Sunday 4 June 2017

प्रश्न 2 पॉइंट्सचा, भारत विरुद्ध पाकिस्तान, 1996 वर्ल्ड कप

जून 2017, चॅम्पियन्स ट्रॉफी

आज जर भारताने पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला असता तर पाकिस्तानला दोन पॉइंट्स तर मिळाले असतेच शिवाय या मालिकेचं संपूर्ण चित्र बदललं असतं. असं 96 च्या वर्ल्डकप मध्ये घडलं होतं. नव्वदच्या दशकात श्रीलंकेत आतंकवाद माजला होता.

96 चा वर्ल्डकपचे यजमान भारत ,पाकिस्तान श्रीलंका होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धच्या 2 लीग मॅचेस श्रीलंकेत होत्या. पण कोणतीही टीम असुरक्षित वातावरण असलेल्या श्रीलंकेत जाऊन खेळायला तयार नव्हती. सुरक्षेचं कारण देऊन ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज टीम्स ने मॅच खेळण्यास नकार दिला.

शेवटी अत्यन्त महत्वाच्या ग्रुप मॅचेसचे विनर श्रीलंकेला घोषित करण्यात आले. त्यामुळे मालिकेचे चित्र बदलले.लंका सहज उपांत्यपूर्व सामन्यात पोहचली.
 पुढे श्रीलंका आणि भारताचा कोलकात्यात प्रसिद्ध -कुप्रसिद्ध सेमिफायनल सामना झाला.प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाळपोळ केली सामना बंद पाडला..महान रिऍलिटी शो परफॉर्मर विनोदवीरकांबळीने मैदानात अश्रूपात केला. श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. हा तिसरा विजय होता जो श्रीलंकेला पूर्ण मॅच न खेळता आयता मिळाला होता.(हा सामना श्रीलंकाच जिंकणार होते.)
 पुढे श्रीलंकेने वर्ल्ड कप ही जिंकला.

पण मुद्दा हा आहे की जर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने मॅच न खेळण्याचा निर्णय रद्द केला असता तर कदाचित चित्र वेगळे असते. कदाचित भारत श्रीलंका सामना न होता वेस्ट इंडिज किंवा न्यूझीलंड विरुद्ध सेमिफायनलमध्ये सामना झाला असता.आणि हा पेपर भारतासाठी त्यामानाने नक्कीच सोपा होता.

त्यामुळे आज जर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला असता तर पाकिस्तान दोन पॉईंट्स मिळाले असते शिवाय हरलेल्या टीमला जास्त संधी नसलेल्या या मिनिवर्ल्डकपमधून भारत कदाचित बाहेर पडला असता.आणि पाकिस्तानला फुकटमध्ये मोमेंटम गती मिळाली असती.

आणि सगळ्यात महत्त्वच हेच की आयसीसी असो व बीसीसीआय कोणालाही लोकांच्या भावनेचं महत्व नाही.बरोबर रविवारीच भारत पाक सामना ठेवण्यात आला यावरूनच चित्र स्पष्ट होतं.

-अभिजित पानसे

No comments:

Post a Comment