रामदास आठवले आणि रम
"इंडियन आर्मी क्यू जॉईन करना चाहते हो?"
- "देश की सेवा करना चाहता हु"
एकच एक पुस्तकी वाक्य ऐकल्यामुळे इंटररव्यू घेणाऱ्याचा चेहरा कोरडा.
नेक्स्ट.
"आर्मी मे क्यू आना है?"
थोडासा बिचकत ,"आर्मी मे बहोत अच्छे इन्सेटिव्हज.. सुविधाये मिलते है?
..."डेली नॉन व्हेज खाने मिलता है सर!"
.."
"सर आर्मीमे फ्री मे रेड वाईन , रम पीने को मिलती है!"
'क्यू आना चाहते हो?"
"सर दुसरा कुछ आता भी नही! बॉडी , स्टॅमिना अच्छा है! दोस्तो ने कहा आर्मीचे चला जा लाईफ सेट हो जायेगी! इसलीये आर्मी मे आना चाहता हु!"
"सर लडकिया युनिफॉर्मपे मरती है! लडकीयो पे इम्प्रेशन मारने के लिये आर्मी मे आना चाहता हु!"
असे अनेक , ऐकायला विचित्र वाटणारे पण प्रामाणिक उत्तरे सैन्य भरतीच्या निवड प्रक्रियेत मुलाखतीवेळी होतात.
हे सर्व गंमती एका मित्राने ज्याचे वडील आर्मीमध्ये मोठ्या पदावर अधिकारी आहेत आणि जो स्वतः या प्रक्रियेतुन गेला त्याने हे सांगीतले.
तो म्हणाला होता जेव्हा मुलाखतीत '#देशभक्तीसाठी, देशसेवेसाठी आलो वगैरे उत्तरे दिलेत तर मुलाखत घेणारा हसतो नाहीतर "खोटं बोलू नकोस" म्हणत उलट अनेक प्रश विचारून भांबावून सोडतो. आणि बरेच जण यात नापास होतात.
जे मुलं बिनधास्तपणे सर आर्मीमे खाना ,पीना, आर्मी लाईफ, एन्जॉय करने की इच्छा है सांगतात ते बहुतेक सिलेक्ट होतात. पुढे मग पुन्हा मेडिकल टेस्टची चाळणी असते तो भाग वेगळा.
रामदास आठवलेंनी काही दिवसांपूर्वी तरुणांना उद्देशून म्हटले की चांगली दारू पिण्यासाठी तरी आर्मीमध्ये जा. हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे चांगली रम मिळते.
यावरून त्यांच्यावर फार टीका होतेय.
यात टीका करण्यासारखं काहिच नाही आहे. मुळात 'प्रथम' स्वतःच्या फायद्यासाठीच, 'सुरक्षित' करिअर साठी, सुरक्षा सेवेत मिळणाऱ्या विविध सुविधांसाठीच मुलं आर्मीमध्ये जात असतात.
देशभक्ती हा फॅक्टर त्यात फार कमी, क्वचित असतो. त्यात काहीही चूक नाही.
देशभक्ती, सेवा हा 'एलिमेंट' त्यांच्यात आपोआप निर्माण होतो त्याचे कारण निवड झाल्यावर होणारी त्यांची जीवनशैली!
रोजचं आयुष्य मग बदलून जातं. कडक शिस्त, रोजच्या कवायती, त्यातील घोषणा, हातात शस्त्र , तेथील वातावरण, आर्मीची लेगसी यामुळे 'प्रोसेस्ड' होऊन हळूहळू त्यांच्यात देशाबद्दल भावना जागृत होत जाते.
सैन्यातील जवान सतत चोवीस तास देशभक्तीने धगधगत नसतात. तेही नियमितपणे 'सिविलियन' प्रमाणे नोकरी करावी तश्या प्रकारे आपापले काम करत असतात. फक्त त्यांची जीवनशैली ही कडक शिस्तीत , कवायतीत असते.
रोज युद्ध होत नसतात. बीएसएफ आणि सिआरपीएफ मधील काही काळ सोडल्यास सैनिकीआयुष्य रोजचा दिनक्रम एकसारखाच जगत असतो.
पण वेळ आल्यास संकट आल्यास मात्र हे सैनिक देशभक्ती भावनेने पेटून उठतात प्रत्यक्षात 'कृती' करतात आणि त्याला तसे अधिकार मिळतात. हा फरक आहे सैन्यातील जवान आणि सिव्हिलियन व्यक्तीमध्ये.
सैन्यात जाण्यासाठी बरेच आमिष असतात .त्या अमिषांसाठी तरुण सैन्यात भरती होतात. आणि प्रोसेस्ड होऊन 'जवान' होतो.
म्हणून रामदास आठवलेंनी तरुणांना दारू पिण्यासाठी तरी सैन्यात जा हे सांगून काहीही चूक केली नाही . त्यांची उगीचच टीका केली जात आहे.
कारण प्रत्यक्षात असेच प्रामाणिक खरे बिनधास्त उत्तरे द्यावेत हेच निवड प्रक्रियेत अपेक्षित असतं.
-Aअभिजित पानसे
No comments:
Post a Comment