"समुद्र मंथन आणि तो"
ही पोस्ट वरवरून धार्मिक वाटत असेल पण ती ती फक्त धार्मिक नसून एक हजारो वर्षांपासूनचं रहस्य ..सत्य सांगणारी आहे.
ज्यांना रुचकर खायला आवडते त्या सर्वांसाठी हे रहस्य, सत्य महत्वाचं आहे.
शेकडो वर्षांपासून मुद्दाम एक घटना अर्धसत्य सांगितली जाते आहे.
आजवर '#त्या' व्यक्तीचं खरं नाव, ओळख लपवून ठेवण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच राजस्थानातील दुर्गम भागात जाऊन आलो, तेव्हा तेथील काही वृद्ध जाणकार व्यक्तींनी एक रहस्य सांगितले. प्रथम ऐकून त्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी सांगितलेली "ती व्यक्ती" काहीतरी वेगळी आहे यावर विश्वास बसत नव्हता.
परत येऊन काही गूढ पुस्तकांचा अभ्यास केला. नाडी ग्रंथ अभ्यासलेत.
आणि " त्या व्यक्तीबद्दल " रहस्य समजले.
इतक्यातच 'रामसेतू' बद्दल नासाने परत येऊन त्यातील दगडांचा अभ्यास करून ते किती हजारो वर्षे जुने या निष्कर्षाला पोहचलेत. त्याचप्रमाणे "त्या व्यक्ती" चाही अभ्यास केला गेलाय. आणि जे रहस्य हाती लागलं ते चक्रावून टाकणारं आहे. लवकरच 'ऑफिशियल' स्टेटमेंट याबाबत येणार आहे.
त्यापूर्वी पुन्हा एकदा ती हजारो वर्षांपूर्वीची घटना समजून घेणे आवश्यक आहे.
देवांची आणि राक्षस टीम ची मिटिंग ठरली. बैठकीअंती हे ठरले की सागरात अनेक रत्ने, संपत्ती, अमृत दडले आहे, ती बाहेर काढण्यासाठी आपणास समुद्र मंथन करणे गरजेचे आहे.
समुद्र मंथन करण्याची तारीख ठरली. मेरू पर्वताचा 'रवी' झाला. नागाची दोरी झाली. देव आणि दानव समुद्र मंथन करू लागलेत.
प्रथम विष बाहेर आले. महादेवांना आवाहन केले गेले, त्यांनी 'नीलकंठ' बनून नाजूक परिस्थिती मॅनेज केली.
त्यानंतर इतर रत्ने निघालीत. तदनंतर बाहेर आले ते 'अमृत'
"याचसाठी केला होता अट्टाहास" .
पण अमृत प्राशन कोण करणार यावरून वाद सुरू झाला.
डोमेस्टिक सिच्युएशन हाताळण्यात निष्णात असलेल्या विष्णूंनी पुढाकार घेतला.
देवांना आणि असुरांना दोन ओळीत बसवून प्रथम मुद्दाम देवांना संपूर्ण अमृत द्यायला सुरुवात केली.
विष्णूंची ही 'ट्रिक' ही दोघांना समजली. "राहू आणि केतू", ते देवांच्या पंगतीत येऊन बसलेत आणि थोडं अमृत प्राशन केले , विष्णूंनाही राहू केतूंची ही चालबाजी कळल्यावर सुदर्शन चक्राने त्यांचे शीर धडावेगळे केले.
पण इथेच खरी ज्ञानबाची मेख आहे.
अर्धसत्य सांगितल्या गेलंय.
त्या दिवशी राहू केतू शिवाय आणखी एक जण चोरून देवाच्या पंगतीत बसला होता.
***
तो एक अत्यन्त उत्साही तरुण होता. नुकतीच त्याची देवांच्या पाकशाळेत नेमणूक झाली होती. त्याच्या हाताला लाजवाब चव होती, तो जे काही स्वयंपाक बनवायचा ते अत्यन्त रुचकर लागे. लवकरच तो फूड डिपार्टमेंटचा प्रमुख बनला.पाक वैद्य बनला. देवांचा संपूर्ण स्वयंपाक त्याच्या देखरेखीखाली होत. इंद्र , अग्नी संपूर्ण देवगण त्याच्यावर प्रचंड खुश होते.
आपल्या स्वयंपाकाने , रुचकर चमचमीत पदार्थांनी त्याने सगळ्यांची मर्जी संपादली होती.
इंद्र दरबारातील खास नृत्य इव्हेंट्स ला 'त्यालाही' खास निमंत्रण असायचे. शिवाय त्यालाही नृत्य करायला फार आवडे. नेहमी जाम उत्साहात स्वारी असायची.
अनेक जण अगदी इंद्रा पासून त्याला तो स्वयंपाकात असं काय टाकतो याबद्दल विचारायचे पण तो काही सांगायचा नाही.
***
त्या दिवशी समुद्र मंथनातून प्राप्त झालेले अमृत देवांना सर्व्ह करताना , तो ही परवानगी नसताना, न विचारता, चोरून देवांच्या पंगतीत जाऊन बसला. समोर पाचू रत्नाने बनवलेलं पात्र समोर केलं, घाईत विष्णूंनी त्यात अमृत टाकलं, आणि 'त्या'ने ते तात्काळ प्राशन केले.
तेवढयात विष्णूंनी त्याला ओळखले. खानासामा, पाकवैद्य , मेन शेफ ने केलेली लबाडी, चोरी त्यांच्या लक्षात आली. ते कृत्य चूक होते. चोरी होती.
संपूर्ण देव गणांना याबद्दल कळले. सर्वजण क्रोधीत झालेत.
सर्वांनी त्याला शिक्षा करण्यासाठी विष्णू आणि महादेवाला आवाहन केले. आजपर्यंत या श्रेष्ठ महाराजाने, पाक वैद्याने आपल्याला रुचकर चमचमीत अन्न खाऊ घातलेत , याचा सर्वाना विसर पडला.
महादेवांनी "मला या डोमेस्टिक मॅटर मध्ये रस नाही" सांगून ते त्यांच्या कैलासावर परत गेले.
पण विष्णूंनी न्याय करण्याचं ठरवलं.
त्यांनी पाकवैद्य, शेफला समोर बसवलेत. त्याने चूक, चोरी केली आहे हे समजावून सांगितले. त्याची शिक्षाही मिळेल सांगितले.
त्या तरुणानेही चूक कबूल केली.
विष्णूने शिक्षा फर्मवली. " तू अमृत प्राशन केल्याने तू चिरंजीव असशील! पण आता देवलोकांतून तुला काढून टाकण्यात येते आहे! कलियुगात तूला गरिबीत जन्मावे लागेल! अनेक वर्षे मेहनत केल्यावरच तुला यश मिळेल! तुझी रवानगी आता पृथ्वीवर!"
ते ऐकून मान लवून त्याने त्या शिक्षेचा त्याने स्वीकार केला.
विष्णूने त्याचे आजवर कार्य बघता त्याला एक वर दिला.
त्याची हाताची कला पृथ्वीवरही त्याच्यासोबतच असणार होती.
आज ते हजारो वर्षांपासून पृथ्वीवर आहेत.
त्यांचा फोटो अत्यन्त जीकरीने , जीवावर उदार होत मी मिळवला. तो खाली आहे.
याशिवाय आणखी एक रहस्य सांगतोय, त्या व्यक्तिशिवाय , गुजरात राज्यात जन्मलेली त्यांची एक बहीण सुद्धा अशीच अजरामर होती. तिनेही लपून अमृताचा एक थेंब चोरून प्राशन केला होता.पण पुढे तिची शिक्षा माफ झाली. तिला मोक्ष मिळाला. ती आपल्या देवलोकांत परत गेली.
खूप धोका पत्करून , हे दोन फोटोज मिळवले आहेत. ते येथे उघड्या भिंतीवर लावू शकत नसल्याने, लिंकवर ते फोटोज आणि इतर माहिती टाकली आहे.
त्या आदरणीय व्यक्तीचं नाव आहे, "महाशय धर्मपाल गुलाटी" ! मसाला किंग!
नुकतंच रामसेतूच्या दगडांचा अभ्यास करून तो शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा आहे हे संशोधन झाले, त्याचप्रमाणे नासा पासून जगभरातील जीव शास्त्रज्ञानी मसाला किंग आजोबांच्या डोक्यावरील एका केसाचा अभ्यास करून डीएनएचे संशोधन करून त्यांचे वय सध्या देवापेक्षा फक्त दहा वर्षांनी कमी असल्याचे सांगितले आहे.
सप्तचिरंजीवांमध्ये आता त्यांचीही गणना करण्यात यावी अशीही एक मागणी जोर धरतेय.
त्यामुळे आता सप्तचिरंजीव नसून अष्ट चिरंजीव मोजण्यात यावे.
ज्यांना कोणाला अश्वत्थामा बघायची इच्छा असेल पण पूर्ण झाली नसल्यास त्यांनी या मसाला किंग आजोबांना बघितले तरी ते ही तितकेच पुण्यप्रद समाजवे. कारण आता ते ही अष्ट चिरंजीवांपैकी एक झाले आहेत.
जाहिरातीतसुद्धा ते उत्साहात नृत्य करताना दिसतात.
त्यांची गुजरात राज्यात जन्मलेली बहीण "क्यूकी सास भी कभी बहू थी" मधील "श्रीमती बा" , त्यांचेही आयुष्य मोक्षप्राप्ती पूर्वी किमान पाचशे ते सहाशे वर्षे होती हे 'स्टार' संशोधकांनी शोधून काढले आहे.
तळटीप:- ही कहाणी पूर्णपणे काल्पनिक असून, कोणाच्याही धार्मिक, भाषिक, खादाडीक भावना दुखवायचा हेतू नाही.
नुकताच आमच्या धर्मपाल मसाला किंग आजोबांचा हॅपी बर्थडे झाला त्या निमित्त हे लिखाण.
अखिर उनका मसाला खाया है! मसाला हराम नही मसाला हलाल है!
ते आणखी किमान दीडशे वर्षे तरी जगावेत ही प्रार्थना!💐
- अभिजित पानसे.
ही पोस्ट वरवरून धार्मिक वाटत असेल पण ती ती फक्त धार्मिक नसून एक हजारो वर्षांपासूनचं रहस्य ..सत्य सांगणारी आहे.
ज्यांना रुचकर खायला आवडते त्या सर्वांसाठी हे रहस्य, सत्य महत्वाचं आहे.
शेकडो वर्षांपासून मुद्दाम एक घटना अर्धसत्य सांगितली जाते आहे.
आजवर '#त्या' व्यक्तीचं खरं नाव, ओळख लपवून ठेवण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच राजस्थानातील दुर्गम भागात जाऊन आलो, तेव्हा तेथील काही वृद्ध जाणकार व्यक्तींनी एक रहस्य सांगितले. प्रथम ऐकून त्यावर विश्वास बसला नाही. त्यांनी सांगितलेली "ती व्यक्ती" काहीतरी वेगळी आहे यावर विश्वास बसत नव्हता.
परत येऊन काही गूढ पुस्तकांचा अभ्यास केला. नाडी ग्रंथ अभ्यासलेत.
आणि " त्या व्यक्तीबद्दल " रहस्य समजले.
इतक्यातच 'रामसेतू' बद्दल नासाने परत येऊन त्यातील दगडांचा अभ्यास करून ते किती हजारो वर्षे जुने या निष्कर्षाला पोहचलेत. त्याचप्रमाणे "त्या व्यक्ती" चाही अभ्यास केला गेलाय. आणि जे रहस्य हाती लागलं ते चक्रावून टाकणारं आहे. लवकरच 'ऑफिशियल' स्टेटमेंट याबाबत येणार आहे.
त्यापूर्वी पुन्हा एकदा ती हजारो वर्षांपूर्वीची घटना समजून घेणे आवश्यक आहे.
देवांची आणि राक्षस टीम ची मिटिंग ठरली. बैठकीअंती हे ठरले की सागरात अनेक रत्ने, संपत्ती, अमृत दडले आहे, ती बाहेर काढण्यासाठी आपणास समुद्र मंथन करणे गरजेचे आहे.
समुद्र मंथन करण्याची तारीख ठरली. मेरू पर्वताचा 'रवी' झाला. नागाची दोरी झाली. देव आणि दानव समुद्र मंथन करू लागलेत.
प्रथम विष बाहेर आले. महादेवांना आवाहन केले गेले, त्यांनी 'नीलकंठ' बनून नाजूक परिस्थिती मॅनेज केली.
त्यानंतर इतर रत्ने निघालीत. तदनंतर बाहेर आले ते 'अमृत'
"याचसाठी केला होता अट्टाहास" .
पण अमृत प्राशन कोण करणार यावरून वाद सुरू झाला.
डोमेस्टिक सिच्युएशन हाताळण्यात निष्णात असलेल्या विष्णूंनी पुढाकार घेतला.
देवांना आणि असुरांना दोन ओळीत बसवून प्रथम मुद्दाम देवांना संपूर्ण अमृत द्यायला सुरुवात केली.
विष्णूंची ही 'ट्रिक' ही दोघांना समजली. "राहू आणि केतू", ते देवांच्या पंगतीत येऊन बसलेत आणि थोडं अमृत प्राशन केले , विष्णूंनाही राहू केतूंची ही चालबाजी कळल्यावर सुदर्शन चक्राने त्यांचे शीर धडावेगळे केले.
पण इथेच खरी ज्ञानबाची मेख आहे.
अर्धसत्य सांगितल्या गेलंय.
त्या दिवशी राहू केतू शिवाय आणखी एक जण चोरून देवाच्या पंगतीत बसला होता.
***
तो एक अत्यन्त उत्साही तरुण होता. नुकतीच त्याची देवांच्या पाकशाळेत नेमणूक झाली होती. त्याच्या हाताला लाजवाब चव होती, तो जे काही स्वयंपाक बनवायचा ते अत्यन्त रुचकर लागे. लवकरच तो फूड डिपार्टमेंटचा प्रमुख बनला.पाक वैद्य बनला. देवांचा संपूर्ण स्वयंपाक त्याच्या देखरेखीखाली होत. इंद्र , अग्नी संपूर्ण देवगण त्याच्यावर प्रचंड खुश होते.
आपल्या स्वयंपाकाने , रुचकर चमचमीत पदार्थांनी त्याने सगळ्यांची मर्जी संपादली होती.
इंद्र दरबारातील खास नृत्य इव्हेंट्स ला 'त्यालाही' खास निमंत्रण असायचे. शिवाय त्यालाही नृत्य करायला फार आवडे. नेहमी जाम उत्साहात स्वारी असायची.
अनेक जण अगदी इंद्रा पासून त्याला तो स्वयंपाकात असं काय टाकतो याबद्दल विचारायचे पण तो काही सांगायचा नाही.
***
त्या दिवशी समुद्र मंथनातून प्राप्त झालेले अमृत देवांना सर्व्ह करताना , तो ही परवानगी नसताना, न विचारता, चोरून देवांच्या पंगतीत जाऊन बसला. समोर पाचू रत्नाने बनवलेलं पात्र समोर केलं, घाईत विष्णूंनी त्यात अमृत टाकलं, आणि 'त्या'ने ते तात्काळ प्राशन केले.
तेवढयात विष्णूंनी त्याला ओळखले. खानासामा, पाकवैद्य , मेन शेफ ने केलेली लबाडी, चोरी त्यांच्या लक्षात आली. ते कृत्य चूक होते. चोरी होती.
संपूर्ण देव गणांना याबद्दल कळले. सर्वजण क्रोधीत झालेत.
सर्वांनी त्याला शिक्षा करण्यासाठी विष्णू आणि महादेवाला आवाहन केले. आजपर्यंत या श्रेष्ठ महाराजाने, पाक वैद्याने आपल्याला रुचकर चमचमीत अन्न खाऊ घातलेत , याचा सर्वाना विसर पडला.
महादेवांनी "मला या डोमेस्टिक मॅटर मध्ये रस नाही" सांगून ते त्यांच्या कैलासावर परत गेले.
पण विष्णूंनी न्याय करण्याचं ठरवलं.
त्यांनी पाकवैद्य, शेफला समोर बसवलेत. त्याने चूक, चोरी केली आहे हे समजावून सांगितले. त्याची शिक्षाही मिळेल सांगितले.
त्या तरुणानेही चूक कबूल केली.
विष्णूने शिक्षा फर्मवली. " तू अमृत प्राशन केल्याने तू चिरंजीव असशील! पण आता देवलोकांतून तुला काढून टाकण्यात येते आहे! कलियुगात तूला गरिबीत जन्मावे लागेल! अनेक वर्षे मेहनत केल्यावरच तुला यश मिळेल! तुझी रवानगी आता पृथ्वीवर!"
ते ऐकून मान लवून त्याने त्या शिक्षेचा त्याने स्वीकार केला.
विष्णूने त्याचे आजवर कार्य बघता त्याला एक वर दिला.
त्याची हाताची कला पृथ्वीवरही त्याच्यासोबतच असणार होती.
आज ते हजारो वर्षांपासून पृथ्वीवर आहेत.
त्यांचा फोटो अत्यन्त जीकरीने , जीवावर उदार होत मी मिळवला. तो खाली आहे.
याशिवाय आणखी एक रहस्य सांगतोय, त्या व्यक्तिशिवाय , गुजरात राज्यात जन्मलेली त्यांची एक बहीण सुद्धा अशीच अजरामर होती. तिनेही लपून अमृताचा एक थेंब चोरून प्राशन केला होता.पण पुढे तिची शिक्षा माफ झाली. तिला मोक्ष मिळाला. ती आपल्या देवलोकांत परत गेली.
खूप धोका पत्करून , हे दोन फोटोज मिळवले आहेत. ते येथे उघड्या भिंतीवर लावू शकत नसल्याने, लिंकवर ते फोटोज आणि इतर माहिती टाकली आहे.
त्या आदरणीय व्यक्तीचं नाव आहे, "महाशय धर्मपाल गुलाटी" ! मसाला किंग!
नुकतंच रामसेतूच्या दगडांचा अभ्यास करून तो शेकडो हजारो वर्षांपूर्वीचा आहे हे संशोधन झाले, त्याचप्रमाणे नासा पासून जगभरातील जीव शास्त्रज्ञानी मसाला किंग आजोबांच्या डोक्यावरील एका केसाचा अभ्यास करून डीएनएचे संशोधन करून त्यांचे वय सध्या देवापेक्षा फक्त दहा वर्षांनी कमी असल्याचे सांगितले आहे.
सप्तचिरंजीवांमध्ये आता त्यांचीही गणना करण्यात यावी अशीही एक मागणी जोर धरतेय.
त्यामुळे आता सप्तचिरंजीव नसून अष्ट चिरंजीव मोजण्यात यावे.
ज्यांना कोणाला अश्वत्थामा बघायची इच्छा असेल पण पूर्ण झाली नसल्यास त्यांनी या मसाला किंग आजोबांना बघितले तरी ते ही तितकेच पुण्यप्रद समाजवे. कारण आता ते ही अष्ट चिरंजीवांपैकी एक झाले आहेत.
जाहिरातीतसुद्धा ते उत्साहात नृत्य करताना दिसतात.
त्यांची गुजरात राज्यात जन्मलेली बहीण "क्यूकी सास भी कभी बहू थी" मधील "श्रीमती बा" , त्यांचेही आयुष्य मोक्षप्राप्ती पूर्वी किमान पाचशे ते सहाशे वर्षे होती हे 'स्टार' संशोधकांनी शोधून काढले आहे.
तळटीप:- ही कहाणी पूर्णपणे काल्पनिक असून, कोणाच्याही धार्मिक, भाषिक, खादाडीक भावना दुखवायचा हेतू नाही.
नुकताच आमच्या धर्मपाल मसाला किंग आजोबांचा हॅपी बर्थडे झाला त्या निमित्त हे लिखाण.
अखिर उनका मसाला खाया है! मसाला हराम नही मसाला हलाल है!
ते आणखी किमान दीडशे वर्षे तरी जगावेत ही प्रार्थना!💐
- अभिजित पानसे.
No comments:
Post a Comment