भारतीय चित्रपटसृष्टीत पडद्यावर दोन प्रकारचे कलाकार असतात. स्टार किड्स, हिरॉइझम असलेले स्टार्स तर दुसरे ‘एनएसडी’ किंवा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची पार्श्वभूमी असलेले. दुर्दैवाने भारतासारख्या ‘लाऊड’ देशात सर्वसाधारणपणे पहिल्या प्रकारातील लोक..अभिनेते (?) दुसऱ्या प्रकारातील ‘अभिनेत्यांवर’ कुरघोडी करतात. इथे नाव आणि हिरॉइझम फक्त तांत्रिकरित्या सक्षम असलेल्या अभिनेत्यांना झाकोळून टाकतं. एनएसडीतुन आलेले कलाकार ,कोणाचाही वशिला, गॉडफादर नसलेले ‘अभिनेते’ मग सतत संधीच्या शोधात असतात, मिळेल त्या छोट्या छोट्या, सह कलाकाराच्या भूमिका करून स्वतःची छाप सोडत जातात. कधी कोणाची ऐनवेळी रिप्लेसमेंट म्हणून त्यांना घेतलं जातं. कधीतरी मग त्यांच्या कलेला न्याय मिळतं. त्यानंतर काही नशीबवान कलाकारांना हळूहळू ते मिळतं ज्याच्यासाठी ते पात्र असतात.
भारतीय टीममध्ये नेहमीच असे काही , कोणाचाही अवास्तव , “आऊट ऑफ द वे” पाठिंबा नसलेले, “एक्स फॅक्टर” नसलेले पण तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी भक्कम, खणखणीत नाणं असलेले खेळाडू होते, आहेत. जे छोट्या छोट्या भूमिका..तात्पुरती रिप्लेसमेंट्स म्हणून आलेत.. आणि स्वतःच्या खेळीने सतत बीसीसीआयच्य दरवाजा ठोठावत , “दार उघड बुआ दार उघड” करत स्वतःच्या भरवशावर स्वतःचा प्रवेश करते झाले. त्यातील एक नाव, अजिंक्य रहाणे.
अजिंक्य रहाणेला भारतीय टीममध्ये संधी नशिबानेच मिळाली म्हणावी लागेल. याचा अर्थ त्याच्यात कौशल्य नव्हतं वा तो त्यासाठी योग्य नव्हता असं नव्हतं. पण तो काही कॅप्टन धोनीज स्टार किड्स , सुरेश रैना, रवींद्र जडेजा वा तत्कालीन कॅप्टनस किड अंबाटी रायडू नव्हता, ज्यांच्यावर कॅप्टन धोनीची पूर्ण मर्जी बहाल होती. दरवेळी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये केशरी कॅप होल्डरच्या स्पर्धेत असणारा, मिळवणारा अजिंक्य राहाणेकडे बँकेत देशांतर्गत क्रिकेटमधील रन्स होते. पण त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती.
2013 चा भारतीय क्रिकेटचा भारतातील मौसम सुरू झाला तो प्रसिद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्याने. पहिलीच मॅच खेळत असलेल्या शिखर धवनने खणखणीत शतक हाणलं. पण पुढील मॅचसाठी तो तंदुरुस्त राहिला नाही. त्याच्यजागी आलेल्या गौतम गंभीरला ऐनवेळी कावीळ झाली. त्यामुळे शेवटच्या क्षणी अजिंक्य रहाणेला कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आले. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला.
आपल्याकडे बॅट्समनला विदेशी दौऱ्यांवर कसोटी कारकिर्दीची सुरवात करायला कधीही आवडत नसते. कारण इथे अपयशी ठरल्यास, ज्याची शक्यता हमखास असतेच, पुन्हा संधी मिळणे कठीण असते. “डेब्यु नको पण विदेशी दौरा आवर” अशी नवफलंदाजांची अवस्था असते. अजिंक्य राहणेची कारकीर्दच अशी प्रवाहाच्या विरुद्ध झाली. पहिल्या टेस्टमध्ये अपयशी झाल्यावर त्याची निवड अतिखडतर अश्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाली. तिथे त्याने अत्यन्त कठीण परिस्थितीत रन्स काढलेत पण पहिल्या वहिल्या शतकापासून तीन ते चार रन्सने वंचित राहिला. त्या इनिंगमध्ये आऊट होणारा तो शेवटचा बॅट्समन होता.
