1 ऑक्टोबर 2017
"आप तो काँग्रेसी थे ना पुरे जीवन भर फिर भी आपको ये सरकार क्यू परेशान कर रही है?"
त्यांचा मुलगा त्याना म्हणतो.
"..माफ किजिये सूनने मे अच्छा नही लगेगा लेकिन सच है अंग्रेजो
काल अच्छा था कम से कम तब दुष्मन कोन है ये तो पता था!"
हे वाक्य एक अस्सल गांधीवादी ,भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधींच्या विचारसरणीवर पूर्ण विश्वास असलेला 84 वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक बोलतो.
अत्यन्त तगडी स्टारकास्ट असलेला हा गांधींच्या विचारसरणीवर विश्वास असलेल्या, स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सरकारने स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपत्र द्यावे म्हणून 30 वर्षांपासून लढणाऱ्या ओरिसातील गौरहरी दास नावाच्या स्वा. सै. स्वातंत्र्यानंतर मुंबई शहरातील संघर्षावर "गौर हरी दास्तान" चित्रपट आहे.
सम्पूर्णपणे ऑफ स्ट्रीम चित्रपट आहे. विनय पाठकने भावहीन शांत चेहऱ्याने जे भाव मांडले आहेत त्याला तोड नाही! या चित्रपटाचे एक विशेष की यातील प्रत्येक कलाकार हा मराठी, हिंदी नाट्यभूमिचा पाया असलेला आहे.
दीड तासाच्या या चित्रपटात अनेक सुंदर दृश्ये आहेत. अलझायमर्सची सुरवातीचे लक्षणे दिसत असताना एपीजे अब्दुल कलामांना पत्र लिहितात की स्वातंत्र्य या शब्दचा अर्थही मी विसरायच्या आधी मला माझं ताम्रपत्र द्या".
छोट्या मुलाला गांधीजी बघितलेल्या या 80 वर्षाच्या वृद्धाला भेटायचं असतं ते दृश्य.
शिवाय शेवटचं दृश्य खूप मस्त.
खूप कमी शब्दात अनेक गोष्टींना अलवार स्पर्श केलाय.
कोंकना सेन, रणवीर शौरी, विक्रम गोखले ,रजत कपूर
माझी आवडती अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी अशी मोठी स्टारकास्ट आहे. सिद्धार्थ जाधव ही एक दृश्यात आहे.
नेहा पेंडसे , विद्या माळवदे खूप सुंदर दिसली आहे.
अनंत महादेवन ने दिग्दर्शित केलेला हा "गौर हरि दास्तान" सिनेमा हा एकदा तरी बघावा असा आहे.
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment