Monday, 18 December 2017

रोहिंगे शरणार्थी

पारशी लोक भारतात शरणार्थी बनून आलेत त्याबद्दल एक कथा, दंतकथा आहे. इराण मध्ये त्यांच्यावर अन्याय, जाच सुरू झाल्यावर ते गुजरात मार्गे भारतात शरण मागायला आले असता तत्कालीन राजाने त्यांच्या धर्मगुरू समोर दुधाने भरलेलं एक भांडं ठेवलं. आणि म्हणाला की आमचं राज्य हे दुधाने भरलेल्या या भांडयासारखं आहे. आता यात शरणार्थीसाठी जागा नाही.

तेव्हा पारसिंच्या नेत्याने त्या दुधाच्या भांड्यात साखर घातली.आणि साखर विरघळलेल्या त्या गोड दुधाकडे बोट दाखवून म्हणाला की ज्या प्रकारे ही साखर दुधाला सांडू न देता त्यात मिसळून एक झाली ,आम्हीसुद्धा त्याचप्रकारे तुमच्या राज्यात तुम्हला बाहेर न काढता ,त्रास न देता तुमच्यात मिसळून एक होऊन राहू आणि तुमच्या राज्यातील राहिवाश्यांचे आयुष्य मधुर बनवू.
बाकी इतिहास आहे.

पारशी लोकांनी आजवर कोणते दंगे केल्याचं, जन जीवन विस्कळीत केल्याचं ऐकिवात नाही. आपल्या धर्मासाठी , धार्मिक विधींसाठी इतरांवर जबरदस्ती केली नाही.

उलट पारशी लोक त्यांच्या धर्माबद्दल मानसिकरित्या सगळ्यात जास्त ठिसूळ असतात. त्यांना त्यांच्या धर्माचा, चालीरितीचा अत्यन्त अभिमान, अहंकार असतो. पारशी कधीही धर्माबाहेर विवाह करत नाही. पण त्यांच्या ठिसूळ धार्मिकतेसाठी ते समाजाला, लॉ अँड ऑर्डर ला हाती घेत नाहीत. ते देशात राहून धुडगूस घालत दंगे करत नाहीत.

#नेपाळी लोक भारतात राहतात. नेपाळी वॉचमनसुद्धा असतात. त्यांच्या भरवशव्यावर तर लोक रात्री बिनधास्त झोपतात. हे लोक सुद्धा कधी दंगे करीत नाहीत. आपला धर्म, चालीरीती इतरांवर थोपवत नाहीत. वरचेवर भावना दुखावून घेत नाही. शांतपणे जगतात. जगू देतात.

#तिबेटी भारतात शरणार्थी बनून आलेत .दर हिवाळ्यात ते शहराशहरात जाऊन स्वेटर, जॅकेट्स विकतात. कधी त्यांनी धुडगूस घातल्याचं ऐकलं नाही.
फक्त चीनचे राष्ट्रपती /पंतप्रधान मागे भारतात आले असता तिबेट वरील अतिक्रमण केल्याच्या निषेधात काही तिबेटीने काळे झेंडे दाखवले होते.
 आणि एका तिबेटी तरुणाने 'स्वतःला' जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.

पण #रोहिंग्यांबद्दल ही पार्श्वभूमी नाही. त्यांच्याबद्दल हा विश्वास जनमाणसात नाही.
एक प्रवाह असा आहे की म्यानमार सरकार गरीब रोहिंग्यांवर अत्याचार करतंय. म्हणून
त्यांना माणुसकीम्हणून आसरा द्यावा या आधी पारशी, नेपाळी, तिबेटीना दिला तसा.
कोणी म्हणतं हे रोहिंगे आक्रमक आहेत, मूलतत्त्ववादी आहेत. देशात धुडगूस घालतात.

दोन्हीमध्ये काही टक्के तरी सत्य असूच शकतं.
" यत्र यत्र धुम्र: तत्र तत्र पावक:"

त्यामुळे रोहिंगे जमातीला भारतात शरण द्यायला (कुठलेही राजकीय पक्ष्यची चष्मे न लावलेल्या) सर्व सामान्य जनतेत विरोध आहे.
2012मध्ये म्यानमारमध्ये रोहिंग्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या, गोष्टी, वावड्या ऐकून इथे भारतात आझाद मैदानावर तोडफोड केली होती. सार्वजनिक वस्तूंचे नुकसान करण्यात आले होते. स्त्री पोलिसांना मारले होते.
मग एकदा देशात आल्यावर हे लोक काय करू शकतील याचा काही भरवसा कोणाला?

भारतीय संस्कृतीची स्वीकार्यता सर्व जगात प्रसिध्द आहे. जगाचं सेकंड होम असल्याप्रमाणे  कोणीही शरणार्थी भारताकडे आशेने बघतं. पण आता जिथे; ज्या देशात जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, गरिबी आहे, ज्या देशातच शहरे तुडुंब भरली आहेत, भांडं काठोकाठ भरलेललं आहे, आता पुन्हा बाहेरून भर टाकल्यास नुकसानच होईल असे असताना धोकादायक ठरू 'शकणाऱ्या' शरणार्थीना जागा का द्यावी!
त्यामुळे येथील जनतवरच  भार पडणार नाही का?येथील जनतेला मानवाधिकार नाही का?
व्यावहारिकरित्या परोपकार ही स्वतःचं पोट भरलं असेल तरच केल्या जातो.

भारताची शरणार्थीसाठी जी स्ट्रेटजी, नियमावली आहे त्यानुसार गोष्टी घडतील. पण ती सर्व नियमावली कागदावर आहे.पण जनभावना या कागदावर नसतात.एकच कागदी नियम इथे सर्वांना लावता येऊ शकणार नाही. कारण येणारे लोक हे कागदाची भेंडोळी नाही तर जीवंत लोक असतात. ते कसे आहेत याची पार्श्वभूमी म्हणून महत्वाची असते.

टीव्हीवर, सोशल मीडियावर अनेक जण ; तिबेटी, नेपाळी ,पारसी यांना शरण देता येतं मग रोहिंग्यांनाच फक्त मुसलमान आहेत म्हणून का शरण देत नाहीत असे वाद, युक्तिवाद,करताना दिसतात .म्हणून हे पोस्टप्रपंच.
वि सु- रोहींगे फक्त मुसलमान नाहीत त्यात हिंदु, बौद्धहि आहेत.

-Abhijeet Panse

No comments:

Post a Comment