2011चा वर्ल्ड कप भारताने जिंकला खरा पण त्यानंतर भारतीय कसोटी क्रिकेटसाठी दोन वर्षांसाठी काळ खडतर गेला. बॉलिंग कक्ष कमजोर पडला होता. प्रमुख स्पिनर हरभजनसिंग जवळपास संपला होता, झहीर खान दुखापती ग्रस्त राहिला. फिरकीपटूपैकी प्रज्ञान ओझा, अमित मिश्रा सतत आत बाहेर होत होते. रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमध्ये नामोनिशाण नव्हतं. अश्यावेळी आला नवोदित गोलंदाज चेन्नईचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन! 2011 च्या दिवाळीत वेस्ट इंडिजची टीम भारतीय दौऱ्यावर आली. त्यात प्रथमच आपलं कसोटी क्रिकेटचं नारळ वाढवलं रवी चंद्रन अश्विनने.
स्वप्नातीत वाटावं असा त्याने खेळ केला तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेत !
सगळ्यात जास्त विकेट्स आणि शिवाय हरभजनसिंग ला आपले
कसोटीमधील प्रथम शतक करायला दहा वर्षे लागलेत तिथे या ऑफ स्पिनरने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत दोन शतके हाणलीत आणि सगळ्यात जास्त विकेट्स घेतल्या आणि "मॅन ऑफ द सिरीज" झाला.
विमान ..फ्लाईट आकाशात उडताना छोटी मुलं डोळे भरून बघतात तसा टीव्हीवर बघताना सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटतील अशी ऑफस्पिनरचा बॉलला फ्लाईट ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर लाईन आणि अचूक "गूड लेग्थ" टप्पा टीव्हीवर बघतानासुद्धा डोळ्यांचे पारणे फिटायचे. पण 2013 ते 015 याकाळात तो अगदीच नकारात्मक गोलंदाज बनला! बॅट्समनच्या पायावर , लेग स्टंप वर गोलंदाजी करू लागला. बॉलमधील फ्लाईट विमान आकाशातून सरळ धावपट्टीवर धावू लागलं. बॅट्समनच्या डोळ्यांच्या पातळीच्या वरचा बॉल आता बॅट्समनच्या उदराच्या पातळीवर येऊ लागला. त्याची नकारात्मक बॉलिंग बघून त्याची अक्षरशः चीड येऊ लागली. तो टीममध्ये नको आता वाटू लागलं. जी नकारात्मक, सुरक्षणात्मक गोलंदाजी हरभजनसिंगने करिअरच्या शेवटी करायला सुरुवात केली होती ती रवी अश्विनने अगदी दोन वर्षातच सुरवात केली. हरभजनसिंग त्याच्या याच डिफेनसिव्ह बॉलिंगमुळे संपला तो अश्विन पहिल्या दोन वर्षांतच संपतोय असं वाटलं.
अश्विन चा कुमार गौरव, रॉय होणार असं वाटू लागलं. वन मुव्ही वंडर ऍक्टरप्रमाणे हा वन इअर क्रिकेटर होता असं वाटलं.पण 2016 पासून त्याने स्वतःमध्ये खूप बदल केलेत, आत्मपरीक्षण केलं. मेहनत केली आणि अति 'वेरायटीज' च्या मागे लागण्यापेक्षा त्याने पारंपरिक ऑफ स्पिनवर लक्ष केंद्रित केलं.
मधल्या काळात 'दुसरा' या जालीम अस्त्रावर आयसीसीची कडवी दृष्टी पडल्याने त्या अस्त्राला हद्दपार केले होते. या जालीम अस्त्राने सकलेन मुश्ताक, थलैवा मुथैय्याला रणकर्कश केलं होतं, ज्या 'दुसरा ' अस्त्रामुळे मोहम्मद हाफिज अजेय बनला होता त्या अस्त्रालाला आयसीसीने रद्दबातल केले. त्यामुळे " कॅरम बॉल'' वर या मूळ मेंडिसास्त्रावरच अवलंबून झालेल्या अश्विनने पारंपरिक ऑफस्पिन वर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आणि पुढील दोन वर्षात तीन साल का भुला अश्विन 2016 वर्षाच्या शाम को फिरसे लौट आया!
आज अश्विन जबरदस्त गोलंदाज बनला आहे. गेल्या वर्षभरात त्याने ऐंशीच्या वर विकेट्स घेतल्यात.
आजच त्याने नागपुरात लंकेविरुद्ध 300 तीनशे टेस्ट विकेट्स पूर्ण केलेत, जो एक अत्यन्त महत्वाचा टप्पा कोणत्याही बॉलरच्या करिअरमध्ये असतो.
अश्विन बद्दल मी नेहमी म्हणतो की हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन व्हायला हवा. तो एक अत्यन्त "थॉट प्रोसेस" थ्रू जाणार , 'थिंकिंग' खेळाडू आहे. एक अस्सल दाक्षिणात्य खेळाडू नेहमीच कॅप्टन म्हणून मला आवडतो. दिल्लीच्या आणि दाक्षिणात्य खेळाडूंच्या मानसिकतेत थोडा फरक असतो. कॅप्टन असताना तो स्पष्ट जाणवतो.
अश्विन हा कर्णधार म्हणून खूप यशस्वी होऊ शकतो हे मला मनापासून वाटतं. ऑन एकंदरीतच भारतीय मानसिकता, वर्गातील हुशार मुलाला कॅप्टन , मॉनिटर बनवायची असते; त्यामुळे नेहमी टीममधील रन्स काढणाऱ्या बॅट्समनलाच कॅप्टन बनवलं जातं.
महेंद्र धोनीवेळी परिस्थितीकारणामुळे तसं केलं नसल्याने भारताला जबरदस्त कर्णधार मिळाला.
पण रवी अश्विन कॅप्टन होण्याची शक्यता कमी आहे कारण चाहल आणि कुलदीप दोन उत्कृष्ट स्पिनर्स भारतीय टीममध्ये आले आहेत. त्यामुळे अश्विनची संघात वर्णी लागेलच असे नाही. पण कधीतरी अश्विनला कॅप्टनशिप करताना बघायची इच्छा आहे.
पुढील महिन्यात भारतीय टीम खडतर दक्षिण आफ्रिकेत जातेय तिथे त्याची कसोटी लागेल यात शंका नाही. पण किमान तो आता 'बेसिक' गोष्टी नीट करतोय ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे!
अभिनंदन रवीचंद्रन अश्विन!
स्वप्नातीत वाटावं असा त्याने खेळ केला तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेत !
सगळ्यात जास्त विकेट्स आणि शिवाय हरभजनसिंग ला आपले
कसोटीमधील प्रथम शतक करायला दहा वर्षे लागलेत तिथे या ऑफ स्पिनरने आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत दोन शतके हाणलीत आणि सगळ्यात जास्त विकेट्स घेतल्या आणि "मॅन ऑफ द सिरीज" झाला.
विमान ..फ्लाईट आकाशात उडताना छोटी मुलं डोळे भरून बघतात तसा टीव्हीवर बघताना सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटतील अशी ऑफस्पिनरचा बॉलला फ्लाईट ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर लाईन आणि अचूक "गूड लेग्थ" टप्पा टीव्हीवर बघतानासुद्धा डोळ्यांचे पारणे फिटायचे. पण 2013 ते 015 याकाळात तो अगदीच नकारात्मक गोलंदाज बनला! बॅट्समनच्या पायावर , लेग स्टंप वर गोलंदाजी करू लागला. बॉलमधील फ्लाईट विमान आकाशातून सरळ धावपट्टीवर धावू लागलं. बॅट्समनच्या डोळ्यांच्या पातळीच्या वरचा बॉल आता बॅट्समनच्या उदराच्या पातळीवर येऊ लागला. त्याची नकारात्मक बॉलिंग बघून त्याची अक्षरशः चीड येऊ लागली. तो टीममध्ये नको आता वाटू लागलं. जी नकारात्मक, सुरक्षणात्मक गोलंदाजी हरभजनसिंगने करिअरच्या शेवटी करायला सुरुवात केली होती ती रवी अश्विनने अगदी दोन वर्षातच सुरवात केली. हरभजनसिंग त्याच्या याच डिफेनसिव्ह बॉलिंगमुळे संपला तो अश्विन पहिल्या दोन वर्षांतच संपतोय असं वाटलं.
अश्विन चा कुमार गौरव, रॉय होणार असं वाटू लागलं. वन मुव्ही वंडर ऍक्टरप्रमाणे हा वन इअर क्रिकेटर होता असं वाटलं.पण 2016 पासून त्याने स्वतःमध्ये खूप बदल केलेत, आत्मपरीक्षण केलं. मेहनत केली आणि अति 'वेरायटीज' च्या मागे लागण्यापेक्षा त्याने पारंपरिक ऑफ स्पिनवर लक्ष केंद्रित केलं.
मधल्या काळात 'दुसरा' या जालीम अस्त्रावर आयसीसीची कडवी दृष्टी पडल्याने त्या अस्त्राला हद्दपार केले होते. या जालीम अस्त्राने सकलेन मुश्ताक, थलैवा मुथैय्याला रणकर्कश केलं होतं, ज्या 'दुसरा ' अस्त्रामुळे मोहम्मद हाफिज अजेय बनला होता त्या अस्त्रालाला आयसीसीने रद्दबातल केले. त्यामुळे " कॅरम बॉल'' वर या मूळ मेंडिसास्त्रावरच अवलंबून झालेल्या अश्विनने पारंपरिक ऑफस्पिन वर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आणि पुढील दोन वर्षात तीन साल का भुला अश्विन 2016 वर्षाच्या शाम को फिरसे लौट आया!
आज अश्विन जबरदस्त गोलंदाज बनला आहे. गेल्या वर्षभरात त्याने ऐंशीच्या वर विकेट्स घेतल्यात.
आजच त्याने नागपुरात लंकेविरुद्ध 300 तीनशे टेस्ट विकेट्स पूर्ण केलेत, जो एक अत्यन्त महत्वाचा टप्पा कोणत्याही बॉलरच्या करिअरमध्ये असतो.
अश्विन बद्दल मी नेहमी म्हणतो की हा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन व्हायला हवा. तो एक अत्यन्त "थॉट प्रोसेस" थ्रू जाणार , 'थिंकिंग' खेळाडू आहे. एक अस्सल दाक्षिणात्य खेळाडू नेहमीच कॅप्टन म्हणून मला आवडतो. दिल्लीच्या आणि दाक्षिणात्य खेळाडूंच्या मानसिकतेत थोडा फरक असतो. कॅप्टन असताना तो स्पष्ट जाणवतो.
अश्विन हा कर्णधार म्हणून खूप यशस्वी होऊ शकतो हे मला मनापासून वाटतं. ऑन एकंदरीतच भारतीय मानसिकता, वर्गातील हुशार मुलाला कॅप्टन , मॉनिटर बनवायची असते; त्यामुळे नेहमी टीममधील रन्स काढणाऱ्या बॅट्समनलाच कॅप्टन बनवलं जातं.
महेंद्र धोनीवेळी परिस्थितीकारणामुळे तसं केलं नसल्याने भारताला जबरदस्त कर्णधार मिळाला.
पण रवी अश्विन कॅप्टन होण्याची शक्यता कमी आहे कारण चाहल आणि कुलदीप दोन उत्कृष्ट स्पिनर्स भारतीय टीममध्ये आले आहेत. त्यामुळे अश्विनची संघात वर्णी लागेलच असे नाही. पण कधीतरी अश्विनला कॅप्टनशिप करताना बघायची इच्छा आहे.
पुढील महिन्यात भारतीय टीम खडतर दक्षिण आफ्रिकेत जातेय तिथे त्याची कसोटी लागेल यात शंका नाही. पण किमान तो आता 'बेसिक' गोष्टी नीट करतोय ही भारतासाठी चांगली गोष्ट आहे!
अभिनंदन रवीचंद्रन अश्विन!
No comments:
Post a Comment