Thursday, 21 December 2017

एक सूर चराचर छायो

एक सुर चराचर छायो
सुर निरागस हो

  ''इक सुर चराचर छायो..सुनने वाला कोई न था...''
पंडित अभिषेकींचं हे गाणं  तीन वर्षापुर्वी एका जवळच्या व्यक्तीने चेन्नईवरून उशीरा रात्री फोनवर ऐकवलं आणि ते मन..बुद्धी..विचार;लौकीक अलैकीक..या द्वंद्वात्मक आवरणाला  भेदुन मनाला..आत्म्याला जे भिडलं ते नेहमीसाठीच...

''निर्गुण तत्वावरील'' ह्या गाण्यातील शेवटी ''सुनने वाला कोई ना था जब अलख निरंजन गायो..''हे ऐकताना अगदी ह्रदयातुन ''वाह~ह..'' निघतं.तिसऱ्याच जगात पोहचतो..बस डोळे मिटुन शांत राहावं वाटतं..

त्यानंतर पं.अभिषेकिंच्या आवाजातील मुळ शास्त्रीय गाणं मिळवलं.त्यानंतर आजवर अगणितवेळा ते गाणं मी ऐकलय..दरवेळी अंगावर रोमांच..डोळ्यात.....

या गाण्या संबंधी माझी एक ''शेवटची इच्छा'' आहे जी मी माझ्या जवळच्या व्यक्तिंना नेहमी सांगतो.

पण जेव्हा पहिल्यांदा ''कट्यार काळजात..'' पाहिला; तेव्हाही शेवटी'' अरूण किरणी...सूर निरागस हो..''ह्या वेळी रोमांच दाटुन ओक्साबोक्सी रडलो होतो..आत दडलेलं सारं बांध फुटल्यागत....

तीन वेळा थिएटरमध्ये जाउन पाहिला होता दरवेळी तीच अवस्था झाली..रोज रात्री ते गाणं ऐकुन झोपायचो..
याच भाबड्या इच्छेने..आशेनेे कदाचीत हळहळु का होइना कधीतरी माझेही सूर निरागस होतील..

सूर हेच माझं..प्रत्येकाचं..विश्वाचं मूळ रूप..PURE..PIOUS.. UNADULATERATED..मग का बिघडले असतील सुर माझे...

का बिघडतात सुर?

..पण सुरांची इनबिल्ट निरागसता खरच हरवु शकते का?

स्वर..म्हणजे मुळ रूप..ते तर षड् रिपुंपासुन अस्पर्शीत..

सूर..स्वर हे तर 'आकाश' तत्वाचं परिणित होय असं पदार्थ विज्ञान सांगतं.

दर्शन शास्त्र सांगतं विश्व निर्मितीचं रहस्य!
अव्यक्तातुन व्यक्त होण्याचं प्रकिया.

पंच तन्मात्रांपासुन पंच महाभुते निर्माण होउन संपुर्ण विश्व उत्पन्न होतं.

फक्त एकच तन्मात्रा असलेलं आकाश तत्व..अग्नी दोन तन्मात्रा..शेवटी पंच तन्मात्रायुक्त ''materialstic'' पृथ्वी तत्व..wordly desires निर्माण करणारं..लवकर स्पाॅइल होणारं..करणारं..

पण यात ईश्वरी निर्गुण तत्व आकाशाच..जे सर्वव्याप्त..तेच आत्मरूप..तेच ''सूर..''स्वर'' तोच ॐकार...

तो कसा बिघडेल?

''कट्यार....'' मध्ये झरीना महादेवला गायला सांगते तेव्हा नकार देत 'महादेव' म्हणतो ''स्वर सुद्धा शब्द आहेत.''

नाही स्वर म्हणजेच शब्द नाही!!!

स्वर तर 'परा' वाणीतुन प्रसवतो..

आणि शब्द तर ''वैखरी'' बोलते.

हाॅँ! स्वर शब्दाचं मुळ रूप..अव्यक्त..Inactivated state of word; perhaps the world too.

हे सुर जेव्हा मनाला स्पर्श करून वैखरीद्वारे बाहेर पडतात
तेव्हा शब्द बनतात.

हम्म्म...''मन'.

ते तर फार 'रिसेप्टिव्ह' असतं. स्पंजसारखं.
हेच ते मन सुरांची निरागसता संपवणारं..सुरांना बिघडवणारं..

युरेका!! युरेका!!!
उत्तर मिळालं!

या मनाच्या 'चेक नाक्याला' दुरस्त केला..काॅन्शिअस चा सिसिटीव्ही कॅमेरा तिथे बसवला..सद्विवेकबुद्धीचा सुपरवायझर तिथे नेमला तर मन सुधारेल आणि 'सुर'ही निरागस होतीलच!

कारण मन तर रिसेप्टिव्ह आहे!स्पंजसारखं..पाण्यासारखं.
त्याला जे नकारात्मक..सकारात्मक भाव..विचार..शब्दांचा संपर्क घडवु ते तो शोषतो...त्या रंगात रंगतं.

माझी शेवटची इच्छा हीच की 'औदुंबर'ला सुर्योदयावेळी घाटावर पायरीवर बसुन शांतपणे वाहत्या कृष्णा माईचा मंद स्वर कानी पडत राहावा..वर मंदीरात दत्तपादुकांची नुकतीच पुजा आरती आटोपली असावी..कापुर,धूप,ओल्या चंदनाच्या मंद सुगंधाची झुळुक येत असावी..''सुर निरागस हो..''
'कोणीतरी' गावं.अधुन मधुन वर मंदीरातुन सौम्य घंटानादाचं पार्श्वसंगीत कानी पडावं..आणि त्या क्षणाला (तरी) माझे सुर निरागस होउन शरीरातील सुररूपी 'चैतन्याने'' शरीराचा त्याग करावा..

किंवा

नर्मदा किनारी सुर्योदय  होत असावा..मी पद्मासनात ध्यान करत असावा..किमान त्या दिवशी तरी खोल ''ध्यान लागावं''..पलिकडच्या तिरावरीलएका खेड्यातील छोट्याश्या मंदीरात वाजणाऱ्या ढोलाचे स्वर दुरून कानावर पडत राहावे.. अभिषेकींचं ''इक सुर चराचर छायो..'' 'तिने' पुन्हा एकदा गावं..पुर्ण खोल श्वास घेउन मी दिर्घ शांत  #ओंकार म्हणावा आणि शेवटचा ' म् ' संपताच या देहाने शेवटचा श्वास घ्यावा..

सुर निरागस हो...........''

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment