer"
मला गंमती कोणत्याही प्रकारच्या आवडतात. एन्जॉय करतो. पण शेवटचं कॅन्सर अवेअरन्सचं वाक्य वाचलं आणि प्रचंड चीड, संताप आला. या असल्या फालतू टाईमपास करण्यासाठी कॅन्सर अवेअरन्स चे शब्द टाकायची काय गरज!
याशिवाय अधून मधुन काहितरी पोस्ट करून ते कॉपी पेस्ट आपापल्या वॉलवर पोस्ट करायचं आवाहन करतात.आणि हे सर्व कॅन्सर जागृतीसाठी अशी पुस्ती जोडलेली असते.
त्या निरर्थक वन लायनर्समधून किंवा इतर कॉपीपेस्ट आवाहन पोस्ट मध्ये 'कॅन्सरबद्दलची' माहिती मात्र, लोकांचे अनुभव, वा घेण्याची काळजी बद्दल एक शब्दही नसतो. उगाच काही ट्रेंड निर्माण करावेत म्हणून #कॅन्सरअवेअरनेस असले भावनिक शब्द टाकायचेत.
मला अश्या मेंढरूवृत्तीची फार चीड येते. तेव्हा ठरवलं होतं यावर एकदा लिहायचं.
ज्या क्षणी मला तो I hav caught u ..now copy paste for कॅन्सर awareness..मेसेज आला त्याक्षणी त्या व्यक्तीला काढून टाकलं आणि इतर जे ते वन लायनर्स टाकायचेत त्यांनाही.
कारण हे करताना ते कर्करोग झालेल्या लोकांची एक प्रकारे थट्टा करताय. आणि असले प्रकार तेच करू शकतात ज्यांनी कधी कर्करोगी बघितले नाहीत किंवा जे स्वतःच्या शरीराला कायम स्वस्थ राहील हे गृहीत धरतात.
कर्करोगांतुन बरे झालेल्यासाठी , दुर्दैवाने न होऊ शकलेले वा सध्या जे या व्याधीचा सामना करताहेत त्यांच्यासाठी हे समर्पित.
💐💐
- अभिजित पानसे
No comments:
Post a Comment