त्यानंतर लगेच न्यूझीलंड दौऱ्यात त्याची निवड झाली. मध्यंतरी श्री श्री सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यामुळे अजिंक्य राहणेची संघात निवड होण्याची शक्यता वाढत गेली. गॉडफादर कॅप्टन धोनीचे लाडोबा रोहित शर्माचे लाड करूनही ते कसोटीत अपयशी ‘ठरल्यामुळे(च) राहणेला संधी मिळत गेली. न्यूझीलंडमध्ये कठीण परिस्थितीत अजिंक्य रहाणेने टेस्ट शतक ठोकले.
आणि त्यानंतर सुरू झाला इंग्लंड दौरा! लॉर्ड्सचं मैदान! लॉर्ड्स टेस्ट मॅच!
फक्त पिचवरच इंग्लंडच्या धष्टपुष्ट गायी
आणि वळू सोडले असते तरी कसोटीचे पाच दिवसही ते मस्त चरले असते . इतकं खेळपट्टीवर हिरवं गवत होतं. मैदान आणि खेळपट्टीत फरक कळत नव्हता. फुटबॉलचं मैदान झालं होतं.
असं हिरवेगार मैदान दिसलं की नागपूरला टेस्ट सुरू व्हायच्या दोन तासांपूर्वी जखमी असल्याचे कारण सांगून मॅच न खेळणारा #कॅप्टनसौरवगांगुली आठवतो.
या घटनेची मॅथ्यू हेडनने त्याच्या आत्मचरित्रात टर उडवली आहे. असो.
दुष्काळात तेरावा महिना तसा त्या लोर्ड्सच्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर भारत टॉस हरला.
क्रूक अॅलिस्टर कूकने LOL करत भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्यावेळी तो नक्कीच आसुरी आनंदाने खदखदत हसला असावा. भारतीय टीम शंभर रन्सच्या आत आऊट होईल हे सर्वांना वाटले.
पहिल्याच ओव्हरमध्ये जिमी अँडरसनने शब्दशः अशक्य बॉल टाकला. सत्तरच्या कोनात इनस्विंग होऊन डावखोऱ्या शिखर धवनला काही कळायच्या आत तो आऊट झालाही होता.
विराट कोहलीचा अॅवरेज त्या दौऱ्यात 13 चा होता. तो फक्त ‘मम’ म्हणून बॅटिंग करायला यायचा. आणि परत जायचा.
भारतीय टीमची अवस्था अत्यन्त बिकट झाली. तेव्हा अजिंक्य राहाणेने भुवनेश्वर कुमारसोबत भागीदारी करत स्वतःचे अविस्मरणीय , अशक्य, अफलातून शतक पूर्ण केले. तेही द लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर. खरंतर त्याने त्या दिवशी शतक केलं नाही तर शतक हाणलं.
लोर्ड्सच्या प्रसिद्ध बाल्कनीतून संपूर्ण भारतीय टीमने अजिंक्य रहाणेचे अभिवादन केले. अजिंक्य रहाणे लॉर्ड्स मैदानावर शतक करणारा दुसरा मराठी क्रिकेटर ठरला. पहिलं नाव जास्त आश्चर्यकारक आहे.
लॉर्ड्सच्या मैदानात त्या दिवशी राहणेहसोबत भुवनेश्वर कुमारनेही अत्यन्त महत्त्वाचे तिशीत रन्स काढलेत. हा माणूस प्रत्येक दौऱ्यात बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. पण तरीही महापौर ..ऑलउंडर आमचाच ! हार्दिक पंड्याच!
जी मॅच भारत वाईटरित्या हरणार अशी मॅचच्या सुरवातीलाच सगळ्यांना खात्री होती; भारतीय समर्थकांसकट, ती मॅच भारताने जिंकली. लॉर्ड्सवर विजय साकारला. त्याचा शिल्पकार होता अजिंक्य रहाणे. लोर्ड्सवर LOL करण्याची वेळ भारताची होती.
पूढे 014- 015 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पुन्हा शतक केलं. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर श्रीलंकेत शतक केलं. अश्याप्रकारे त्याने त्याची प्रथम चार शतकं भारताबाहेर कठीण परिस्थितीत काढली. हाही एक विक्रम आहे.
पण पुढे त्याचा फॉर्म चांगला वाईट होत राहिला. आणि मुळात तो रोहित शर्मासारखा , सुरेश रैना, सर (इथे हास्य मुद्रा) जडेजा सारखा स्टार कीड नसल्याने , ज्याच्यासाठी खास कमबॅक करायला खास भारतीय खेळपट्टीवर लॉंचिंग केल्या जाईल , सतत संधींवर संधी मिळत जाईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे राहणे 015 नंतर सतत आत बाहेर होत राहिला.
गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही कोहलीने अजिंक्य रहाणेला डावलून (तथाकथित) एक्स फॅक्टर असलेल्या, मोठं नाव, हिरॉइझम असलेल्या कसोटीतील टुकार बॅट्समन रोहित शर्माला संधी दिली. नेहमीप्रमाणे त्याने माती केली. शेवटच्या टेस्टमध्ये राहणेला संधी दिली. त्याने महत्वाचे योगदान दिले.
आता सध्या भारतीय टीमचा तो उपकर्णधार आहे. ती संधी त्याला इतर मोठी नावे अपयशी ठरल्यामुळे मिळाली. पण तरीही त्याचं स्थान पक्कं असतंच असं नाही. कोणीतरी रोहित शर्मा , हार्दिक पंड्या प्रीमिअर लीगमध्ये , घरच्या मैदानावर रन्स काढतात आणि विदेशात कसोटीत राहणेच्या जागी त्यांना घेतलं जातं. लाऊड भारत देशात हिरो हा अभिनेत्यावर भारी पडतो.
मध्यंतरी धोनी कॅप्टन असताना अजिंक्य रहाणेला टीममधून वगळण्याचं अजब कारण सांगितलं होतं की तो सिंगल्स काढून स्ट्राईक बदलू शकत नाही.
त्यापूर्वी रैना, अंबाती रायडूची जागा पक्की करण्यासाठी रहाणेला प्लेयिंग इलेव्हनमधून सतत डावललं जाई. भारतीय उपखंडात क्रिकेटमध्ये कॅप्टन्स, पावर असलेले लोक आपल्या दोस्ता मित्रांना असेच फेवर करत असतात. मग ते क्रिकेट असो, राजकारण की आणखी कुठलं सेक्टर.
अश्याप्रकारे एक बऱ्यापैकी तंत्रशुद्ध फलंदाज , एक्स फॅक्टर नसल्याने मोठ्या नावांखाली नेहमी झाकोळल्या गेला.
अजिंक्य रहाणे सम्पूर्णतः तांत्रिकदृष्टया उत्तम फलंदाज नाही. इतर भारतीय बॅट्समनसची जिथे आऊटस्विंगवर भंबेरी उडते तेथे हा इनस्विंगवर , ऑफकटर
वर बरेचदा एलबीडब्ल्यू, बोल्ड होतो. राहुल द्रविडला करिअरच्या उत्तरार्धात हा त्रास झाला होता तो अजिंक्य रहाणेला सुरवातीपासून आहे. चेतेश्वर पुजाराचाही हाच प्रॉब्लेम.
#अजितआगरकर सहा बॉलमध्ये एक बॉल विकेट घेणारा टाकायचा बाकी पाच वाईट. तसा अजिंक्य रहाणे छान खेळत असताना गरज नसताना अचानक आक्रमक फटका, चुकीचा शॉट खेळून विकेट देऊन जातो.
अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात तो कॅप्टन आहे. त्यापूर्वी विराट कोहली तंदूरस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील टेस्टमध्ये त्याने कॅप्टन्सी केलेली होती. त्या मॅचमध्ये त्याने कुलदीप यादवला संधी दिली होती. त्या मॅचमध्ये तो हुकूमचा एक्का ठरला होता.
नेहमी इतरांना संधी मिळाल्यावर ते अपयशी झाल्यावर संधी मिळणारा हा शंभर टक्के प्रयत्न करणारा क्रिकेटर. मागच्या टूरवेळी लॉर्ड्स गाजवणारा या खेळाडूला आता येत्या इंग्लिश टूरमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. कारण लॉर्ड्सचं आणि लीड्सचं घोडामैदान आता फक्त दीड महिन्यावर आहे.
#AjinkyaRahanesbirthday
- Abhijeet Panse
भारतीय टीममध्ये नेहमीच असे काही , कोणाचाही अवास्तव , “आऊट ऑफ द वे” पाठिंबा नसलेले, “एक्स फॅक्टर” नसलेले पण तांत्रिकदृष्ट्या बऱ्यापैकी भक्कम, खणखणीत नाणं असलेले खेळाडू होते, आहेत. जे छोट्या छोट्या भूमिका..तात्पुरती रिप्लेसमेंट्स म्हणून आलेत.. आणि स्वतःच्या खेळीने सतत बीसीसीआयच्य दरवाजा ठोठावत , “दार उघड बुआ दार उघड” करत स्वतःच्या भरवशावर स्वतःचा प्रवेश करते झाले. त्यातील एक नाव, अजिंक्य रहाणे.
अजिंक्य रहाणेला भारतीय टीममध्ये संधी नशिबानेच मिळाली म्हणावी लागेल. याचा अर्थ त्याच्यात कौशल्य नव्हतं वा तो त्यासाठी योग्य नव्हता असं नव्हतं. पण तो काही कॅप्टन धोनीज स्टार किड्स , सुरेश रैना, रवींद्र जडेजा वा तत्कालीन कॅप्टनस किड अंबाटी रायडू नव्हता, ज्यांच्यावर कॅप्टन धोनीची पूर्ण मर्जी बहाल होती. दरवेळी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये केशरी कॅप होल्डरच्या स्पर्धेत असणारा, मिळवणारा अजिंक्य राहाणेकडे बँकेत देशांतर्गत क्रिकेटमधील रन्स होते. पण त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळत नव्हती.
2013 चा भारतीय क्रिकेटचा भारतातील मौसम सुरू झाला तो प्रसिद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्याने. पहिलीच मॅच खेळत असलेल्या शिखर धवनने खणखणीत शतक हाणलं. पण पुढील मॅचसाठी तो तंदुरुस्त राहिला नाही. त्याच्यजागी आलेल्या गौतम गंभीरला ऐनवेळी कावीळ झाली. त्यामुळे शेवटच्या क्षणी अजिंक्य रहाणेला कसोटी सामन्यासाठी संघात समाविष्ट करण्यात आले. पहिल्या कसोटीत तो अपयशी ठरला.
आपल्याकडे बॅट्समनला विदेशी दौऱ्यांवर कसोटी कारकिर्दीची सुरवात करायला कधीही आवडत नसते. कारण इथे अपयशी ठरल्यास, ज्याची शक्यता हमखास असतेच, पुन्हा संधी मिळणे कठीण असते. “डेब्यु नको पण विदेशी दौरा आवर” अशी नवफलंदाजांची अवस्था असते. अजिंक्य राहणेची कारकीर्दच अशी प्रवाहाच्या विरुद्ध झाली. पहिल्या टेस्टमध्ये अपयशी झाल्यावर त्याची निवड अतिखडतर अश्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाली. तिथे त्याने अत्यन्त कठीण परिस्थितीत रन्स काढलेत पण पहिल्या वहिल्या शतकापासून तीन ते चार रन्सने वंचित राहिला. त्या इनिंगमध्ये आऊट होणारा तो शेवटचा बॅट्समन होता.
त्यानंतर लगेच न्यूझीलंड दौऱ्यात त्याची निवड झाली. मध्यंतरी श्री श्री सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यामुळे अजिंक्य राहणेची संघात निवड होण्याची शक्यता वाढत गेली. गॉडफादर कॅप्टन धोनीचे लाडोबा रोहित शर्माचे लाड करूनही ते कसोटीत अपयशी ‘ठरल्यामुळे(च) राहणेला संधी मिळत गेली. न्यूझीलंडमध्ये कठीण परिस्थितीत अजिंक्य रहाणेने टेस्ट शतक ठोकले.
आणि त्यानंतर सुरू झाला इंग्लंड दौरा! लॉर्ड्सचं मैदान! लॉर्ड्स टेस्ट मॅच!
फक्त पिचवरच इंग्लंडच्या धष्टपुष्ट गायी
आणि वळू सोडले असते तरी कसोटीचे पाच दिवसही ते मस्त चरले असते . इतकं खेळपट्टीवर हिरवं गवत होतं. मैदान आणि खेळपट्टीत फरक कळत नव्हता. फुटबॉलचं मैदान झालं होतं.
असं हिरवेगार मैदान दिसलं की नागपूरला टेस्ट सुरू व्हायच्या दोन तासांपूर्वी जखमी असल्याचे कारण सांगून मॅच न खेळणारा #कॅप्टनसौरवगांगुली आठवतो.
या घटनेची मॅथ्यू हेडनने त्याच्या आत्मचरित्रात टर उडवली आहे. असो.
दुष्काळात तेरावा महिना तसा त्या लोर्ड्सच्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर भारत टॉस हरला.
क्रूक अॅलिस्टर कूकने LOL करत भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्यावेळी तो नक्कीच आसुरी आनंदाने खदखदत हसला असावा. भारतीय टीम शंभर रन्सच्या आत आऊट होईल हे सर्वांना वाटले.
पहिल्याच ओव्हरमध्ये जिमी अँडरसनने शब्दशः अशक्य बॉल टाकला. सत्तरच्या कोनात इनस्विंग होऊन डावखोऱ्या शिखर धवनला काही कळायच्या आत तो आऊट झालाही होता.
विराट कोहलीचा अॅवरेज त्या दौऱ्यात 13 चा होता. तो फक्त ‘मम’ म्हणून बॅटिंग करायला यायचा. आणि परत जायचा.
भारतीय टीमची अवस्था अत्यन्त बिकट झाली. तेव्हा अजिंक्य राहाणेने भुवनेश्वर कुमारसोबत भागीदारी करत स्वतःचे अविस्मरणीय , अशक्य, अफलातून शतक पूर्ण केले. तेही द लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर. खरंतर त्याने त्या दिवशी शतक केलं नाही तर शतक हाणलं.
लोर्ड्सच्या प्रसिद्ध बाल्कनीतून संपूर्ण भारतीय टीमने अजिंक्य रहाणेचे अभिवादन केले. अजिंक्य रहाणे लॉर्ड्स मैदानावर शतक करणारा दुसरा मराठी क्रिकेटर ठरला. पहिलं नाव जास्त आश्चर्यकारक आहे.
लॉर्ड्सच्या मैदानात त्या दिवशी राहणेहसोबत भुवनेश्वर कुमारनेही अत्यन्त महत्त्वाचे तिशीत रन्स काढलेत. हा माणूस प्रत्येक दौऱ्यात बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये महत्त्वाचे योगदान देतो. पण तरीही महापौर ..ऑलउंडर आमचाच ! हार्दिक पंड्याच!
जी मॅच भारत वाईटरित्या हरणार अशी मॅचच्या सुरवातीलाच सगळ्यांना खात्री होती; भारतीय समर्थकांसकट, ती मॅच भारताने जिंकली. लॉर्ड्सवर विजय साकारला. त्याचा शिल्पकार होता अजिंक्य रहाणे. लोर्ड्सवर LOL करण्याची वेळ भारताची होती.
पूढे 014- 015 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पुन्हा शतक केलं. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर श्रीलंकेत शतक केलं. अश्याप्रकारे त्याने त्याची प्रथम चार शतकं भारताबाहेर कठीण परिस्थितीत काढली. हाही एक विक्रम आहे.
