दहा वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय वेळेनुसार जवळपास रात्री पावणे नऊ वाजता ,धोनीने हरभजन ला बॉल द्यावा की जोगिंर ला?
मिसबाह ने चुकीचा #स्कुप मारला का?
हे प्रश्न पडले होते.
1000 वेळा पहिला प्रश्न विचारला असता त्या क्षणाला तर 999 वेळ हरभजन नाव घेतल्या गेलं असतं.
पण मोस्ट सिनिअर बॉलर असलेल्या हरभजनसिंग च्या देहबोलीतून कुठलाच आत्मविश्वास दिसत नव्हता.१८ व्या ओव्हर मध्ये मिसबह ने त्याला सिक्स नाही तर जणू कानफटात मारल्या होत्या. त्याच्या आत्मविश्वाचा चोळामोळा केला होता.
शिवाय हरभजनलाही व्हिलन व्हायचं नव्हतं. त्याला जाणीव होती हॅट्रिक घेतलेल्या चेतन शर्माला त्याच्या हॅट्रिक साठी नाही,पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या बॉलवर बसलेल्या , हरवलेल्या मॅच साठी #खलनायक म्हणून ओळखलं जातं.
आत्मविश्वास नसलेल्या पण काहीतरी करून दाखवायची इच्छा आणि आधीच्या मॅचमधील नाजूक अवस्थेत बॉलिंग करण्याचा अनुभव असलेल्या मुळात अननुभवी जोगिंदर शर्माला बॉल दिला.
मिसबाह ने चुकीचा शॉटची निवड केली का?
1000 वेळा उत्तर हेच "बिलकुल नाही."
फाईन लेग आत असताना स्कुप शॉट अगदी अचूक निवड होती.
24 सप्टेंबर 2007 पासून आजच्या तारखेपर्यंत तो शॉट मिसबहने आणि जगातील इतर बॅट्समनने शेकडो वेळा खेळलाय. फार फार कमी वेळी फाईन लेग ला कोणी आउट झाला असेल.
पण मिसबाहने एक चूक केली. त्याने जोगिंदर शर्माला 'वेगवान' गोलंदाज समजला. जोगिंदर शर्मा ने बॉल टाकला, मिसबाहने स्कुप केला.पण वेग कमी होता. मिसबाह मिस्ड टायमिंग ऑफ द बॉल. बॉल गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात हवेला कापत उंच जाऊ लागला ,उंचीचा परमोच्च बिंदू गाठला आणि खाली येई लागला.
अंगावर शहारे..मॅच हरलोय ची तीव्र भावना..
पण खाली दोन हात दिसलेत. बॉल ने उंची गाठली होती अंतर नाही.
बॉल हातात विसावला.
त्यानंतर फक्त आवाज आवाज कल्ला...!
10 वर्षपूर्वी आजच्या दिवशी भारत विश्वविजेता बनला होता.
-अभिजीत पानसे
मिसबाह ने चुकीचा #स्कुप मारला का?
हे प्रश्न पडले होते.
1000 वेळा पहिला प्रश्न विचारला असता त्या क्षणाला तर 999 वेळ हरभजन नाव घेतल्या गेलं असतं.
पण मोस्ट सिनिअर बॉलर असलेल्या हरभजनसिंग च्या देहबोलीतून कुठलाच आत्मविश्वास दिसत नव्हता.१८ व्या ओव्हर मध्ये मिसबह ने त्याला सिक्स नाही तर जणू कानफटात मारल्या होत्या. त्याच्या आत्मविश्वाचा चोळामोळा केला होता.
शिवाय हरभजनलाही व्हिलन व्हायचं नव्हतं. त्याला जाणीव होती हॅट्रिक घेतलेल्या चेतन शर्माला त्याच्या हॅट्रिक साठी नाही,पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या बॉलवर बसलेल्या , हरवलेल्या मॅच साठी #खलनायक म्हणून ओळखलं जातं.
आत्मविश्वास नसलेल्या पण काहीतरी करून दाखवायची इच्छा आणि आधीच्या मॅचमधील नाजूक अवस्थेत बॉलिंग करण्याचा अनुभव असलेल्या मुळात अननुभवी जोगिंदर शर्माला बॉल दिला.
मिसबाह ने चुकीचा शॉटची निवड केली का?
1000 वेळा उत्तर हेच "बिलकुल नाही."
फाईन लेग आत असताना स्कुप शॉट अगदी अचूक निवड होती.
24 सप्टेंबर 2007 पासून आजच्या तारखेपर्यंत तो शॉट मिसबहने आणि जगातील इतर बॅट्समनने शेकडो वेळा खेळलाय. फार फार कमी वेळी फाईन लेग ला कोणी आउट झाला असेल.
पण मिसबाहने एक चूक केली. त्याने जोगिंदर शर्माला 'वेगवान' गोलंदाज समजला. जोगिंदर शर्मा ने बॉल टाकला, मिसबाहने स्कुप केला.पण वेग कमी होता. मिसबाह मिस्ड टायमिंग ऑफ द बॉल. बॉल गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात हवेला कापत उंच जाऊ लागला ,उंचीचा परमोच्च बिंदू गाठला आणि खाली येई लागला.
अंगावर शहारे..मॅच हरलोय ची तीव्र भावना..
पण खाली दोन हात दिसलेत. बॉल ने उंची गाठली होती अंतर नाही.
बॉल हातात विसावला.
त्यानंतर फक्त आवाज आवाज कल्ला...!
10 वर्षपूर्वी आजच्या दिवशी भारत विश्वविजेता बनला होता.
-अभिजीत पानसे
No comments:
Post a Comment