हा "हृषीकेश जोशी" नावाचा इसम कधी भेटला तर मला त्याला मिठी मारायची आहे. किती नितांत सुंदर काम करतो हा माणूस! मसाला मधील ‘तो’ सायकल मधील ‘हा’, दोन्ही टोकाच्या भूमिका डोंगरावरून अलगद झरा कोसळावा तसा अगदी सहज अभिनय करतो. खरंतर नाट्यभूमीचा कलाकार असल्याने त्याच्यासाठी या दोन्ही भूमिका करणे म्हणजे खायचं काम होतंच. पण तरिही सायकल मधील त्याचा वावर, अस्तित्व हेच डोळयांना मेजवानी वाटते. तो चित्रपट खाऊन टाकतो.
सायकल एक अगदी सहज, शांत, तरल चित्रपट.
एरवी ‘कोंकण’ पार्श्वभूमी असलेले चित्रपट बघताना , दिग्दर्शकावर ठराविक पद्ध्तीनेच, चाकोरीबद्ध कोंकण दाखवलं पाहिजे याचा ताण असतो का, ही शंका येत राहते. कारण सर्वच “कोंकण चित्रपटात” पावसाळ्यातील हिरवाकंच निसर्ग, ठराविक पुस्तकी- सिनेमॅटोग्राफिक कोंकणच दाखवला जातो. प्रत्यक्षात एरवी तसा दिसणारसुद्धा नाही. पण सायकलमध्ये असं कुठलंही स्टिरिओटाईप न होता सहज कोंकण दर्शन दाखवलंय. ही गोष्ट विशेष आवडली.
प्रियदर्शन जाधव! याच्या लेखणीचा चाहता मी आधीपासूनच आहे. पण त्याचा अभिनयही तितकाच मस्त असतो.
प्रियदर्शन जाधवला खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर बघितल्याने छान वाटलं.
"दीप्ती लेले". “मृण्मयी देशपांडेचं” लग्न झाल्यावर ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या माझ्या हृदयाला ‘पुन्हा’ असेंम्बल करणारा आशेचा किरण दीप्ती लेलेच्या रुपात दिसतोय. खूप सुंदर बोलका चेहरा. इन्स्टाग्राम ही खूप ऍक्टिव्ह. तिनेही साजूक तुपातला अभिनय केलाय.
अँड देन ही कम्स! भाऊसाहेब “ भालचंद्र कदम”! स्वतःच्या नुसत्या अस्तित्वानेच हसायला लावणारा हा नट. नेमक्या योग्य वेळी चेहऱ्यावर विनोदी निरागस भाव, आपल्या खास (खर्जात?) आवाजात एखादं वाक्य, शब्द म्हणून दृश्यावर प्रभाव टाकणारा. यालाही मिठी मारायचीच आहे.
चित्रपटात काही छोट्या छोट्या दृश्यांनी सुंदर परिणामकारकता साधली गेलेली आहे.
प्रदीप वेलणकरांचं दृश्य खूप मस्त.
चित्रपटाच्या सुरवतीलाच लिहून येतं, की या सिनेमतील काळ, जेव्हा लोक साधी होती तेव्हाचा आहे. आणि तो काळ, तो भाव सम्पूर्ण चित्रपटात जाणवत राहतो.
सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य, “ आणि वस्तुंमध्ये किती काळ रमायचं ना!” हे. सिनेमाचा शेवट सुद्धा या वाक्याच्या अभिव्यक्तिवरच होतो.
नितांत सुंदर , गोड सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतो. आणि ते वाक्य आठवत राहतं ," वस्तूंमध्ये किती काळ रमायचं! " ......
- Abhijeet Panse
सायकल एक अगदी सहज, शांत, तरल चित्रपट.
एरवी ‘कोंकण’ पार्श्वभूमी असलेले चित्रपट बघताना , दिग्दर्शकावर ठराविक पद्ध्तीनेच, चाकोरीबद्ध कोंकण दाखवलं पाहिजे याचा ताण असतो का, ही शंका येत राहते. कारण सर्वच “कोंकण चित्रपटात” पावसाळ्यातील हिरवाकंच निसर्ग, ठराविक पुस्तकी- सिनेमॅटोग्राफिक कोंकणच दाखवला जातो. प्रत्यक्षात एरवी तसा दिसणारसुद्धा नाही. पण सायकलमध्ये असं कुठलंही स्टिरिओटाईप न होता सहज कोंकण दर्शन दाखवलंय. ही गोष्ट विशेष आवडली.
प्रियदर्शन जाधव! याच्या लेखणीचा चाहता मी आधीपासूनच आहे. पण त्याचा अभिनयही तितकाच मस्त असतो.
प्रियदर्शन जाधवला खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर बघितल्याने छान वाटलं.
"दीप्ती लेले". “मृण्मयी देशपांडेचं” लग्न झाल्यावर ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या माझ्या हृदयाला ‘पुन्हा’ असेंम्बल करणारा आशेचा किरण दीप्ती लेलेच्या रुपात दिसतोय. खूप सुंदर बोलका चेहरा. इन्स्टाग्राम ही खूप ऍक्टिव्ह. तिनेही साजूक तुपातला अभिनय केलाय.
अँड देन ही कम्स! भाऊसाहेब “ भालचंद्र कदम”! स्वतःच्या नुसत्या अस्तित्वानेच हसायला लावणारा हा नट. नेमक्या योग्य वेळी चेहऱ्यावर विनोदी निरागस भाव, आपल्या खास (खर्जात?) आवाजात एखादं वाक्य, शब्द म्हणून दृश्यावर प्रभाव टाकणारा. यालाही मिठी मारायचीच आहे.
चित्रपटात काही छोट्या छोट्या दृश्यांनी सुंदर परिणामकारकता साधली गेलेली आहे.
प्रदीप वेलणकरांचं दृश्य खूप मस्त.
चित्रपटाच्या सुरवतीलाच लिहून येतं, की या सिनेमतील काळ, जेव्हा लोक साधी होती तेव्हाचा आहे. आणि तो काळ, तो भाव सम्पूर्ण चित्रपटात जाणवत राहतो.
सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य, “ आणि वस्तुंमध्ये किती काळ रमायचं ना!” हे. सिनेमाचा शेवट सुद्धा या वाक्याच्या अभिव्यक्तिवरच होतो.
नितांत सुंदर , गोड सिनेमा बघितल्याचा अनुभव मिळतो. आणि ते वाक्य आठवत राहतं ," वस्तूंमध्ये किती काळ रमायचं! " ......
- Abhijeet Panse
No comments:
Post a Comment