पण पुढे त्याचा फॉर्म चांगला वाईट होत राहिला. आणि मुळात तो रोहित शर्मासारखा , सुरेश रैना, सर (इथे हास्य मुद्रा) जडेजा सारखा स्टार कीड नसल्याने , ज्याच्यासाठी खास कमबॅक करायला खास भारतीय खेळपट्टीवर लॉंचिंग केल्या जाईल , सतत संधींवर संधी मिळत जाईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे राहणे 015 नंतर सतत आत बाहेर होत राहिला.
गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही कोहलीने अजिंक्य रहाणेला डावलून (तथाकथित) एक्स फॅक्टर असलेल्या, मोठं नाव, हिरॉइझम असलेल्या कसोटीतील टुकार बॅट्समन रोहित शर्माला संधी दिली. नेहमीप्रमाणे त्याने माती केली. शेवटच्या टेस्टमध्ये राहणेला संधी दिली. त्याने महत्वाचे योगदान दिले.
आता सध्या भारतीय टीमचा तो उपकर्णधार आहे. ती संधी त्याला इतर मोठी नावे अपयशी ठरल्यामुळे मिळाली. पण तरीही त्याचं स्थान पक्कं असतंच असं नाही. कोणीतरी रोहित शर्मा , हार्दिक पंड्या प्रीमिअर लीगमध्ये , घरच्या मैदानावर रन्स काढतात आणि विदेशात कसोटीत राहणेच्या जागी त्यांना घेतलं जातं. लाऊड भारत देशात हिरो हा अभिनेत्यावर भारी पडतो.
मध्यंतरी धोनी कॅप्टन असताना अजिंक्य रहाणेला टीममधून वगळण्याचं अजब कारण सांगितलं होतं की तो सिंगल्स काढून स्ट्राईक बदलू शकत नाही.
त्यापूर्वी रैना, अंबाती रायडूची जागा पक्की करण्यासाठी रहाणेला प्लेयिंग इलेव्हनमधून सतत डावललं जाई. भारतीय उपखंडात क्रिकेटमध्ये कॅप्टन्स, पावर असलेले लोक आपल्या दोस्ता मित्रांना असेच फेवर करत असतात. मग ते क्रिकेट असो, राजकारण की आणखी कुठलं सेक्टर.
अश्याप्रकारे एक बऱ्यापैकी तंत्रशुद्ध फलंदाज , एक्स फॅक्टर नसल्याने मोठ्या नावांखाली नेहमी झाकोळल्या गेला.
अजिंक्य रहाणे सम्पूर्णतः तांत्रिकदृष्टया उत्तम फलंदाज नाही. इतर भारतीय बॅट्समनसची जिथे आऊटस्विंगवर भंबेरी उडते तेथे हा इनस्विंगवर , ऑफकटर
वर बरेचदा एलबीडब्ल्यू, बोल्ड होतो. राहुल द्रविडला करिअरच्या उत्तरार्धात हा त्रास झाला होता तो अजिंक्य रहाणेला सुरवातीपासून आहे. चेतेश्वर पुजाराचाही हाच प्रॉब्लेम.
#अजितआगरकर सहा बॉलमध्ये एक बॉल विकेट घेणारा टाकायचा बाकी पाच वाईट. तसा अजिंक्य रहाणे छान खेळत असताना गरज नसताना अचानक आक्रमक फटका, चुकीचा शॉट खेळून विकेट देऊन जातो.
अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यात तो कॅप्टन आहे. त्यापूर्वी विराट कोहली तंदूरस्त नसल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील टेस्टमध्ये त्याने कॅप्टन्सी केलेली होती. त्या मॅचमध्ये त्याने कुलदीप यादवला संधी दिली होती. त्या मॅचमध्ये तो हुकूमचा एक्का ठरला होता.
नेहमी इतरांना संधी मिळाल्यावर ते अपयशी झाल्यावर संधी मिळणारा हा शंभर टक्के प्रयत्न करणारा क्रिकेटर. मागच्या टूरवेळी लॉर्ड्स गाजवणारा या खेळाडूला आता येत्या इंग्लिश टूरमध्ये जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. कारण लॉर्ड्सचं आणि लीड्सचं घोडामैदान आता फक्त दीड महिन्यावर आहे.
#AjinkyaRahanesbirthday
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment